विषय «इतर»

स्फुट लेख -आजचा सुधारक हा आपला सुधारक कसा वाटेल? (२)

श्री. खिलारे आणि श्री. नानावटी यांची मागच्या म्हणजे नोव्हेंबर १८ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली पत्रे वाचून मनात काही विचार आले ते सगळ्या वाचकांपुढे ठेवीत आहोत.
लेख कोणी लिहिला आहे ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे आणि केवळ त्यातील विधानांचा, मतांचा आणि सूचनांचा परामर्श घेणेच योग्य होईल असे जे आम्ही पूर्वी म्हटले होते त्या आमच्या मतांत फरक झालेला नाही. पत्रलेखकांनी पाषाणच्या डॉ. कांबळे ह्यांच्या दवाखान्याचे उदाहरण दिले आहे. डॉ. कांबळे ह्यांच्या ठिकाणी आवश्यक ते वैद्यकीय कौशल्य असेल तर त्यांचा दवाखाना कोणत्याही वस्तीत नीट कसा चालेल हे आम्ही सर्वांनी बघितलेच पाहिजे.

पुढे वाचा

नागवणुकीचे धार्मिक तंत्र

गुलामगिरी, पुरोहितशाही, वसाहती, साम्राज्यशाही व भांडवलशाही हे ऐतिहासिक अनुक्रमाप्रमाणे मानवांनी मानवांच्या केलेल्या नागवणुकीचे चार प्रकार इतिहासास ओळखीचे आहेत. यांत गुलामगिरी व वसाहती साम्राज्यशाही निदान प्रथमावस्थेत तरी पाशवी बळावरच आधारलेल्या असतात. लोकशाही जन्मास येण्याच्यापूर्वीच भांडवलशाही अस्तित्वात आल्याकारणाने, भांडवलशाही व शासनसत्ता या दोघांची प्रेरकशक्ती एकाच वर्गात एकवटली होती असे चित्र कालपरवापर्यंत नजरेस पडत असे. इतरांच्या मानाने पुरोहिती नागवणुकीच्या तंत्राची वाटचाल जरा निराळी आहे. धर्म आणि पुरोहित या संस्थांचा उगम प्राचीन मानवाला अदृष्ट शक्तीबद्दल वाटणारे भय आणि पूज्यबुद्धी ह्यांत असतो. यामुळे जी नागवणूक इतर क्षेत्रांत बहुतांशी पाशवी शिरजोरीवर चालत असते ती धार्मिक क्षेत्रात मानसिक शिरजोरीवरच पुरोहितवर्गास साधावी लागते.

पुढे वाचा

जातधंद्याची काटेरी कुपाटी नाहशी…

सध्यां जातिधर्माप्रमाणे कुणबिकीच्या आउतापैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा एवढेच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेगवेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारे किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तन्हा होते. त्यामुळे त्यांतली व एकमेकांच्या ध्यानात येत नाहींत व सर्वच आउते अगदी निकृष्ट अवस्थेत पोहचली आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेत शिकविले तर हत्यारें एकाच्या देखरेखीखाली तयार होऊन ती सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बघून त्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल.

पुढे वाचा

विवेकाचे अधिकार

विवेकाचे, म्हणजे reason चे, दोन अधिकार सर्वमान्य आहेत असे म्हणायला हरकत नाही. (१) एखादे विधान स्वयंसिद्ध (self evident) आहे हे ओळखणे. उदा. ‘दोन राशी जर तिस-या एका राशीबरोबर असतील, तर त्या परस्परांबरोबर असतात (२) अनुमाने करणे, म्हणजे एक विधान जर खरे असेल, तर त्यापासून निगमनाने व्यंजित होणारी विधानेही खरीच असतात असे ओळखणे. उदा. सर्व मनुष्य मर्त्य आहेत आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे हे संयुक्त विधान जर खरे असेल, तर ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे हे विधानही खरेच असले पाहिजे, ते असत्य असू शकत नाही.

पुढे वाचा

माफ करा! माझे मत बदलले आहे — माझी वर्तमान भूमिका

‘स्वतोमूल्य’ या विषयावरील माझे मत बदलले आहे हे वाचकांना कळविण्यासाठी मुद्दाम हे टिपण लिहिले आहे. चार-सहा महिन्यांपूर्वी स्वतोमूल्य विषयनिष्ठ, म्हणजे objective आहे, ते जाणणारी सारी मने, सर्व ज्ञाते, नाहीसे झाले तरी ते अबाधित राहणार आहे, असे मी मानीत असे. थोडक्यात स्वतोमूल्याविषयी मी G.E. Moore चे मत स्वीकारीत असे. मूर म्हणतो की स्वतोमूल्यवान वस्तू म्हणजे आपल्याला केवळ तिच्याखातर अभिलषणीय वाटावी अशी वस्तू, तिच्यामुळे आपल्याला हवे असलेले अन्य काही प्राप्त होते म्हणून नव्हे. आता मूरचे म्हणणे असे होते की जगातले सर्व विषयी (किंवा ज्ञाते) नाहीसे झाले तरी स्वतोमूल्यवान वस्तूचे स्वतोमूल्य अबाधित राहते.

पुढे वाचा

दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (२)

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश प्रशासकांच्या जागी भारतीय प्रशासक आले पण प्रशासनाचे स्वरूप जवळपास तेच राहिले. ब्रिटिश आराखड्यावर भारतीय संसदीय लोकशाहीचे स्वरूप आखले गेले. भारतीय प्रशासकीय सेवा, न्यायसंस्था, सैन्यदल, शिक्षणपद्धती सगळे जवळपास त्याच स्वरूपात पुढे चालू राहिले. वर्माच्या मते हे सातत्य टिकले कारण मध्यमवर्गाची स्वातंत्र्याची कल्पनाच ती होती. ब्रिटिशांची हकालपट्टी त्यांना हवी होती पण राज्यकारभाराची पद्धत तीच हवी होती.
१९४७ च्या सुरुवातीचा हा मध्यमवर्ग संपूर्ण लोकसंख्येच्या १०% सुद्धा असेल नसेल. वरती मूठभर अतिश्रीमंत उद्योजक, भांडवलदार, जमीनदार आणि राजघराण्यातले काही लोक आणि खालती प्रचंड संख्येचे शेतमजूर, कष्टकरी, कामगार, चतुर्थ श्रेणीतील नोकरवर्ग वगैरे.

पुढे वाचा

स्फुट लेख

(१) फक्त शेतक-यांनाच वीज मोफत का?
शिवसेनाप्रमुखांनी शेतक-यांना दिल्या जाणा-या विजेबद्दल त्यांच्याकडून कोठलाही मोबदला घेऊ नये असे फर्मान काढल्याबरोबर आमच्या शासनाची तारांबळ उडाली. महाराष्ट्र राज्य विद्युन्मंडळाच्या कर्जबाजारीपणाची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेली आहेत. थोड्या थोड्या रकमांसाठी त्याला बँकांकडे याचना करावी लागत आहे. सार्वजनिक मालकीकडून खाजगीकरणाकडे आपल्या समाजाची वाटचाल होत असल्याची चिह्न दिसत असताना शिवसेनाप्रमुखांच्या आदेशामुळे शासन चांगलेच पेचात सापडले आहे.
जोपर्यंत खाजगी मालकी कायम आहे, खाजगी मालकीवर आपला विश्वास आहे तोपर्यंत कोणालाही कोणतीही वस्तु फुकट न मिळणे योग्य नव्हे काय? आपली खाजगी मालमत्ता वाढविण्यासाठी ज्या-ज्या वस्तू आणि सेवा आपण वापरतो त्या दुस-याकडून घेतल्या असल्यास त्यांचा मोबदला ज्याचा त्याला मिळाला पाहिजे.

पुढे वाचा

खेड्यांतली शाळा कशी असावी?

खेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हां कुणबी हा खेड्यांतला प्रधान घटक आणि कुणब्यासाठी इतर हे नाते लक्षात आणून खेड्यापाड्यांनी शाळा काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे तास व सुट्या असाव्यात. शेतकाम नसेल अशा दिवसांत शाळा दुवक्त असावी, ते बेताचे असेल त्या वेळी एकवक्त आणि त्याचा भर असेल त्यावेळी विद्यार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या बेताने म्हणजे सुमारे एक दोन तास शाळा भरावी. शाळेत शारीरिक बळवृद्धीला महत्त्व दिले पाहिजे; आणि अभ्यासक्रम इतकाच असावा कीं, शिकणाराला बाजारांत अडचण पडू नये, सावकाराशीं तोंड देतां यावे आणि आपल्या धंद्याचे ज्ञान वाढवतां यावे; पाहिलेली व ऐकलेली वस्तु व हकीगत मजकूर जुळवून सांगतां व लिहितां येणे, उजळणी, देशी चालीची कोष्टके, (ज्याला परदेशी कोष्टकांचे कारण पडेल तीं तो जरूरीप्रमाणे पुढे शिकेल.)

पुढे वाचा

अमेरिकेतील शिक्षकसंघ: सामर्थ्य आणि संघर्ष

आज अमेरिकेत शिक्षकांच्या हक्कांसाठी झगडणारे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले नॅशनल एज्युकेशनल असोसिएशन (एन्.ई.ए.) व अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स (ए.एफ.टी.) असे दोन संघ आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ह्या दोन संघटना कुत्र्या-मांजरांसारख्या उघडपणे मांडत आहेत. दरवर्षी ह्या संघटनांचे प्रतिनिधी आपल्या वार्षिक संमेलनात एक संघटनेच्या मागणीचा प्रस्तावही मांडतात. पण दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी तो बहुमतांनी फेटाळून लावतात. हा तमाशा अनेक वर्षांपासून अमेरिकन जनतेला फुकटात पाहावयास मिळतो. ह्या वर्षी जुलै महिन्यात दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी बहुमताने एकीकरणाचा ठराव पुन्हा एकदा बहुमतांनी नामंजूर केला.
ह्या दोन्ही संघटनांची सभासद-संख्या जवळजवळ ३० लाख आहे.

पुढे वाचा

दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (१)

भारतातील मध्यम-वर्गाचा हा संशोधनपूर्वक अभ्यास पवन वर्मानी अतिशय प्रभावीपणे आणि आश्चर्यकारक पोटतिडकेने सादर केला आहे. इतिहासाचे आणि कायद्याचे पदवीधर असलेले वर्मा भारतीय विदेशसेवेत एक अधिकारी आहेत. राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी म्हणून आणि इतर अनेक जबाबदारीच्या अधिकारपदांवर त्यांनी काम केले आहे आणि सध्या ते विदेश कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी, प्रवक्ते (spokesman) आहेत.
ह्या आधीची वर्माची पुस्तके वेगळ्या प्रकारची आहेत. उदा. Krishna: The Playful Divine; Ghalib: The Man, the Times; Mansions at Dusk – The Havelis of old Delhi (with Raghu Rai) वगैरे. ह्या पुस्तकांवरून त्यांचा उर्दू काव्याचा, पौराणिक वाङ्मयाचा आणि इतिहासाचा अभ्यास लक्षात येतो.

पुढे वाचा