विषय «उवाच»

इतर

मी हे पुस्तक लिहिलं नसतं तर माझ्यासाठी बरं झालं असतं. फार फार बरं झालं असतं. हे लिहिणं मला नको इतकं महागात पडतंय.

किती प्रयत्न करते आहे, आठवायचा, पण आठवतच नाहीय, माझ्यावर पहिल्यांदा अत्याचार कधी झाला. मला जे आठवतं आहे, तीच पहिली वेळ होती की त्याआधीही असं घडलं होतं, आणि मी ते बाहेर येऊच दिलेलं नव्हतं.

या विचारांना काही अर्थ नाही, आणि ते आता महत्त्वाचेही नाहीत, हे कळतं मला; पण हे पुस्तक लिहिताना प्रत्येक वेळी मला माझ्या या विचारांशी लढावं लागतं, आणि ते माझा घात करतात.

पुढे वाचा

कर्मयोगातील हानी

कर्मयोगातील हानी

… आपल्या संस्थांचा जीवनरस उडून जात आहे, त्याचे कारण स्वाध्यायाचा अभाव हे आहे.

आपण कर्मयोगात पडलो आहोत. कर्मयोगात लाभाबरोबर हानीहि होते. शंकराचार्य, रामानुज, बुद्ध, महावीर आदींच्या अनुयायांचे जे काही दोष होते, ते आपण सुधारले आहेत ही गोष्ट खरी. आपण कर्मयोगावर जास्त जोर दिला. ही सुधारणा जरुरीची होती. परंतु ते लोक आत्मज्ञानात जितके खोल उतरत होते, तितके खोल आपण उतरत नाही. यामुळे कार्याच्या विकासाबरोबर आपली विचारनिष्ठा नि तत्त्वनिष्ठा घटत जाते. आपल्या कामाचा बोजा वाढत जातो, पण त्यातील तत्त्व नष्ट होत आहे.

पुढे वाचा

टिप्पणीविना

[ज्यावर काहीच वेगळी टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही अशा बोलक्या चालू-घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हे सदर ह्या अंकापासून सुरू करीत आहोत. वाचकांच्या प्रतिसादाची व सहभागाची अपेक्षा आहे. – संपादक]

१. ‘ओपन सोसायटी जस्टिस इनिशिएटिव्ह’ ही न्यूयॉर्क येथील एक स्वयंसेवी संघटना आहे. ह्या संघटनेतर्फे नुकताच ‘ग्लोबलायज़ींग टॉर्चर’ नावाचा एक २१६-पानी अहवाल प्रकाशित करण्यात आला. सी आय ए. मानवी हक्कांचे उल्लंघन सातत्याने कानी आली आहे, हे सर्वविदित आहे. परंतु, आता सी आय ए ने ह्या ‘कामांची’ व्याप्ती वाढवली आहे. संशयावरून कोणाही व्यक्तीला ताब्यात घेणे, कोणतीही कायदेशीर मदत मिळू न देता तिला अज्ञात ठिकाणी अडकवून ठेवणे, तिचा विविध पद्धतीने छळ करणे ही सारी कृत्ये सी आय ए आता ५४ देशांच्या सरकारांच्या संगनमताने करीत असल्याचा गौप्यस्फोट ह्या अहवालात करण्यात आला आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

राजा, खरेतर नियमाप्रमाणे मला तुला गोष्ट सांगणे आणि त्यानंतर प्रश्न विचारणे भाग आहे, पण खरे सांगू? आज कोणतीही नवीन गोष्ट तुला सांगण्याची अजिबात इच्छा नाही बघ. त्यापेक्षा असे करू या का? आपला जो हा उद्योग कित्येक वर्षांपासून, नव्हे शतकांपासून चालू आहे, तू, म्हणजे राजा विक्रमादित्याने, प्रेत उचलून खांद्यावर टाकायचे आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागायचे, मग मी जागे होऊन तुला एक गोष्ट सांगायची आणि त्या आधारावर प्रश्न विचारावयाचे, त्यावर तुला उत्तर द्यावयास बाध्य करून तुझ्या मौनव्रताचा भंग करावयाचा आणि मी लगेच झाडावर जाऊन लोंबकळावयास लागावयाचे.

पुढे वाचा

मुक्त मनाचा माणूस

मुक्त मनाचा माणूस
(एखाद्या) माणसाच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत विझलेली नाही, याचा पुरावा काय? मुक्त मनाचा माणूस असे आपल्याला कोणाविषयी म्हणता येईल? आपल्या जागृत सदसद्विवेकबुद्धीद्वारे ज्याला आपले हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांचे भान असते, त्याला मी मुक्त म्हणतो. जो परिस्थितीचा गुलाम न बनता, तिला बदलवून आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी तत्पर व कार्यरत असतो, त्याला मी मुक्त मानतो. जो निरर्थक रूढी, परंपरा व उत्सवांचा, अंधश्रद्धांचा गुलाम नाही, ज्याच्या मनात विवेकाची ज्योत तेवते आहे. त्याला मी मुक्त मानतो. ज्याने आपले इच्छास्वातंत्र्य गहाण ठेवले नाही; आपली बुद्धिमत्ता वस्वतंत्र विचारबुद्धी यांचा त्याग केला नाही, इतरांच्या शिकवणुकीनुसार जो आंधळेपणाने वागत नाही, वैधता व उपयुक्तता तपासल्याशिवाय व विश्लेषणाशिवाय जो कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाही, आपल्या हकांच्या रक्षणासाठी जो सदैव सज्ज असतो, लोकनिंदा व अन्याय्य टीका यांची जो पत्रास बाळगत नाही, आपण इतरांच्या हातातील बाहुले बनू नये यासाठी आवश्यक विवेक व स्वाभिमान ज्याच्यापाशी आहे, त्यालाच मी मुक्त मानव मानतो.

पुढे वाचा

विनाशाची क्षमता

आजच्या जीवशास्त्र्यांपैकी एक मोठा माणूस अटै मायर, याने काही वर्षांपूर्वी एक मत व्यक्त केले. तो पृथ्वी सोडून इतरत्र कुठे बुद्धिमान जीव सापडू शकतील का, यावर बोलत होता. त्याला असे जीव सापडण्याची शक्यता अगदी कमी आहे असे वाटत होते. उच्च बुद्धिमत्ता म्हणजे माणूसप्राण्यांत दिसते तश्या रचनेची बुद्धिमत्ता जीवांना कितपत परिस्थितीशी अनुरूप करते, यावर मायरचा युक्तिवाद बेतलेला होता. मायरच्या अंदाजात पृथ्वीवर सजीव रचना अवतरल्यापासून आजवर सुमारे पन्नास अब्ज जीवजाती उत्पन्न झाल्या आहेत; ज्यांपैकी एकाच जीवजातीपाशी संस्कृती घडवण्याला उपयुक्त अशी बुद्धिमत्ता आहे. या जीवजातीला ही बुद्धिमत्ता सुमारे एक लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली.

पुढे वाचा

लोई ओबामा

काही आफ्रिकन देश दुर्मिळ धातूंची खनिजे इतर सर्व जगाला पुरवतात. आजचे प्रगत तंत्रज्ञान या धातूंशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे त्या धातूंच्या खनिजांना भरपूर मागणी असते. उदाहरणार्थ, पूर्व काँगो (पूर्वश्रमीचा झाईर) या देशात कथील, टंगस्टन आणि टैंटलम हे धात सापडतात, आणि हे तीन्ही धात मोबाईल फोन्स बनवण्याला आवश्यक असतात.

काही आफ्रिकन देशांत मध्यवर्ती सत्ता कमकुवत आहे, आणि वॉरलॉ ऊर्फ बाहुबली प्रत्यक्षात सत्ता गाजवतात. या सत्ता गाजवण्यात भाडोत्री सैनिक, आंतर जमातीय हेवेदावे, तस्करी, अशी अनेक अंगे असतात. अशा बाहुबलींचे पैशाचे स्रोत आटवण्याच्या हेतूने अमेरिकन काँग्रेसने (लोकसभेला समांतर, विधानसभा) डॉड-फ्रैंक वॉल स्ट्रीट सुधार कायदा (2010) मध्ये एक कलम घातले, की कोणत्याही अमेरिकन कंपनीने परदेशांतून माल विकत घेताना त्या खरेदीपासून स्थानिक बाहुबलीना मदत मिळू नये यासाठी काय खबरदारी घेतली ते सांगावे.

पुढे वाचा

घराणी, चोरी, स्वातंत्र्य

पु.ल.: तुमचं घराणं या विषयावर काय मत आहे? भीमसेन : माझं स्वतःचं काय आहे, की मी डेमॉक्रॉटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आईवडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढं ठेवलं तर ती पोपटपंची होते. मग आपलं काही तरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे

. पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य वाटतं की, तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत तुम्ही जी रचना केलीत, त्याच्यामध्ये नवीनपण आहे.

पुढे वाचा

थोडेसुद्धा ‘बहु’ आहे

“शेतकीतून मिळालेले थोडेसुद्धा ‘बहु’ आहे. कारण ते थोडे झाले तरी नवीन पैदाशीचे आहे. बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी. त्यात नवीन कमाई नाही. द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे. त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही. परंतु शेतकऱ्याच्या कमाईच्या हरएक कणात साक्षात् लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मी निराळी, पैसा निराळा, पैसा काय! चोरीने मिळतो, लुटीने मिळतो, सट्टेबाजीने मिळतो, लबाडीने मिळतो, तोंडपाटीलकीने मिळतो, दंडुक्याने मिळतो, राजाच्या शिक्क्याने मिळतो; आणि कशाने मिळत नाही? पण लक्ष्मींचा एक कणही मिळवण्याचे सामर्थ्य कोणत्याही पंडिताच्या तोंडपाटीलकीत नाही, कोणत्याही दांडगोबाच्या दंडुक्यात नाही किंवा कोणत्याही राजराजेश्वराच्या शिक्क्यात नाही.’

पुढे वाचा

भाषा वाहते आहे !

भाषा वाहते आहे ! एका नदीच्या प्रवाहाच्या दोन काठांवर दोन माणसे उभी होती. पल्याडच्या काठावरील माणसानं ओरडून सांगितले, “भाषा वाहते आहे!” प्रवाहाच्या खळखळाटामुळे अल्याडच्या माणसाला काही नीट ऐकू आलं नाही. त्यानं हातवारे करून तसं सांगितलं. पल्याडच्या माणसानं पुन्हा ओरडून सांगितलं. अल्याडच्या माणसाला संदेश समजला. काठावरून मागे वळून त्यानं गावाकडे धाव ठोकली. गावकऱ्यांसाठी त्यानं हाकाटी पिटली, “धावा रे धावा ! भाषा वहावते आहे!”