विषय «जीवन शैली»

सुरांचा धर्म (१)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मियांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणारा हा लेख. भारतीय संगीताला मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी नेमके काय योगदान दिले व सूफी परंपरेने भक्ती संप्रदायाशी नाते जोडीत कर्मठ धर्मपरंपरेविरुद्ध कसे बंड पुकारले हा इतिहास विषद करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध –
—————————————————————————–

गुजरातमधल्या हिंसाचाराच्या गोंधळात एका गोष्टीकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. बडोद्यात मुस्लिमविरोधी हिंसाचारादरम्यान उस्ताद फैयाज खानांच्याकबरीची मोडतोड झाली. अहमदाबादेत अनेक दंगे या धर्मपिसाटांनीभुईसपाट केले. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून कधी गुलामअलीच्या गाण्याच्या कार्यक्रमात गोंधळ, मेंहदी हसनला कार्यक्रम करण्यापासून रोखणे असे अनेक प्रकार झाले.

पुढे वाचा

अनुभव: कलमा

आंतरधर्मीय विवाह, मानवी नातेसंबंध, कलमा
________________________________________________________
मुस्लीम मुलगा व ख्रिश्चन मुलगी ह्यांचा विवाह, तोही आजच्या ३५ वर्षांपूर्वी.सुनबाई तर हवीशी आहे, पण तिचा धर्म न बदलता तिला स्वीकारले, तर लोक काय म्हणतील ह्या पेचात सापडलेले सासरे व प्रेमाने माने जिंकण्यावर विश्वास असणारी सून ह्यांच्या नात्याची हृद्य कहाणी, मुलाच्या दृष्टीकोनातून —
________________________________________________________
आमच्या लग्नाला कोणाचा विरोध नव्हता. आशाबद्दल तक्रार नव्हती. आमचे वडील तिच्या गुणांचे कौतुक करायचे. परंतु तिने मुसलमान व्हावे एवढीच त्यांची अट होती. आम्ही एकमेकाला व्यक्ती म्हणून पसंत केले होते. धर्मांतराचा विषयच नव्हता.

पुढे वाचा

‘बोल्ड’ हे ‘ब्युटिफूल’च हवे

‘बाबा, एक फ्रेंड येणार आहे. आम्हाला काही discuss करायचे आहे.’ मुलाचा फोन.

माझा मुलगा ‘टीन’ वयोगटातला.

‘हो. येऊ दे की.’ मी.

बेल वाजल्यावर दरवाजा उघडला. समोर माझा मुलगा आणि एक मुलगी. मुलगी असणं मला अनपेक्षित होतं. फ्रेंड म्हणजे मुलगाच असणार असं मी गृहीत धरलं होतं. का? – माझा समज. संस्कार. मुलाचा मित्र मुलगाच असणार. जास्तीकरून समाजात असंच असतं ना. आमच्यावेळी तर हे असंच अधिक होतं. शिवाय त्याने लिंगनिरपेक्ष फ्रेंड शब्द वापरला होता. मैत्रीण असे म्हटले असते, तर प्रश्नच नव्हता. मी काही जुन्या विचारांचा नाही.

पुढे वाचा

देवाच्या नावावर राजकारण नको

ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही

—————————————————————————
अमेरिकेत डाव्यांनी उदारमतवादी धर्माच्या बाजूचे राजकारण करावे असे सुचविणाऱ्या मताचा प्रतिवाद करणारी ही मांडणी
—————————————————————————

दोन हजार तेरा सालची गोष्ट. टेक्सास राज्यात गर्भपाताची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या एका विधेयकावर चर्चा सुरू होती. (ते विधेयक नंतर संमतही झाले.) त्या चर्चेत भाग घेताना सिनेटर डॅन पॅट्रिक अन्य सदस्यांना उद्देशून म्हणाले – “जर तुम्ही ईश्वराला मानता, तर देव इथे असता तर त्याने कोणाच्या बाजूने मत दिले असते ह्याचा विचार करा.”
हेच महाशय नंतर (देवाच्या कृपेने नव्हे, तर मानवी निवडणुकीच्या माध्यमातून) लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवडले गेले.

पुढे वाचा

गोमांस आणि पाच प्रकरणे

गोमांस, पोर्क, गांधी, सावरकर, जिना
—————————————————————————
गोमांस ह्या सध्याच्या वादग्रस्त प्रश्नाशी संबंधित इतिहासाची काही महत्त्वाची पाने कोणत्याही टिप्पणीविना उलगडून दाखवत आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक तरुण अभ्यासक
——————————————————————–
प्रकरण 1: 10 डिसेंबर 2015 जागतिक मानवाधिकारदिनी तेलंगणातील ओस्मानिया विद्यापीठाचा परिसर युद्धभूमी बनला होता. निमित्त होते गोमांस विरुद्ध वराहमांस विवाद. गोमांसबंदी व त्यासंदर्भात देशभर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक कल्चरल फोरम या डाव्या विचारांच्या विद्यार्थीसंघटनेने उच्च न्यायालयाच्या स्थगितीला न जुमानता विद्यापीठपरिसरात गोमांसउत्सव साजरा करण्याचे ठरविले. यास प्रतिक्रिया म्हणून ओ.यु.जॅाईंट अॅक्शन कमिटी या दुसऱ्या संघटनेने वराहमांस उत्सवाचे आयोजन करण्याचे जाहीर केले.

पुढे वाचा

दस्तावेज: स्वामी विवेकानंद ह्यांचे मित्रास पत्र

विवेकानंद, हिंदूधर्म, इस्लाम
—————————————————————————

माझ्या प्रिय मित्रा,

मला तुम्ही पाठवलेले पत्र अतिशय भावले आणि आपल्या मातृभूमीसाठी ईश्वर शांतपणे किती अद्भुत गोष्टी रचतो आहे हे कळल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. आपण त्याला वेदान्त म्हणा किंवा अन्य कोणतेही नाव द्या, पण सत्य हे आहे की धर्म आणि चिंतनाच्या क्षेत्रातील अखेरचा शब्द आणि ज्या स्थानावरून आपणास सर्व धर्म व पंथांचे प्रेमाने अवलोकन करता येईल  त्याचे नाव आहे अद्वैतवाद. मला विश्वास आहे की भविष्यातील प्रबुद्ध मानवतेचा धर्म हाच असेल. हिब्रू आणि अरबांच्या पूर्वीचा वंश असल्यामुळे हिंदूंना ह्या मुक्कामावर इतरांपूर्वी पोहचण्याचे श्रेय घेता येऊ शकेल; परंतु वास्तवातील अद्वैतवाद, जो सर्व मानवजातीला स्वतःच्या आत्म्याप्रमाणे बघतो व तसा आचारही करतो, सर्व हिंदूंमध्ये कधीही प्रस्थापित झाला नाही.

पुढे वाचा

धर्म समाजस्थैर्यासाठीच आहे

”परधर्माच्या लोकांनी आमच्या धर्माच्या लोकांस आपल्या धर्मात घेतले म्हणजे आमच्या धर्मगुरूंची छाती दु:खाने फाटून जाते! लोकांनी धर्मातर करू नये म्हणून ते गीतेतील तत्त्वज्ञान दाखवतील, वेदांतील सुरस काव्य पुढे करतील, उपनिषदांतील गहन विषय सांगतील, पण धर्माच्या नावाखाली धर्माचाच घात करणाऱ्यांची कानउघाडणी त्यांच्या हातून होणार नाही. असे तर हे धर्ममरतड! असे तर हे धर्मगुरू! आणि असे तर हे शंकराचार्य! बसल्या बसल्या नाटकाप्रमाणे वेदांचे भाषांतर केल्याने धर्माची सुधारणा होणार नाही. गावोगाव पालखीत मिरविल्याने धर्माची ग्लानी जाणार नाही. गीतेवर कितीही लंबी प्रवचने झोडल्याने धर्म जागा होणार नाही.

पुढे वाचा

विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!

अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ म्हणतात.

तसं म्हटलं तर, मानवाच्या बाबतीत लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध असा अर्थ असू नये. कारण तसे संबंध प्राचीन काळापासून विवाहाशिवायच होत होते आणि आजही होऊ शकतात.

पुढे वाचा

प्रतिकार हे कोतेपणाचे लक्षण नसते!

..आज प्रत्यक्ष हिंदू समाजात सर्वच प्रकारच्या भिन्नत्वाच्या कल्पना प्रभावी आहेत. जातीबद्दलची उच्चनीचत्वाची भावना आहे. पोटजातीबद्दलचा अभिमान आहे व त्याबरोबरच प्रादेशिक व भाषिक भिन्नत्वाच्या कल्पनांचा पूर्ण पगडा आहे.. जोवर प्रत्येक पंथ, जात, गट आपापले वैशिष्टय़ निराळे मानतो व त्याप्रमाणे वागतो तोवर भारतीयतेचा कितीही डांगोरा पिटला, तरी आमचा समाज अनेकविध विभागलेला आणि म्हणून दुर्बळ राहणार. तसेच राष्ट्राभिमानाचा अतिरेक व दुष्परिणाम होतात ते राष्ट्रनिष्ठा या एकाच कल्पनेस फाजील महत्त्व दिल्यामुळे.

व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रदेश, राष्ट्र, खंड, जग ही एक श्रेणी मानता येईल. या श्रेणीतील प्रत्येक घटकाबाबत व्यक्तीचे विशिष्ट कर्तव्य असते.

पुढे वाचा

स्वप्रतिमेच्या प्रेमात काही थोर भारतीय

नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्या अलीकडील भेटीत नरेंद्र मोदींनी घातलेल्या पोषाखाची चर्चा बरीच गाजली. त्यांनी जो सूट परिधान केला होता, त्यावर त्यांच्या नावाच्या नक्षीचे पट्टे होते. त्यावरील टीका अप्रस्तुत नव्हती. त्यांच्या पोषाखात दिखाऊपणा, भोंगळपणा तर होताच; तरीही मोदींचे त्यांच्या पेहरावातून दिसणारे स्वयंप्रेम हे आपल्याकडील किती तरी ताकदवान आणि यशस्वी भारतीय पुरुषांच्या सामाजिक वर्तणुकीचे अनुकरण होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
याचे पहिले उदाहरण भारताच्या सुप्रसिद्ध आणि अनेक सन्मानांनी अलंकृत शास्त्रज्ञ सी.एन.आर.राव यांचे देता येईल. ते जगातील एका प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेचे सदस्य (फेलो) आहेत आणि आपल्या देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना अलीकडेच मिळाला आहे.

पुढे वाचा