मासिक संग्रह: फेब्रुवारी, १९९१

अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय

अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय

पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्यांना, प्राण्यांचे आत्मे शरीराचा त्याग केल्यावर कसल्यातरी शरीराच्या आधारातूनच काही वेळ राहू शकतात, अशी खात्री झाली असली पाहिजे ……अशरीरत्व म्हणजे शरीराचा अत्यंत अभाव असे म्हणण्याचा त्यांचा आग्रह असेल तर मात्र ते काहीतरी गडबड करतात असे म्हणावे लागेल, अशरीरी वस्तू म्हणजे काय? आम्ही शरीरी मर्त्यांनी तिची कल्पना कशी करावयाची? आत्म्याशिवाय एखादी अशरीरी वस्तु आमच्या पाहण्यात आली आहे काय ? इंद्रियाला किंवा मनाला गोचर अशा वस्तूचे अस्तित्व मानण्यास कोणीही हरकत घेणार नाही. इंद्रिये ही मनाची द्वारे आहेत.

पुढे वाचा

एक निरीश्वरवादी ग्रामसेवक दांपत्य

आंध्रमध्ये विजयवाडा या ठिकाणी ‘एथिइस्ट सेंटर’ ही संस्था आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ म्हणून अलिकडेच असा तीन दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याला आशिया, युरोप आणि अमेरिका या तीन खंडांतून मानवतावादी, निरीश्वरवादी, बुद्धिवादी, बिनसांप्रदायिक, स्वतंत्र विचारांचे पुरस्कर्ते, नास्तिकता समर्थक आणि परिवर्तनवादी चळवळीशी निगडित प्रतिनिधी आले होते. देशातूनही ८०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रा रामचंद्र गोरा आणि त्यांच्या पत्नी सरस्वती गोरा यांनी या वैशिष्टयपूर्ण संस्थेचा ५० वर्षापूर्वी मुदुनुरु या आंध्र प्रदेशामधील कृष्णा जिल्ह्यातील खेड्यात पाया घातला..

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ९)

मानवी जीवनात प्रेमाचे स्थान
बहुतेक सर्व समाजांची प्रेमविषयक अभिवृत्ती (attitude) दुहेरी राहिली आहे. एका बाजूला प्रेम काव्य, कादंबरी आणि नाटक यांचा प्रमुख विषय आहे; आणि दुसऱ्या बाजूला बहुतेक समाजशास्त्रज्ञांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असते, आणि आर्थिक किंवा सामाजिक सुधारणांच्या योजनांत प्रेमाचा समावेश अभीष्ट उद्देशात केला जात नाही. मला ही अभिवृत्ती समर्थनीय वाटत नाही. प्रेम ही मानवी जीवनातील अति महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे असे मी मानतो, आणि ज्या व्यवस्थेत प्रेमाच्या अनिरुद्ध विकासात विनाकारण अडथळे आणले जातात ती व्यवस्था वाईट असे मी समजतो.

जेव्हा ‘प्रेम’ हा शब्द उचितार्थाने वापरला जातो तेव्हा त्याने स्त्री आणि परुष यांच्यामधील यच्चयावत संबंध निर्दिष्ट होत नाहीत.

पुढे वाचा

विवेकवाद – १०

स्वामी धर्मव्रत यांच्या पत्रास उत्तर

याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारकच्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.

पुढे वाचा

पुस्तक परिचय

हिंदू संस्कृती आणि स्त्री
ले. आ. ह. साळुखे (प्रकाशक: स्त्री उवाच, मुंबई, १९८९ मूल्य रु.३५)

‘स्त्री उवाच ने अलीकडे प्रकाशित केलेले (९ डिसेंबर १९८९) डॉ. आ. ह. साळुखे यांचे हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक वाचनात आले. यात लेखकाने हिंदू संस्कृतीचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण किती अन्याय्य होता ह्याचे अतिशय संतुलितपणे, कोणताही अभिनिवेश न बाळगता, अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन जवळ जवळ तेवीस ग्रंथांच्या साह्याने केलेले आहे. त्या ग्रंथांची सूची पुस्तकाच्या सुरुवातीला दिली आहे. त्यात मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती इत्यादि स्मृतींबरोबरच इतरही धर्मग्रंथांचा समावेश आहे.

हे विवेचन करीत असतांना डॉ.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक’ यांस,
नोव्हेंबरच्या अंकातील औरंगाबादचे प्रा. श्याम कुलकर्णी यांचं पत्र आणि त्या पत्राला तुम्ही दिलेलं ‘काहीसं सविस्तर उत्तर दोन्ही वाचली. ती वाचल्यानंतर न तथा आंदोलिकादंडः यथा ‘बाधति बाधते अशी माझी अवस्था झाली. मी काही कुणी प्रोफेसर नाही. विज्ञानाचाही नाही किंवा तुमच्या त्या तत्त्वज्ञानाचाही नाही. पण तरीसुद्धा माझ्या अल्पमतीला असं वाटतं की तुम्ही एक फार मोठी चूक करीत आहात. आणि कदाचित तुम्ही एकटेच नव्हे तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी ही चूक करीत असावेत. आणि म्हणून हे पत्र लिहीत आहे. कृपया याला उत्तर द्यावं अशी विनंती आहे.

पुढे वाचा