Social Distancing नका म्हणू, त्याचा इतिहास भयकारी आहे.
गणेश देवी आणि कपिल पाटील यांचे PM मोदी यांना पत्र
Social Distancing नका म्हणू, त्याचा इतिहास भयकारी आहे.
गणेश देवी आणि कपिल पाटील यांचे PM मोदी यांना पत्र
चेतन भगत यांचा वर्तमानपत्रीय लेख
जगातील आजची परिस्थिती अभूतपूर्व म्हणावी लागेल. ह्याचा अर्थ असा नव्हे की आजवर साथीचे रोग आलेच नाहीत. आले, परंतु त्यावरील उपाय म्हणून जागतिक संचारबंदी लादावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्या संचारबंदीचे परिणाम काय होत आहेत आणि काय होणार आहेत, ह्यांचा विचार सर्वप्रथम करणे क्रमप्राप्त आहे.
अगदी अलीकडेपर्यंत सुरू असलेले जातीय, धार्मिक, राजकीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न ह्या एकाच समस्येमुळे तूर्तास कालबाह्य झाले आहेत. सरकार पूर्ण शक्तीनिशी ह्या समस्येशी झुंजण्यात लागले आहे. हा विषाणू चीनमधून भारतात संक्रमित होण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरात प्रवास करणारे उच्चवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय प्रवासी.
साधारण नोव्हेंबर २०१९ पासून मार्च २०२० पर्यंत म्हणजे फक्त साडेचार-पाच महिन्यांत संपूर्ण जगामधील मानवी आयुष्य एका छोट्याशा विषाणूने विस्कळीत केले आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या साधारण हजारपट लहान, इतक्या छोट्या असलेल्या या विषाणूमुळे आपले रोजचे सामाजिक, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आज मार्च २०२० महिन्याच्या शेवटी संपूर्ण जग फक्त या विषाणूची लागण कशी थांबवता येईल आणि ते करताना आपल्या मूलभूत जीवनावश्यक गरजा कशा भागवता येतील हे सोडून इतर काहीही विचार करू शकत नाही आहे. Corona/SARS-CoV2/COVID-19 अशा विविध नावांनी आज कुप्रसिद्ध झालेला हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, या विषाणूमुळे पुढे नेमके काय काय होईल आणि यावर उपाय कधी येणार असे अनेक प्रश्न पडलेले आहेत.
इंदौरच्या `नई दुनिया’ दैनिकामध्ये २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित सोपान जोशी ह्यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद
अगदी सामान्य भारतीय नागरिकापासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच पाण्याविषयी एक महत्त्वाचे तथ्य माहिती आहे – पाणी निर्माण करता येत नाही. आधुनिक विज्ञानाने आज कल्पनातीत प्रगती केली आहे. रेणू ज्यापासून बनलेला असतो त्या सूक्ष्म अणूला भेदून त्यातील ऊर्जादेखील आपण काढू शकतो. अनेक नवनवीन रसायनांचा शोध तर लागलेला आहे, निसर्गात न आढळणारी मूलद्रव्येसुद्धा प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहेत. आणि तरीही, पाण्याची निर्मिती काही आपण करू शकत नाही.
पाण्याचे रासायनिक सूत्र अगदी मुलांनासुद्धा ठाऊक आहे.
अशोक राणे हे नाव चित्रपटशौकिनांच्या चांगल्या परिचयाचं आहे. गेली चार दशके ते सातत्याने लेखन करीत आले आहेत. विविध दैनिकांतून त्यांनी चित्रपटसमीक्षा लिहिली आहे. याच काळात त्यांनी चित्रपट माध्यम केंद्रस्थानी ठेवून ग्रंथलेखनही केले आहे. त्यांच्या ग्रंथांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभले आहेत.
चित्रपटजगतातला त्यांचा संचार हा केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यातून त्यांची कारकीर्द वेगळ्या दिशेने घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक (ज्युरी) म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक व्यापक आणि विशाल असे परिमाण प्राप्त झाले.
सध्या महाराष्ट्रात तरी वृक्षप्रेमाच्या भावनेचा महापूर आला आहे. भारतीय मनोवृत्ती मुळातच भावनेच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष फायदा- तोटा यांचा विवेक हरवून बसण्याची आहे. त्यात विविध प्रसारमाध्यमांची भर पडल्यामुळे सर्व समाजाला वृक्षप्रेमाचा ज्वर चढला आहे. त्यामुळे अवास्तव खर्च, वाया जाणारे श्रम, वाढती गैरसोय, भूगर्भातील पाणी कमी होणे व काही वेळा हकनाक मृत्यु हे सर्व दोष निर्माण होत आहेत. त्यापैकी काही पैलूंकडे ह्या लेखात लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.
झाडे व पाऊस
झाडांमुळे, जंगलामुळे पाऊस वाढतो अशी एक समजूत समाजमनात घर करून आहे. पण ह्या समजुतीला काहीही शास्त्रीय आधार नाही!
मिलिंद बोकील ह्यांनी २००३ साली ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना.
डॉ. जयंतराव पाटील यांनी विनोबांच्या या लेखसंग्रहाचे संकलन करून प्रस्तावना लिहिण्याचे काम मला जेव्हा सांगितले तेव्हा आयुष्यात पूर्वी कधीही नाही इतका प्रचंड संकोच वाटला. मन अतिशय दडपल्यासारखे झाले. संकलन करण्याचे काम अवघड नव्हते, पण प्रस्तावना लिहिणे? त्या कामाला आपण पात्र नाही एवढे आत्मज्ञान मला जरूर होते. अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर विनोबांसारख्या महात्म्याच्या लेखांची ओळख माझ्यासारख्याने करून देणे म्हणजे सूर्याला काजव्याने ओवाळण्यासारखे होय. पण डॉ. पाटील यांनी सांगितले की सध्याच्या पिढीतील एका माणसाला विनोबांबद्दल काय वाटते ते कळण्यासाठी हे काम तू करायला हवेस.
‘थप्पड’ चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि आम्ही सर्व स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी तो बघण्याचा निश्चय केला. संध्याकाळी पाचच्या शोचा ‘थप्पड’ बघण्यासाठी आम्ही सिनेमागृहात प्रवेश केला तेव्हा सिनेमागृहात मोजून ३० ते ४० प्रेक्षक होते. त्यांत महिलांचे प्रमाण अधिक होते. बहुतेक प्रेक्षक हे तरुण व मध्यमवयीन होते तर काही बोटावर मोजण्याइतक्या पन्नाशीपुढच्या महिला होत्या. प्रेक्षकांमधील पाच-सहा तरुण तर चित्रपट सुरू असताना मध्येच उठून गेले. बहुदा त्यांना चित्रपट आवडला नसावा. सदर चित्रपटातील मोलकरणीला तिचा नवरा मारतो हे दृश्य आले तेव्हा बहुतेक तरुण मुली-मुले हसली. परंतु नायिकेला तिच्या नवऱ्याने ‘थप्पड’ मारल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटले हे त्यांच्या स्तब्धतेतून कळाले.
खरं तर,
ती कवी आहे
चित्रकार आहे…
तो ऑफिसला गेल्यानंतर
घर फक्त तिचं असतं;
मग ती जगते हवं तसं
तिला चित्र काढायला आवडतं;
ती चित्र काढते
दिवसभर खेळते रंगांशी…
गुणगुणते एखादं आवडीचं गाणं !
सायंकाळी तो घरी येतो,
आता ती गाणं गुणगुणत नाही,
ती मुकी होते
आणि…. आणि…
उडून जातो,
तिच्या कॅनव्हासवरून चेहऱ्यावर पसरलेला रंग !
तो घरी नसतो तेव्हाच फक्त;
घर तिचं असतं !
मग,
घर आणि रात्र दोन्ही त्याचं होतं !