विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (३) – डेविड रिकार्डो (१८ एप्रिल १७७२ – ११ सप्टेंबर १८२३)

अॅडम स्मिथ ने मांडलेल्या आशावादाला जेव्हा माल्थसने सुरुंग लावले तेव्हा बहुतांश लोकांना डेविड रिकार्डो च्या आशावादाने तारले. घरातून व समाजातून बहिष्कृत केलेल्या त्याच्या आयुष्यात त्याने एक अत्यंत यशस्वी उद्योजक, उत्तम गुंतवणूकदार व नंतर मोठा जमीनदार, ख्यातनाम अर्थशास्त्र- पंडित होण्याचा व आयुष्याच्या शेवटी शेवटी तर ब्रिटिश संसदेमध्ये जागा मिळवण्याचा मान मिळवला होता. अर्थशास्त्राचा प्रकांड पंडित म्हणून त्याचा इतका मान होता की इंग्लंडच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला अर्थशास्त्रावरील त्याचे विचार मांडण्यासाठी बोलाविले होते. त्याकाळी व आजसुद्धा अॅडम स्मिथनंतर सर्वात प्रभावशाली अर्थशास्त्री म्हणून त्याचे नाव घेतले जाते..

पुढे वाचा

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (१) – अॅडम स्मिथ

मनुष्यप्राणी जंगलातील झाडावरून खाली उतरला तेव्हापासून त्याला प्रत्येक पावलागणिक जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या सर्व अडचणींवर मात करीत करीत तो आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला. हे साध्य करण्यासाठी त्याला बऱ्याच उपाययोजना कराव्या लागल्या. परंतु आजही जगातल्या सर्वांत श्रीमंत राष्ट्रात पसरलेल्या गरिबी, भेदाभेद, उच्चनीचता यावरून असे अनुमान काढावे लागते की हे उपाय अनेकदा तोकडे पडले.
अनेक संकटातून माणूस सुखरूप बाहेर पडू शकला कारण तो कायम समूहामध्ये सुरक्षित राहिला. परंतु इतर प्राणी उदा. मुंगी, मधमाशी यांसारखा तो समूहातील अनेकविध कामांपैकी विशिष्ट काम करण्याची नैसर्गिक प्रेरणा घेऊन काही जन्माला नव्हता आला.

पुढे वाचा

विकासाने केला घात (एका खेड्याची विनाशाकडे वाटचाल अ विलेज अवेट्स् अ डूम्स डे ह्या जयदीप हर्डीकर लिखित पुस्तकाचा परिचय )

नर्मदाखोऱ्यातील लोकांच्या नर्मदा सरोवर प्रकल्पाविरोधातील लढ्यातील शक्तिशाली एक अर्थपूर्ण घोषणा आहे, ‘विकास चाहिये, विनाश नहीं’. मोठी धरणे म्हणजे विकास असे मानणाऱ्या अनेक शहरी भारतीयांना ही घोषणा चुकीची वाटेल. पण ‘सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा तुकडा किंवा जगण्याचे साधन गमावलेल्या आदिवासीचे किंवा शेतकऱ्याचे दुःख, हे शब्द नीटच मांडतात.
मोठी धरणे, वेगवान आंतर-राज्य रस्ते, अभयारण्ये, विशेष आर्थिक क्षेत्रे अशा मोठ्या विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या मानवी समुदायांची वंचितता आणि पर्यावरणाचा विनाश यांची कथा आपल्याला परिचित अशीच आहे. तरीही ती संवेदनशीलतेने अन् सहानुभूतिपूर्वक पुनः पुन्हा सांगावी लागते म्हणजे तरी अशा विकासाची किंमत काय असते आणि ती कोण मोजते याचे भान आपल्याला येईल.

पुढे वाचा

मुस्लिम मनाचा उत्कट आविष्कारः अजीम नवाज राही यांची कविता

मराठी कवितेत मुस्लिम कवींचे योगदान प्राचीन काळासूनच राहिलेले आहे. शेख मोहंद, शेख सुलतान, अल्लाखान, याकूब हुसेनी इ. मुस्लिम कवींनी संत कवितेत सुफी पंथाच्या मानवताधर्माची मांडणी केली आहे, तर तंत कवितेच्या काळात मराठी शाहिरी काव्य लिहिणारे सगनभाऊ, दादू पिंजारी, शेख कलंदर ह्यांची नावे आपल्यासमोर येतात. आधुनिक काळात शाहीर अमरशेख, प्रा. नसीमा पठाण, खलील मो नि, अल्लाउद्दीन आणि रफीक सूरज हे नामांकित कवी आहेत. मध्ययुगीन काळातील सुफी कवींच्या कवितेतून सुफी तत्त्वज्ञानांच्या औदार्याचे दर्शन तर शाहिरांच्या कवितेतून लावण्याच्या विविध छटा आविष्कृत होत गेल्या. आधुनिक कवितेतून मुस्लिम समाजातील आर्थिक अनिश्चितता, अल्पसंख्यकपणाची जाणीव यांसह बंधुभावासाठीचे उमदे मन हे विषय अभिव्यक्त झाले.

पुढे वाचा

विज्ञानआश्रमाची कथा – लेखांक १

[पुणे जिल्ह्यातल्या पाबळ या गावामध्ये गेली तीस वर्षे विज्ञानाश्रम कार्यरत आहे. डॉ. श्रीनाथ कलबाग ह्यांनी भारतामधील एक नवीन शिक्षणप्रयोग येथे करून दाखवला. शिक्षणव्यवस्थेतून ग्रामीण विकास. आज विज्ञानाश्रमात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश कुलकर्णी यांच्याकडून आपण हा प्रयोग करण्यामागची विचारधारा जाणून घेऊ या. प्रयोग सुरू केल्यापासून आजपर्यंत त्यात कसकसा विकास होत गेला हे तपशिलात समजण्यासाठी पाच लेखांची मालिका द्यावी असा विचार आहे. त्यातील हा पहिला लेख.- संपादक]

डॉ. कलबागांनी १९८३ मध्ये चालू केलेल्या विज्ञानाश्रमाबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. काहींना वाटते, की ही नापासांची शाळा आहे, काहींना वाटते की हे लोक शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्याचा कार्यक्रम चालवतात, ग्रामीण भागात उपयुक्त तंत्रज्ञान शिकवतात, कमी खर्चात घरे बांधून देतात वगैरे.

पुढे वाचा

तळ ढवळतानाः एक आकलन

१९८० नंतरच्या काळात लहू कानडे यांची कविता पुढे आली. आत्मभानाचा सशक्त आविष्कार करणाऱ्या या कवितेची नाळ विद्रोही युगजाणिवेशी आहे. लहू कानडे यांच्या कवितेला असणारा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यव्यवस्थेचा संदर्भ या कवितेचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. क्रांतिपर्व (१९८३ आणि टाचा टिभा हे लहू कानडे यांचे सुरुवातीचे दोन कवितासंग्रह याची साक्ष देतात. याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यांचा अलीकडे २०१२ मध्ये प्रकाशित झालेला ‘तळ ढवळताना’ हा कवितासंग्रह होय.

ज्ञान-संपत्ति-अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलेल्या वर्गाला भारतीय राज्यघटनुळे मानवी अधिकार मिळाले. त्यांच्या कर्तृत्वाला संधी मिळून त्यांच्या अभिव्यक्तीची कवाडे खुली झाली.

पुढे वाचा

कार्यकर्त्यांची पाठशालाः दत्ता सावळे

भारतातील अनेक जनसंघटना, त्या जनसंघटनांतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, विचारवंत आणि विश्लेषक दत्ता सावळे यांचे गुरुवार दि.१३ डिसेंबर रोजी त्यांच्या गावी, पंढरपुरी, वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. गेली ३-४ वर्षे त्यांना पार्किन्सनच्या आजाराने ग्रासले होते. शारीरिक हालचाली मंदावणे, विस्मरण, परावलंबित्व अशांळे त्यांचा शेवटचा काळ काहीसा त्रासदायक झाला होता. मात्र अशा अवस्थेतही भोवतालच्या सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी ते कमालीचे सजग होते. अलिकडल्या काळातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानिमित्त काहीशी उभारी मिळालेल्या जनमानसाला, १९७० च्या दशकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून उभारी मिळालेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनासारखे टोक कसे आणता येईल याविषयीचे मत भेटावयास येणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर ते आग्रहाने मांडत होते.

पुढे वाचा

मोरपीस – रवींद्रनाथांची ‘चित्रा’

[पुस्तके व इतर ललित-वैचारिक कलाकृतींचा परिचय व समीक्षा करणारे हे सदर आपण गेल्या तीन महिन्यांपासून चालवीत आहोत. ह्यामध्ये अनेक विषयांवरच्या कलाकृतींचा अंतर्भाव होईल. साहित्य अर्थातच त्याला अपवाद नसेल.
स्त्री-पुरुष नाते त्यांच्या (विशेषतः स्त्रीच्या) रूपावर अवलंबून असावे का ह्या आदिम प्रश्नाचा वेध एका मिथक कथेच्या व त्यावर आधारित टागोरांच्या नाटकाच्या निमित्ताने ह्या लेखात घेतला आहे. ह्या प्रश्नाशी असलेला (आजच्या आपल्या) मानवी वर्तनाचा संबंध ध्यानात घेऊन कृपया हा लेख वाचावा – संपादक ]

भारतीय साहित्यपरंपरा विलक्षण समृद्ध आहे. भारतातील विविध प्रदेश, विविध भाषा, विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध झालेली संस्कृती, लोकजीवन, लौकिकासोबत पारलौकिकाची अनुभूती, येथे स्थापन झालेले, विकसित झालेले व बाहेरील जगतातून येऊन येथील प्रवाहात मिसळलेले धर्म व दर्शने अनेकविध विद्याशाखा, असंख्य विचारप्रणाली, वेद-उपनिषदे, बुद्ध-चार्वाक यांच्या तत्त्वज्ञानापासून ते आजच्या तंत्रज्ञानापर्यंत झालेला भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास या साऱ्यांचे यथार्थ प्रकटीकरण भारतीय साहित्य करीत आलेले आहे.

पुढे वाचा

आकडेबाजी

एक महत्त्वाचे नवे पुस्तक हाती आले, Churning the Earth : The Making of Global India (Penguin/ Viking, 2012) नावाचे. लेखक आहेत असीम श्रीवास्तव आणि आशिष कोठारी; आणि पुरस्कर्ते आहेत अमित भादुरी, अमिताभ घोष, अरुणा रॉय, आशिष नंदी, गणेश देवी, ज्यां ड्रेझे, कुमी नायडू, माधव गाडगीळ, मल्लिका साराभाई, रामस्वामी अय्यर, सुरेश होस्पेट, व्ही. आर. कृष्ण अय्यर व इतर.

लेखक एका ठिकाणी आर्थिक वाढ आणि रोजगार यांच्यातला संबंध तपासतात. भारतासारख्या देशांत प्रजेची सुख-समृद्धी एकूण आर्थिक वाढीपेक्षा रोजगाराच्या उत्पादक आणि बऱ्या पगाराच्या संधी जास्तजास्त उपलब्ध होण्यात आहे, हे उघड आहे.

पुढे वाचा

कसोटीचा दगड…… पाठराखा

“आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करू या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.”

भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे.

पुढे वाचा