विषय «संपादकीय»

संपादकीय

आजचा सुधारक चा हा नवा अंक आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी मी घेत आहे.
मराठीत नियतकालिकांची कमतरता नाही. त्यांपैकी वैचारिक नियतकालिकांची स्थिती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चिंताजनक म्हणावी अशी आहे व ती दिवसेंदिवस ढासळताना दिसते आहे. मुळात मराठी भाषेतील व्यवहारालाच ओहोटी लागली आहे. वैयक्तिक संवादापासून गहन विमर्शापर्यंत सर्व व्यवहारांत इंग्रजीशिवाय आपले पानही हलू शकणार नाही अशी समजूत येथील अभिजनांनी (व त्यांचे अनुकरण करणाऱ्या बहुजनांनी) करून घेतली आहे. समाजात असहिष्णुता वाढीला लागली आहे, किंवा सुप्तावस्थेतील अनुदार वृत्ती सामाजिक माध्यमे व प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने उसळून बाहेर येत आहे.

पुढे वाचा

मानवजातीचे डोळस संमीलन

समाजातील तंत्रविज्ञानाचा व अधिकतम प्रावीण्याचा विस्तार जोवर चालू असतो, तोवर प्रत्येक समाज बाहेरच्या समाजांच्या दडपणाला समर्थपणे तोंड देतो. किंबहुना तो फारच रसरशीत असला, तर दुबळ्या समाजांचे शोषण करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. पण याउलट तो एकदा घसरगुंडीला लागला की, त्याचा अन्य समाजांशी चाललेला संघर्ष अधिकाधिक कष्टप्रद आणि अपयशी होऊ लागतो. जरा वेगळ्या भाषेत सांगावयाचे, म्हणजे एखादी संस्कृती अधिकतम प्रावीण्य प्राप्त करून घेईपर्यंत सतेज असते आणि तोपर्यंत ती जगातील एक उदयोन्मुख बलदंड सत्ता म्हणून मानली जाते. याउलट प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तिचे तेज मंदावत जाते व ती संस्कृती अन्य संस्कृतींचे भक्ष्य बनते.

पुढे वाचा

सहिष्णुतेची खरी कसोटी

समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रूजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रीया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याच्या बाबतीत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रध्दांच्यावर आघात करणाऱ्या लिखाणांच्या विषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणी कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रध्दा जपायच्या या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असते मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रध्दा कितीही दुखावली तरीही सहिष्णुतेने वागायचे, या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे.

पुढे वाचा

संपादक, आजचा सुधारक…

आपल्या नोव्हेंबर २०१४ च्या अंकात अरुण फाळके ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे पत्र वाचून असे वाटले की, त्यांनी माझे धर्म-धर्मनिरपेक्षता वगैरे विषयावरील तीन लेख वाचले नाहीत; त्यांनी केवळ शेवटचा लेख वाचला आहे.

त्यांचा लेखकाच्या शीर्षकावर आहे. धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यातील ‘धर्म’ ह्या शब्दाच्या ऐवजी ‘हिन्दुधर्म’ म्हणायला हवे होते असे ते म्हणतात. त्याबद्दल माझा खुलासा असा की, हे शीर्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळचे बौद्धिकप्रमुख श्री. मा.गो. वैद्य ह्यांच्या एका पुस्तकाच्या वाचनानंतर मी घेतले आहे. त्यांनी हिन्दु-धर्माची व्याख्या करताना ती कशा प्रकारे केली आहे की ‘ह्या जगात धर्म ह्या संज्ञेला पात्र अशी एकच विचारप्रणाली आहे आणि ती हिन्दुधर्माची होय आणि त्यामुळे धर्म आणि हिन्दुधर्म ह्यांत काही फरक नाही.

पुढे वाचा

न केलेल्या चुकीची अद्दल

श्री बाळ ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मुंबईत पाळल्या गेलेल्या बंदमुळे वैतागलेल्या एका तरुणीने त्याबद्दलची नाराजी फेसबुकवर लिहिली आणि त्या माध्यमाच्या पद्धतीने तिच्या एका मैत्रिणीने ‘मला पटतं’ म्हटले. या साध्याश्या, खरे म्हणजे अगदी निरुपद्रवी कृतीची फार मोठी किंमत या मुलींना आणि अनेकांना भरावी लागली आहे. या दोन मुलींना अटक करून अर्ध्या रात्रीपर्यंत पोलीसचौकीत डांबण्यात आले. एकीच्या नातेवाईकांच्या इस्पितळाचे सुमारे पंचवीस लाखांचे आणि दुरुस्त करून घेण्यासाठी लागणाऱ्या अनंत तासांचे नुकसान झाले. त्यावेळी इस्पितळात असलेल्या रुग्णांचे काय झाले; त्यांना मार बसला असेल, लावलेले सलाईन उघडले असेल.

पुढे वाचा

मेंदू-विज्ञान विशेषांक

ज्ञानाची आस विज्ञानाच्या प्रत्येक शास्त्रशाखेची विचार करायची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, स्वतंत्र असते. त्या त्या ज्ञानशाखेशी सुसंगत असते.

डीएनएचा शोध लावणारा फ्रान्सिस क्रिक हा मुळातला भौतिकीतज्ज्ञ. त्याने जेव्हा जैवविज्ञानात संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा त्याला भौतिकविज्ञानाची विचारपद्धती सोडून देऊन जैवविज्ञानाची विचारपद्धती अंगीकारावी लागली होती. माझ्यासाठी हा जणू पुनर्जन्मच होता, असे त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहूनच ठेवले आहे!

विज्ञानाच्याच दोन शाखांमध्ये विचार करायच्या पद्धतीत जर एवढे वेगळेपण तर ललितसाहित्याची विचारपद्धती किती निराळी असेल ते सांगायलाच नको. तत्त्वज्ञानाची विचारसरणी तर आणखीच वेगळी असणार.

पुढे वाचा

मेंदू-विज्ञान विशेषांकाविषयी

मेंदू-विज्ञान ह्या विषयावरचा सुदीर्घ विशेषांक आजचा सुधारक च्या वाचकांच्या हातात देताना विशेष आनंद होत आहे.

मेंदू-विज्ञान हे शरीरशास्त्र व मानसशास्त्र (वर्तनशास्त्र ह्या अर्थाने) दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे शास्त्र आहे. अलिकडच्या काळात ह्या शास्त्राने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अनेक ज्ञानशाखांमध्ये क्रांती घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली आहे. तत्त्वज्ञान ही तर सर्व शाखांची जननी मानली जाते. मेंदूविज्ञानाच्या प्रगतीने तत्त्वज्ञानावर कसा प्रभाव पाडला आहे हा आज जगभरच्या शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय आहे. तसा तो आसु च्या संपादक मंडळालाही वाटला. म्हणून या विषयावर अंक काढायचे आम्ही ठरवले होते.

पुढे वाचा

संपादकीय

मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर झालेला किंवा होऊ घातलेला परिणाम या विषयावरील ‘आजचा सुधारक’चा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. या विशेषांकामध्ये लेखनसाहाय्य करणाऱ्या लेखकांचे मनःपूर्वक आभार.

गेल्या काही वर्षांत मेंदू-विज्ञानात लागलेल्या शोधांमुळे मेंदूचे कार्य कसे चालते त्याबद्दल अधिकाधिक माहिती जमा होत आहे. आत्तापर्यंत जे फक्त तर्काने जाणणे शक्य होते त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळू लागले आहे. पूर्वापार चालत आलेल्या काही समजांना बळकटी मिळू लागली आहे, तर काही कल्पना मोडीत निघाल्या आहेत. या उलथापालथीचा परिणाम तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांवर होणे स्वाभाविक आहे. अश्या संकल्पना कोणत्या?

पुढे वाचा

संपादकीय

सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण ह्या सूत्राभोवती ह्या विशेषांकातील लेख गुंफलेले आहेत. हा विशेषांक एरवीच्या अंकांपेक्षा काहीसा वेगळा आहे.

बालकांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा अधिनियम एप्रिल 2010 पासून लागू झाला. ह्या अधिनियमाच्या कलम 8 व कलम 29 नुसार भारतातील प्रत्येक मुलाला आता चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. मात्र, हा अधिनियम लागू होऊन 18 महिने झाले असले तरी त्यात उल्लेख असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टाबाबत राज्यात पुरेसे विचारमंथन होताना दिसत नाही. अशाप्रकारचे मंथन व्हावे ह्या हेतूने 14 व 15 जानेवारी 2012 रोजी ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण’ हे दोन दिवसांचे निवासी संमेलन सेवाग्राम, वर्धा येथे आयोजित केले गेले होते.

पुढे वाचा

प्रस्तावना

‘प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे’ या विधानाबद्दल भारतात एकमत आहे, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून! ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय?’ या प्रश्नावर चर्चा करताना मात्र मतभेद सुरू होतात. ‘किमान साक्षर झाले तर पुरे’, ‘अमेरिकेतील सर्वोच्च विद्यापीठात प्रवेश मिळविला पाहिजे’, ‘भारतीय समाजातील विषमतेवर मात करता येईल असे दमदार शिक्षण प्रत्येक बालकाला मिळाले पाहिजे’ अश्या निरनिराळ्या कसोट्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला लावल्या जातात. शासकीय धोरणेही या विविध टोकांच्या अधेमधे कोठेतरी फिरत राहतात, हा आपला गेल्या 65 वर्षांचा अनुभव आहे.
दुसऱ्या बाजूने पाहावे तर महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत खूप मूलभूत विचार झालेला आहे.

पुढे वाचा