विषय «इतर»

विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या

राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला.
“काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. हा हर्षोन्मादाचा काळ तुला आठवत असेल, होय ना?” राजाच्याने राहवेना, तो भडाभडा बोलू लागला. “लोक फार विघ्नसंतोषी असतात, वेताळा. आपण आपल्या तंत्रशक्तीचे प्रदर्शन केले रे केले, आणि त्या बाकी लोकांनीही दोनचार बाँवस्फोट करून सारा मजा किरकिरा केला.

पुढे वाचा

स्वदेशी चळवळ : एक मुक्त चिंतन

मे १९९९ च्या अंकात श्री. र. वि. पांढरे यांचा स्वदेशीची चळवळ हा लेख वाचण्यात आला. स्वदेशीच्या चळवळी बद्दल मतभेद असू शकतात. पण श्री. पांढरे या चळवळीचा विचार ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत वैचारिक लेखाला अंशोभनीय आहे. लेखकाचा रोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असल्याचे दिसून येते. वास्तविक संघाचा हिंदुत्ववाद कधीच आक्रमक नव्हता. त्याला एवढेच अभिप्रेत होते आणि आहे की, संपूर्ण हिंदू समाज संघटित झाल्याशिवाय आक्रमक शक्तींचा प्रतिकार करणे शक्य नाही. पूर्वीच अस्तित्वात आलेली हिंदु-महासभा ही हिंदुत्ववादी राजकीय संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांत हेतुतः साम्य असल्याने राजकारणाचे आकर्षण व अगत्य असणारी संघाची काही माणसे हिंदु-महासभेत गेली.

पुढे वाचा

स्फुट लेख

भांडवलाचे वास्तव स्वरूप
एप्रिल ९१ च्या अंकात महागाई नाही – स्वस्ताई! या नावाचा स्फुट लेख लिहिलेला आहे. त्यानंतर आज भांडवलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी नजरेने जगाकडे पाहण्याची ही एक खटपट आहे.
कोणतेही उत्पादन करावयाचे असेल तर त्यासाठी भांडवल, श्रम आणि भूमि आणि कच्चा माल या चार वस्तूंची गरज असते हे आपण सगळेच जाणतो, मात्र भांडवलाच्या विपयीची आपली अगोदरची कल्पना ही शोपणाधिष्ठित असल्या मुळे एका वाजूला उत्पादन वाढत राहिले तरी दुस-या वाजूला विपमता कायम राहते. शोषणाचे पूर्वीचे स्वरूप आता थोडे फार वदलले असले, जो शोषित आहे तो अगदी सर्वहारा, सर्वस्व गमावलेला नसला तरी विषमता आणि शोपण हे शब्द पर्यायवाची वनले आहेत, आजवरच्या भांडवलाच्या व्याख्या खाजगी मालकी गृहीत धरून केलेल्या आहेत असे जाणवते.

पुढे वाचा

सत्यदर्शनातील अडथळा

आजचा सुधारक च्या जानेवारी ९९ च्या अंकात सत्यदर्शनातील खरा अडथळा कोणता? ह्या शीर्पकाखाली मी एक जिज्ञासा व्यक्त केली होती. त्या संदर्भात दोन पत्रे आली. पैकी पहिले पत्र श्री. अनन्त महाजन यांचे एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित झाले आहे. त्याचा प्रथम विचार करू . ते म्हणतातः “लेखिकेने आपल्या निवेदनात वापरलेला conditioning हा शब्द जे. कृष्णमूर्ती यांच्या लिखाणात सर्वत्र दिसतो; त्याचा अर्थ मला समजला नाही.” असे म्हणून त्यांनी त्यासंबंधी काही प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे मानसशास्त्राच्या जाणकारांनीच द्यावयाला हवीत. याशिवाय “विश्वरूपाचे निरनिराळे आविष्कार म्हणजेच सुवर्णपात्र आहे” असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे वाचा

अमेरिकेत आजचा सुधारक – (२)

बारा सप्टेंबरच्या त्या वाचकमेळ्यात सुधारक कसा वाढवता येईल याच्या अनेक सूचना पुढे आल्या. त्यांतली एक अशी की येथून आपण भारतातले वर्गणीदार प्रायोजित (स्पॉन्सर) करावे. फडणिसांच्या या सूचनेला डॉ. नरेन् तांबे (नॉर्थ कॅरोलिना) यांनी पुस्ती जोडली की व्यक्तीपेक्षा वाचनालयांना आजचा सुधारक प्रायोजित करा. सुनील देशमुखांनी कॉलेजची ग्रंथालये घ्या म्हटले – एक वर्षभर अंक प्रायोजित करून तेथे जावा. त्यातून संस्था, महाविद्यालये, व्यक्तिगत वाचक-ग्राहक मिळतील. मुळात प्रायोजित करण्याची योजना आजीव सदस्यतेची वर्गणी भरून करायची पण लाभार्थी संस्था दरवर्षी बदलत जायच्या अशी कल्पना.
ही कल्पना इतकी अफलातून ठरली की एकूण मिळालेल्या एक्याऐंशीपैकी तीस अमेरिकेतले आणि एक्कावन्न भारतातले प्रायोजित अशी विभागणी आज झाली आहे.

पुढे वाचा

अर्थ-व्यवस्था व राज्य-व्यवस्था

समाजवाद, बाजारपेठा व लोकशाही’ या अमर्त्य सेन यांच्या निबंधाचा विद्यागौरी खरे यांनी केलेला अनुवाद मार्च ९९ च्या आ.सु. मध्ये वाचला. तो वाचून काही स्पष्टीकरण करणे व काही विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा लेख.

अर्थव्यवस्थेच्या दोन प्रमुख पद्धती आहेत –
(१) भांडवलशाहीः – खाजगी उत्पादन, खाजगी व्यापार, मुक्त बाजारपेठेमध्ये मागणी व पुरवठा यांवर आधारित विनिमयाचा दर, खाजगी सेवा, उत्पादनक्षमतेचा विकास करून, कमी कमी किमतीत जास्तीत जास्त चांगली वस्तू किंवा सेवा पुरवण्याचा प्रयत्न करून, जास्तीत जास्त नफा किंवा पगार मिळवण्याची स्पर्धा करणे ही भांडवलशाहीची प्रमुख लक्षणे म्हणता येतील.

पुढे वाचा

स्वदेशीची चळवळ

अलीकडे विदेशी आणि स्वदेशी यांमधील द्वंद्व फार प्रकर्षाने खेळले जाऊ लागले आहे. आन्तर्राष्ट्रीय दबावामुळे जागतिकीकरणाचा १९९० च्या दशकात सर्वत्र बोलबाला होऊ लागला त्यामुळे भारतात काहीशा सुस्त पडलेल्या स्वदेशीच्या चळवळ्यांना चेव आला. स्वदेशीची चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधील एक महत्त्वाचा घटक होती आणि स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय विकास धोरणाच्या पायातील एक वीट (plank in the platform) म्हणून काँग्रेस सरकारने या ना त्या प्रकारे स्वदेशीचे तत्त्व मान्य केले. भारतीयांना खरोखरच स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरूंनी स्वदेशीला महत्त्वाचे स्थान दिले. म्हणूनच पोलादाचे, खतांचे, अवजड यंत्रसामुग्रीचे व अणुऊर्जेचे प्रचंड प्रकल्प सरकारने राबविले.

पुढे वाचा

वाचक मेळाव्याचा वृत्तान्त

आजचा सुधारक या मासिकाच्या वाचकांचा मेळावा रविवारी दिनांक २४ एप्रिलला भरला. निमित्त होते, मासिकाचे दहाव्या वर्षात पाऊल टाकण्याचे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने आपले दालन या मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिले, ज्याबद्दल आजचा सुधारक परिवार त्यांचा अपार आभारी आहे.
हा या मासिकाच्या वाचकांचा तिसरा मेळावा. आधीच्या दोन मेळाव्यांपेक्षा हा काही बाबतींत वेगळा होता. मुख्य म्हणजे मासिकाचे संस्थापक संपादक श्री. दि. य. देशपांडे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीतले हे मासिकाचे पहिलेच ‘कार्य’! दुसरे म्हणजे हा वाचक-मेळावा पूर्णपणे अनौपचारिक होता – ना अध्यक्ष, ना प्रमुख पाहुणे.

पुढे वाचा

चर्चा – धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर

धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर त्या विषयावरचा वाद फलदायी व्हायला हवा असेल तर त्यातला मुळातला मुद्दा काय आहे हे पाहिले पाहिजे.
‘धर्मान्तर म्हणजे राष्ट्रान्तर’ हे विधान मला वाटते प्रथम सावरकरांनी केले. त्याचा नेमका अर्थ काय?
हे विधान करताना सावरकर एक त्रिकालाबाधित समाजशास्त्रीय नियम सांगत नव्हते. म्हणजे कोणत्याही काळी, कोणत्याही राष्ट्रातील लोकांनी आपला धर्म बदलला तर त्यांची राष्ट्रनिष्ठा ढळते असे त्यांना सांगायचे नव्हते. असे विधान कुणी केले तर ते असिद्ध ठरवणे
अगदीच सोपे आहे. पण प्रचलित प्रश्नांवर प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही.

पुढे वाचा

अर्थव्यवस्थेच्या सुसूत्रीकरणासाठी बाजारपेठ उपयोगी नाही

बाजारपेठ म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ घालून सर्व वस्तूंच्या योग्य किमती ठरून त्याप्रमाणे वस्तू आणि श्रम यांचा विनिमय होणे. या क्रियेला काही जण अर्थव्यवहाराचे सुसूत्रीकरण मानतात. श्री. स.ह. देशपांडे (एप्रिल ९९) हे या बाजारपेठेचे दोन प्रकार सांगतात. खाजगी मालकीच्या आधारे उभी राहणारी (म्हणजे भांडवलशाही किंवा ‘मुक्त) बाजारपेठ; आणि सामुदायिक मालकीच्या आधारावर (संकुचित) उभी असलेली ‘सोशलिस्ट मार्केट इकॉनमी’ उर्फ समाजवादी बाजारपेठ.
देशपांडे असेही सांगतात की सो.मा.इ. मध्ये केवळ आर्थिक यंत्रणा अभिप्रेत आहे, तर भांडवलशाही बाजारपेठेत लोकशाहीचा आत्माही आहे. सोईसाठी आपण ‘जुनी’ भांडवलशाही ती बाजारपेठ आणि नवे कृत्रिम समाजवादी ते ‘मार्केट’ असे शब्द वापरू.

पुढे वाचा