विषय «तत्त्वज्ञान»

अध्यात्म की विज्ञान

आधुनिक विज्ञान हे अध्यात्माच्या जवळ चालले आहे असे मत अनेक वेळा प्रदर्शित करण्यात येते; अशा अर्थाची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. परंतु खरोखर अशी वस्तुस्थिती आहे काय याविषयी आज विचार करणे आवश्यक झाले आहे.

अध्यात्मातील काही संकल्पना :अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध! त्याचे प्रयोजन म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे तादात्म्य प्राप्त करणे, व अशा रीतीने मोक्ष मिळविणे. या ध्येयाला मुक्ती प्राप्त करणे, निर्वाणाप्रत जाणे, साक्षात्कार होऊन परमेश्वराची प्राप्ती होणे, अशा विविध प्रकारे व्यक्त करण्यात येते.

पुढे वाचा

विनोबांची ‘गीता प्रवचने’ व ‘स्थितप्रज्ञदर्शन’

‘गीता प्रवचने’ यातील ‘अध्याय पहिला’ या प्रवचनात विनोबा म्हणतात, “तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो.” (गीता प्रवचने, आ. १३, पान १) तर्काला छाटल्यामुळे सत्यशोधन टाळता येते. तर्काला फाटा दिल्यामुळे गीतेतील सर्व प्रतिपादन खरे म्हणून स्वीकारावे लागते, आणि विनोबांनी ते तसे स्वीकारले आहे.

गीता प्रवचनांतील अध्याय २ वरील प्रवचनात विनोबा म्हणतात, “पूर्ण स्थितप्रज्ञ या जगात कोण होऊन गेला ते हरीलाच माहीत”. (गीता प्रवचने, आवृत्ती १३, पान २४) परंतु स्थितप्रज्ञदर्शनामध्ये विनोबा म्हणतात, “बुद्धी कोणाच्या ठिकाणी कमी असो, कोणाच्या ठिकाणी अधिक असो, त्याचे महत्त्व नाही.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता : वस्तुस्थिती आणि विचारवंत

‘आजचा सुधारक’च्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या अंकात धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाशी संबंधित दहा प्रश्न प्रसिद्ध करून त्यावर प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन विचारवंतांना केले होते. वर्षभरातील अंकांतून या प्रतिक्रिया वाचकांसमोर आल्याच आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरचा अंक धर्मनिरपेक्षता विशेषांक म्हणूनच प्रकाशित झाला आहे. त्यानंतरही एक प्रदीर्घ लेख क्रमशः तीन अंकांतून आला आहे. (लेखांक १, लेखांक २, लेखांक ३) आमच्या प्रश्नावलीला प्रतिसाद देणाऱ्या या सर्व अभ्यासकांचे आम्ही आभार मानतो आणि वर्षभर चाललेल्या या चर्चासत्राच्या समारोपादाखल काही मुद्दे नोंदवतो.

प्रश्नावली तयार करीत असताना आज आणि आताच्या समकालीन संदर्भाचा विचार आमच्या मनात प्रामुख्याने होता.

पुढे वाचा

सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर (उत्तरार्थ)

भारतात निर्माण झालेल्या धर्माचे अनुयायी ते सर्व हिंदू, नास्तिक मते बाळगणारेही हिंदू अशा प्रकारची व्याख्या केल्याने व्यवहारातली परिस्थिती बदलत नाही, शीख, बौद्ध, व जैन स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास तयार नाहीत. व्याख्येनुसार हिंदू असूनही आदिवासींना हिंदू धर्माच्या व संस्कृतीच्या तथाकथित मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आवजून राबविला जातोच आहे. प्रा. देशपांडे तर या भेदाभेदांचा हवाला देऊन असेही म्हणतात की, ‘हिंदुराष्ट्र धर्मनिरपेक्ष असणे अपरिहार्य आहे.’ हिंदू सेक्युलरच असतात असे जेव्हा हिंदुत्ववादी नेते म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याला खराखुरा अर्थ असतो.

पुढे वाचा

विवेकवाद -१६

गीतेतील नीतिशास्त्र

तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका आक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच, अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म-किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे?’

पुढे वाचा

मुक्त मानवाची पूजा

[‘A Free Man’s Worship’ हा बरट्रॅंड रसेलच्या अत्युत्प्ट लिखागांपैकी एक निबंध. तो त्याने १९०२ साली म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिला. हा निबंध म्हणजे एक तसदर काव्य हे झार तसेच ते विश्वाचे आणि मानव जीवनाचे अतिशय मार्मिक दर्शनही आहे. हे विश्व निर्हेतुक आहे, निष्प्रयोजन आहे, त्यात मानवाची उत्पत्तीही तशीच अर्थहीन, प्रयोजनहीन आहे, हे विश्व मानवाच्या झाकांक्षाविषयी पूर्णपणे उदासीन आहे – या विज्ञानाच्या निर्णयाच्या संदर्भात मानवाने आपल्या ध्येयांची आदराची उपासना कशी करावी या प्रश्नाला रसेलने दिलेले हे उत्तर, साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवलेल्या एका भाषाप्रभूच्या राज्याचा अनुवाद करणे महाकठीण काम आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ११)

वेश्यावृत्ती जोपर्यंत प्रतिष्ठित स्त्रियांचे पातिव्रत्य ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते तोपर्यंत विवाहसंस्थेला आणखी एका पूरक संस्थेची जोड द्यावी लागते, किंबहुना ही पूरक संस्था विवाहसंस्थेचाच भाग मानावा लागेल. मला अभिप्रेत असलेली संस्था म्हणजे वेश्यासंस्था होय. लेकी ज्या परिच्छेदात वेश्यावृत्ती गृहाच्या पावित्र्याची आणि पत्न्या आणि कन्या यांच्या शुचितेची रक्षक आहे असे म्हणतो तो प्रसिद्ध आहे. त्यात व्यक्त झालेली भावना व्हिक्टोरियाकालीन आहे, आणि तिच्या अभिव्यक्तीची तन्हा जुन्या वळणाची आहे; पण त्यात वणलेली वस्तुस्थिती मात्र नाकारण्यासारखी नाही. नीतिमार्तडांनी लेकीचा धिक्कार केला आहे. कारण त्यांना त्याचा भयानक संताप आला, पण का ते त्यांना सांगता येत नव्हते; आणि त्याचे म्हणणे खोटे आहे हे ते दाखवू शकले नाहीत.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १०)

विवाह
या प्रकरणात मी विवाहाची चर्चा केवळ स्त्रीपुरुषांमधील संबंध या दृष्टीने, म्हणजे अपत्यांचा विचार न करता, करणार आहे. विवाह ही कायदासंमत संस्था आहे हा विवाह आणि अन्य लैंगिक संबंध यांतील भेद आहे. विवाह ही बहुतेक सर्व देशांत एक धार्मिक संस्थाही असते, पण ती कायदेशीर आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आदिम मानवांतच केवळ नव्हे तर वानरांत आणि अन्यही अनेक प्राणिजातीत प्रचलित असलेल्या व्यवहाराचे विवाह ही कायदेशीर संस्था एक रूप आहे. जिथे अपत्यसंगोपनात नराचे सहकार्य आवश्यक असते तिथे प्राण्यांतही विवाहसदृश व्यवहार आढळतो. सामान्यपणे प्राण्यांमधील ‘विवाह’ एकपत्नीक-एकपतिक असे असतात, आणि काही अधिकारी अभ्यासकांच्या मते मानवसदृश वानरांमध्ये (anthropoid apes) ते विशेषत्वाने आढळतात.

पुढे वाचा

विवेकवाद – १०

स्वामी धर्मव्रत यांच्या पत्रास उत्तर

याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारकच्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ९)

मानवी जीवनात प्रेमाचे स्थान
बहुतेक सर्व समाजांची प्रेमविषयक अभिवृत्ती (attitude) दुहेरी राहिली आहे. एका बाजूला प्रेम काव्य, कादंबरी आणि नाटक यांचा प्रमुख विषय आहे; आणि दुसऱ्या बाजूला बहुतेक समाजशास्त्रज्ञांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असते, आणि आर्थिक किंवा सामाजिक सुधारणांच्या योजनांत प्रेमाचा समावेश अभीष्ट उद्देशात केला जात नाही. मला ही अभिवृत्ती समर्थनीय वाटत नाही. प्रेम ही मानवी जीवनातील अति महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे असे मी मानतो, आणि ज्या व्यवस्थेत प्रेमाच्या अनिरुद्ध विकासात विनाकारण अडथळे आणले जातात ती व्यवस्था वाईट असे मी समजतो.

जेव्हा ‘प्रेम’ हा शब्द उचितार्थाने वापरला जातो तेव्हा त्याने स्त्री आणि परुष यांच्यामधील यच्चयावत संबंध निर्दिष्ट होत नाहीत.

पुढे वाचा