जगण्याचे वियाग्रीकरण : जगाची नवी ओळख

“प्रिय आईबाबा आणि माझ्या बंधूंनो,

इथे फार कठीण दिवस आले आहेत, आणि मी जवळपास दर आठवड्याला तुम्हांला पत्र का लिहितोय, हे तुम्हांला समजत असेलच. आज मी तुम्हांला लिहीत आहे ते मुख्यतः आणखी काही पेर्वीटीन गोळ्यांसाठी…..”

तुमचा आवडता
हेन

तो दिवस होता ९ नोव्हेंबर १९३९. नाझीव्याप्त पोलंडमध्ये २२ वर्षांचा एक तरुण जर्मन सैनिक आपल्या आईवडिलांना पत्र लिहीत होता. २० मे १९४०ला त्याने पुन्हा आईवडिलांना लिहीले:

“रसद म्हणून तुम्ही आणखी काही पेर्वीटीन गोळ्या पाठवाल, अशी आशा वाटते.”

त्यानंतर १९ जुलै १९४० रोजी त्याने आणखी एक पत्र लिहिले,

“जर शक्य असेल तर आणखी काही पेर्वीटीनपाठवा, प्लीज.”

पुढे वाचा

चल कत्तली करूया

तुझं तू तिकडे अन् माझं मी इकडे
रोजचंच झालंय हे घुसमटणं
नको निभावूस दुनियादारी;
नाहीस तू अबला
अन् नाहीस रणरागिणी आणि दुर्गाही!
ह्या फसव्या शब्दावर फिरव तू हातोडा;
तू एक मुक्त जीव!
इथं रोजच तुझ्या पावित्र्याची घेतली जाईल अग्निपरीक्षा
कित्येक सीता ह्या अग्निकुंडात खपल्या
मर्यादा पुरुषाची जपत.
ठेवू नकोस आदर्श सावित्री, सीता अन् द्रौपदीचा.
नको देऊस संस्कृतीच्या गारद्यांपुढे तुझ्या भावनांचा बळी!
तू मुक्त हो, स्वाभिमानी हो!!
जिवंत ठेव तुझ्यातील ज्योतीची सावित्री!
मी नर अन् तू मादी
निसर्गाची हीच किमया !
जप रीत त्या निसर्गाची अन् दे झुगारून बंधने;
मी झुगारतो पुरुषपणाची कवचकुंडले!

पुढे वाचा

भारतीय पुरुष आणि लैंगिक सुखाचे व्यसन

भारतात ८०च्या दशकाच्या मध्यापर्यंततरी अश्लील व्हिडियो पाहता येणे सामान्य माणसांसाठी सहजसाध्य नव्हते. त्यामुळेच असेल कदाचित, पण ह्या काळात मराठी रंगभूमीवर कामुक, अश्लील नाटकांची लाटच आली होती. असल्या नाटकांमधे प्रत्यक्ष रंगमंचावर उन्मादक, हॉट, अश्लील दृश्ये दाखवली जातात असं ऐकायला मिळत होतं.
‘हिट अँड हॉट’ नाटके असं वर्णन वृत्तपत्रांमधून होत असे.

वय वर्षे पंधरा-सतरा ह्या वयोगटातील मित्रांचा आमचा गट होता. असल्या नाटकात कायकाय दाखवत असतील ह्याबद्दल चर्चा जवळपास रोजच रंगत होत्या. आमच्या गटातील एका मित्राला अशी नाटके बघण्याबद्दल अगदी टोकाची आवड, असोशी वाटत होती.

पुढे वाचा

जागतिकीकरण आणि लैंगिकताविषयक बदल

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत झाला आहे, हे माझ्या प्रतिपादनाचे प्रमुख सूत्र आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचे पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे.

नवे पर्व, नवे प्रश्न

नव्वदचे दशक आले. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) पर्व सुरु झाले आणि सर्व काही वेगाने बदलले. त्यापूर्वी शहरीकरण, आधुनिकीकरण, शिक्षणाचा प्रसार इ. घटकांमुळे खेड्यांतील व शहरांतील वातावरण हळूहळू बदलत होते. स्त्रीमुक्तीचळवळ आकार घेत होती. बलात्कार, माध्यमांतून घडणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन, असे मुद्दे सार्वजनिक चर्चेत आणण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला होता.

पुढे वाचा

पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा – अर्ध्या वाटेवरचे विचार

अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ने एके काळी मला झपाटलं होतं. ही मुंबईची आणि मुंबईतल्या माणसांची गोष्ट आहे. प्रत्येक पात्राच्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींमधून मुंबई ‘घडते’ आणि कादंबरी पुढे सरकते. यात अय्यर नावाचा पत्रकार आहे, डी-कास्टा हा कामगार पुढारी आहे, मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आहेत, काही आम आदमी – दयानंद पानिटकर, किशोर वझे हे आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. कादंबरीने जे झपाटलं, त्यात एक कोन त्यातील काही थेट लैंगिक संदर्भाचा होता. मी ही कादंबरी वाचली, तेव्हा वीस-बावीस वर्षांचा होतो. काही मुली किंवा स्क्रीनवरील काही ललनांविषयी विशेष ममत्व वाटण्याचा हा काळ होता.

पुढे वाचा

लोकशाहीचा गळा आवळणारे….

सर्व सत्ता हस्तगत केल्याशिवाय राजा कधीच स्वस्थ बसणार नाही , अशी एक सरंजामशाहीच्या काळातील म्हण होती. ध्येय-धोरणे ठरवणारे कुणीतरी, कायदा पास करणारे आणखी कुणीतरी, न्याय-निवाडा करणारे भलतेच कुणीतरी, असे वेगवेगळ्या लोकांच्या हाती कारभार असल्यास निरंकुश सत्ता व सत्तेची अंमलबजावणी एकाच्याच हाती येणे फार कठिण होईल, याची कल्पना राजाला असल्यामुळे साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून निरंकुश सत्ता भोगण्याची स्वप्ने तो बघत असतो. शासनव्यवस्थेत वेगवेगळी खाते वेगवेगळ्यांच्या हाती असल्यास थोड्याफार प्रमाणात का होईना, एकमेकांवर कुरघोडी होत राहणार. कदाचित त्यामुळेच थोडासा संघर्ष होत असल्यास ते क्षम्यही ठरू शकेल व लोकशाहीसुद्धा टिकू शकेल.

पुढे वाचा

भाजपाच्या दहशतीने हादरलेली काँग्रेस

सध्या देशभरात व विशेषतः महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे बरेच हाल होत आहेत. लोकसभेच्या निवडणुकांतून ज्या प्रचंड बहुमताने भाजपाचे सरकार निवडून आले त्याच्या परिणामी व सत्तासाधनांचा सूडबुद्धीने दुरुपयोग करून दहशत निर्माण करण्याची आर.एस.एस.ची जी पद्धत आहे, तिच्यामुळे काँग्रेससह त्यांच्या समकक्ष असलेले इतर विरोधीपक्षही धास्तावले आहेत. २०१४ च्या निवडणुकांवेळी मोदींनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताची घोषणा केली होती. त्यावेळी केवळ निवडणुकांतून काँग्रेसला पराभूत करून तो पक्ष संपविण्याची ते भाषा करीत आहेत व तसे होणे शक्य नाही असे बहुतेकांना वाटत होते. त्यावेळी ते सत्तासाधने असलेल्या सी.बी.आय., ई.डी.सारख्या संस्थांचा गैरवापर व न्यायव्यवस्थेचाही वापर करून काँग्रेसमध्ये दहशत फैलावतील व त्या धाकापोटी त्यांना आपल्यात सामावून घेऊन पावन करतील व याप्रमाणे त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल.

पुढे वाचा

देशाला काय हवे- ऐक्य की एकरूपता?

‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश’ या घटकांचे मिळून राष्ट्र तयार होते. इटलीचा स्वातंत्र्यसेनानी जोसेफ मॅझिनी याचे हे मत. सावरकरांनी मॅझिनीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रभाव मराठी ब्राह्मण तरुणांवर एकेकाळी फार मोठा होता. हाच वर्ग पुढे हिंदू सभा व संघाच्या माध्यमाने देशभर स्वयंसेवक वा शाखाप्रमुख म्हणून गेला. परिणामी मॅझिनीची भाषा ही संघाची व त्याच्या परिवाराचीही भाषा झाली. त्याआधी भारत हे हिंदू राष्ट्र आहे ही भाषा संघाचे संस्थापक डॉ. के. ब. हेडगेवार यांनीही वापरली होती. संघाच्या आरंभीच्या व नंतरच्याही स्वयंसेवकांना तश्या प्रतिज्ञा त्यांनी दिल्या व घ्यायला लावल्या होत्या.

पुढे वाचा

गोहत्या बंदी कायदा: एक पाऊल मागे!

गेली दोनशे वर्षे सामाजिक व राजकीय सुधारणा करण्यात अग्रभागी असलेल्या आणि सतत प्रगतिपथावर चालणार्‍या महाराष्ट्राने आता एक पाऊल मागे टाकले आहे. हे नकळत घसरलेले पाऊल नसून हा बुरसटलेल्या विचारांचा एक मोठा दुष्परिणाम आहे. गोहत्याबंदीचा कायदा आणून आणि गाय मारणार्‍याला शिक्षा फर्मावून महाराष्ट्राने काय मिळवले? या एका फटक्याने भारतीय धर्मनिरपेक्षतेला आणि शास्त्रीय तर्काधिष्ठित विचारांना फाटा दिला! ‘हिंदूधर्माचे रक्षण केले’ असेही म्हणता येत नाही, कारण हिंदूंच्या (माझ्या) धर्मशास्त्रामध्ये कोठेही ‘गोमांस खाऊ नये’ असे सांगितलेले नाही. कुठलेही “श्रुति-स्मृति-पुराणोक्त” वचन असे म्हणत नाही की गाय मारू नका व गोमांस खाऊ नका.

पुढे वाचा

आर्टिकल १५ – जातिव्यवस्थेचे व नोकरशाहीचे योग्य चित्रण

बड़े बड़े लोगन के महला-दुमहला
और भइया झूमर अलग से
हमरे गरीबन के झुग्गी-झोपड़िया
आंधी आए गिर जाए धड़ से
बड़े बड़े लोगन के हलुआ पराठा
और मिनरल वाटर अलग से
हमरे गरीबन के चटनी औ रोटी
पानी पीएं बालू वाला नल से
कहब त लगीजाइ धक से

डाव्या कम्युनिस्टांच्या या गाण्यानेच चित्रपटाची सुरुवात होते व लगेचच दिग्दर्शक अनुभव सिन्हा फारसा वेळ न दवडता दोन लहान दलित मुलींवरील अत्याचाराची दृश्ये दाखवून चित्रपट वेगवान असल्याची जाणीव करून देतो व प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो.

पुढे वाचा