विषय «जीवन शैली»

‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य आहे का?

‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य आहे का? ह्या कुटुंबाचा धर्म कोणता असेल? ह्या कुटुंबाचा देव कोण असेल?
‘Man is an animal that makes bargain’
देव, विश्व, आणि निसर्ग ही तिन्हीं एकाच गोष्टीची नावें आहेत.’बायबलमध्ये म्हटले आहे तसे, देव कुणी वेगळा नाही. असे जाहीरपणे प्रकट केल्याबद्दल, थॉमस आयकनहेड नावाच्या वीस वर्षे वयाच्या तरुणाला अठराव्या शतकात मृत्युदंड दिला होता. देवाच्या नावाने धर्म काय करू शकतो, त्याची ही झलक!

१.
धर्मांच्या उदयामुळे मनुष्याचे कल्याण साधले का? धर्माने मनुष्याला नीतिमान बनवले का? धर्माने मनुष्याला दैववादी केले का?

पुढे वाचा

मैं और मेरी नास्तिकता

मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं.  और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिक्य मिरवलं तर बिघडलं कुठे?

नमस्कार,

हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे सगळ्यांवर साधारणपणे जे संस्कार होतात तसे माझ्यावरसुद्धा झाले. लहानपणी आपल्याला योग्य अयोग्याची तशी समज नसते. आई-वडील सांगतात त्यावर आपला विश्वास असतो. ते सांगतात तसेच आपण करत असतो. माझंही तसंच होतं. पण वाढत्या वयात काही काही गोष्टी निरीक्षणात यायला लागल्या आणि प्रश्नही पडायला लागले. आजूबाजूचे लोक कोणाच्याही आणि कशाच्याही पाया पडतात हे दिसायला लागलं. प्रश्न पडू लागला की गावाच्या वेशीवरची एखादी दगडाची मूर्ती देव कसा काय होऊ शकेल? गणपतीच्या बाबतीत तर विशेषच. त्या मूर्तीत जर देवत्व आहे तर ती मूर्ती काढून नवीन मूर्ती कशी बसवता येईल?

पुढे वाचा

देव नाकारणे हे विवेकवादाचे बाय-प्रॉडक्ट

ब्राईट्स सोसायटीच्या दशकपूर्तीला नास्तिक परिषदेच्या निमित्ताने जमलेले आपले माननीय प्रमुख पाहुणे जावेद अख्तरजी, मंचावरील आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व नास्तिक मुक्तचिंतक मित्र-मैत्रिणींनो.

सर्वप्रथम, या पुरस्कारासाठी माझी निवड केली यासाठी ब्राईट्स सोसायटीच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. अतिशय प्रांजळपणे सांगायचं तर हा पुरस्कार प्राप्त करण्याची पात्रता माझी आहे की नाही हे मला अजिबात माहीत नाही. पण तरीही अतिशय विनम्रपणे याचा स्वीकार करते. मंचावर उपस्थित जावेद अख्तर सर एक शायर किंवा स्क्रीन-प्ले-रायटर म्हणून आपणा सर्वांना अवगत आहेत. मी नास्तिक झाल्यापासून रॅशनॅलिटीसाठी त्यांना फॉलो करते आणि रॅशनॅलिटीसाठी भारतातले म्हणावे असे एक आयडॉल कदाचित तेच असतील.

पुढे वाचा

गुणाकाराची बेरीज – वजाबाकी

लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता

अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वी लाँच झालेले चॅटजीपीटी आणि पर्यायाने कृत्रिमप्रज्ञा हे क्षेत्र आज जगभरात सर्वांत मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बेरोजगारीची सर्वात मोठी लाट येणार, तब्बल तीस कोटी रोजगार यातून बाधित होऊ शकतील असे काही अहवाल सांगत आहेत. मानवी सर्जनशीलतेवर कृत्रिमप्रज्ञेचा हा हल्ला आहे असे काही चिंतातूर जंतू ओरडत आहेत, तर तंत्रज्ञानाचे बहुतेक जाणकार, तज्ज्ञ तिचे स्वागतही करत आहेत. चॅटजीपीटीमार्फत ओपनएआय कंपनीने जगभरातील भाषा आणि सर्जनशीलता क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यांनी असे एक चॅटबॉट बनवले आहे जे तुमच्यासाठी लेखनिकाचे काम करते.

पुढे वाचा

लिव्-इन विथ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स

२०२२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून AI च्या चर्चा रंगल्यात. चॅटजीपीटीमुळे सर्वांचे लक्ष जणू या एका बिंदूपाशी येऊन थांबले आणि आपण सर्वांनी कळत नकळत या कृत्रिमप्रज्ञेला डेट करायला सुरुवात केली आणि आता साधारण ७-८ महिन्यांनी हे नाते या टप्प्यावर आले आहे की ‘लिव्-इन’मध्ये राहून पाहूयात जरा. 

कारण कृत्रिमप्रज्ञा हा आपल्या आयुष्यातला होऊ घातलेला नवीन जोडीदार आहे यात शंका नाही. पण संसार थाटायच्या आधी जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे.

तर २०२२ च्या किती आधीपासून आपण कृत्रिमप्रज्ञा हे तंत्रज्ञान वापरत आहोत? मग ते गूगलने पुरवलेले नकाशे असूदेत नाहीतर ऑनलाइन चॅट-बॉट्स असूदेत किंवा टायपिंग करताना स्वतःहून दुरुस्त होऊन येणारे शब्द असूदेत.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता – फायदे आणि तोटे

कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे बरेच चर्चिले गेले आहेत. त्यावर हा माझा दृष्टिकोन. 

आपण मानव किंवा सजीव प्राणी अनुभवांवरून शिकू शकतो पण यंत्रे तसे करू शकत नाहीत. आता यंत्रेही तसे करू लागलीत तर? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जणू यंत्राने स्वतःच शिकणे.

ह्या क्षेत्रात जरी काही मोठे बदल, प्रगती हल्ली झाली असली तरी २१ व्या शतकाच्या मध्यापासून शास्त्रज्ञांनी यावर विचार करणे सुरू केले होते. १९४३ मध्ये मॅकलॉक आणि पिट्‌स या शास्त्रज्ञांनी बायलॉजिकल न्यूरल नेटवर्कची संकल्पना मांडली. अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी याने १९५५ मध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ह्या शब्दांचा प्रथम वापर केला, त्याने एक प्रोग्रामिंग लँग्वेज LISP विकसित केली जी आजही कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सगळ्यांत जास्त वापरली जाणारी भाषा आहे.

पुढे वाचा

विचार आणि आखूडदोषी बहुगुणीपणाची कसोटी : एक संक्षिप्त टिपण

मानव जसजसा प्रगत होत जातो तसतसा त्याचा विचारप्रवास/विचारप्रवाहसुद्धा प्रगत होत जाणे अगदी स्वाभाविक तथा क्रमप्राप्त असते. अशा विचार-प्रगती-प्रवासा/प्रवाहादरम्यान कोणत्याही विचारांना त्यांच्या ‘असण्या’तील ‘आखूडदोषी-बहुगुणीपणा’ची कसोटी पार पाडावी लागते. आखूड का असेनात, अंतर्निहित दोषांना पार करून व बहुगुणीपणाची लस टोचूनच विचारांच्या प्रवासा/प्रवाहात प्रगती संभव असते. विचारप्रवास व विचारप्रवाहातील ही कसोटी पार करू न शकणारे विचार कालबाह्य तथा मानवप्रगतीच्या दृष्टिकोनातून सर्वंकषविकासरोधी होऊ लागतात. अर्थातच अशा कालबाह्य व विकासरोधी विचारांना कवटाळून असलेल्या/असणाऱ्या साऱ्या (विचार)’पद्धती’ निसर्गसंमत/निसर्गाधारित/निसर्गानुकूल मानवविकासाला बाधकच नव्हे तर घातकही ठरू लागतात. असे असले तरी विज्ञानाधारित व निसर्गचक्राला, सुसंगत विचारांना प्राणशून्य करून अशा प्राणशून्य विचारांच्या शववाहकांची समाजातील संख्या व शक्तीसुद्धा नाकारून चालणार नाही. 

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञा वापराचे तारतम्य शक्य होईल का?

मानवी जीवन हे सतत आपल्या अडचणी आणि गरजांमधून शिकत, त्यावर तोडगा म्हणून नवनवीन उपकरणे, युक्त्या, क्लृप्त्या, तंत्र इत्यादी शोधत, विकसित होत गेले आहे. या सगळ्यामुळे मानवी जीवन सुरुवातीला नेहमीच सुखकर, सहज झाले खरे, पण या सर्व उपायांमुळे नवे प्रश्न नक्कीच उभे राहत आले आहेत. हे चक्र अखंड सुरू आहे आणि यापुढेही राहील. मागील काही दशकांपासून विकसित झालेले तंत्रज्ञान, उदाहरणार्थ विमान, अणुऊर्जा, वीज, टीव्ही, फोन, इंटरनेट, मोबाईल, स्मार्टफोन, सीसीटीव्ही, क्लाऊड टेक्नॉलॉजी इत्यादी, आणि आता कृत्रिमप्रज्ञा.

या सर्वांचा दैनंदिन जीवनात समावेश/वापर वाढत गेला, आणि या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यावर प्रथमदर्शनी आपले जीवन सहज/सोपे/सुखकारक झाले असे नक्कीच म्हणता येईल.

पुढे वाचा