विषय «कविता»

काळ बदलत आहे…!

अलीकडे माणसं होतायेत निकामी

भेसूर चेहरे अडकताहेत

तंत्रज्ञानाच्या महाकाय जाळ्यात…

गतिमान होणाऱ्या काळात

धर्मांधतेच्या वाळवंटात पाय रुतून पडलेत..

ऑक्सिजन झालाय गढूळ!

हवेतील समानतेचा ओलावा होतोय जहरी..

मेंदू झोपलेत, डोळे बंद आहेत

ही प्रतिकृती होऊन बसलीय शत्रू

सारं अगदी चिडीचूप

फक्त आदेश घेणे…पुढे जाणे…

हे हात पडलेत गळून

सौंदर्यमुद्रा होतेय अंधूक…. धूसर

गर्भबीजांवर होतंय अतिक्रमण

माणूस होतोय बेवारस दिवसेंदिवस 

हे तेच उगवलं जे पेरलं होतं

अती विकासाच्या नावातील भयंकर अंधार…

पायरीवर पाऊल टाकून स्तब्ध उभे राहा

गर्दीचा भाग बनून, रेंगाळत

पुढे सरका

नव्या युगात तुमचे स्वागत आहे

डोळे मिटवून माना हलवा

आता काळ बदलत आहे…!

पुढे वाचा

न्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन

ते म्हणाले की बलात्कार हा एक अश्लाघ्य

गुन्हा आहे.

त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे

मग त्यांच्या लक्षात आले बरेचसे…

म्हणजे ९५ टक्के बलात्कार करणारे पुरुष असतात,

घनिष्ठ सबंध असलेले.

कदाचित नवरासुद्धा.

मग आता नकोच आवाज करायला!

त्यांचे बघा हे असंच आहे.

महागाई पेट्रोलची १ रुपयाने वाढली तेव्हा

त्यांनी रस्त्यावर आंदोलनं केली.

राज्यकर्त्यांना वाटेल ते बोल लावले,

आपला लोकशाही हक्क बजावत ताशेरे झाडले.

आता पेट्रोलने १०० गाठली तर ते म्हणाले, 

“पगार नाही का वाढला

तर पेट्रोल वाढलं तर काय मोठंसं?”

तर ते सारे हा असा लोकशाहीचा सोईस्कर

हक्क बजावत आज राज्यकर्ते झाले

आणि मग…..

पुढे वाचा

ओॲसीस

मूळं वाळवंटातही रोखून धरतात ओलावा
जीवघेणं ऊन सोसूनही
टिकवून ठेवतात अस्तित्व
मातीशी घट्ट नातं जोडून
शोधू पाहतात ओॲसीस

विस्तारणाऱ्या मुळांना माती नाही अडवत
दोघेही असतात गुंतलेले

आभाळही नाही थांबवत वाढणाऱ्या फांद्यांना
सारं घडतं आपल्याच अवतीभवती
तरी माणसाची नजर खुंटलेलीच…!

जि. वाशिम
मो. 7875173828

तू हसत रहा….

तू हसत रहा
क्रांतीच्या विचारांवर 
मी पेटवत जातो
एक एक रान 

तू ओढत जा 
तुझ्या कुजल्या विचारांची 
एक एक रेघ आडवी 
नवनिर्माणाच्या स्वच्छ फळ्यावर 
मी पुसत जातो 
ती हर एक रेघ आडवी

तू बोल छाती फुगवून 
आम्ही करोडोंमध्ये आहोत 
मी ढोल लावून 
एक एक जमवीत जाईन

तू करत जा चर्चा 
आमच्यावरील खोट्या आरोपांची 
मी चिरत जाईन 
तुझ्या  वाफाळ शब्दांच्या 
तुफानी वादळांना 

तू फवारत जा 
विष फुटीरतेचं 
मी सावरत जातो 
पडत चाललेल्या 
प्रत्येक  खिंडारीला

तू मारत जा 
एका एका बिनीच्या शिलेदाराला 
तोंडावर काळे बुरखे घालून 
मी वावरत जाईन 
असाच निधड्या छातीने 
तुझ्या कुजक्या परंपरेला तोडण्यासाठी 

रावतभाटा, राजस्थान.

पता नही

पता नही हममें 
इतनी उम्मीद – ए – मुहब्बत 
किसने भर दी है ।

कोई नफरत के बीज भी बोये,
हम प्यार की फसल ही उगाते है ।
टूटती हुई शाखों पर भी 
घरौंदे बनाते है ।

और तो और
हमारी आंख से आँसू भी टपके
वो किसीके हमदर्द होने का अहसास ही जताते है ।

ना जाने किस मिट्टी से बने है हम 
कोई रौंद भी जाये
तो नया रूप धर कर दुबारा उठते है हम ।
और नफरत भी नही करते 
उन कुचलने वाले पैरों से ।

हमारी तादाद भी सराहनीय है 
हम जुडे है एक दुसरे से कुछ इस कदर 
तवारीख गवाह है,
हम रहे है एकसाथ और बेखौफ ।

कोई हमें कायर कहे 
या कहे मौजूदा से बेखबर 
हम भाषा जानते है सिर्फ प्यार की 
जिसने जिंदा रखा है हमें आजतक 

बाकी तो कुछ बचता नही कहने सुनने को ।   
हमारा यकीन है  हमारी  उम्मीद-ए-मुहब्बत पर। 

माझ्या देशात

माझ्या देशात..

कितीही दंगली होवोत.

कितीही अत्याचार हावो.

कितीही हल्ले होवोत.

त्यात कधीच…..

माणसे मरत नाहीत.

याआधीही मेली नाहीत.

पटत नसेल तर…

जुना दस्तावेज तपासा…

दिसतील तुम्हाला,

वर्तमानपत्राच्या हेडलाईन.

दंगल वा हल्ला झाल्यावर..

हिंदूला भोसकले…

मुसलमानाची कत्तल…

हिन्दूला जाळले..

मुसलमानाला चिरले…

दाखवा एखादा पुरावा

माणसे मेल्याचा…

दाखवा एखादी हेडलाईन

दंगलीत माणसे मेल्याची..

तीन कविता

१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 

तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 
पाठवत राहा शुभेच्छा 
महिला दिनाच्या.. 
बस कुरवाळत 
तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला 

तसेच, आयुष्यभर पुन्हा 
सहन करण्यासाठी… 
करत रहा अभिमान 
तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा 

दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नाला
गुलाबी रंगाचा डोहात 
बुडवून मारण्यासाठी …
भरत रहा ऊर 

‘कशी तारेवरची कसरत करते’ 
हे ऐकून 
तुझ्या मनावर कोरलेल्या 
भूमिकेला न्याय देत 
घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या 
पायावर सांभाळण्यासाठी… 
टाकत राहा 
मनगटात बांगड्यांचे थर

नेसत राहा 
नवरात्रीच्या नऊ साड्या 
करत रहा 
मेंदूला गहाण ठेवणारे उपवास 
भरत रहा 
टिकल्यांचा ठिपका 
तुझ्या प्रशस्त कपाळाच्या  
स्वातंत्र्याच्या चंद्रावर 
ग्रहणासारखा

तुला डॉलच बनून राहायचे असेल तर….

पुढे वाचा

इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने
उडवून नेलीत काही पत्रे,
तुटून पडले काही पंख..!

सोबतीने आलेला मित्र
शांत थोडीच राहणार…!

जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते..
समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले
अन् वावरेच धो – धो वाहू लागली!

तुटलेल्या छपराला
चिकटलेले आहेत
फक्त काही कोरडे अश्रू!

एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय..
एकमेव दागिना मोडून
गुलाल उधळत आणला होता..
तशा.. बांगड्या बाकी होत्या!

वावरातील पिकांचा
उडालेला हिरवा रंग,
आणि निस्तेज पडलेले
वखर आणि पांभर..
टक लावून बघतायेत
आकाशाकडे..

भुरकट पडलेल्या पिकांना
कोपर्‍यात पडलेल्या औषधांची आता गरज नव्हती…
मरून पडलेल्या बैलाच्या मागे राहिलेल्या दोराला मात्र
हवा होता एक नवा गळा!

पुढे वाचा

काळ बदलत आहे

१.

जेव्हा केव्हा हुकमती राजवटीने मोडू पाहिला लोकशाहीचा कणा
फिरवून टाकल्या सत्तेच्या दिशा
पुसटश्या उजेडालाही झाकोळून टाकण्याच्या वाटल्या खिरापती
तेव्हाही या जुलुमशाहीच्या आखाड्यात कोणीतरी लढत होतंच
आणि आता शेतकरी आहेत…!

२.

तू आहेस म्हणून
काटेरी सत्तेला प्रश्नांनी देता येतात तडे
बेबंदशाहीच्या सिंहासनाची उखडता येतात पाळंमुळं
जेव्हा कधी नाकारला गेला जगण्याचा हक्क
तेव्हा तेव्हा नव्याने पुकारला एल्गार… तू आहेस संघर्षाची अमाप शक्ती

तू आहेस…
बुद्ध.. तुकोबा.. छत्रपती.. ज्योतिबा.. शाहू.. बाबासाहेब…!

३.

अजूनही का नाही सरत रात्र
म्हणून त्याने साऱ्याच खिडक्या उघडून ठेवल्या
दरवाजे कुलूपबंद ठेवून
दिस उजाडाची पाहत होता वाट… सारं करुन सुद्धा कुठे दिसलीच नाही उगवती

हे पाहून…
सोडून त्याचा पदर
भयभीत काळ्याकुट्ट अंधारातही
ती पेटून उठली मशानातून…
उखडून फेकल्या दरवाज्याच्या चौकटी
आणि उजळून टाकल्या मुर्दाड वस्त्या…!

पुढे वाचा

स्वप्न

समाजवादी
धर्मनिरपेक्षलोकशाहीच्या पार्श्वभूमीवर
भेदाभेदाचा उत्कलनांक जाळून टाकतो कित्येकांना

कुणाही सौंदर्यवतीच्या
गालावरचा तीळ
महत्त्वाचा नाहीये
उपयुक्त आहे
आरक्षणाचा बिंदू

प्रेमीजनांचा होकार किंवा नकार,
एकत्रीकरण किंवा अलगीकरण
यापेक्षा खळबळजनक आहे
वाढत जाणारं खाजगीकरण
अर्थात,
संधीच्या समानतेचं विस्थापन

एक स्वप्न पेरू
लोकशाहीच्या छातीवर
मग होईल या मातीवर
मानवतेच्या उदारीकरणाचं उद्घाटन,
धर्मांध आणि जातींचं उच्चाटन
समानतेची व न्यायाची उजळून वात
नव्याने करून घेऊ स्वातंत्र्याचा उपोद्घात

.शिक्षकशिव विद्यालय,चतारीता.पातूर जि.अकोला
(‘इंदुकपिलवस्तु नगर,अकोला )