विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

परीक्षण – पेशींचे गाणे

Book: The Song of The Cells: An Exploration of Medicine and the New Human
Siddhartha Mukherjee, Imprint: India Allen Lane, October 2022

‘पेशींचे गाणे’ ह्या आपल्या नव्या पुस्तकात प्रसिद्ध लेखक आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी म्हणतात, “आपण म्हणजे आपल्या शरीरात नांदणारी पेशींची संस्कृती!” पुस्तकाचे शीर्षक आणि पुस्तकाबद्दल लेखकाच्या दिल्लीत झालेल्या वार्तालापाचे वृत्त वाचले, तेव्हा पुस्तक वाचलेच पाहिजे असे वाटले. गंमत म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला माझ्याच शरीरातले पेशींचे गाणे ऐकू यायला लागले, थोडेसे समजायला लागले. आपले शहर जसे बहुविध नागरिकांमुळे तयार होते, तसेच आपले शरीर म्हणजे आपली बहुविध पेशींनी तयार होणार संस्कृती हे लेखकाने वापरलेले रूपक मला एक आर्किटेक्ट आणि नगरविज्ञान विषयाची अभ्यासक म्हणून विशेष भावले.

पुढे वाचा

परीक्षण – निर्वासित

मूळ पुस्तक : निर्वासित (आत्मकथन), लेखक : उषा रामवाणी,  
उषःकाल पब्लिकेशन, मुंबई १ जून २०२३

निर्वासित म्हणून ओळखले जाणारे सिंधी लोक महाराष्ट्रातील गावागावातून व्यापारी म्हणून स्थिरावले. पण त्या समाजातील मान्यतांपेक्षा निराळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या मुलीला आईवडिलांच्याच घरात निर्वासित असल्यासारखे वाटले. अशा उपेक्षित मुलीचा संघर्ष किती तीव्र असेल? उषा रामवाणी यांच्या ‘निर्वासित’ या आत्मकथनातून त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड, मायेचा ओलावा मिळण्यासाठी आसुसलेले हळवे मन दिसते. अर्थार्जनासाठी खडतर वाटचाल त्यांनी केली. अथक प्रयत्न केले. मराठी भाषेवर केवळ प्रभुत्व नव्हे तर प्रेम असणाऱ्या या तडफदार स्त्रीची संघर्षगाथा वाचनीय तर आहेच पण डोळ्यात अंजन घालणारीही आहे. 

पुढे वाचा

द मॅजिशियन – पुस्तक परिचय

कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या अंतरंगात शिरून ते वाचकांना उलगडून दाखवावे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.

मान जर्मनीमध्ये जन्मला. वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर.

पुढे वाचा

हमरस्ता नाकारताना : पारदर्शी जगण्याचे धैर्य

अलीकडेच सरिता आवाड यांचं ‘हमरस्ता नाकारताना’ (राजहंस प्रकाशन) हे आत्मकथन वाचलं. २८६ पानांचं हे पुस्तक अगदी प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे, हे पानोपानी जाणवत राहतं. कसलीही भीती न बाळगता, काहीही न लपवता यात आयुष्यातील अनेक घटना लेखिकेने तंतोतंत, मोकळ्या मनाने सांगितलेल्या आहेत. चरित्रलेखिका सुमती देवस्थळे यांची सरिता ही मुलगी. लहानपणापासूनच संवेदनशील, बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांची. चाकोरी सोडून वेगळ्या वाटा चोखाळण्याची आकांक्षा असलेली. चळवळींमध्ये भाग घेणारी, त्यांत रमणारी आणि त्यामुळेच पुरोगामी विचार अंगिकारून स्वतःचे आंतरजातीय लग्न ठरवल्यामुळे वेळोवेळी घरच्यांकडून दुखावली जाणारी, विचारी व समंजस वागूनही जवळच्यांकडून वागणुकीतले परकेपण मिळणारी.

पुढे वाचा

कसोटीचा दगड…… पाठराखा

“आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करू या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.”

भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे.

पुढे वाचा

“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय

एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.

पण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात.

पुढे वाचा

पैसा झाला मोठा !:

पुस्तक-परिचयामागील भूमिका
पैसा हा आपल्या आधुनिक जीवनाचा अतिशय महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. आपले कोणतेही वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक व्यवहार हे आता पैशांच्या मदतीशिवाय करता येत नाहीत. अठरा-एकोणिसाव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार हे वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीतून केले जात. सोन्याचांदीची नाणी चलन म्हणून वापरली जात असली तरी मुख्यत: व्यापारी लोक आणि राजेरजवाडे ह्यांच्यासाठीच त्यांचा वापर होत असे. साहजिकच आजच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती. आजही अनेक गोष्टींचे मोल पैशाच्या स्वरूपात मांडलेले अनेकांना आवडत नाही आणि पैसा सामाजिक नात्यांमध्ये बाधा आणतो असे मानले जाते.

पुढे वाचा

पुस्तकपरीक्षण ‘कातकरी’

कातकरी: विकास की विस्थापन हे पुस्तक छोटेखानी विश्वकोषाचे स्वरूपाचे आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात आदिवासी जमातीची म्हणजेच कातकरींची विविध प्रकारची माहिती इथे एका सुसंगत क्रमाने वाचकांना नवीन विषयाची पुरेशी ओळख करून देते. पुस्तकातील विवेचनाला श्री मिलिंद बोकील यांचा प्रत्यक्ष समाजकार्याचा त्यापरिसरातील दोन दशकांचा अनुभव आणि व्यासंगपूर्ण संदर्भ वाचनाचे साक्षेपी उल्लेख यांची जोड मिळालेली आहे.
पुस्तकाच्या मांडणीमध्ये सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोणातन कातकरींची जीवनशैली आणि प्रामुख्याने इंग्रजी काळानंतर कातकऱ्यांची उपजीविकेची आर्थिक साधने यामध्ये होत जाणारे महत्त्वाचे बदल व्यवस्थित रीतीने मांडलेले आहेत. कात गोळा करणे, कोळसाभट्टी आणि वीटभट्टी मजूर, डोंगराळ जमिनीवर, पारंपरिक शेती करताना वनखात्याशी कातकऱ्यांचे आलेले संबंध आणि शेवटी मुंबईसारख्या महानगराच्या सावलीत भौगोलिक वास्तव्य असल्याने त्याचे अपरिहार्य परिणाम बोकील यांनी तपशीलवार दिलेले आहे.

पुढे वाचा

आमचे नाना

३१ डिसेंबर २००५ च्या पहाटे १.३० वाजता नानांनी या जगाचा निरोप घेतला. वय ८९ वर्षे! म्हटले तर पिकले पान! खरे आहे. पण ते ज्या दिवशी गळून पडले तो दिवस तर इतर दिवसांसारखाच होता. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे थोडेसे खाणे इथवर तो रोजच्यासारखा होता आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक? मी सभेवरून आले आणि त्यांच्या खोलीतून कशाचा आवाज येतोय हे पाहिले तर नाना तक्यावरून कलंडले होते, बेशुद्ध होते. पुढची सर्व धावपळ केली. पण ह्यावेळी मात्र यश आले नाही. मागे काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला होता त्यावेळी खरे तर डॉक्टरांनीच ते चार-पाच दिवसांपेक्षा जास्त काळाचे सोबती नाही हे सांगितले होते.

पुढे वाचा

‘तर्कशास्त्र’ : पूर्णपणे फसलेले लिखाण

काही दिवसांपूर्वी डॉ. संतोष ठाकरे ह्यांनी ‘अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. अंत्य परीक्षेसाठी नेमलेल्या अभ्यासक्रमावर आधारित’ लिहिलेले तर्कशास्त्र हे पुस्तक वाचनात आले. पुस्तक वाचून हसावे की रडावे हेच समजेना. अलीकडच्या तरुण प्राध्यापक मंडळींना अल्पावधीतच आपल्याला मान्यता मिळावी ही इच्छा असते आणि ह्या इच्छेपोटी मग एखादा लेख, एखादे पुस्तक लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम घेण्याची मात्र त्यांची तयारी नसते. मग तुटपुंज्या माहितीच्या आधारे काहीतरी चुकीचे लिहिणे, कोणत्या तरी पुस्तकातून मजकूर चोरून पुस्तक सिद्ध करणे या मार्गांचा अवलंब केला जातो.

पुढे वाचा