विषय «कविता»

भाबडी परिभाषा

‘जिथून सुरू होतं दुसऱ्याचं नाक
तिथेच माझ्या स्वातंत्र्याचा अंत होतो’

अशा तऱ्हेने स्वातंत्र्याला परिभाषित करताना
स्त्रियांचा विसर पडला
की
त्यांच्यापाशी नाकाहून अधिक
उन्नत जे काही आहे
त्याला तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्यात सामील करून घेतलं?

वात्सल्याचे तपशील

एकदा पाणभिजला ऋतु येऊन गेला म्हणजे
शिवारावर श्वासांची लागवड सुरू होते
पाखरे
ओठांच्या काठांवर झाडांची हिरवी पाने ठेवतात
पाखरांकडून
खुलेपणाने
कोरसपमध्ये
सूर्याचे गाणे गायिले जाते
सगळा आसमंत गणगोत होऊन
माणसांच्या भेटीला येतो
वासरांच्या वात्सल्याचे तपशील
गायींच्या डोळ्यांत; डोळाभर झालेले असतात
एवढेच
शील :
झाडांचे, शिवारांचे, पाखरांचे.

इतर

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना

साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला

सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला

कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टँकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टँकच बोलवा
टँक.

पुढे वाचा

दुखऱ्या मूळांपर्यंत

सकाळ झालीय
फुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्र जनावर काठीने
फुलांवर हल्ले करीत आहे.

बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हा
इथल्या झाडांना
फुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या
दुखऱ्या मूळांपर्यंत पोहचली असेल
***

अकल्पित, गजबंधन सोसायटी
सी के पी हॉलसमोर, राम गणेश गडकरी पथ

मुली

आता आणखी वाट नाही पाहणार मुली
त्या घरातून बाहेर पडतील
बिनधास्त रस्त्यांवरून धावतील
उसळतील, कुदतील, खेळतील, उडतील
मैदानांतून निनादतील त्यांचे आवाज
आणि हास्यध्वनी   

मुली थकल्याहेत
रांधावाढाउष्टीकाढा करून व रडून   
त्या आता नाही खाणार मार
नाही ऐकून घेणार कोणाचेही टोमणे
आणि रागावणे

ते  दिवस, जेव्हा मुली
चुलीसारख्या जळायच्या
भातासारख्या रटरटायच्या 
गाठोड्यासारख्या कोपऱ्यात पडून राहायच्या
केव्हाच संपले 

आता नाही ऐकू येणार दारांमागचे त्यांचे हुंदके
अर्धस्फुट उद्गार किंवा भुणभुण
आणि आता भिजणार नाहीत उश्यादेखील

दरी

नकाच पडू माझ्या भानगडीत
चालू देत माझं आपलं
वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी
तुम्हाला नाहीच कळणार
माझा आवाज तुमच्यापर्यंत नाहीच पोहोचणार
कारण आपल्यामध्ये एक दरी आहे
हां म्हणजे नातं आहेच, कचकड्याचं
तो डी एने पण आहे, जीन्स पण
पण या सगळ्याला व्यापून उरणारी
एक भली थोरली दरी आहे आपल्यात

या दरीत ते शेतकरी आहेत
ज्यांच्याविषयी तुम्हाला जराही कणव नाही
कारण ते टॅक्स भरत नाहीत
‘ती लोकं ‘ आहेत फँड्रीमधली
ज्यांची तुम्हाला किळस वाटते
ती आदिवासी लोकं पण आहेत
विकासाच्या मार्गातले धोंडे बनलेली
आणि ती विस्थापित लोकं पण
ते नाही का जे सिग्नल्स वर दिसतात
त्यांचे घाणेरडे हात आपल्याला , आपल्या गाडीला लावत
भीक मागतात
असं सगळं तुम्ही नाकारलेलं वास्तव या दरीत साचलंय
नदीतून वाहून आलेल्या गाळासारखं
दिवसागणिक थरावर थर साचाताहेत
घट्ट होत जाताहेत
भीतीदायक आहे सगळं
प्रलय येऊन पुनश्च सृजनाची सुरुवात असणारा
पिंपळाच्या पानावरचा तो बाळकृष्ण दिसेपर्यंत तरी
हे असंच चालणार
हा असाच अंधार असणार
गिळायला बघणारा

नकाच येऊ तुम्ही इथे
तुमचं चालू देत
हिंजेवाडी, नगरपट्टा , खराडी
ट्रॅफिक
पाचगणी की गोवा
टकिला की ओल्ड मॉंक
चिकन साटे की चिकन फलाणा
मी येते ना तुमच्याबरोबर
छान तयार होऊन
‘व्यवस्थित’ कपडे घालून
माझा नेहमीचा मुखवटा घालून
डिनरला मंगळागौरीची रांगोळी काढायला
साखरपुड्याला गणेशवंदना म्हणायला
गौरी जेवणाला
सगळ्याला
पण मनानी मात्र मी त्या दरीतच असते
मला नाही जमत तुमच्यासारखं
ते वास्तव नाकारत जगायला

जाफर आणि मी

जाफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालो
त्याच्या निकाहला शाही बिर्याणी
त्याची आई माझ्याच आईसारखी
घरासाठी खपताना चेहऱ्यावरचे छिलके निघालेली
त्याच्या घराच्या भिंती माझ्याच घराच्या भिंताडासारख्या
कुठे कुठे पोपडे निघालेल्या
त्याचे बाबा हळहळतात माझ्याच बाबांसारखं
फाळणीच्या दिवसांबद्दल बोलताना
त्याच्या भाजणीतलं मीठ
माझ्याच घरातल्या डब्यातल्या मिठासारखं
त्याच्या आमटीतलं पाणी एकाच जमिनीतून आलेलं
माझ्या तुळशीवर पडलेला सूर्यप्रकाश
त्याच्या मशिदीच्या आवारातल्या
नीमच्या सळसळीतून मावळलेला
तोहि तिरुपतीला एकदोनदा व देहूला जाऊन आलेला
मीही कितीतरी वेळा खजूर व चादर ओढून आलेलो
पिराच्या दर्ग्यावर बायकोबरोबर
त्याला मला समकालीन वाटत आलेला
गालिब व तुकाराम
आपल्याच जगण्यातलं वाटत राह्यलं
मंटो व भाऊ पाध्येच्या कथेतलं विश्व
दारूच्या नशेतही वंटास बोललो नाही
कि एकमेकांच्या कौमबद्दल कधी अपशब्द

कितीतरी दिवस आतड्यातल्या अल्सरसारखी-
छळत राहिली मला
त्याच्या आईला कॅन्सर झाल्याची बातमी
आम्ही अफवा नव्हतो
आम्ही संप्रदायाची लेबलं नव्हतो
आम्ही होतो दोनवेळच्या दाल चावलची
सोय लावताना चालवलेली तंगडतोड
एकवेळची शांत झोप मिळवण्यासाठी चालवलेला
दिवसभरातला आकांत
काय माहीत मात्र काही दिवसांपासून
कोणीतरी फिरवतंय गल्लीमोहोल्ल्यांतून
जाफर व माझ्यातल्या वेगळेपणाची पत्रकं

दरी

नकाच पडू माझ्या भानगडीत
चालू देत माझं आपलं
वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी
तुम्हाला नाहीच कळणार
माझा आवाज तुमच्यापर्यंत नाहीच पोहोचणार
कारण आपल्यामधे एक दरी आहे
हां म्हणजे नातं आहेच, कचकड्याचं
तो डीएने पण आहे, ते जीन्स पण
पण या सगळ्याला व्यापून उरणारी
एक भली थोरली दरी आहे आपल्यात
या दरीत ते शेतकरी आहेत
ज्यांच्या विषयी तुम्हाला जराही कणव नाही
कारण ते टॅक्स भरत नाहीत
’ती लोकं’ आहेत फॅंड्रीमधली
ज्यांची तुम्हाला किळस वाटते
ती आदिवासी लोकं पण आहेत
विकासाच्या मार्गातले धोंडे बनलेली
आणि ती विस्थापित लोकं पण
ती नाही का — सिग्नल्स वर दिसतात
त्यांचे घाणेरडे हात आपल्याला, आपल्या गाडीला लावत भीक मागतात
असं सगळं तुम्ही नाकारलेलं वास्तव या दरीत साचलंय
नदीत वाहून आलेल्या गाळासारखं
दिवसागणिक थरावर थर साचताहेत
घट्ट होत जाताहेत
भीतीदायक आहे सगळं
प्रलय येऊन पुनश्च सृजनाची सुरुवात असलेला
पिंपळाच्या पानावरचा तो बाळकृष्ण दिसेपर्यंत तरी

amrutapradhan@gmail.com

पुढे वाचा

मरणभय-आत्मा-पुनर्जन्म

सजीव येई जन्मासी। अटळ असे मृत्यू त्यासी।
जाणीव प्रत्येक व्यक्तीसी। जी का असते सज्ञानी ॥१॥
अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन ।
निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥
सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ ।
सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥
व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्‍या-गाई-गुरे ।
मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥
पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण ।
परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप तो सातवा ॥५॥
यांसी म्हणितले चिरंजीव । कल्पना केवळ मानीव ।
त्या त्या काळी सजीव । ते असतील सातही ॥६॥
परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत ।
कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥
देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार ।
स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥
तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व ।
मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥
मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे ।
मरणासंबंधीचा शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥
मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण ।
तिरडी-गोवर्‍या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥
दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे ।
शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥
भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे ।
कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥
घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती ।
तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ॥१४॥
बुद्धिवंतासी ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय ।
मरणी भयदायक काय । घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥
वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक ।
जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजांनी ॥१६॥
यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक ।
प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥
म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय ।
परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥
प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण ।
जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥
टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन ।
जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥
द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन ।
नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥
अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह ।
जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥
यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार ।
नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥
आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना ।
आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥
आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे ।
परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥
शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे ।
तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥
विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे।
जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥
संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने ।
नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥
यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना । सातत्याने जनमना–।
वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥
असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे ।
शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥
आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म ।
त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥
आपण प्रयत्‍न करावे । गतजन्मीचे काही आठवावे ।
तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥
याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देती लोक ।
पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥
गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही ।
पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ?

पुढे वाचा

कुंभारवाडा

काळ्या डागांनी गालबोटलेल्या सूर्याने फुंकलेले वारे
भन्नाट भिरभिरतात पृथ्वीच्या चुंबकीय भोवर्‍यात
मग उभं राहातं ध्रुवप्रदेशात अरोरा बोरिआलिसचं अद्भुत प्रकाशशिल्प,
न्हाऊ घालत घनतिमिर थंडगार प्रदीर्घ रात्रीला
दिसतात कधी सप्तरंगाचे तुषार उडणार्‍या थेंबांतून निघताना
घुसमटलेल्या प्रतिभेच्या अनावर उन्मेषाप्रमाणे
आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं
प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून

कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी
चार साच्यांची विविधता व अर्धज्ञानी बोटांच्या ठशांची समृद्धता मिरवत
तोच कंटाळवाणा चंद्र जातो ठरल्याप्रमाणे लिंबोणीच्या झाडाआड,
आणि छचोर तोता मैनेच्या पिंजर्‍यावर सावलीचं जाळं पडतं
लाजेचं काजळ थोबाडावर पसरून मग सूर्यच काळाठिक्कर पडतो
आणि युगायुगांची रात्र निर्लज्जपणे फैलावत राहाते.

पुढे वाचा