विषय «विज्ञान»

आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन

आयुर्वेदाच्या ऱ्हासाची कारणे बरीच असली तरी मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण हा यातील एक मोठा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोगल आक्रमणापासून आयुर्वेदाचा राजाश्रय खंडित झाला तो आजतागायत पुन्हा आयुर्वेदाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्येदेखील आयुर्वेदाला मिळणारा वाटा हा एकंदर स्वास्थ्यावर खर्च होणाऱ्या रकमेच्या दोन ते तीन टक्केच होता. परंतु आयुर्वेदाचे खरे नुकसान झाले ते इंग्रजांच्या काळात. त्यांनी आपल्याबरोबर आपले वैद्यकशास्त्र आणले, जे आज ‘आधुनिक वैद्यक’ म्हणून ओळखले जाते. याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु याचबरोबर त्यांनी एक समज प्रचलित केला की पाश्चात्त्य विचारपद्धतीच एकमेव शास्त्रीय विचारपद्धती आहे.

पुढे वाचा

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग १)

प्राथमिक शाळेत विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेत मुलांना अभ्यासाबाबत ज्या चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात त्यांचा त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो. म्हणून प्राथमिक शिक्षणात गणिताच्या अध्यापन आणि अध्ययन पद्धतींना आत्यंतिक महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे. संख्याबाबतचे मूलभूत संबोध मुलांना अवगत न झाल्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या प्राथमिक क्रिया करताना मुलांच्या हातून सतत चुका घडत राहतात. गणितात सातत्याने मिळणाऱ्या अपयशामुळे मुलांच्या मनात गणिताविषयी एक न्यूनगंड निर्माण होतो. ह्या न्यूनगंडामुळे त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्वच झाकोळल्यासारखे होते. आपल्या देशात हा प्रश्न व्यक्तिगत पातळीवर हाताळण्याचा प्रयत्न केला जातो.

पुढे वाचा

स्त्रीवैज्ञानिक आणि त्यांच्या संशोधनाचे सामाजिक आयाम

स्त्रीवैज्ञानिकांचा विचार करताना मी पाच आधुनिक स्त्री वैज्ञानिकांचा परिचय येथे करून देणार आहे. या पाच जणींनी तत्कालीन स्वीकृत सिद्धान्तांना छेद देणारे संशोधन केले. त्याचबरोबर त्यांच्या संशोधनातून प्रचलित, स्वीकृत सामाजिक व्यवहारांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये ज्या मोठ्या उणिवा त्यांना आढळल्या त्यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली. परिणामी या वैज्ञानिक संशोधनाचे सामाजिक मोल समाजाला मान्य करावे लागले. प्रचलित व्यवस्थांमध्ये सकारात्मक बदल करावयाला त्यांच्या मौलिक संशोधनाचा हातभार लागला. या पाच जणींच्या संशोधनाला असलेली सामाजिक जाणिवेची झालर त्यांच्या वैज्ञानिक मोठेपणाला शोभा देणारी आहे.
स्त्री-वैज्ञानिक आणि त्यांच्या संशोधनाचे विषय
ज्या पाच स्त्रियांचा विचार येथे केला आहे त्यांच्या संशोधनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

पुढे वाचा

बाराला दहा कमीः अण्वस्त्रांचे महाभारत

एखाद्या भाषेचे सामर्थ्य त्या भाषेत ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान किती लिहिले गेले आहे यावरून दिसते. तिच्यात जर सूक्ष्म वैचारिक विश्लेषण करता येत असेल, गुंतागुंतीच्या कल्पना चोखपणे मांडता येत असतील, अमूर्तातील अमूर्त भेद दाखविता येत असतील, विचारांचे बारकावे व्यक्तविता येत असतील, तात्त्विक चिकित्सा, तार्किक मीमांसा आणि सैद्धान्तिक अभिव्यक्ती सहजपणे साधता येत असतील, तर ती भाषा समृद्ध आहे असे समजावे. मराठीला या दिशेने अजून पुष्कळ वाट चालायची आहे. म्हणून मराठीत या प्रकारच्या ग्रंथांची जेवढी निर्मिती होईल तेवढी हवीच आहे. यादृष्टीने ‘बाराला दहां कमी’ या ग्रंथाचे आपण तोंडभर स्वागत केले पाहिजे.

पुढे वाचा

गतार्थ भारतीय वास्तुशास्त्र

भारतीय वास्तुशास्त्र शिल्पशास्त्राचे एक उपांग आहे. शिल्पशास्त्रात एकूण दहा विषय येतात व वास्तुशास्त्र हे त्यांतील एक. त्याचा विस्तार एकूण अठरा ऋषींनी अठरा संहितांत केलेला आढळतो. त्यातील कश्यप, भृगुव मय यांच्या संहिता जास्त प्रचलित आहेत. भौगोलिकदृष्ट्या दक्षिणेमध्ये त्या पुरातन काळापासून प्रचलित असल्याने आजही आपल्याला दक्षिणेकडील संहितांचाच प्रचार होतानाआढळतो.
शिल्पशास्त्राच्या विस्तारात वजने, मापे, पदार्थवत्यांचे गुणधर्म, त्यावर करावयाच्या प्रक्रियाव त्यापासूनचे फायदे तोटे हे विस्ताराने येतात, व वास्तुशास्त्राला पण ते लागू होतात. ह्या एका बाबतीत पुरातन वास्तुशास्त्र हे आजच्या बांधकामशास्त्राची जननी म्हणता येईल. दिशा निश्चितीच्या प्रक्रिया, मोजमापाच्या पद्धती व गणिते, ह्याचप्रमाणे बांधकामाच्या संबंधात करावयाचे करार, त्यातील अटी, मुख्यापासून ते कनिष्ठापर्यंतव्यक्तींनी करावयाची कामेव त्यातील सूत्रबद्धता, त्यांना द्यावयाची दक्षिणा इत्यादि गोष्टीआजच्यापुढारलेल्या पद्धतींशी आश्चर्यकारकरीत्याजुळतात.

पुढे वाचा

मी आस्तिक का आहे?

कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.

पुढे वाचा

क्वांटम भौतिकी आणि तत्त्वज्ञान

या शतकाच्या आरंभी भौतिकीमध्ये दोन क्रांतिकारी शोध लागले. आइन्स्टाइनप्रणीत सापेक्षता-सिद्धान्ताने निरपेक्ष अवकाश, काल आणि गती याविषयीच्या जुन्या कल्पनांना तिलांजली दिली. या सिद्धान्ताने न्यूटोनीय यांत्रिकीमुळे भक्कम पायावर प्रस्थापित झालेल्या कार्यकारणभावाच्या आणि नियतिवाद (causality and determinism) या तत्त्वांना मुळीच धक्का पोहोचला नाही. परंतु क्वांटम यांत्रिकीने मात्र या तत्त्वांना प्रचंड हादरा दिला. आधुनिक भौतिकीचा आधार अनिश्चितता तत्त्व आहे ही कल्पना विसाव्या शतकातील अनेक तत्त्ववेत्त्यांना बुचकळ्यात पाडणारी आहे.

कण आणि तरंग : एक द्वैत
अभिजात (classical) भौतिकीमध्ये प्रकाश अथवा सर्व प्रकारचे प्रारण (radiation) हे तरंगस्वरूपी मानण्यात येते, कारण या संकल्पनेने व्यवहारात आढळणाऱ्या सर्व घटनांचे स्पष्टीकरण देता येते.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

खुळा प्रश्न

सगळ्या विश्वात बातमी पसरली की प्रश्नांची उत्तरं देणारं एक यंत्र निघालं आहे. यंत्र कुणी घडवलं, कसं घडवलं, काही माहीत नाही. यंत्राबद्दलची माहिती विश्वातल्या सर्व सुजाण जीवांना कशी कळली हेही माहीत नाही. फक्त येवढंच कळलं, की कोणताही योग्य आणि नेमका प्रश्न विचारा, आणि प्रश्नोत्तरयंत्र तुम्हाला उत्तर देईल. सोबत पत्ताही होता.

तरुण सेवकानं वृद्ध शास्त्रज्ञाला रॉकेटच्या खुर्चीत बसवलं. म्हणाला, “चला. प्रश्नोत्तर यंत्राकडे नेतो तुम्हाला. काय विचारायचं ते ठरवलं असेलंच, ना ?” शास्त्रज्ञ म्हणाला, “ हो तर ! दोनच प्रश्न, जीवन म्हणजे काय ?

पुढे वाचा

अध्यात्म आणि विज्ञान (उत्तरार्ध)

जापान कोवा

आपल्या भोवतालचे विश्व मानवाला अनुकूल आहे, एवढेच नव्हे तर सबंध विश्वच मानवाच्या स्वरूपाचे म्हणजे जड नसून चैतन्यमय आहे, असे ठरविण्याकरिता भारतीय आणि पाश्चात्त्य अध्यात्मात अनेक युक्तिवाद केले गेले आहेत. त्यांपैकी एक प्रसिद्ध युक्तिवाद म्हणजे इंद्रियगोचर जग भ्रामक आहे असे सिद्ध करणारा युक्तिवाद. इंद्रियगोचर जग सत् नाही. कारण ते सतत बदलणारे, परिवर्तमान आहे, आणि सत् तर अपरिवर्तनीय, त्रिकालाबाधित असते असा हा युक्तिवाद आहे. परंतु या युक्तिवादात वापरली गेलेली प्रमुख प्रतिज्ञा (premise), म्हणजे सत् त्रिकालाबाधित असते ही कशावरून खरी मानायची ?

पुढे वाचा