‘जयभीम’ हा तमीळ सिनेमा जबरदस्त आहे. इतर अनेक भाषांत तो OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपण जातीय अन्यायग्रस्तांना कसा न्याय मिळवून देऊ शकतो याचे, हा सिनेमा उत्कृष्ट उदाहरण आहे. सामाजिक भान असलेल्या वकीलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच जेलमधून सुटलेल्यांना त्यांची जात विचारून त्यातील SC/ST ना जेलर वेगळे उभे करतो व इतरांना घरी सोडतो. त्यांना घेण्यासाठी विविध पोलिसस्टेशनचे इन्स्पेक्टर आलेले असतात, जे यांना प्रलंबित खटल्यांमध्ये अडकवण्यासाठी पुन्हा घेऊन जातात हे दाखवले आहे.
Author archives
अमेरिके, ट्रम्पची रात्र आहे; भारता, जागा रहा
अमेरिकेत २०१६ साली रिपब्लिकन पक्षाचे डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्याचे सर्वांत मोठें आश्चर्य त्यांना स्वतःलाच वाटले होते. जरी निवडणुकीआधी खुद्द नरेंद्र मोदी ट्रम्प यांची उत्साहाने भलावण करून गेले होते तरी!
अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या जागतिकीकरण धोरणामुळे हजारो अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्या कमी वेतनात काम करून घेणाऱ्या देशात पसार झाल्या. इतकेच नव्हे तर परदेशातून अमेरिकेत आलेल्या लक्षावधी कामगारांनी गोऱ्या लोकांपेक्षा कमी वेतनात नोकऱ्या स्विकारल्या.त्यांच्या बेकारीला आणि असंतोषाला कोणत्याच राजकीय पक्षाकडे उत्तर नव्हते. त्यांतून खतपाणी मिळालेल्या वर्णद्वेषाला डॉनल्ड ट्रम्पने इंधन घातले. गौरेतरांना आणि मुसलमानांना अमेरिकेत येऊ देणार नाही असे आश्वासन दिले. मात्र
लोकशाही, राजकारण आणि द्वेषपूर्ण भाषण
हरिद्वारच्या कथित ‘धर्मसंसद’मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या घटनेसंदर्भात रविवार, २६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. या द्वेषपूर्ण भाषणांची सु-मोटो दखल घेण्याची विनंती या पत्रात सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक नेत्यांनी नरसंहाराची हाक देशासाठी “गंभीर धोका” असल्याचे म्हटले आहे. ‘धर्म संसद’मध्ये केलेल्या वादग्रस्त चिथावणीखोर विधानांवरून नागरी समाजासह डाव्या पक्षांनीही सोमवारी २७ डिसेंबर रोजी दिल्लीतील उत्तराखंड भवनात निदर्शने केली. या निदर्शनात नरसंहाराची मागणी करणाऱ्या तथाकथित संतांना त्वरित अटक करण्याची आणि अशा द्वेषपूर्ण परिषदांच्या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
मराठी साहित्य सम्मेलनाचा अखिल भारतीय तमाशा
आपले तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलन परंपरेप्रमाणे आपला घरंदाज घाटीपणा सिद्ध करून गेले. माय मराठी, माझा मऱ्हाटीची बोलू कवतुके, लाभले भाग्य आम्हा, मराठी माणूस, अणूरेणू या तोकडा, मराठी वर्ष, मराठी अस्मिता….. अशा नानाविध अस्मितादर्शी पताका आम्ही रोवल्या आहेत. हे आम्ही पांघरलेलं वाघाचं कातडं, साहित्यसम्मेलनात आपोआप गळून पडतं. साहित्यसम्मेलन आलं की गर्दी जमवण्यासाठी आम्हाला कुणी चिंटू भगत, जावेदभाऊ अख्तर यांच्या रूपाने वाघ बाहेरून आणावा लागतो. आणि आम्ही सारे बनगरवाडीतील मेंढरं म्हणून आपले घरंदाज घाटीपण खालच्या मानेनं सिद्ध करतो.
सम्मेलन जाहीर झाले की बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा आधीच बेतलेला/pre-cooked वाद सुरू करून आम्ही माय मराठीच्या अस्मितेवर थुंकायला सुरुवात करून आमच्या घरंदाज घाटी ॲटिट्यूडची दिवाळी साजरी करायला सुरुवात करतो.
अर्थात! तुमचे बोट तुमच्याच डोळ्यात…!
नागरीकरणाच्या प्रक्रियेत माणूस कधीतरी टोळी करून राहू लागला. त्याची अवस्था जरी रानटी असली तरी शेतीच्या शोधाने काही प्रमाणात का होईना त्याच्या जगण्याला स्थिरता लाभली. संवादाच्या गरजेतून भाषा निपजली. व्यक्तिंच्या एकत्रीकरणातून समाज निर्माण झाला. पुढे कधीतरी ‘राष्ट्र’, ‘देश’ ह्या संज्ञा रूढ झाल्या. अनाकलनीय घटकांच्या भीतीतून वा नैतिक शिकवणुकीसाठी धर्म समोर आला. धर्म मानवाला तथाकथित नीती शिकवू लागला. ह्या धर्माला प्रचलित रूप देण्यात व समाजावर हा धर्म थोपवण्यात एका विशिष्ट समूहाचे वर्चस्व दिसून येते.
स्वप्न
समाजवादी
धर्मनिरपेक्ष–लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर
भेदाभेदाचा उत्कलनांक जाळून टाकतो कित्येकांना
कुणाही सौंदर्यवतीच्या
गालावरचा तीळ
महत्त्वाचा नाहीये
उपयुक्त आहे
आरक्षणाचा बिंदू
प्रेमीजनांचा होकार किंवा नकार,
एकत्रीकरण किंवा अलगीकरण
यापेक्षा खळबळजनक आहे
वाढत जाणारं खाजगीकरण
अर्थात,
संधीच्या समानतेचं विस्थापन
एक स्वप्न पेरू
लोकशाहीच्या छातीवर
मग होईल या मातीवर
मानवतेच्या उदारीकरणाचं उद्घाटन,
धर्मांध आणि जातींचं उच्चाटन
समानतेची व न्यायाची उजळून वात
नव्याने करून घेऊ स्वातंत्र्याचा उपोद्घात
स.शिक्षक, शिव विद्यालय,चतारी, ता.पातूर जि.अकोला
(‘इंदु‘ कपिलवस्तु नगर,अकोला )
दाणे
राजस दाणे
भरडलेच जातील का?
काही जात्यात
काही सुपात
काही ओंजळीत
तोंडात टाकण्यासाठी
अलगद
काही जमिनीत
मातीआड
कणीस फळवायला
भरडलेच जातील का
राजस दाणे?
सुपातल्या दाण्यानं हसू नये
जात्यातल्या दाण्याला
ओंजळीतल्यांनी
भिऊ नये दातांना
मातृत्वाचे पोवाडे गात
जमिनीत गाडून घ्यायलाही
नसावं आसुसलेलं दाण्यांनी
ओंजळीत पडून
कुण्या लाचाराची
भरू नये झोळी
दाण्यांना फुटावेत डोळे
स्वतःचे टपोरेपण
पाहण्यासाठी
दाण्याना फुटावेत पंख
वाऱ्यासवे उडण्यासाठी
घालू नये जन्माला कणीस
दाण्यांनी
भागवू नये कुणाची भूक
दाण्यांनी थांबवावं
फिरतं जातं
कणखर होऊन…
आवाहन
स्नेह.
नवीन कृषी कायदे मागे घेताना “आम्ही खुल्या अंतःकरणाने शेतकऱ्यांना समजावत राहिलो. पण आमच्याच प्रयत्नात काही कसर राहिली. देशवासियांची आम्ही माफी मागतो.” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. आजवर याच कायद्यांचे गुणगान गाणारे आणि दहशतवादी, माओवादी, सोंग घेतलेले गुंड, एवढेच नव्हे, तर अराजकतावाद्यांचे गिनिपिग्ज अशा वेगवेगळ्या शब्दांत आंदोलनकर्त्यांचा उपमर्द करणारे भारतीय जनता पक्षाचे सदस्य पंतप्रधानांच्या या कथनानंतर वेगळ्याच भूमिकेत शिरले. उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी नवीन कृषी कायदे मागे घेतले असल्याची विरोधकांची सुरू असणारी ओरड दाबण्यासाठी आता “शेतकरी याच देशाचा नागरिक आहे आणि भारताचा प्रत्येक नागरिक आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.” अशी पुस्ती ते जोडू लागले.
पक्षांतर्गत परस्परविरोधी अशा या विधानांमुळे राजकारणात नेतृत्वाचा आणि त्यांच्या निर्णयाचा पाया नेमका कोणत्या तथ्यांवर आधारित असतो याविषयी मनात संभ्रमच उमटतो. मग
मनोगत
‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबरच्या अंकासाठी साहित्य मागवताना आपल्या समाजातील विषमतेवर आणि चढाओढ, स्वार्थ यांसारख्या मूलभूत स्वभाववैशिष्ट्यांवर लिहावे असे आम्ही सुचवले होते.
तदनुषंगाने श्रीधर सुरोशे यांचे बर्ट्रांड रसेल यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ या ग्रंथाचे परीक्षण उल्लेखनीय वाटते. त्यांच्या परीक्षणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अनुक्रमे ग्रंथपरिचय आणि ग्रंथसमीक्षा असा असून यात बर्ट्रांड रसेलांनी आणि डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या विविध संकल्पनांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
या अंकात पुस्तक परीक्षणांना विशेष जागा देता आली याचा आनंद वाटतो. यानिमित्ताने वाचकांची अनेक नव्या व जुन्या उत्तम, वाचनीय अशा पुस्तकांशी ओळख होईल.
विक्रम आणि वेताळ – भाग ६
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, गेल्या खेपेत तू आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधताना आपल्या स्वभावामुळे येणाऱ्या अडचणींविषयी बोललास.
त्यातील पहिली: वैचारिक आणि शारीरिक शक्ती खर्च करण्याची आपली अनिच्छा; आणि त्यातून येणारी सोयीस्कर अनुकरणप्रियता.
दुसरी: अनुक्रमाने घडलेल्या कोणत्याही दोन यादृच्छिक (random) घटनांत काल्पनिक/अतार्किक कार्यकारण संबंध जोडण्याची आपली सवय.
तिसरी: आपल्या विचारात असणारी तर्कदोषाची शक्यता.
चवथी: बुवाबाजीतून, बाबावाक्य प्रमाण मानण्याच्या आपल्या सवयीमुळे, आपली फसवणूक होण्याची शक्यता.