Author archives

घोंगे यांच्या संशोधनातील भकासपणा

१. प्रा. ह. चं. घोंगे यांचा गोमांसभक्षण : एक ऐतिहासिक वास्तविकता या शीर्षकाचा आजचा सुधारकमध्ये (मार्च २०००) प्रसिद्ध करण्यात आलेला लेख वाचून बरीच करमणूक झाली. त्यामुळे सध्या काही विद्वानांचे प्राचीन इतिहासाचे संशोधन आणि त्याची अभिव्यक्ती कोणत्या दर्जेदार रीतीने चालते याचा एक नमुना उपलब्ध झाला आहे. प्रस्तुत लेख घोंगे यांनी ‘मित्रवर्य’ डॉ. भाऊ लोखंडे यांच्या ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लेखाच्या समर्थनार्थ लिहिला आहे. परंतु, तो मूळ प्रतिक्रिया समजून न घेता ‘पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण’ लिहिला आहे.
[१. आपली करमणूक व उद्बोधनही झाले असावे. आपण एकच कबूल केले तरी दुसरे झाकत नाही.

पुढे वाचा

वृद्धांच्या समस्या (२)

बऱ्याच वेळी पुढारलेल्या पा चात्त्य देशांत ज्या विषयांची चर्चा चालत असते त्याच विषयांची चर्चा सहाजिकच भारतातही चालते. भारतासारख्या गरीब देशाशी तुलना करता ह्या संपन्न देशात आर्थिक प्रश्न वेगळे किंवा जवळजवळ सुटलेले आहेत. त्यांच्याकडे कुटुंबसंस्था, स्त्रियांच्या घराबाहेर जाऊन केलेल्या नोकऱ्या, व्यक्तिस्वातन्त्र्य, व्यक्तिमत्त्वाचा विकास व त्यामुळे असणारी किंवा वाढणारी स्वयं-केन्द्रितता हे प्रश्न जास्त प्रकर्षाने जाणवतात. त्यातच वृद्ध होरपळत असले तर त्यांच्या समस्या चर्चेला येतात. वृद्ध म्हणजे सामान्यपणे साठ वर्षे वयावरील लोक असे गृहीत धरले जाते. संपन्न देशांत आज सरासरी आयुर्मान ७८ वर्षांपर्यंत गेलेले आहे.

पुढे वाचा

प्रेम हाच खरा देव आहे (२) आंद्रे पॅरी यांच्या फ्रेंच लेखावरून

धर्माच्या शृंखलांतून आपणांस मुक्त समजणाऱ्या लोकांत देखील बराच धार्मिक मूर्खपणा शिल्लक असतो. उदाहरणार्थ फ्रान्समध्ये जरी धर्माला सरकारी दृष्टीने अस्तित्व नाही, तरी तेथील कायदे पाहिले तर ते अजून धार्मिकच आहेत. ख्रिस्ती धर्मांत लैंगिक ज्ञान लील समजतात, यामुळेच लैंगिक शिक्षणाकडे कायदाहि लक्ष देत नाही आणि पालकहि देत नाहीत. यामुळेच मुलांच्या डोक्यांत याविषयी भलभलत्या कल्पना शिरतात. विवाहबाह्य समागमाला धर्माची आडकाठी, पण धर्मा पासून अलिप्त मानलेले कायदे देखील अनौरस मुलांना कमीपणा देतात, अविवाहित आयांचे हाल करतात आणि व्यभिचाराला गुन्हा समजतात. ही कायद्याची गोष्ट झाली. सामाजिक छळ तर कायद्याचेहि पलीकडे आहे आणि यामुळे इतर बाबतींत लोक कितीहि क्रांतिकारक मतांचे असले तरी लैंगिक बाबतीत मात्र त्यांना समाजाला भ्यावे लागते कारण समाजाविरुद्ध जाण्याचे धैर्य फार थोड्या लोकांत असते.

पुढे वाचा

प्रिय वाचक

सुधारकात काय यावे आणि काय येऊ नये याबद्दल बरेच वाचक सल्ला देत असतात. अनेक विषयांवर साहित्य आम्हाला हवे असते, परंतु ते हाती येतेच असे नाही. तसेच काही विषयांवर आम्ही जे लिखाण देतो ते अनेकांना स्चत नाही. सर्वांना संतुष्ट राखणे आणि तेही सर्वदा, शक्य नसते. ‘आमच्या प्राचीन धर्मग्रंथांतले शेण तेवढे तुम्हाला दिसते, सोने मात्र दिसत नाही’ असा एका वाचकाने संतापाने टोमणा मारला. त्यावर आम्हाला प्रश्न इतकाच पडतो की अमुक एक पूर्वमत सोने आहे हे कसे ठरवावे? आणि कोणी? एक साधे उत्तर असे की सोने किंवा शेण ठरविण्याची कसोटी ही शेवटी आपल्या बुद्धीला अनुसरून आपण लावणार.

पुढे वाचा

मनुष्यनिर्मित दुःखे आणि मी

. . . . ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो. त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपला गेलो असतो तर? किंवा कामाठीपुऱ्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो तर? या समूहांमध्ये जन्मणाऱ्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! … .
एखाद्या भीषण खुनाची बातमी वाचल्यावर आपण किती हादरतो! पण असे या परिस्थितीच्या दडपणाखाली चिरडून होणारे माणूसपणाचे खून किती सहजपणे आपण पाहू शकतो, किंवा पाहायचे नाकारू शकतो.

पुढे वाचा

प्रिय वाचक,

गेल्या महिन्यात वॉटर चित्रपट निर्मितीला विरोध करणारी निदर्शने झाली. चित्रिकरण जबरदस्तीने बंद पाडण्यात आले. व्हॅलेंटाइन डे निमित्त प्रेमिकांनी एकमेकांना छुपे संदेश देऊन प्रेम व्यक्त करण्याची पाश्चात्त्यांची पद्धत आहे. आपल्या तरुण- तरुणींनी तिचे नकळत अनुकरण सुरू केले आहे. हळूहळू छापील संदेश-पत्रे, त्यांच्या जाहिराती यांनी भव्य रूप घेतले आणि तो प्रकार डोळ्यात भरण्याइतका मोठा झाला. ज्यांना ह्या प्रघाताचा प्रसार व्हायला नको आहे त्यांनी त्याला विरोध करायला हरकत नाही. ज्या पद्धतींनी प्रसार झाला त्याच पद्धतींनी विरोध होऊ शकतो. प्रसारमाध्यमांचाही वापर केला जाऊ शकतो. पण दुकानांची तोडफोड केली गेली.

पुढे वाचा

सावर.. रे !

भारत सासणे यांच्या ‘एका प्रेमाची दास्तान’ ह्या कथेचे नाट्यरूपांतर केलेले सावर रे! हे नाटक नुकतेच पाहिले. नाटक वैचारिक, संवादप्रधान आहे. विषय प्रौढ अविवाहित स्त्रीसंबंधीचा आहे. नायिका इंदू ही बुद्धिमान असल्यामुळे लहानपणापासूनच ‘तू इतरांपेक्षा वेगळी आहेस’ हे तिच्या मनावर बिंबवलेले. एरवी, ‘तू मुलगी आहेस, परक्याचे धन आहे’ वगैरे, वगैरे चाकोरीबद्ध विचारांपासून तिला जाणीवपूर्वक दूर ठेवलेले. इंदूदेखील यशाचा एक एक टप्पा सहज गाठत जाते. मेरीट मध्ये येणे, इंग्रजीत एम्. ए. करणे, प्राध्यापक म्हणून सफल होणे, पीएच. डी. होणे, संशोधनपर लेख लिहिणे, चर्चासत्राला जाणे इ.

पुढे वाचा

आ. सु. चे स्वरूप सुधारण्याबद्दल

स्पष्ट विचार, नेमके शब्द, आपुलकी आणि सूक्ष्म विनोदबुद्धी यांचा परिचय देणारी एक प्रतिक्रिया.
पुण्याचा वाचक मेळावा आपल्या खुसखुशीत अहवालातून कळला. उपस्थितांची नावे वाचून विचारवंताचे अग्रणी कोणकोण आहेत ते कळले. आणि समाधान वाटले की, जाहिरात न करता, अंदाजपत्रकी कौशल्य न वापरता आजचा सुधारक एवढा मेळावा करू शकतो. जाहिरातीच्या आवश्यकतेबद्दल बोलणाऱ्यांना ही गोष्ट पुरेसे उत्तर नाही का? अन्वर भाई आणि ताहेरभाईची नावे वाचून विशेष आनंद झाला. का ते पुन्हा केव्हातरी सांगेन.
पुष्कळ हितचिंतकांना वाटते की हे मासिक अधिक आकर्षक दिसावे .. मला त्यांना विचारावेसे वाटते की ते स्वतः या मासिकाकडे आकृष्ट झाले ते कशामुळे?

पुढे वाचा

आजच्या शिक्षणातील दुखणी – एक टिपण

गेली ३० वर्षे शिक्षणक्षेत्रात शिक्षक ते उपसंचालक म्हणून काम करत असताना आमच्या शिक्षणातील जी दुखणी मला कळली आणि जी वेळोवेळी माझ्या लेखांतून, पालकशिक्षकसभांतून, शिक्षण सल्लागार मंडळांच्या बैठकींतून मांडली त्याचे एकत्रीकरण करण्याचा हा प्रयत्न.
१. सन १९४७ मध्ये आम्ही स्वतंत्र झालो. त्यावेळी आचार्य विनोबा भावे म्हणाले होते, “राज्यक्रांतीनंतर जसा झेंडा बदलतात तसेच शिक्षणही बदलावे. ” परंतु गंभीररीत्या त्यांचे म्हणणे कोणी ऐकलेच नाही. महात्मा गांधी- आचार्य विनोबा भावे यांनी जीवन – शिक्षणाची कल्पना मांडली होती. प्रयोग केले होते. परंतु आपण ते सोडून दिले.

पुढे वाचा

भारतीय शिक्षणपद्धती आणि माहिती-तंत्रज्ञान

आपले जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाने आपल्याला माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आणून सोडले आहे. मोठ्या प्रमाणात संगणकांचे उत्पादन झाल्याने ते स्वस्त होणार आहेत. आणि माहिती-महाजालावरील स्थानांसाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे हे सारेच तंत्रज्ञान सामान्यांनाही ‘परवडणारे’ होणार आहे. इंटरनेट, माहिती- महामार्ग (किंवा महाजाल) आमच्या संकल्पना स्पष्ट करायला मदत करणार आहेत. इंटरनेटमुळे वर्गात वसून शिकवणे येत्या पाच वर्षांत कालबाह्य होणार आहे. अशा रीतीने ज्ञान सर्वांनाच सहज उपलब्ध होणार आहे.
हा ज्ञानाचा स्फोट झेपण्यासाठी उपलब्ध ज्ञानाचा योग्य वापर करता यायला हवा. आपली शिक्षणपद्धती बहुतांशी पाठांतरावर आधारित आहे. यात विद्यार्थ्यांवर फार भार पडतो आणि त्यांची शक्ती व त्यांच्या क्षमता ह्यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.

पुढे वाचा