निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करून महिना-दीड महिना केंद्र सरकारतर्फे रेडिओ, दूरदर्शन, प्रसारमाध्यमांतर्फे होणारा प्रचार थांबला आहे. हा प्रचार ‘अवास्तव, अतिरेकी, आक्रमक होता.
खरे पाहता नव्या आर्थिक सुधारणांचा पाया 1980-90 च्या दशकात आणि नंतर राजीव गांधी आणि नरसिंह राव शासनाने घातला. संगणकतज्ज्ञ सॅम पित्रोडा यांचे व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला यानुसार साक्षरता मोहीम, दूरसंचार मोहीम आदी पाच मोहिमा सुरू करून कामास गती आणि दिशा दिली गेली. 1984-89 व नंतर 1991-96 या दहा वर्षांत आजच्या ‘भारत उदया’ची पायाभरणी झाली, सातत्याने प्रयत्न झाले आणि 1998-99 मध्ये असा ‘भारत उदय’ विकसित झालेला देश भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शासनाखाली आला.