मासिक संग्रह: फेब्रुवारी, २००७

संपादकीय

जातिव्यवस्थेवरच्या लेखांना आजचा सुधारक ने प्रसिद्धी द्यावी, अशी इच्छा काही वाचक वेळोवेळी व्यक्त करतात. दुसऱ्या टोकाला त्या आग्यामोहोळात हात घालू नये, असे एक मत आहे ! एकूणच भारतीयांना जातींबाबत तटस्थपणे लिहिणे अवघड जाते. लेखांतील एखादे निरीक्षण, एखादा निष्कर्ष, एखादे मत, मान्य करावे की नाही याचा निर्णय बहुतांश वेळी लेखकाची जात पाहून घेतला जातो. हे जातींबद्दलच्या लेखांबद्दल नव्हे, तर साहित्यासकट सर्व प्रकाशित मजकुराबद्दल घडत असते. हे अर्थातच विवेकी नाही.
लॅन्सी फर्नाडिस आणि सत्यजित् भटकळ यांचे The Fractured Civilisa-tion : Caste in the Throes of Change (भारतीय जनवादी आघाडी, १९९९) हे पुस्तक जातिसंस्था, तिच्यातले बदल, तिचे परिणाम, यांच्याबद्दलचा एक महत्त्वाचा दृष्टिकोण मांडते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

मेंदूतील देव वरील चर्चा (जुलै, ऑक्टो.व नोव्हें.०६), याबद्दल पर्सिंगर ह्यांचे पूर्वीचेही एक संशोधन पाहिले तर त्यांच्या मेंदूतील धार्मिक स्थानाच्या प्रयोगाबद्दल संशय घेण्यासारखीच स्थिती आहे. परामानसशास्त्रज्ञ विल्यम रोल ह्यांच्याबरोबर पर्सिंगर ह्यांनी २००१ मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. त्याचे नाव होते : पिशाच्च आणि पिशाच्चाने झपाटलेल्या जागेविषयीचे संशोधन पुनर्तपासणी आणि अर्थान्तरण. त्यामध्ये त्यांनी काढलेले निष्कर्ष गूढ भाषेत लिहिलेले होते व ते बुद्धिवादी संशोधकांना पटलेले नव्हते.
आपल्या निष्कर्षात पर्सिंगर व रोल ह्यांनी, “काही पिशाचे ‘सायकोएनर्जीटिक फोर्स’ मुळे शांतताभंग (भानामतीसारख्या गोष्टी) करतात.” “मेंदूतील विद्युत्-चुंबकीयच अवस्था वातावरणातील विद्युत्-चुंबकीय शक्तींवर परिणाम करून घटना घडवत असावी,” ह्यासारखे निष्कर्ष काढले होते.

पुढे वाचा

खैरलांजीः मला जे आढळले

खैरलांजी येथे २९ सप्टेंबर रोजी झालेले भीषण हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनाबाबत जनतेसमोर खरी माहिती आली नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. पोलिसांनी वेळीच प्रतिबंधक कारवाई केली असती तर कदाचित ती मानवतेला काळिमा फासणारी घटना टळली असती. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली असती तर हिंसक आंदोलने झाली नसती. हिंसक आंदोलनांत भरकटलेल्या युवकांचे होणारे नुकसान बघून राहवले नाही म्हणून मी स्वतः वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खैरलांजीला भेट दिली, माहिती घेतली, विचारपूस केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने जनतेसमोर सत्य मांडणे माझे कर्तव्य समजतो.
खैरलांजी हत्याकांड घडण्याचे प्रमुख कारण जातीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था व कायद्याची मुळीच भीती नसणे हे आहे.

पुढे वाचा

ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था

प्रस्तावना
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भारत अस्वस्थ आहे. राजकारण्यांचा वर्ग छिन्नभिन्न झालेला आहे. गेल्या तीन लोकसभांमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहमत नव्हते, आणि तेरावी लोकसभाही तशीच असेल. पन्नास वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर जगातील सर्वांत जास्त गरीब लोक भारतात आहेत. मध्यमवर्ग अशाश्वतीने व इतर अडचणींनी ग्रस्त आहे. समाजवस्त्र फाटते आहे. कुटुंबसंस्था विरते आहे. गुंडगिरी, टोळीयुद्धे, देहविक्रय, एड्स, बकाली, सारे वाढते आहे. सर्व वैचारिका (ideologies) निस्तेज होऊन आपली सम्यकदृष्टी गमावत आहेत. प्रागतिक अवसरवाद; तात्कालिक, लहान गटांपुरत्याच कृती, या दूरदृष्टीवर मात करत आहेत. लोक तुच्छतावादाच्या (cynicism) आहारी जाऊन कोणताच पर्याय विश्वसनीय नाही, असे मानू लागले आहेत.

पुढे वाचा

Uncertain Science…. Uncertain World

विज्ञान म्हणजे अत्यंत वेगळे, बंदिस्त, एकाकी आप्लया जीवनव्यवहाराशी संबंध नसलेले असे काही तरी आहे असे अनेकांना वाटत आले आहे. यालाच मी आह्वान देत आहे. आपण विज्ञानयुगात राहत आहोत. तरीसुद्धा ज्ञान हे काही मूठभर लोकांच्या हातातील व त्यांच्या मालकीची मालमत्ता असे वाटत असल्यास ते अत्यंत चुकीचे आहे. विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा, व्यवहाराचा एक अविभाज्य अंग आहे. त्याला आपण वेगळे ठेऊ शकत नाही, तोडू शकत नाही. आपल्या अनुभवविश्वातील प्रत्येक अनभवाला का. कसे व केव्हा असे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच विज्ञान आहे.’
रॅचेल कार्सन
(Uncertain Science….

पुढे वाचा