Author archives

“सीडी”

आजचा सुधारक चा जाने.-फेब्रु. ०४ (अंक १४.१०) हा आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरचा विशेषांक होता. अभ्यागत संपादक होता चिंतामणी देशमुख, उर्फ ‘सीडी’. अंक वाचकांपर्यंत पोचताच मौज प्रकाशनगृहाचे श्री. पु. भागवत यांचा दूरध्वनी आला अंकाचे पुस्तक काढावे, आणि यात मौज मदत करेल! पुस्तक निघायच्या बेतात असताना सीडीचे २ डिसें. ०५ ला निधन झाले.
भागवतांचा निरोप सीडीला कळवल्यावरची त्याची प्रतिक्रिया मजेदार होती’चांगलं झालं असं समजायचं ना?” सीडी ‘डावा’, मार्क्सवादी, पण कर्मठही नव्हे आणि सहज ढळणारा लेचापेचाही नव्हे. त्याच्या विचारांचा पाया होता तो विज्ञानात. विज्ञानाची मूळ प्रेरणा माणसाच्या ऐहिक सुखाच्या ओढीतून येते, हे पूर्णपणे आत्मसात करून, त्याला सामाजिक भानाची जोड देऊन सीडी वाट चालत असे.

पुढे वाचा

उपयोगितावाद (१): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण १: सामान्य आलोचने
मानवी ज्ञानाची वर्तमान अवस्था अपेक्षेहून इतकी भिन्न असावी किंवा अतिमहत्त्वाच्या विषयांतील विचार इतका रेंगाळावा यांतील सर्वांत सूचक गोष्ट म्हणजे युक्त आणि अयुक्त यांच्या निकषासंबंधीच्या वादाचा निर्णय करण्याच्या बाबतीत झालेली अत्यल्प प्रगती ही होय. जीवनाचे सर्वोच्च साध्य कोणते, किंवा नीतीचे मूलाधार काय आहेत हा प्रश्न तत्त्वज्ञानाच्या उत्पत्तीपासून तात्त्विक विचारांतील प्रमुख प्रश्न मानला गेला असून त्याला उत्तर देण्यात अतिशय बुद्धिमान लोक गढून गेले आहेत; एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्यात अनेक तट पडले असून त्यांचा परस्परांशी तीव्र संघर्ष चालू आहे.

पुढे वाचा

रोगराईचा दहशतवाद

अगदी ११ सप्टेंबर २००१ लाही त्या दिवशीच्या अमानुष दहशतवादाने जेवढी माणसे मेली त्यापेक्षा जास्त एड्सने मेली. इतर सामान्य दिवशी तर एड्स आणि तसल्या रोगांनी मरणारे संख्येने बरेच जास्त असतात. ह्या रोगांना अवरोध करता येतो, रोग्यांना दुरुस्त करता येते आणि रोगांचे व्यवस्थापन करता येते. या तथ्यांमुळे दहशतवादाच्या विकारीपणाचे, विखारीपणाचे अवमूल्यन होत नाही, किंवा दहशतवादाला थोपवायची गरजही कमी होत नाही. पण ही तथ्ये हे अधोरेखित करतात की थांबवता येणारी पण थांबवली जात नसलेली रोगराई जास्त महत्त्वाची आहे.
[टाईम साप्ताहिकाने प्रिन्सिपल व्हॉईसेस नावाचा जगापुढील आह्वानांवर चर्चा घडवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

मी एक सामान्य वाचक आहे. साहित्याशी माझा दूरान्वयानेही संबंध नाही. परंतु माझी पंधरा वर्षांनी मोठी असलेली बहीण एक ऑक्टोबर २००५ ला शंभर वर्षांची झाली असती त्यानिमित्ताने आजचा सुधारक ने एक विशेषांक काढला, कारण एके काळची ती सुप्रसिद्ध लेखिका होती. हा अंक वाचण्याची मला उत्सुकता होती.बाळुताईंची शंभरी! आज तिच्या साहित्याच्या क्षेत्रात (समाजशास्त्रात नव्हे) काय बदल झाले असतील हे जाणून घेण्याची इच्छा होती. सुदैवाने तीन उच्चशिक्षित मराठीच्या प्राध्यापिकांनी लेख लिहायचे कबूल केल्याचे ऐकले आणि माझी उत्सुकता वाढली. या तीनही प्राध्यापिकांचे लेख मी वाचले.

पुढे वाचा

विवेकवाद-भाग १०ः (प्रथम प्रकाशन मार्च१९९१ अंक १.१२, लेखक : दि. य. देशपांडे)

श्रद्धेचे दोन प्रकार विधानांवरील आणि मूल्यांवरील
‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’ हा शब्द दोन वेगळ्या अर्थांनी वापरण्यात येतो. एका अर्थी श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे असा दृढविश्वास, तर दुसऱ्या अर्थी श्रद्धा म्हणजे एखाद्या मूल्यावरील निष्ठा. ह्या दुसऱ्या अर्थी ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे श्रेयस्कर आहे, कारण तो व्यर्थी नसल्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज होण्याची भीती नाही. अमुक गोष्ट मूल्य आहे म्हणजे ती स्वार्थ १. वांछनीय आहे अशी दृढनिष्ठा. याच्या उलट पहिल्या प्रकारची श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे अशी पक्की खात्री. या विश्वासाला ‘श्रद्धा’ म्हणण्याचे कारण असे की त्याला पुराव्याचा आधार नसतो.

पुढे वाचा

रोजगार हमी योजना: महाराष्ट्रातील अनुभव

लोकसभेने भारताकरिता रोजगार हमी योजनेचा कायदा करू घातला व भारतातील सर्व गरजूंना रोजगाराची हमी देण्याचे ठरविले. त्यासाठी मोठीच रक्कम मंजूर झाल्याचे समाधान लाभले. परंतु याच सुमारास सोलापूर जिल्ह्यात ९.१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने भारताची हजारो कोटींची रक्कम अशीच उधळली जाण्याची कोणालाही भीती वाटल्याशिवाय राहिली नाही व आज गेल्या तीस वर्षे महाराष्ट्रात चालू असलेल्या रोहयो कडे इतर राज्यांना धडे देण्याची कितपत कुवत आहे याकडे लक्ष वेधले गेले.
महाराष्ट्रात रोहयो १ मे १९७२ सालीच राबविण्याचे ठरले होते. राज्यात जलसिंचन विशेष मर्यादित असल्याने शेतीचा विकास होत नव्हताच.

पुढे वाचा

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (१)

गेलनर ह्यांनी राष्ट्रवाद हा औद्योगिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या आवश्यकतेतून जन्मल्याचे मांडले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे व तिचा जन्म औद्योगिकीकरणापासून झाला असा त्यांचा सिद्धान्त त्यांनी Nations & Nationalism ह्या १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात मांडला आहे. औद्योगिकीकरणाची परमसीमा गाठली आणि भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर काय परिणाम होतील हा त्यावेळी त्यांच्यापुढे संभाव्य (हायपोथेटिकल) प्रश्न होता.१ पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज जग अशा एका टप्प्यावर आहे की त्यांचा संभाव्य प्रश्न आज खराच आपल्यापुढे उभा आहे. राष्ट्राचे सार्वभौमत्त्व आणि राष्ट्राच्या सीमा हे दोन आधुनिक राष्ट्राचे निकष मानले जातात.

पुढे वाचा

विचारदर्शन आणि त्याचं जागतिकीभवन

जगभरचं होणं आणि जगभरचं करणं
‘विश्व’ म्हणजे सगळं काही. ‘जगत्’ म्हणजे माणसाचं विश्व, माणसाच्या हालचालींना, जगण्याला संदर्भ देणारं सगळं काही. ‘जागतिक’ म्हणजे जगभरचं. ‘जागतिकीभवन’ म्हणजे जागतिक होऊन जाणं, केवळ स्थानिक न राहणं. हे आपोआप जागतिक होणं असेल किंवा कुणी हेतुतः जागतिक केलेलं असेल. मानवजातीच्या इतिहासात अगोदरपासून संथपणे चालू असलेल्या ‘जागतिकीभवना’ ची अलीकडची मुद्दाम गतिमान केलेली अवस्था म्हणजे ‘जागतिकीकरण’.(जाता जाता सांगायचं म्हणजे ‘ग्लोबलायझेशन’साठी योजलेला हिंदी भाषेतील ‘वैश्विकीकरण’ शब्द तेवढा योग्य नाही. ‘भूमंडलीकरण’ त्यापेक्षा थोडा बरा एवढंच.)
जागतिकीभवन या अधिक दीर्घकालीन आणि अधिक व्यापक घडामोडीचा विचार करताना व्यापार आणि उद्योग यांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या जगण्याच्या सगळ्याच बाजूंचा विचार करायला लागतो.

पुढे वाचा

न सुचलेले प्रश्न

शिक्षणाच्या प्रक्रियेत म्हणे दोन वेगवेगळ्या भूमिका वठवणाऱ्या गटांचा सहभाग असतोः शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान घेतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक खुल्या मनाच्या शिक्षकाला हेही जाणवते की विद्यार्थीही शिक्षकांना ज्ञान देतात. कधी हे ज्ञानदान शिक्षकाच्या भूमिकेच्या गृहीततत्त्वांना आह्वान देण्यातून घडते, तर कधी शिक्षकाला न सुचलेले प्रश्न विचारून.
मी विद्यार्थ्यांना ईस्टर आयलंडचे समाज कसे कोलमडले ते सांगितले. विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाची व्यामिश्रता माझ्या तोपर्यंत ध्यानात आलीच नव्हती ज्या झाडांवर आपले अस्तित्व आवलंबून आहे ती सर्व झाडे कापून टाकण्याचा आत्मघातकी निर्णय एखादा समाज कसा घेऊ शकतो ?

पुढे वाचा

पत्रसंवाद

पा.क्र.१५३ तिसरी ओळ ‘म्हणजे गणित समजणे’ ऐवजी ‘त्याचप्रमाणे ५ आणि ३ मिळून ८ होतात हे समजणे म्हणजे गणित समजणे’ असे हवे. ही ओळ छापण्यात आली नाही असे दिसते. चुका माझ्याकडून झाल्या असण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही. चुकीचे छापून आलेले दुरुस्त न करणे हे अयोग्य आहे असे मला नवीन आलेल्या अनुभवावरून प्रकर्षाने जाणवू लागले म्हणून
ह्या पत्राचे प्रयोजन.
प्रश्न हा उद्भवतो की मी ह्या चुका आणि त्यांच्या दुरुस्तीसंबंधी पत्र लिहायला इतका उशीर का केला ? ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात गणिताविषयी असलेली एकूणच उदासीनता.

पुढे वाचा