नागरी-जैविक विविधता (भाग २)

नागरीकरणामुळे जैविक वैविध्यावर होणारे आघात आणि ते रोखण्यासाठी आवश्यक असणारे संवर्धन धोरण

५. जैवविविधता जपणाऱ्या ‘नव्या’ नगरांचे नियोजन:
५.१. वस्ती, खेडे, गाव, नगर, महानगर, मोठे नागरी प्रदेश अशी मानवी वस्त्यांची एक श्रेणी असते. कधीकधी एखाद्या ठिकाणी अचानकपणे नवे नगर वसविण्याचे ठरते. त्यामागे काही सामाजिक-राजकीय कारणे असतात. वेगाने नगरनिर्माण करण्याच्या धडपडीमध्ये नियोजन करायला पुरेसा वेळही दिला जात नाही. साध्या नागरी सेवांचा विचार पुरेशा प्रमाणात होत नाही तेथे पर्यावरणाचा विचार तर दूरच राहतो. असे असले तरी स्थानिक जैवविविधता नष्ट होणे हे अपरिहार्यच असते असे मात्र नाही.

पुढे वाचा

ग्राम-नागरी संबंध आणि विकासाची परस्परावलंबी प्रक्रिया (भाग २)

या लेखाच्या पहिल्या भागात ग्रामीण-नागरी प्रक्रियेमधील लोकांचे स्थलांतर आणि मालांची देवाण-घेवाण यांची चर्चा केली होती. या ‘उपयोगी’ मालाच्या आणि/सक्षम, कष्टकरी लोकांच्या स्थलांतर प्रक्रियेला जोडूनच इतर काही महत्त्वाची देवाणघेवाण ग्राम-नागरी विभागांमध्ये होत असते. त्यांचा विचार या भागात केला आहे. ७) निरुपयोगी गोष्टींचे प्रवाह (Flows of wastes):
नागरी क्षेत्रांचे, विशेषतः मध्यम आणि मोठ्या आकाराच्या शहरांचे परिणाम केवळ त्यांच्या ‘सीमांकित’, नागरी भूक्षेत्रापुरते कधीच मर्यादित नसतात. त्यांचे पर्यावरणविषयक परिणाम तर पुष्कळ मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर होत असतात. ‘नगरांचे पर्यावरण ठसे’ (Ecological footprints) हे आजूबाजूच्या ग्रामीण समजल्या जाणाऱ्या प्रदेशांवरही पडत असतात.

पुढे वाचा

आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (३)

पाश्चात्त्य देशांनी इतरांचे शोषण करण्यासाठी विज्ञानाचा गैरवापर केला. ‘नेटिव्हां’ना कमी लेखणे विज्ञानाच्या मदतीने घडले. परकी परंपरांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी प्रबोधन-काळातल्यासारखा विज्ञानाचा वापर केला. हे सर्व नाकारता येत नाही. पण हे नोंदण्यामुळे, यावर टीका करण्यामुळे आधुनिकोत्तर विचारवंत धर्माधिष्ठित ‘उजव्या’ विचारवंतांचे सहकारी, दोस्त होत नाहीत. पण आधुनिकोत्तर विचारवंत विज्ञानाच्या राजकीय गैरवापरावरील टीका करून थांबत नाहीत. ते वस्तुनिष्ठ ज्ञानाची कल्पना हेच एक मिथक आहे, आणि हे मिथक सत्ताधारी पाश्चात्त्यांनी मतलबीपणे ‘सत्य’ म्हणून इतरांवर लादले आहे, असे म्हणतात. ते विज्ञानाचे पाश्चात्त्य साम्राज्यवादाशी असलेले संबंध दाखवून थांबत नाहीत.

पुढे वाचा

चिरतरुण जातिव्यवस्था

इंग्रजी शिकलेल्या उच्चभ्रू वर्गातील एखाद्यासमोर ‘जात’ या शब्दाचा उच्चार केला तरी तो अस्वस्थ होईल. रागाने लालबुंद होईल. पूर्वग्रहदूषित म्हणून हिणवेल व तुम्हाला चक्क वेड्यात काढेल. त्याच्या मते ‘ते’ जातपात मानत नाहीत. कधी कुणाची जात विचारत नाहीत, जातीवर आधारित व्यवहार करत नाहीत वा कुठलेही निर्णय घेत नाहीत, अशांना आपण फक्त एकच प्रश्न विचाराः ‘तुमचे लग्न जातीतच झाले आहे ना ?’ उत्तर बहुधा ‘होय’ असेल व त्याला पुष्टी म्हणून ‘आयुष्यात फक्त एकदाच मी लग्नाच्या वेळी जात पाळली होती’, असे गर्वाने सांगतील. परंतु ही एकच गोष्ट जातिव्यवस्थेला जिवंत ठेवत आहे, तिला चिरतारुण्य व अमरत्व बहाल करत आहे, याची कदाचित त्यांना कल्पना नसेल.

पुढे वाचा

संपादकीय

विशिष्ट शहरे आणि त्यांच्या विशिष्ट समस्या यांच्यावरील लेख मराठी नियतकालिकांमध्ये आढळतात. काही वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेने मुंबईच्या स्थितीवर एक दस्तऐवजही घडवला होता. पण नागरीकरणाची प्रक्रिया, नगररचना आणि नगर व्यवस्थापन, यावरील तात्त्विक लिखाण मराठीत अपवादानेच आढळते. ही परंपराही जुनीच आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील काही फुटकळ संदर्भ आणि जैनांच्या बहात्तर कलांच्या यादीत नगररचनेचा समावेश सोडता या विषयाकडे भारतीयांचे लक्ष फारसे गेलेले दिसत नाही.

मोहेंजोदडोच्या काळापासून भारतात नगरे रचली जात आहेत व त्यांचे व्यवस्थापनही होत आहे. आज नगरशासकांच्या व्यवहारात मात्र शास्त्र कमी जाणवते, तर लालफीत व भ्रष्टाचाराचीच ‘याद राखली’ जाते.

पुढे वाचा

नागरीकरण: प्रक्रिया, समस्या आणि आव्हाने

गेल्या दशकात भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात महानगरे, नगरे आणि वाढणारी नागरी लोकसंख्या यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नगरांबद्दल, (इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाबद्दल) सातत्याने लिहिले गेले. त्या निमित्ताने अनेक नगरांचे प्राचीन काळापासूनचे अस्तित्वही अभिमानाने शोधले गेले. परंतु अशा लिखाणामध्ये नागरीकरणाच्या, मानवांची नगरे निर्माण करण्याच्या प्रक्रियेकडे मात्र क्वचितच लक्ष वेधले गेले. नगरे का निर्माण होतात? कशी वाढतात? कशी टिकतात? कशी आणि कशामुळे हास पावतात? असा विचार सहसा केला जात नाही, किंवा केला गेला तरी अतिशय वरवरचे विश्लेषण केले जाते. नागरीकरण ही मानवाची मूलभूत प्रेरणा असावी का?

पुढे वाचा

लेखक परिचय

सुलक्षणा महाजन: वास्तुविशारद, मुंबई व मिशिगन विद्यापीठात अध्ययन. नागरी, तांत्रिक व पर्यावरणशास्त्रीय नियोजनाच्या क्षेत्रात संशोधन. भाभा अणुविज्ञान केंद्र व अनेक मान्यवर कंपन्यांमधील सखोल अनुभवानंतर सध्या रचना संसदेच्या कला अकादमीत व ‘जे.जे.’ मध्ये अभ्यागत म्हणून अध्यापन. (ग्रंथ: जग बदललं व अर्थसृष्टी: भाव आणि स्वभाव, ग्रंथाली २००३, २००४) ८, संकेत अपार्टमेंट, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०

विद्याधर फाटक: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये १९७६ ते २००४ पर्यंत नगरनियोजक होते. त्याच काळात ते राष्ट्रीय नागरीकरण आयोगाचे व अन्य शासकीय समित्यांचे सदस्य होते. जागतिक बँकेने साहाय्य दिलेले मुंबई व तामिळनाडूतील नगरविकास प्रकल्प व मुंबई वाहतूक प्रकल्प यांसाठीही त्यांनी काम केलेले आहे.

पुढे वाचा

नागरी-जैविक विविधता (भाग १)

१. प्रस्तावना:
जगाची ५० टक्के लोकसंख्या आता नगरांमध्ये राहते. पुढील तीस वर्षांत हे प्रमाण ६१ टक्के होईल. (युनो अहवाल १९९७). विकसित देशांमधील ८० टक्के लोक नागरी विभागात राहतात. असे असूनही एकविसाव्या शतकात मात्र सर्वांत मोठी लोकसंख्येची नगरे विकसनशील देशांमध्येच असतील. गेल्या शतकात नगरांचे आकारमान प्रचंड वाढले. ३०० नगरांत १० लाखांपेक्षा, तर १६ नगरांत १ कोटीपेक्षा जास्त लोक राहतात. मानवी समाजाच्या/लोकसंख्येच्या रेट्यामुळे जगाच्या भूगोलाची रचनाच बदलून गेली आहे.

नागरीकरणाचे पर्यावरणावर मोठे परिणाम होतात. नागरी जमीनक्षेत्र जगाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ २ टक्के आहे.

पुढे वाचा

ग्राम-नागरी संबंध आणि विकासाची परस्परावलंबी प्रक्रिया (भाग १)

प्रास्ताविक:
आजपर्यंत विकासासंबंधीच्या सैद्धान्तिक आणि धोरणात्मक विचारांचा रोख एकतर ग्रामीण विभाग नाहीतर नागरी विभाग असतो. ग्राम-नागरी परस्परावलंबी संबंधांचा विचार क्वचितच केला जातो. याउलट प्रत्यक्ष अभ्यासांमधून मात्र ग्राम-नागरी विभागांमधील लोकांचे स्थलांतर, सामानाची, मालाची देवाणघेवाण, आणि भांडवलाची हालचाल (शिाशपी) या प्रक्रिया महत्त्वाच्या असलेल्या दिसतात. या दोन्ही भौगोलिक वस्त्यांमध्ये सामाजिक देवाणघेवाण महत्त्वाची असते, ज्यायोगे ग्रामीण आणि नागरी विभागांमधील संबंध सतत बदलत असताना दिसतात. अर्थव्यवस्थांचा विचार करता अनेक नागरी उत्पादनांचे ग्राहक हे ग्रामीण भागात असतात. या उलट नागरी ग्राहकांना अन्नधान्य, शेतीमधील कच्चा माल, तसेच नागरी सेवांचा पुरवठा करण्यासाठी ग्रामीण शेतीक्षेत्राची गरज असते.

पुढे वाचा

आटपाट नगर?

चेंबूर-ट्रॉबेच्या वस्त्यांमधून प्रौढसाक्षरता प्रसाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामामध्ये मी १९८९ पासून सहभागी आहे. ‘कोरो साक्षरता समिती’ हे आमच्या संघटनेचे नाव. ह्या कामात मी अधिकाधिक गुंतत चालले त्यावेळी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनी भेटून, फोनवर माझ्याबद्दल, कामाबद्दल चौकशी केली, अगदी आस्थेने चौकशी केली. “काम कसं चाललंय?”, “कसं वाटतं’ ?, “झोपडपट्टीतली लोक कामाला प्रतिसाद देतात का?” अशा उत्सुक प्रश्नांबरोबर “सुरक्षित आहेस ना? काळजी घे,’ “यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस?’, “कसे राहतात ग हे लोक?’, असेही प्रश्न होते.

पुढे वाचा