विषय «इतर»

कितपत तेजस्वी भारत

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करून महिना-दीड महिना केंद्र सरकारतर्फे रेडिओ, दूरदर्शन, प्रसारमाध्यमांतर्फे होणारा प्रचार थांबला आहे. हा प्रचार ‘अवास्तव, अतिरेकी, आक्रमक होता.

खरे पाहता नव्या आर्थिक सुधारणांचा पाया 1980-90 च्या दशकात आणि नंतर राजीव गांधी आणि नरसिंह राव शासनाने घातला. संगणकतज्ज्ञ सॅम पित्रोडा यांचे व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला यानुसार साक्षरता मोहीम, दूरसंचार मोहीम आदी पाच मोहिमा सुरू करून कामास गती आणि दिशा दिली गेली. 1984-89 व नंतर 1991-96 या दहा वर्षांत आजच्या ‘भारत उदया’ची पायाभरणी झाली, सातत्याने प्रयत्न झाले आणि 1998-99 मध्ये असा ‘भारत उदय’ विकसित झालेला देश भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शासनाखाली आला.

पुढे वाचा

मनुष्यस्वभाव : एकीतली विविधता

आपण आपल्या भूतकाळाने घडवलेले असतो-डार्विनच्या उत्क्रांतीबाबतच्या मांडणीत ही एक कळीची संकल्पना आहे. आपण देवाने आपल्याला घडवले असे न मानताही आपण घडवले गेलेलो आहोत असे मानू शकतो. आपल्या पूर्वजांच्या पुनरुत्पादनाच्या (प्रजननाच्या) निवडीतून आपण अजाणताच काही विशिष्ट जीवनशैलीसाठी घडवले जातो. एका सामाजिक, द्विपाद, मूळच्या आफ्रिकन कपीच्या आयुष्यक्रमासाठी मानवी स्वभाव घडलेला आहे. अशीच माणसाची पचनसंस्थाही एका सर्वाहारी, मांसाहाराची चटक असलेल्या आफ्रिकन कपीसाठी घडलेली आहे.

या माझ्या सुरुवातीने दोन प्रकारची माणसे चिडली असणार. ज्यांना एका दाढीवाल्या माणसाने सांत दिवसांत हे जग घडवले असे वाटते, आणि याचे उपप्रमेय म्हणून मनुष्य- स्वभाव निवडीतून नव्हे, तर त्या दाढीवाल्याच्या बुद्धीने घडला असे वाटते, त्यांना माझे अभिवादन.

पुढे वाचा

नको तिथले खाजगीकरण

चीनच्या हुनान प्रांतातले क्षिनमिन हे हजारभर वस्तीचे खेडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोड्या पाण्यातल्या गोगलगाईंमुळे पसरणाऱ्या शिस्टोसोमिॲसिस या रोगाने गावातील सारे ग्रस्त आहेत. गोगलगाईंमधून एक परजीवी कृमी शरीरांत शिरते, यकृतात आणि मूत्राशयात अंडी देते आणि रक्ताबरोबर मेंदू आणि मज्जारज्जूत जाऊन स्थिरावते. मूत्रपिंडे निकामी होतात, अर्धांगवायू होतो आणि अखेर वेदनामय अकाली मृत्यू ओढवतो. वांग झिंकुनला तीन वर्षांपूर्वी लागण झाली. त्याने 4,830 डॉलर्सची (सुमारे सव्वा दोन लाख रुपये) आपली पुंजी औषधोपचार आणि शस्त्रक्रियेने अंडी व कलिका काढून टाकण्यात खर्च केली. आता पुन्हा शस्त्रकियेची गरज आहे, पण 45 वर्षांच्या वांगकडे पैसे नाहीत.

पुढे वाचा

मनकवडे- ‘मनांधळे’

माणसे स्वभावतःच मनकवडी असतात. इतरांचे मनोव्यापार कल्पनेने तपासण्याचे माणसांचे कौशल्य हे भाषेचा वापर किंवा बोटांपुढे आणता येणाऱ्या अंगठ्याच्या दर्जाचे मानवी वैशिष्ट्य आहे. ते इतक्या सहजपणे आपण वापरत असतो की तसले काही कौशल्य आहे हेच आपल्याला सुचत नाही. पण चार वर्षांच्या मुलाचे या क्षेत्रातले कौशल्य बहुतांश प्राण्यांमध्ये आढळत नाही. आपण जगात येतो तेच ‘इतर मनांचे आराखडे’ घडवत आणि सामाजिक प्रतिसादांप्रमाणे आराखडे बदलून घेत.

1980-90 च्या दशकाच्या मध्याजवळ सायमन बॅरन कोहेन या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाने काही सहकाऱ्यांसोबत लहान मुलांच्या मनकवडेपणाबद्दल एक महत्त्वाचा प्रयोग केला.

पुढे वाचा

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग २)

संख्यांची लेखनपद्धती 0, शून्याची संकल्पना साकारल्याशिवाय हे शक्य होणार नव्हते. म्हणून दशक संकल्पनेनंतर ) ची संकल्पना सुचणे हा गणिताच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पण मोठ्या संख्या लिहिता येण्यासाठी आणखी एका संबोधाचे आकलन होणे आवश्यक होय. लिहिताना आपण कागदाच्या पानाचा, किंवा फळ्याचा (जमिनीवरील धुळीचासुद्धा) उपयोग करतो. पानाला डावी बाजू, उजवी बाजू, तसेच खालची बाजू असते. पानावर उभी रेघै ओढल्यास रेघेच्या डावीकडे आणि उजवीकडे अशा बाजू असतात. 0 ते 9 ह्या दहा चिह्नांचा उपयोग करून दोन अंकी संख्या लिहू शकू का? दोन अंकी संख्येत किती दहा आहेत आणि (दहा पेक्षा कमी) सुटे एकक किती हे सांगता येत असल्यामुळे रेघेच्या डावीकडे दशक अंक लिहून आणि उजवीकडे (एकाच ओळीत) एकक लिहून इष्ट संख्येचा बोध होतो.

पुढे वाचा

‘आम्ही नागरिक’

शासनाच्या क्रियांमुळे व निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या हक्कांमध्ये सतत झीज होत असल्याचे आपण सारे अनुभवत आहोत. हे राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत घडत आहे. आता ही झीज थांबवून एकत्रित नागरी क्रियांमधून नागरिकांचे हक्क पुन्हा मागण्याची वेळ आली आहे. या हेतूने ‘आम्ही नागरिक’ (We, The People) या नावाने एक संस्था स्थापण्यात येत आहे

. 1) केंद्रीभूत मुद्दे : खालील बाबतीत नागरिकांच्या हक्कांचे पुनःप्रस्थापन करणे – क) कायद्याचे राज्य, नेमकेपणाने सांगायचे तर नागरिकप्रेमी कायदा, सुव्यवस्था व निराकरणाच्या यंत्रणांची मागणी करणे. ख) समन्यायी, परिणामकारक व कार्यक्षम तऱ्हेने सार्वजनिक सेवा (Public Services) लोकांपर्यंत पोचवणे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

डॉ. निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 (10-03-2004) पृ. 489 वरील परिच्छेद 3 मधील आध्यात्मिकांच्या दाव्यातील एक भाग “…आत्माच… भौतिक गोष्टींचे नियंत्रण करतो….” सिद्ध झालेला नाही. तर्काला किंवा मानवी संवेदनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाणविणारी वस्तू अशी भौतिक वस्तूची व्याख्या आहे. म्हणूनच, भौतिक उपकरणांना न जाणवणाऱ्या आत्म्याचे अस्तित्व आत्म्याच्या व्याख्येमुळे कधीही मान्य केले जाणार नाही. त्यासाठी प्रयोगाचीही गरज नाही. चांगल्या वैज्ञानिक कल्पनेचे (hypothesis) दोन अत्यावश्यक गुणधर्म असे की तिच्यामध्ये किमान घटक (factor) असतात आणि तिला तपासणारा प्रयोग त्या कल्पनेमध्येच सुचविलेला असतो.

पुढे वाचा

माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ!

31 ऑक्टोबर 2002 ला एका जनहित याचिकेवर निर्णय देताना भारताचे तेव्हाचे सरन्यायाधीश बी.एन. किर्पाल यांनी केंद्र सरकारला नद्या-जोडणी लवकर करण्याचा आदेश दिला. नद्या-जोडणी अत्यंत निकडीची आहे आणि ती लवकरात लवकर करण्याचा आमचा निर्धार आहे, अशा अर्थाची विधाने राष्ट्रपती व पंतप्रधानांनी केली. त्यासाठी (माजी मंत्री व शिवसेनेचे खासदार) सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली एक कृतिदल (Task Force) घडवले गेले. मधल्या काळात किर्पाल यांनी आपण केवळ सूचना केली, आदेश दिला नाही, असे सांगितले. राष्ट्रीय जनआंदोलन संघटन (NAPM), मेधा पाटकर व इतरांनी नद्या-जोडणी चुकीची असल्याचे सांगितले.

पुढे वाचा

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग २)

“माती धरून ठेवा, पाणी अडवा आणि जमिनीत मुरवा” हा आजकालचा मंत्र झाला आहे पण त्याला म्हणावा तसा जोर येत नाही. पाणलोटक्षेत्र संवर्धन (Catch- ment area Management) आणि वनीकरण (Afforestation) यांनाही जोर येत नाही याला कारणे आहेत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे एक प्रमुख कारण आहे. वनवासी गिरिजनांनी वृक्षसंपत्ती जपावी पण लाभ मात्र मैदानी लोकांचा अथवा जंगल खात्याचा व्हावा, हे बरोबर नाही. जपणाऱ्यांनाही समृद्धीचे आयुष्य का जगता येऊ नये? मुंबईने शहापूर तालुक्याचे पाणी ओढून आणावे पण शहापूर तालुक्यातील पाणलोटक्षेत्रांच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊ नये, उलट धरणे गाळाने भरताहेत म्हणून ओरड करावी हे कितपत सयुक्तिक आहे?

पुढे वाचा

नैतिक बुद्धिमत्ता

सर्व पालकांना वाटते की आपली मुले आज्ञाधारक असावीत. त्यांना सिगरेट, दारू, अमली पदार्थ यांचे व्यसन असू नये. त्यांनी बाहेर मारामारी किंवा दंगेखोरपणा करू नये. त्यांनी नातेवाईकांशी व मोठ्यांशी आदराने वागावे. परंतु यासाठी नेमके काय करावे हे पालकांना समजत नाही. सदाचाराने कसे वागावे यासाठी कोणतेही नीतिनियम नाहीत. शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ गिरवून अनैतिक वर्तणुकीस आळा बसतोच असे नाही. मुलांना सारखे ‘हे कर’ आणि ‘ते करू नकोस’ असे सांगितल्याने मुलांमध्ये सदाचाराचा विकास होत नाही. मुले लहान असताना धाकाने एक वेळ ऐकतील. परंतु मोठे झाल्यावर लादले गेलेले नीतिनियम ती झुगारून देतात.

पुढे वाचा