मासिक संग्रह: जून, १९९०

आगरकर म्हणतात –

हिंदु धर्मात बरीच व्यंगे आहेत म्हणून यहुदी, महंमदी, ख्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसर्‍या एखाद्या धर्माचा अंगीकार करणार्‍या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेच, आमचे काहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरे नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणे हे केवढे मूर्खपण आहे बरें?

पुढे वाचा

स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल

स्त्रीचे समाजात नेमके कोणते स्थान आहे? एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून तिचा समाजात दर्जा काय आहे? या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की सामाजिक व आर्थिक स्थित्यंतराशी आणि प्रस्थापित मूल्यव्यवस्थेच्या परिवर्तनाशी तो निगडीत आहे.

प्रत्यक्ष समाजव्यवस्थेमधील सहभाग, सहभागाचे स्वरूप, स्वतःच्या भोवताली घडणाच्या घटना संबंधी निर्णय घेण्याची क्षमता व निर्णयाचे क्षेत्र यांवर स्त्रीचे स्थान अवलंबून आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा आढावा घेतल्यास आपल्या समाजातील स्त्रीचे स्थान कसे होते व ते कसकसे बदलत गेले यावर प्रकाश पडू शकेल.

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्त्रीचे समाजातील स्थान पुरुषाच्या बरोबरीचे होते असे दिसते.

पुढे वाचा

दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष जात नाही, म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असाही समज बळावत चालला आहे. दहशतवादाच्या मागे नेहमीच राजकीय, आर्थिक कारणे असतात व म्हणून आर्थिक संपन्नता हेच दहशतवादाला खरे उत्तर आहे असे मतही व्यक्त केले जाते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ३)

पितृसत्ताक व्यवस्था
पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम आहेत आणि त्यांचे जीवन आपल्याच जीवनाचा विस्तार आहे; व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा तिच्या मृत्यूबरोबरच अंत होत नाही आणि वंशजांच्या चरित्रांतून तिचा हवा तितका विस्तार होऊ शकतो या कल्पना स्वाभाविक होत्या.

पुढे वाचा

विवेकवाद – ३

कर्मसिद्धांत, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या लेखमालेतील दुसर्‍या लेखांकाच्या शेवटी आपण ‘कर्मसिद्धांत’ नावाच्या एका प्रसिद्ध उपपत्तीचा उल्लेख केला. तेथे आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करीत होतो, आणि आपण असा युक्तिवाद केला होता की जगात जे प्रचंड अशिव आढळते – म्हणजे भयानक दुःख, क्रौर्य, अज्ञान, दुष्टाचार, रोगराई इत्यादि जे आढळते, ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक आहे. या युक्तिवादाला दिल्या गेलेल्या अनेक उत्तरांचे आपण परीक्षण केले आणि शेवटी कर्मसिद्धांतापाशी येऊन ठेपलो. कर्मसिद्धांतानुसार जगातील अशिवाचे कारण आपण मानवच आहोत आणि त्याकरिता ईश्वराला जबाबदार धरणे चूक आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. मोहनींच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा आहे. ‘हिंदू असणे’ आणि ‘धार्मिक’ असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खुद्द शंकराचार्यांनाही ‘प्रच्छन्न बौद्ध’ म्हटले गेले. (बुद्ध हा तर’ निरीश्वरवादी’आणि ‘आत्मा’ न मानणारा होता.) तरीही ते ‘हिंदू’च होते. ही सहिष्णुता हिंदुधर्मीयांशिवाय अन्यत्र कोठे दिसते?

‘हिंदू-मुसलमानांचे दंगे’ आणि ‘धर्म – त्यांतही वैदिक धर्म आणि विज्ञान’ यांतील वाद या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करण्यात अर्थ नाही.

हिंदू समाजात मी जन्मलो, घडलो, वाढलो म्हणून बर्‍या वाईट गोष्टींसह मी हिंदूच आहे. त्याबद्दल खंत कशासाठी?

ईश्वरविषयक ‘भाविकता’ ही आणखी एक वेगळीच ‘मनोव्यथा’?

पुढे वाचा