परामर्शासाठी दिवाळी अंक आलेले आणि आणलेले विपुल आहेत. आलेल्या अंकांची पोच स्वतंत्रपणे दिली आहे. निवडक साहित्याचा परामर्श घ्यायचा म्हटले तरी एक लेख पुरणार नाही. परामर्शाचा एक अंश म्हणून या लेखाकडे पाहावे.
दर्जेदार दिवाळी अंक देण्याची परंपरा ‘मौज’ने कायम राखली आहे. मुखपृष्ठ गेल्या पिढीतले विख्यात चित्रकार त्रिन्दाद यांनी केलेले दुर्मिळ पोर्टेट आहे. जोडीला त्याचे सुधाकर यादव-कृत रसग्रहण वाचले की आस्वादनात भर पडते. समाजातल्या समस्यांचा गंभीरपणे ऊहापोह करणारे तिन्ही लेख लक्षणीय आहेत. त्यात स. ह. देशपांडे आहेत.
हे तीनही लेख खूप माहितीपूर्ण आणि तरीही रोचक आहेत.
Author archives
इंग्रजीला पर्याय नाही
इंग्रजीविरुद्धचा गहजब तसा नवीन नाही. भाषाभिमान्यांनी अनेकदा विविध माध्यमांतून इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. मातृभाषेतूनच सर्व शिक्षण द्यावे-घ्यावे ही कल्पना तत्त्वतः मलाही मान्य आहेच. परंतु सद्यः परिस्थितीत हा आग्रह धरणे म्हणजे आपण होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे. तिसरे सहस्रक उगवते आहे. कोणी कितीही नाही म्हटले तरी जागतिकीक र ण (ग्लोबलायझेशन) अटळ आहे . इंटरनेटमुळे तर संदेश दळणवळण-आर्थिक व वाणिज्य व्यवहार या क्षेत्रांतील सर्व पारंपारिक व्यवस्था मोडीत निघाल्या आहेत. अशा वेळी केवळ स्वदेश स्वभाषा ह्यांसारख्या उदात्त, भव्य परंतु अमूर्त आणि प्रसंगी अव्यावहारिक भावनांच्या भरवशावर पुढे जायला नकार देणे फारसे हितकर वाटत नाही.
महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात
एक वृत्तान्त :
मराठी भाषेची सद्यःस्थिति आणि भवितव्य या विषयावर कोकण मराठी साहित्य परिषदेत (को.म.सा.प.) परिसंवाद झाला. प्रत्यक्षात ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात’ अशा शब्दात विषय मांडला तरी आशय तोच.
न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे हे परिसंवादांचे अध्यक्ष होते. आणि मुंबईसकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त भाषासंचालक डॉ. न. ब. पाटील आणि सुरेश नाडकर्णी हे वक्ते होते. मराठीची आणि मराठी माणसाची महाराष्ट्राच्या राजधानीतून हकालपट्टी होत आहे, द्रव्यबळ आणि स्नायुबळ हेच प्रभावी ठरत आहेत, असा मुद्दा अध्यक्षीय भाषणात मांडला गेला. नार्वेकरांनी वृत्तपत्रसृष्टीतील मराठीची गळचेपी निदर्शनास आणली.
मांसाहार – उपयुक्ततावादी!
प्राचीन काळच्या भारतीय समाजात मांसाहाराला मान्यता होती, हे डॉ. लोखंडे यांच्या लेखात (१०.९) वयाच पुराव्यांच्या मदतीने दाखवले आहे. पण पूर्वी काय होते आणि ते का बंद झाले, हा एक दृष्टिकोन झाला. मांसाहाराला विरोध करण्यामागची एक सरळसरळ उपयुक्ततावादी भूमिका अशी –
सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून वनस्पतींची वाढ होते. वनस्पती खाऊन शाकाहारी जीव जगतात. अशा जीवांना खाऊन मांसाहारी जीव जगतात. या तीन्ही ऊर्जा-रूपांतरांची कार्यक्षमता सुमारे पंधरा टक्क्यांएवढी (एक-सप्तमांश म्हणा) आहे. म्हणजे वनस्पती खाऊन एक कॅलरी ऊर्जा घेण्यात सात कॅलरी सूर्यप्रकाश परहस्ते ‘खाल्ला जात असतो.
मंटो नावाचे बंड
येत्या १८ जानेवारीला मंटो मरून ४५ वर्षे होतील. वयाच्या ४३ व्या वर्षी तो वारला. काही समीक्षकांच्या मते तो उर्दूतला सर्वश्रेष्ठ कथाकार होता. नोकरीच्या शोधात अमृतसरहून मुंबईला आला अन् चित्रपट-व्यवसायात शूटींगच्या वेळी संवाद दुरुस्त करून देणारा मुन्शी म्हणून नोकरीला लागला. लवकरच ‘मुसव्विर’ (चित्रकार) या उर्दू सिनेसाप्ताहिकाचा संपादक म्हणून त्याला जरा प्रतिष्ठेची नोकरी मिळाली. ‘बद सही लेकिन नाम तो हुवा’ अशा बेहोशीत लिहायचा. स्वतःबद्दल फार थोडे सांगणारा
मंटो म्हणतो, “माझ्या आयुष्यात सांगण्यासारख्या तीनच गोष्टी. एक माझा जन्म, दुसरे, माझे लग्न आणि तिसरे माझे लिहिणे.
प्राचीन आर्यसंस्कृति – १
समाजस्वास्थ्याच्या नोवेंबरच्या अंकात ‘चमत्कारिक खटला’ या मथळ्याखाली फ्रायबुर्ग (जर्मनी) येथील ओटो व त्याची बहीण एलीझ यांवर निषिद्ध समागमाबद्दल १९२८ साली झालेल्या खटल्याची हकीकत आली आहे. सदर खटल्यांतील पुरावा बनावट होता असे पुढे दिसून आले तरी लोकहिताच्या दृष्टीने शिक्षा ताबडतोब पुरी। होणे इष्ट असल्यामुळे अपील अर्जाचा निकाल होईपर्यंत ती तहकूब करता येत नाही असा जबाब आरोपीच्या वकिलास देण्यांत आला.
निषिद्ध-समागमाचे योगाने इतर कोणाचे नुकसान होत नसल्याने असले खटलेच गैर आहेत. पण प्रजेच्या पापाचा हिस्सा यमाच्या दरबारांत राजाच्या खात्यावर चढवला जातो अशी राजकत्र्यांची समजूत असल्यास व निषिद्ध समागम हे पातक मानल्यास बहीणभावाच्या निषिद्ध संबंधाबद्दल राज्यकर्त्यांनी खुनशी वृत्ति दाखवणे क्षम्य होईल.
आम्ही आणि ‘ते’! (भाग २)
मागच्या अंकामध्ये समाजाची चिकित्सक वृत्ती कोणत्याही एका जातीकडून कुंठित होत नसते हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. ह्या अंकात बहुजनांचे शोषण करण्याचा मक्ता फक्त ब्राह्मणांकडे नव्हता हे सांगण्याचा यत्न करणार आहे.
अन्याय आणि शोषण ह्यांचा देशमुख त्याच वाक्यात पुढे उल्लेख करतात. त्यांच्या वाक्यातून अन्याय आणि शोषण फक्त ब्राह्मणांनीच केले असे सूचित होते. परंतु ते तसे नाही हे इतिहासाच्या कोणत्याही चिकित्सक वाचकाला समजण्यासारखे आहे. आमच्या देशात अन्याय आणि शोषण आम्ही सर्वांनीच एकमेकांचे केले. येथे म्हणजे भारतात महाराष्ट्रातल्या काही मोजक्या प्रदेशात शाहूचे मुख्यप्रधान म्हणून पेशव्यांनी राज्य केले असले तरी अन्यत्र कोठेही ब्राह्मण राज्यकर्ते नव्हते.
“पैसा” उत्पत्ती आणि उत्क्रांती
प्रत्येक मनुष्याला आपल्या कामाचा/वस्तूचा/वेळेचा मोबदला हवा असतो. हा मोबदला सोयिस्कर स्वरूपात, दीर्घकाळ टिकेल असा, भविष्यासाठीही राखून ठेवता येईल असा आणि त्याबदल्यात काही मिळवून देईल असा असावा. पूर्वी अशा त-हेची काही सोय नव्हती. लोक रोखठोक व्यवहारात वस्तूंच्या अदलाबदली करत. परंतु हे फारच जिकिरीचे असे. अशा प्रकारची स्थानिक पातळीवरची देवाणघेवाण म्हणजे व्यापार नव्हे.
तेव्हा मग व्यापा-यांनी, सावकारांनी हुंड्या, हवाला, वचनचिठ्या देण्यास सुरुवात केली. त्या त्या व्यक्तीची पत आणि विश्वासार्हता यांवर हा व्यवहार चाले. परदेशी व्यापाराच्या वेळी सावकार-श्रेष्ठी गायी, शेळ्या-मेंढ्या अशा वस्तू तारण म्हणून ठेवून घेत.
प्रिय वाचक
प्रिय वाचक,
१. ‘ब्राह्मणांचे गोमांस-भक्षण’ हा लेख छापून तुम्ही काय साधले? ब्राह्मण आता बदलले आहेत. बैदिक हिंदू आता पूर्वी होते तसे हिंसक राहिले नाहीत. समाजसुधारणा म्हणजे ऊठसूठ हिंदुधर्माला आणि ब्राह्मणांना झोडपणे असे तुम्ही समजता काय? ही एक प्रतिक्रिया.
२. पोपप्रणीत धर्मविस्तार ह्या लेखाचे प्रयोजन काय? उगाच धर्मा-धर्मात द्वेषबुद्धी जागृत करायची ही कुठली सुधारणा? ही दुसरी प्रतिक्रिया.
उत्तर इतकेच की, धर्माच्या नावावर मनुष्य किती वेडाचार करू शकतो हे दाखवावे. तो पूर्वी करत होता अन् आता नाही असेही नाही. अंधश्रद्धा निर्मूलनवार्तापत्राचा दिवाळी अंक (१९९९)पाहा.
ईश्वर विनाकारण घोटाळ्यात पडायला नको
ईश्वराला अक्कल शिकवणारे लोकच प्रार्थना करीत असतात. पावसाकरतां प्रार्थना करणा-या लोकांची चेष्टा करण्याकरतां विन्स्टन चर्चिल यांनी एकदां वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यांत त्यांनी अशी शिफारस केली होती की, पावसाला व पिकांना सर्वांत सोयीचा वेळ कोणता हे ठरवण्याकरतां एक कमिटी नेमावी आणि त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याला धरून अमुक दिवशीं अमुक इतका पाऊस पाडण्याविषयी ईश्वराला सार्वजनिक प्रार्थना करावी, कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या दिवशी प्रार्थना केल्याने ईश्वर विनाकारण घोटाळ्यांत पडण्याचा संभव आहे. अर्थात् युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी आपणास विजय मिळावा अशी प्रार्थना केल्यामुळे ईश्वर नेहमीच घोटाळ्यांत पडतो, पण पिकांचे बाबतीत कदाचित् एका देशांतल्या लोकांचे तरी कमिटीचे द्वारें एकमत होण्याचा संभव आहे, तेव्हा वेगवेगळ्या देशांत तसतसा पाऊस पाडून त्यांचे समाधान करणे शक्य आहे.