विषय «आरोग्य»

स्त्री-आरोग्य

“In nature there are neither rewards nor punishments, there are consequences.” Robert Ingersoll (निसर्गात कुणाला बक्षिसही नाही किंवा शिक्षाही नाही. निसर्गात फक्त परिणाम असतात. रॉबर्ट इंगरसॉल)

बाह्य रुग्ण विभागात (ओ.पी.डी.त) एक बाई रुग्ण खूप आरडाओरडा करीत होती म्हणून मी पहायला गेले. चौथ्यांदा गर्भ राहिला होता, ५-६ महिने झाले होते. पहिल्या तीनही मुली होत्या. तिला तपासून शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर समजले की आता जर मुलगा नाही झाला तर तिची धडगत नव्हती. सासू-नवऱ्याने दम भरला होता. त्यामुळे मनातून प्रचंड भ्यालेल्या या बाई विचित्र वागत होत्या.

पुढे वाचा

सध्याचे वैद्यक-शिक्षण आणि डॉक्टर विद्यार्थी

सध्याचे म्हणावे असे (भारतातील) वैद्यक शिक्षण मुळातून गेल्या वीस वर्षांत बदलले आहे अशातला काही भाग नाही. परंपरागत शिक्षणपद्धती राबवताना अत्याधुनिक उपकरणे बऱ्यापैकी वापरात आली असली तरी मेडिकल कॉलेजेसची परिस्थिती फारशी सुधारली आहे असे नाही. त्याच कालावधीत या कॉलेजेसमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. वैद्यकशिक्षणावर ज्याचा विपरीत परिणाम होईल असा हा एक महत्त्वाचा घटक आहे. वैद्यकीय शिक्षणाचे चार खंड आहेत. त्यांतील सामान्य त्रुटी आणि शक्ती यांचा या लेखात एकत्रित विचार केला गेला आहे. सरकारी व कॅपिटेशन फीची कॉलेजेस व पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण असे हे चार खंड आहेत.

पुढे वाचा

जगात आरोग्यकर्मींची त्रुटी?

जागतिक आरोग्य संस्थेच्या २००६ चा रिपोर्ट “आपण सर्व मिळून आरोग्यासाठी काम करू.” या विषयावर आहे. आता पुढच्या १० वर्षांत जगभरात आरोग्यसेवेतले मनुष्यबळ कमी होत चालले आहे. जगातल्या ६० देशांमध्ये कमी मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेत सुधारणा नाही. त्रेचाळीस दशलक्ष डॉक्टर्स, दाया, नर्सेस आणि आरोग्यसेवक यांची गरज आज आहे. आफ्रिकेतील सबसहारन देशात या सर्वांची सर्वांत जास्त गरज आहे. भयानक, गरिबी, काम करण्यासाठी लागणारी अपुरी साधने, वाईट वातावरण, अशिक्षित जनता, यामुळे प्रश्न बिकट होत आहेत.

एकोणसाठ दशलक्ष हा आकडा जगभरातील आरोग्यसेवेतील मनुष्यबळाचा आहे. यातील एक तृतीयांश बळ अमेरिकेत व कॅनडात आहे जिथे जगातील ५० टक्के आर्थिक सुबत्ता आरोग्यसेवेत आहे.

पुढे वाचा

‘सर्वांसाठी आवश्यक औषधे’ का शक्य नाहीत ?

उदंड आजार, औषधे व वंचितताः
माणूस म्हटला की तो केव्हातरी आजारी पडणारच व त्यासाठी त्याला थोडेफार तरी औषधपाणी लागणारच! पण तरी आपण अशा समाजाचे ध्येय ठेवले पाहिजे की ज्यामध्ये अनावश्यक व अकाली आजारपणे कमी असतील व एकंदरीतच औषधपाण्याची गरज तुलनेने कमी राहील. पण सध्याच्या समाजात अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, रोजगार या मूलभूत गरजाही बहुसंख्य लोकांबाबत पुरेशा भागवल्या जात नाहीत किंवा चुकीच्या रीतीने भागवल्या जात आहेत. त्यामुळे अकारण व अकाली आजारपणे याने समाज ग्रस्त आहे. भारतासारख्या देशात कुपोषण, जंतुजन्य आजार (जुलाब, न्यूमोनिया, टी.बी.

पुढे वाचा

रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्रविभाग : दशा व दिशा

प्रास्ताविक:
M.B.B.S.च्या अभ्यासक्रमात रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र नावाचा विषय आहे. याच विषयाला इंग्रजीमध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडीसीन असेही संबोधण्यात येते. दंतवैद्यक, होमिओपॅथी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदवी व पदविका अभ्यासक्रम ह्यांसारख्या वैद्यक व पूरक अभ्यासक्रमातही हा विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. समाजशास्त्र, गृहशास्त्र, आहारशास्त्र, पोषणशास्त्र, रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य-प्रशासन, व्यवसाय-आरोग्य, आरोग्य-शिक्षण अभ्यासक्रम, आरोग्य-कर्मचारी-अभ्यासक्रम, स्वच्छता-निरीक्षक-अभ्यासक्रम ह्यांसारख्या विद्यापीठांतर्गत व विद्यापीठाबाहेरील इतरही बऱ्याच अभ्यासक्रमांत रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र हा विषय अंतर्भूत करण्यात आलेला आहे. वर नमूद केलेल्या बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये हा विषय राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून अनिवार्य विषय म्हणून शिकविण्यात येतो.

पुढे वाचा

आयुर्वेदाच्या मर्यादा

होमिओपॅथीचे बिंग फोडल्याबद्दल लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाचे आभार. परंतु अशीच काहीशी परिस्थिती आयुर्वेदाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८०% लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. त्यांपैकी आयुर्वेद एक महत्त्वाची उपचारशाखा असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे. सामाजिक आरोग्याच्या विषयावर प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे कर्तव्यच असल्यामुळे हा लेखनप्रपंच केला आहे. आमच्या ज्ञानशाखेला ‘ॲलोपॅथी’ असे चुकीचे नाव पडले आहे. रोगाच्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम घडविणारे उपचार (रोगाचे कारण न शोधता) करणे म्हणजे ॲलोपॅथी होय. वैज्ञानिक वैद्यक ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. वैज्ञानिक वैद्यकाचा एक भाग ‘लक्षणांवर आधारित उपचार’ (सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट) आहे.

पुढे वाचा

स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज

‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा कोणाला आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत. कोणी बोलूच देत नाहीत. अलीकडे मात्र, निदान वयोवृद्धांमध्ये तरी या विषयावर थोडीबहुत चर्चा होऊ लागली आहे.
“आत्महत्या” करणार्याू व्यक्तीबद्दल आपल्याकडे तरी अजूनही कोणी मोकळ्या मनाने विचार करीत नाहीत.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा