Author archives

वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

दिल्लीस्थित आयुर्विज्ञान संशोधनसंस्थेत डॉक्टरला झालेली मारहाण आणि लगेच दोन दिवसांनी ठाण्यात आनंद दिघे ह्याच्या निधनानंतर सिंघानिया रुग्णालयाची झालेली मोडतोड आणि जाळपोळ ह्या दोन घटना वैद्यकीय व्यवसाय आणि समाज ह्यांच्यातील अस्वस्थ संबंधांवर प्रकाश टाकतात. एकेकाळी समाजाच्या मानास प्राप्त असलेल्या ह्या व्यवसायाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. प्रतिपरमेश्वर अशी असलेली त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. या अस्वस्थ आणि अहितकारक अशा संबंधाचा विचार समाजाने, विशेषतः वैद्यकीय व्यवसायिकांनी, करणे आवश्यक आहे. मारपीट, मोडतोड, जाळपोळ अशा किंवा अशासारख्या हिंसक घटना ह्या सामान्यतः लोकांच्या मनातील असंतोष, अपेक्षाभंग, वैफल्य आणि राग ह्याच्या निदर्शक असतात वैद्यकीय व्यवसायासंबंधी असणारी नाराजी आणि डॉक्टरकडून वारंवार होणारा अपेक्षाभंग हा समाजमनात साठत जातो आणि कुठल्या तरी निमित्ताने (उदा.

पुढे वाचा

विक्रम, वेताळ आणि आधुनिक शेख महंमद

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि आपली पावले त्याने स्मशानाच्या दिशेने वळवली. थोडे अंतर जाताच प्रेतातील वेताळ त्याला गोष्ट सांगू लागला. . . .
राजा, कोणे एके काळी केकय देशात सत्यवान नावाचा एक ब्राह्मण राहत होता. केकय देशाची परिस्थिती तशी वाईटच होती. अर्ध्याहून अधिक प्रजा अत्यंत दरिद्री होती. देशाची लोकसंख्या जशी भरमसाठ होती, तशीच तेथील बेकारी देखील. शेती सगळी पावसावर अवलंबून असलेली आणि लोक आळशी व अज्ञानी त्यामुळे इतर उद्योगधंदेही मरगळलेले.
सत्यवान देखील देशातल्या बहुसंख्य प्रजेप्रमाणे गरिबीतच आयुष्य कंठत होता.

पुढे वाचा

मला सापडलेला कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स (१८१८ ते १८८३) या व्यक्तीबद्दल मला फारसे आकर्षण नव्हते. मार्क्सवाद व सोविएत रशिया याबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. सर्वांनी वाचला तसा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मी पूर्वीच वाचला होता व चांगला वाटला होता. मग मुळात वाचावे या जिद्दीने दास कॅपिटाल वाचायला घेतले, मात्र वाचू शकलो नाही. कारण ते पुस्तक मला बरेच कंटाळवाणे व पुनरुक्तीने भरलेले वाटले. त्यातील सर्व पाने मिळून सार फारतर वीस पानांत काढता येईल असे मला प्रथम वाटले होते.

माझ्या मार्क्सवादी मित्रांचे मात्र तसे नव्हते. ती मंडळी एकत्र बसून एकेका चॅप्टरची पारायणे करीत व त्यावर चर्चा करीत.

पुढे वाचा

फलज्योतिष विज्ञान का नाही?

[विद्यापीठ अनुदान आयोगाने (विअआने) वैदिक फलज्योतिष हा विभाग सुरू करण्यासंबंधीचे निवेदन’ एका परिपत्रकातून केल्यानंतरच्या चर्चेची एक महत्त्वाची कडी म्हणून मराठी विज्ञान परिषदेने (मविपने) ‘फलज्योतिष विज्ञान आहे का?’ यावर एक विशेषांक काढला (नव्हेंबर २००१). सात ‘ज्योतिर्विदां’नी मते मांडल्यावर त्यांच्या युक्तिवादाचा वैज्ञानिक वृत्तीच्या समर्थकांकडून प्रतिवाद केला गेला. हा पूर्णच अंक वाचनीय आहे, पण त्यातील जयंत नारळीकरांच्या लेखातील ‘फलज्योतिष हे विज्ञान का नाही?’ हे प्रकरण कळीचे आहे. ते मविपच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करत आहोत.]

विअआने हा अभ्यासक्रम सुरू करायचे म्हटल्यावर भारतातील वैज्ञानिकांनी विरोधाची एक आघाडी उघडली आहे, ती फलज्योतिष वैदिक आहे की नाही या संबंधी नसून तिला विअआ विज्ञानाचे रंगरूप देऊ इच्छितो यासाठी आहे.

पुढे वाचा

सांप्रदायिक दंगे: एक अभ्यास

विभूति नारायण राय यांनी ‘सांप्रदायिक दंगे और भारतीय पुलिस’ नावाचा एक प्रबंध लिहिला आहे. हैदराबादच्या पोलीस अकादमीने श्री रायना यासाठी विद्यावृत्ती दिली होती. राय यांचा अभ्यास इंग्रजी राजवट येण्याआधीच्या काळापासून सुरू होतो. राज्यसत्ता पोलिसांकरवी दंगे हाताळत असते. दंगेखोरांविरुद्ध बळाचा वापर, अहवालांमधून सत्य परिस्थिती नोंदणे, दंगखोरांना पकडणे, तुरुंगात ठेवणे, न्यायासनापुढे उभे करणे, अशा साऱ्या व्यवहारात पोलीस किती निःपक्षपणे वागतात, हा प्रबंधाचा विषय आहे.
सांप्रदायिकता आणि त्यातून उपजणारे दंगे केवळ ब्रिटिश साम्राज्यवादामुळे सुरू झाले असे रायना वाटत नाही. असे मत त्यांना अतिसुलभीकृत वाटते.

पुढे वाचा

माझी प्रतिज्ञा

१ डिसेंबर, १९९८, खालील अटींचे पालन झाले नाही, तर अभय वैद्य त्या लग्नावर बहिष्कार टाकेल:

१. पत्रिका न बघता लग्न ठरलेले असावे.

२. मुहूर्त न बघता लग्नाचा दिवस ठरवलेला असावा.

३. कुठच्याही त-हेने हुंडा न घेता/देता विवाह ठरलेला असावा. विवाहावर येणारा सगळा खर्च (उदा. हॉलचे भाडे, जेवणावळी, इत्यादी.) वधू–वर पक्षांनी समसमान वाटून घ्यावा. (रुखवत हा एक हुंड्याचाच प्रकार होय.)

४. विवाह लावण्यासाठी पुरोहित किंवा भटाच्या मध्यस्थीची गरज नाही. तेव्हा विवाह त्याच्या उपस्थितीशिवाय, म्हणजेच नोंदणी पद्धतीने करावा

५. लग्नात कुठच्याही प्रकारचे अनिष्ट/अन्याय्य धार्मिक विधी असू नयेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) — ४१० १०१
_ श्री. दिवाकर मोहनी यांनी आ.सु. डिसेंबर २००१ मध्ये ‘रोजगार आणि पैसा’ या लेखात देव आणि पैसा यांच्यातील साम्य शोधले आहे. असे करताना विश्वास आणि श्रद्धा यांमध्ये गल्लत झालेली दिसते.
एखाद्या गृहीतकावर आधारित अनुमाने खोटी ठरत असल्याचे दिसत असूनही त्या गृहीतकाला कवटाळून बसणे म्हणजे अंधश्रद्धा होय. देव मानणे या वर्गात येते. जोवर अनुमाने खोटी ठरत नाहीत तोवर ते गृहीतक खरे आहे असे मानून सावध व्यवहार करणे ही अंधश्रद्धा नाही. पैसा आहे असे गृहीत धरून केलेले आचरण जर अपेक्षित फल (Result) देत असेल तर, ‘तो कोठे आहे?’,

पुढे वाचा

पत्रसंवाद

विजय वर्षा, ‘चार्वाक’, अमृत कॉलनी, भू-विकास बँकेमागे, करंजे, सातारा
आस्तिक माणूस अंधश्रद्धाळू असतो, हे विधान खटकणार असले तरी ते सत्य आहे. कारण दैनंदिन जीवनात माणूस वागताना पावलोपावली त्याच्या अंध-श्रद्धाळूपणाचा ‘प्रत्यय’ येतो.
घरी देवपूजा करून सुख, शांती समाधान, धन संपत्ती, असे बरच काही देवाकडे मागून कामाला बाहेर पडतो. परंतु रस्तोरस्ती दिसणाऱ्या देखल्या देवाला दंडवत घातल्याशिवाय पुढे जात नाही. कारण आपण मागितलेले मागणे देवाच्या स्मरणात राहण्यासाठी येता जाता सारखा दंडवत घालत असतो. ज्याने स्वतःवरचा विश्वास गमावलाय तो देवावर विश्वास ठेवण्याचा नाहक प्रयत्न करतो.

पुढे वाचा

गॉड इज डेड

गॉड इज डेड असे कुणीतरी हट्टी तत्त्ववादी मागेच सांगून गेला म्हणे. असेलही कदाचित हे सपशेल खरे किंवा धादान्त खोटेही अथवा अर्धे खरे अर्धे खोटे. पण ज्या काळी तू खऱ्या अर्थाने जिवंत होतास तेव्हा तरी काय दिवे लावलेस? सोळा सहस्र गवळणींसह नाचलास आपल्या बायकोसह वनात
चालता झालास रोजच घडणारे आम रस्त्यावरचे इन-मिन-तीन सीन बघून सारा संसार असार म्हणत महाशून्यात पसार झालास किंवा सर्वांगावर खिळे ठोकून घेत शेवटी आपलीच मान खाली घातलीस वा स्वतःचाच देह चरकात पिळून घेत त्याचे सताड चिपाड केलेस: आणि ज्या क्षणी हा तुझा पवित्र-पीडित अन्तरात्मा चाबुकराणीचा रोग लागलेल्या उसागत शेंड्यावर निमूळ होत होत दिवंगत झाला तेव्हा तुझ्या ह्या ग्यानी अनुगामी भक्तांनी तुलाच आकाशात व पाताळात समुद्रात नी पहाडात ढकलून दिले (आगामी सिसिफसच्या गड चढणीसाठी) इतकेच नव्हे तर म्हातारी मेली उन्हाळ्यात नी रड आला पावसाळ्यात या म्हणीनुसार त्याच बिलंदर बुकींनी इहलोकाशी विचित्र फिक्सिंग करून तुझ्या अज्ञात व अदृष्ट गढी-मढी वर मोठमोठाली देवळे — रावळे पुतळे व मकबरे उभारलेत, कला आणि साहित्य याचे उदंड पीक अशाच मूठ मातीतून तरारलेत असे नंतरचे शोधकर्ते सांगतात: आणि आजकाल तर सारा आनंदी आनंदच परमेश्वरा!

पुढे वाचा

हसरी किडनी अर्थात् ‘अठरा अक्षौहिणी’ [लेखिका : पद्मजा फाटक, अक्षर प्रकाशन मुंबई, पृष्ठे बावीस + ४३७]

‘हसरी किडनी’च्या लेखिकेचे नागपूरशी नाते आहे. जन्माने. विचाराने ‘आजचा सुधारक’शी त्यांची माहेरची बांधिलकी आहे. पुस्तकाला आ.सु.च्या संस्थापक-संपादकांचा पुरस्कार आहे. तो त्यांनी आग्रहाने मिळवला आणि पद्मभूषणासारखा मिरवला आहे. ‘अशा प्रकारचे एकमेव पुस्तक’ ही त्यांची प्रशस्ती. विजय तेंडुलकर, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या नामवंत सारस्वतांनी तिला संमतिपूर्वक मान मोलावली आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन १६ जून २००१ या दिवशी झाले. लेखकाला आपल्या पुस्तकाचे जे जे व्हावेसे वाटते ते सर्व सोहळे त्याला लाभले आहेत अशा तेंडुलकरांच्या अभिप्रायासमवेत आलेली प्रकाशनसमारंभाची व्हिडियो कॅसेट अमेरिकेत लगेचच लेखिकेच्या सौजन्याने प्रस्तुत परिचयकर्त्याने पाहिली आहे.

पुढे वाचा