विषय «कविता»

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो 
तुमच्यातून जात नाहीत आरपार किरणं
नसतो तुम्हाला कुठल्याच जाणिवेचा मागमूस
चामडी वाचविण्याच्या नादात असता मश्गूल

उजेडाला फाटे देऊन
गुंडाळून घेता अंधाराचं कवच
वर्तमान नाही भूतकाळासारखा
भविष्य नसेल वर्तमानासारखे
मग काळोखाच्या दरवाज्याआड
कुठल्या पिढीचं भविष्य दडवून ठेवलंय?

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो
षंढपणाच्या बाजारात लागेलही तुमचा वाढीव भाव
तरीही बुधवारपेठ, कामाठीपुरा किंवा गंगा-जमुनामधील
भाकरीचं मोल नसेल तुमच्या घरंदाजपणाला

एकवेळ काळोखातून उजेडात आले तरीही
अंधाऱ्या खोलीची ओढ
सोडता सोडवत नाही
कुठल्या भीतीच्या सावटाने पोखरलंय?

आदिपणाचा बाजार उठवून
मुद्दाम पाडल्या जातोय भाव
तरीही तुम्ही शांत?

पुढे वाचा

कवीची कैद

इथे या आटपाट नगरात कवीलाही होऊ शकते कधीही कैद
तशी कवीची कैद फार सामान्य झाली सांप्रतकाळी
कदाचित म्हणून कविता लिहिताना कवीला
तोल सांभाळत लिहावं लागतं मन आणि लेखणीचा,
जाम कसरत करावी लागते कवितेचा एकेक शब्द कागदावर उतरवतांना

त्याला जपून लिहावे लागतात शब्द प्रतिमा-प्रतीकं म्हणून
त्याला जपून वापरावे लागतात कवितेच्या पोस्टरचे रंग
चुकून कधीतरी लाल, निळा, हिरवा इ. इ.
किंवा तत्सम रंग वापरला तर होऊ शकते त्याची पंचाईत
कवीला शब्दकोशही रचावा लागतो नव्याने
ज्यात काही शब्द नसावे म्हणून करावी लागते धडपड
उदा.

पुढे वाचा

स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ?

असं काही सांगा.. ज्यावर
खरंच विश्वास बसेल
स्वातंत्र्याचा मुक्काम सांगा
हल्ली कुठं असेल?

‘भगतसिंग’वाल्या गोळीत
रेशनवाल्या पोळीत
दिवा नसलेल्या घरात 
की.. वंचितांच्या स्वरात?

कष्टकऱ्यांच्या घामात
‘शबरी’वाल्या ‘रामा’त
फांदीवर लटकणाऱ्या प्रेतात
की.. डुकरं घुसलेल्या शेतात?

‘बापू’च्या प्रसिद्ध चरख्यात
आपल्यासोबत परक्यात
विद्यार्थ्यांच्या नव्या चळवळीत
की.. ‘भीमरावा’च्या जुन्या तळमळीत?

कुठं असेल स्वातंत्र्याचा कॅम्प 
की.. ‘क्वारंटाईन’वाला स्टॅम्प ?
भेदरलेल्या ‘मुंग्यां’च्या बिळात
की.. ‘सापां’च्या खानदानी पिळात?

सांगा कुणी पाहिलं का स्वातंत्र्याचं घर
किंवा त्याचा आनंदानं गुणगुणणारा स्वर
ऐकल्याच्या, पाहिल्याच्या काहीतरी टिप्स
किंवा त्याच्या रडण्याच्या केविलवाण्या क्लिप्स ?

पुढे वाचा

हळूच

हळूच कशा एका रात्रीत आठेक वाजता एका दमात
चलनात असलेल्या नोटा अलगद फेकल्या जातात चलनाबाहेर
हळूच कशी आणली जातात मनमानी विधेयकं आणि कायदे
हळूच कसे दडपले जातात संप, आंदोलने आणि मोर्चे
हळूच कसे निर्मिले जातात कोंडवाडे, डीटेंशन सेंटर्स कोंडावया अल्पसंख्य

हळूच कसे बोलू लागतात पुढारी पाच वर्षानंतर मिठू मिठू
हळूच कशी उतरवली जाते गळ्यात मन की बात
हळूहळू प्रोपगंडे जगू लागतो आपण पोस्टट्रूथच्या काळात
मीडिया हाऊसेसही बनू लागतात प्रवक्ते व्यवस्थेचे हळूच

हळूच कसे विकून कोंबले जाते सारे काही 
देशाच्या मालकीचे चारदोन भांडवलदारांच्या घशात
हळूच मग देश टणाटण उड्या मारतो विकासाच्या हायवेवर
उपाशीपोटीउघडेनागडे देह पाहू लागतात हा देशाचा पराक्रम

हळूच कसे होतात हल्ले देशाच्या सीमेवर
हळूच छाती ठोकून कशा मारल्या जातात वीरतेच्या बाता 
हळूच मतपेटीतून हायजॅक केला जातो देश 
हळूच कसे परावर्तित केले जातात नागरिक मतदारांत
हळूच दर पाच वर्षांनी दाबतो आपण मतपेटीची बटणं
आणि हळूच मारले जातो आपण आपल्याच संमतीने

हळूच मारली जाते भूक, बुद्धी, निष्ठा, रोजगार
हळूहळू आपण काहीच बोलत नाही, विचार करत नाही
आपल्या भावभावनांना उरत नाही जागा आपल्याच मनात

हळुहळू देशभक्तीचं सॉफ्टवेर इंस्टॉल केलं जातं मन आणि मेंदूत
मग आपलं उपाशी, बेरोजगार राहणं, शांत संयमी राहणं, काहीही न बोलणं,
ठरत जातं देशभक्तीचं प्रमाण

सारं काही अगदी हळू हळू होतंय.

पुढे वाचा

थांबा, पुढे गतिरोधक आहे

दोन डोळ्यांसाठी दोन चष्मे असतात सताड उघडे
अंतर्वक्र आणि बहिर्वक्र
डोळे शाबूत असले तरीही
डोळसपणाची पैदास सोडत नाही रंगाच्या भिंती

घराला माझ्या कुठलाच रंग शोभत नसला तरीही
मी चोरतो आभाळाची निळाई
निसर्गाची हिरवाई
मातीला घट्ट पकडून असलेला काळसरपणा
बेरंगी पाणेरीही वाटतो अगदी जवळचा

बाजारात दाखल झाल्यावर रंग धरतात आपापल्या वाटा
आणि चालू पाहतात सोडून महावृक्षाच्या मुळ्या

अजून तरी आभाळाने, निसर्गाने, मातीने, पाण्याने
सोडले नाहीत आपापले रंग

म्हणून

कणा मोडू पाहणाऱ्या जमातींनो
थांबा, पुढे गतिरोधक आहे…!

7875173828

यार… बोल, लिही

हल्ली तू बोलत नाहीस मोकळेपणानं
शब्दांतूनही व्यक्त होणं टाळतोयस
तुझ्या मनातलं खदखदणारं
लाव्हारसाचं वादळ
तुझ्या चेहऱ्यावर अंकित झालंय

एरव्ही
तुझ्या वाणीची धार
सपासप वार करते
हिणकस, बिभत्स, अविवेकी
कोशांना फाडत राहते

यार .. मग आता तू का
एवढा शांत आणि लालबुंद?
हिरवं गवत जळू नये
आभाळानं छळू नये
अशावेळी खरं तर
कुणीच मूग गिळू नये

ही वेळ मौन धारणाची नाही
यार..बोल, काहीतरी लिही
दशा बदलणं गरजेचं आहे
आणि दिशाही!!

ssachinkumartayade@gmail.com

तुकडपट्टी

मला भीती वाटते….
माझे डोळे पुसणार्‍यांची
तसाच अंग चोरून उभा असतो!
अंग शहारतं….
डोळे पुसणार्‍याच्या डोळ्यातील फायदा उचलणार्‍या क्रूर कपटी हालचालींमुळे!

माहिती असतं..
या अश्रूंची किंमत आता भलताच कुणीतरी उचलेल
आणि विरून जातील या वेदना
तुकडपट्टी झालेल्या शेताच्या मातीत!

अजून एक तुकडा..
आणि शेवटचा श्वास
एवढंच शिल्लक आहे शेतीचं
आणि शेतातच माती होणार्‍या जीवाचं अस्तित्व!

उरणार आहेत फक्त फुशारक्या-
पूर्वजांकडे असलेल्या शेकडो एकर शेताच्या
आणि वांझोट्या रुबाबाच्या

फडफडत राहतो,
प्रत्येक लग्नानंतर
शेतीचा कमी होत गेलेले एक एक श्वास….
आणि लुळा पडत जातो
शिक्षण, आरोग्य खर्चातून
आखडत गेलेला हात

किती वाचावे
खर्चाच्या ओझ्याखाली 
तोकड्या वावरातील दबलं गेलेलं तोकडं उत्पन्न
आणि हाल अपेष्टांचे शंभर पाढे!

पुढे वाचा

तीन कविता

कापूस उलंगून गेल्यावर
********************

कापूस उलंगून गेल्यावर
काहीच नाही राहत शिल्लक
आशा,
निराशा
अन्
वाळलेल्या पऱ्हाट्याशिवाय

कापूस उलंगून गेल्यावर
शिकारीसाठी दडून बसलेल्या शिकाऱ्यासारखे
दडून बसलेले सावकार अलगद पडतात बाहेर
जे बहुतांश स्वतःच असतात व्यापारीही.
मिरगात सरकी, खात-मूतासाठी कधीतरी घेतलेले
उसने पैसे वसूल करण्यासाठी लावतात तगादा
अन्
नेमका डाव साधून
घेतात कापूस बेभाव विकत

कापूस उलंगून गेल्यावर
अनेक स्वप्नांच पीक ओरबाडून नेलं जातं
चोराने अर्ध्या रात्री कापूस चोरून नेल्यासारखं

मुलांचे कपडे,
मुलीची सायकल,
बायकोची साडी
अन्
भोकं पडलेली बनियन सुद्धा
विकत घेणं कठीण होऊन जातं
कापूस उलंगून गेल्यावर.

पुढे वाचा

देश महासत्ता होतो तेव्हा…!

देश महासत्ता होतो तेव्हा
नांगरं चालवावीच लागतात
शेतं पेरावीच लागतात
जागली कराव्याच लागतात

आदिमानवाने सुद्धा हेचं केलं 
बलाढ्य काळ लोटूनसुद्धा आपणही तेच करत आहोत
मग देश महासत्ता झाला कसा ?

उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या जमाती 
सत्तेला पुरवत असतात रसद
बंदुकीचा चाप ओढून
डांबू पाहतात काळ्याकुट्ट अंधारात
जगवणाऱ्या मातीला वांझ संबोधून
पोशिंद्याला करू पाहतात हद्दपार

ते गोचीडासारखे बसतात चिटकून 
आणि पिढ्यानपिढ्या शोषत असतात रक्त
बांधावरील शेवटच्या झाडाला कापून

ते दाखवू लागले महानगराचे स्वप्न
मातीवर करू लागले बलात्कार
उभारू लागले हायटेक ग्रीन सीटी
बैलं हद्दपार झाली केव्हाचीच
कदाचित कसणाराही होईल गहाळ 
उरेल फक्त सावकारी हुकुमशाही

हायफाय दफ्तरात बसून 
ते रानं पिकवतील
दाम ठरवतील
सोयीनुसार फासावर लटकवतील

ते बदलू लागतील वर्तमान आणि भविष्य
उठणारे हात छाटू लागतील

तेव्हा उजेडाला पेरण्यासाठी
पिकवणाऱ्या मातीने आता पेटलं पाहिजेत
उगवणाऱ्या हाताने आता पेटलं पाहिजेत
आस्तित्व टिकवण्यासाठी
माणसाने आता पेटलच पाहिजेत…!

बांध आणि हमीभाव

गावापासून दूर जंगलातल्या
वावराच्या धुऱ्यावर
वावरातला बारीक सारीक गोटा
वावर सप्फा करावा म्हणून
वावरातून वजा होत
जमा होत होत जातो
वावराच्याच बांधावर

गोट्यावर गोटा
एक्कावर एक करून
साल दरसाल
मिर्गाच्या तोंडी
ठेवत गेलं की
त्याचाच कंबरीएवढा बनतो बांध

कळत नकळत
गोट्यावर गोटा
रचलेल्या बांधाच्या भरोशावर
आम्ही काहीसे अस्तो बिनधास्त
कारण
थोडी का होईना
त्यामुळं रोखली जाते
जंगली जनावरांची अतिक्रमणं
दरसाल पाण्यासंग
वाहून जाणारी
वावरातील माती
राहते वावरात बांधामुळे टिकून
बांधाच्या या बांधणीमुळे
मोकाट जनावरं करत असलेलं
पिकांचं नुकसान
किमान नावापुरतं तरी
कमी होत असतेच.

पुढे वाचा