विषय «आरोग्य»

‘सर्वांसाठी आवश्यक औषधे’ का शक्य नाहीत ?

उदंड आजार, औषधे व वंचितताः
माणूस म्हटला की तो केव्हातरी आजारी पडणारच व त्यासाठी त्याला थोडेफार तरी औषधपाणी लागणारच! पण तरी आपण अशा समाजाचे ध्येय ठेवले पाहिजे की ज्यामध्ये अनावश्यक व अकाली आजारपणे कमी असतील व एकंदरीतच औषधपाण्याची गरज तुलनेने कमी राहील. पण सध्याच्या समाजात अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, रोजगार या मूलभूत गरजाही बहुसंख्य लोकांबाबत पुरेशा भागवल्या जात नाहीत किंवा चुकीच्या रीतीने भागवल्या जात आहेत. त्यामुळे अकारण व अकाली आजारपणे याने समाज ग्रस्त आहे. भारतासारख्या देशात कुपोषण, जंतुजन्य आजार (जुलाब, न्यूमोनिया, टी.बी.

पुढे वाचा

रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्रविभाग : दशा व दिशा

प्रास्ताविक:
M.B.B.S.च्या अभ्यासक्रमात रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र नावाचा विषय आहे. याच विषयाला इंग्रजीमध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडीसीन असेही संबोधण्यात येते. दंतवैद्यक, होमिओपॅथी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदवी व पदविका अभ्यासक्रम ह्यांसारख्या वैद्यक व पूरक अभ्यासक्रमातही हा विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. समाजशास्त्र, गृहशास्त्र, आहारशास्त्र, पोषणशास्त्र, रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य-प्रशासन, व्यवसाय-आरोग्य, आरोग्य-शिक्षण अभ्यासक्रम, आरोग्य-कर्मचारी-अभ्यासक्रम, स्वच्छता-निरीक्षक-अभ्यासक्रम ह्यांसारख्या विद्यापीठांतर्गत व विद्यापीठाबाहेरील इतरही बऱ्याच अभ्यासक्रमांत रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र हा विषय अंतर्भूत करण्यात आलेला आहे. वर नमूद केलेल्या बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये हा विषय राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून अनिवार्य विषय म्हणून शिकविण्यात येतो.

पुढे वाचा

आयुर्वेदाच्या मर्यादा

होमिओपॅथीचे बिंग फोडल्याबद्दल लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाचे आभार. परंतु अशीच काहीशी परिस्थिती आयुर्वेदाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८०% लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. त्यांपैकी आयुर्वेद एक महत्त्वाची उपचारशाखा असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे. सामाजिक आरोग्याच्या विषयावर प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे कर्तव्यच असल्यामुळे हा लेखनप्रपंच केला आहे. आमच्या ज्ञानशाखेला ‘ॲलोपॅथी’ असे चुकीचे नाव पडले आहे. रोगाच्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम घडविणारे उपचार (रोगाचे कारण न शोधता) करणे म्हणजे ॲलोपॅथी होय. वैज्ञानिक वैद्यक ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. वैज्ञानिक वैद्यकाचा एक भाग ‘लक्षणांवर आधारित उपचार’ (सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट) आहे.

पुढे वाचा

आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन

आयुर्वेदाच्या ऱ्हासाची कारणे बरीच असली तरी मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण हा यातील एक मोठा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोगल आक्रमणापासून आयुर्वेदाचा राजाश्रय खंडित झाला तो आजतागायत पुन्हा आयुर्वेदाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्येदेखील आयुर्वेदाला मिळणारा वाटा हा एकंदर स्वास्थ्यावर खर्च होणाऱ्या रकमेच्या दोन ते तीन टक्केच होता. परंतु आयुर्वेदाचे खरे नुकसान झाले ते इंग्रजांच्या काळात. त्यांनी आपल्याबरोबर आपले वैद्यकशास्त्र आणले, जे आज ‘आधुनिक वैद्यक’ म्हणून ओळखले जाते. याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु याचबरोबर त्यांनी एक समज प्रचलित केला की पाश्चात्त्य विचारपद्धतीच एकमेव शास्त्रीय विचारपद्धती आहे.

पुढे वाचा

भारताचे मानसिक आरोग्य: आज आणि उद्या

भारतात जन्मलेल्या आणि भारतात कार्यरत असलेल्या मनोरोग-तज्ज्ञाच्या भूमिकेत एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तो असा की एका सर्वसाधारण भारतीयाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या परदेशी बांधवांपासून कोणत्या दृष्टीने भिन्न असते व ह्या विशिष्ट ‘भारतीय व्यक्तिमत्त्वाचा’ परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर व मानसिक रोगांवर कशा प्रकारे पडतो? आपली ‘भारतीयता’ आपल्याला मानसिक आरोग्याकडे नेते किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

“निरोगी मानसिकता” म्हणजे काय ? निरोगी मानसिकता म्हणजे नेमके काय व आपल्या भारतीय विचारसरणीचा त्यावर काय प्रभाव पडतो हे सर्वप्रथम आपण समजायचा प्रयत्न करू या.

मानसशास्त्रीय विश्लेषणानुसार निरोगी मानसिकतेचे खालीलप्रमाणे दहा पैलू आहेत.

पुढे वाचा

नैराश्यग्रस्तता आघाडी घेत आहे !

जागतिकीकरणाबरोबर माणूस बदलतो आहे. नातेसंबंध बदलत आहेत. माणूस जास्त आत्मकेंद्री होतो आहे. हिशोबी होतो आहे. पैसा खूप मिळतोय पण त्याचबरोबर वेळेचा बळी – सामाजिकीकरणाचा बळी व माणुसकीचाही बळी जातो आहे. कामाचे तास वाटेल तसे वाढताहेत. आरामाला वेळ नाही. खुल्या बाजारपद्धतीमुळे वाढती स्पर्धा, विदेशी उत्पादनाची आयात, यामुळे वाढती महागाई होणार. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढते आहे. मुलांना लहान वयात जीवघेण्या स्पर्धेत उतरावे लागते आहे. त्यामुळे ताण वाढताहेत. त्याचबरोबर निराशाही वाढते आहे. आत्मकेंद्री विचार करण्याची पद्धत, वाढत्या गरजा, छानछोकी-मौजमजा यांच्याशी संबंधित. यातून ताण-तणाव वाढायलाच मदत होते.

पुढे वाचा

नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा

पाच ठळक गोष्टी नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा काय स्वरूप धारण करील हे ठरवतील.

पहिली असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण ज्याचा पुरेसा ऊहापोह शिक्षणावरच्या लेखात झाला आहे. सांसर्गिक रोगांचे प्रमाण जरी घटत चालले असले तरी त्यांचे प्रमाण एकूण वैद्यक व्यवसायामध्ये अगदी कमी होईल हे शक्य नाही. त्यामुळे सांसर्गिक व असांसर्गिक रोग्यांचा दुहेरी भार आपल्याला वाहावा लागणार आहे.

दुसरी ठळक बाब म्हणजे विमायोजनांचे आरोग्यसेवेत पदार्पण. तिसरी बाब वैद्यकीय पर्यटन (medical tourism) व चौथी पेटंट्स् आणि औषधे. विमा प्रभागात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देता देता, सरकारने सार्वत्रिक आरोग्यविमा योजना आखल्या आहेत.

पुढे वाचा

पोलिओ निर्मूलनाचे मृगजळ

(‘कोणत्याही लाभासाठी सत्याचा सोईस्कर भागच पुढे ठेवणे म्हणजे स्वतःला फसवणे. हे टाळायचे असेल तर तुम्ही ज्या गृहीतांवर आधारित प्रयोग करता, ती गृहीतेही तपासून पहायला हवीत,’ रिचर्ड फाईनमन या शास्त्रज्ञाचे हे मत. पोलिओ निर्मूलनाच्या कार्यक्रमातील गृहीतकांची ही तपासणी)

पोलिओ आजार पूर्णपणे, कायमचा उखडून टाकायचा यासाठी पोलिओ-निर्मूलन कार्यक्रम सरकारने गेली १० वर्षे हातात घेतला आहे.

इ.स. २००० पर्यंत पोलिओ निर्मूलन होईल असे आधी जाहीर करण्यात आले होते. सरकारची सर्व आरोग्य-सेवा यंत्रणा या पोलिओ-लसीकरणाच्या कार्यक्रमाला जुंपली गेली. पण पोलिओच्या केसेस होतच गेल्या व ‘पोलिओ-निर्मूलना’साठीची ‘डेड लाइन’ दरवर्षी पुढे ढकलण्यात आली.

पुढे वाचा

आरोग्य आणि आहार

तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. माणसाचे आचार-विचार, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक क्षमता, सारे आहारावरच अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त होणे हे आहाराच्याच आधीन आहेत. योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील. आणि कितीही औषधे घेतली पण पथ्य केले नाही तर त्या औषधांचा उपयोग नीट होणार नाही.

कोणताही रोग एका रात्रीत उपटत नाही त्याच्या मुळाशी बऱ्याच वेळपर्यंत होत राहिलेली अन्नघटकांची कमतरता असते. आहार योग्य असेल तर आजारपण येणारच नाही असे नाही, परंतु त्याचे प्रमाण व तीव्रता कमी राहील.

पुढे वाचा

मलेरियातील गोलमाल

लॅन्सेट या धारदार आरोग्याच्या मासिकाने भारतात जागतिक बँकेने मलेरियाचा फैलाव थांबवण्यासाठी आखलेले कार्यक्रम नीट राबवले जात नसून त्यासाठी भारत सरकारला दोषी ठरवले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने आखून दिलेल्या इलाजाप्रमाणे न चालता आपले सरकार जीवघेण्या मलेरियासाठी अर्धवट इलाज किंवा चुकीचे इलाज करते आहे कारण आपली कार्यपद्धती सदोष, धीमी व कालबाह्य ठरलेली आहे.

१९९० सालापासून भारतात दरवर्षी २०लक्ष मलेरियाचे रोगी आढळतात. प्लाझ्मोडियम विवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम. पहिला प्रकार कमी घातक आणि क्लोरोक्वीनने ठीक होणारा असतो. तर दुसऱ्या प्रकारात अनेक गुंतागुंती (Complications) उद्भवू शकतात.

पुढे वाचा