विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

पुस्तक परिचय – अप अगेन्स्ट डार्कनेस

मूळ लेखिका – मेधा देशमुख भास्करन
भाषांतर – फिटे अंधाराचे जाळे – सुनंदा सदाशिव अमरापूरकर 

वेश्यांबद्दल सामान्य माणसाच्या भावना संमिश्र असतात. कुतूहल, घृणा आणि करुणा असे एक रसायन त्याच्या मनात असते. घरांमध्ये वेश्यांचा विषय काढला जात नाही. बायका वेश्यांबद्दल बोलणे टाळतात, पुरुष बोलले तर त्यांचा उल्लेख “रांडा” असे तुच्छतादर्शक करतात. पण एखादा माणूस कुतूहल आणि घृणेच्या पार पलीकडे जातो आणि अथांग करुणेने वेश्यांच्या प्रश्नाला भिडतो. त्याच्या जिद्दीने, परिश्रमाने आणि धैर्याने अनेकजण त्याच्या कार्यात सहभागी होतात आणि तो संस्था उभारून आपल्या कार्याला स्थायी रूप आणतो.

पुढे वाचा

पुस्तक परिचय – मढवून ठेवलेल्या समाजव्यवस्थेला सुरुंग लावणारे शरणकुमारांचे ‘अक्करमाशी’

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव : अक्करमाशी
लेखक : शरणकुमार लिंबाळे
प्रकाशक : दिलिपराज प्रकाशन

आपल्याकडील समाजव्यवस्थेत, कुटुंबव्यवस्थेत सोज्वळतेचे रूप दिसते. ह्या व्यवस्थांमधील परंपरांच्या कप्प्यांमध्ये माणूस जगत असतो. वरून दिसणारी सोज्वळता आतून कितीही पोखरलेली असली, तरी ती दुर्लक्षून दिखाऊपणाचे तेज कायम टिकवून ठेवले जाते. ही नटवी व्यवस्था खिळखिळी कशी झालेली असते ते ‘अक्करमाशी’ ह्या आपल्या आत्मकथनात शरणकुमार लिंबाळेंनी दाखवून दिले आहे. समाजाने ठरविलेल्या नैतिक-अनैतिकतेच्या, शुद्ध-अशुद्धतेच्या मोजपट्ट्या मानवी जीवनात कशा नकली ठरतात हे दाखवून देऊन केवळ माणूस शिल्लक राहतो हे ‘अक्करमाशी’त आपणास पाहायला मिळते.

पुढे वाचा

नरकात फुललेल्या स्वर्गीय प्रेमाची शोकान्त कहाणी

देवानारचा डोंगर आणि फर्झाना

पुस्तक परिचय
लेखिका – सौम्या रॉय
भाषांतर – छाया दातार
पाने – २३०
किंमत – २९० रुपये

‘देवनारचा डोंगर आणि फर्झाना’ हे एक विलक्षण पुस्तक आहे. ही एक भयकथा आहे, पण ही काल्पनिक नाही, तर वास्तव आहे आणि हे वास्तव जळजळीत आहे. 

देवनार हा मुंबईतलाच विभाग आहे. मध्य-मुंबईपासून अगदी जवळ असलेला. पण सुखवस्तू मुंबईकराला देवनार म्हणजे देवनार कत्तलखाना आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड ह्या दोनच गोष्टींची थोडीफार माहिती असते, आणि ती पण पेपरमध्ये अधूनमधून येणाऱ्या तुरळक बातम्या वाचून.

पुढे वाचा

गतानुगतिक निबद्धता आणि ‘असहमती’च्या निमित्ताने

१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि १९५० साली भारतीय संविधान अंमलात आले. भारतीय समाजाला नवसमाज निर्मितीच्या दृष्टीने एक नवे भान या दोनही घटनांनी बहाल केले. याच भानातून देश एक राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. याच पार्श्वभूमीवर नंतरच्या काळात देशाने स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला होता. पण, कोणाला माहीत होते या देशाचा पुढील इतिहास कसा लिहिला जाणार आहे ते? स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानंतरचा एकूणच कालखंड हा देशाच्या पुढच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला! 

– १ –

१९७४ साली मे महिन्यात देशातील रेल्वे कामगारांचा वीस दिवसाचा संप झाला होता.

पुढे वाचा

पुस्तक परिचय – सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी

लेखक: माधव गाडगीळ
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला होता. पण तरीही त्यांचे हे पुस्तक वाचल्यावर मला माधव गाडगीळ ही काय असामी आहे हे खऱ्या अर्थाने कळले. 

या माणसाने निसर्गावर प्रेम केले. सर्व प्राणी, वनस्पती, किडे, भुंगे – सर्व कीटक, दगड, धोंडे, पर्वत, नद्या, समुद्र, त्यातले मासे, हत्ती, वाघ, सिंह, एवढेच काय इथल्या शेवाळ्यावरही याने प्रेम केले!

पुढे वाचा

परीक्षण – पेशींचे गाणे

Book: The Song of The Cells: An Exploration of Medicine and the New Human
Siddhartha Mukherjee, Imprint: India Allen Lane, October 2022

‘पेशींचे गाणे’ ह्या आपल्या नव्या पुस्तकात प्रसिद्ध लेखक आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी म्हणतात, “आपण म्हणजे आपल्या शरीरात नांदणारी पेशींची संस्कृती!” पुस्तकाचे शीर्षक आणि पुस्तकाबद्दल लेखकाच्या दिल्लीत झालेल्या वार्तालापाचे वृत्त वाचले, तेव्हा पुस्तक वाचलेच पाहिजे असे वाटले. गंमत म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला माझ्याच शरीरातले पेशींचे गाणे ऐकू यायला लागले, थोडेसे समजायला लागले. आपले शहर जसे बहुविध नागरिकांमुळे तयार होते, तसेच आपले शरीर म्हणजे आपली बहुविध पेशींनी तयार होणार संस्कृती हे लेखकाने वापरलेले रूपक मला एक आर्किटेक्ट आणि नगरविज्ञान विषयाची अभ्यासक म्हणून विशेष भावले.

पुढे वाचा

परीक्षण – निर्वासित

मूळ पुस्तक : निर्वासित (आत्मकथन), लेखक : उषा रामवाणी,  
उषःकाल पब्लिकेशन, मुंबई १ जून २०२३

निर्वासित म्हणून ओळखले जाणारे सिंधी लोक महाराष्ट्रातील गावागावातून व्यापारी म्हणून स्थिरावले. पण त्या समाजातील मान्यतांपेक्षा निराळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या मुलीला आईवडिलांच्याच घरात निर्वासित असल्यासारखे वाटले. अशा उपेक्षित मुलीचा संघर्ष किती तीव्र असेल? उषा रामवाणी यांच्या ‘निर्वासित’ या आत्मकथनातून त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड, मायेचा ओलावा मिळण्यासाठी आसुसलेले हळवे मन दिसते. अर्थार्जनासाठी खडतर वाटचाल त्यांनी केली. अथक प्रयत्न केले. मराठी भाषेवर केवळ प्रभुत्व नव्हे तर प्रेम असणाऱ्या या तडफदार स्त्रीची संघर्षगाथा वाचनीय तर आहेच पण डोळ्यात अंजन घालणारीही आहे. 

पुढे वाचा

द मॅजिशियन – पुस्तक परिचय

कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या अंतरंगात शिरून ते वाचकांना उलगडून दाखवावे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.

मान जर्मनीमध्ये जन्मला. वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर.

पुढे वाचा

हमरस्ता नाकारताना : पारदर्शी जगण्याचे धैर्य

अलीकडेच सरिता आवाड यांचं ‘हमरस्ता नाकारताना’ (राजहंस प्रकाशन) हे आत्मकथन वाचलं. २८६ पानांचं हे पुस्तक अगदी प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे, हे पानोपानी जाणवत राहतं. कसलीही भीती न बाळगता, काहीही न लपवता यात आयुष्यातील अनेक घटना लेखिकेने तंतोतंत, मोकळ्या मनाने सांगितलेल्या आहेत. चरित्रलेखिका सुमती देवस्थळे यांची सरिता ही मुलगी. लहानपणापासूनच संवेदनशील, बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांची. चाकोरी सोडून वेगळ्या वाटा चोखाळण्याची आकांक्षा असलेली. चळवळींमध्ये भाग घेणारी, त्यांत रमणारी आणि त्यामुळेच पुरोगामी विचार अंगिकारून स्वतःचे आंतरजातीय लग्न ठरवल्यामुळे वेळोवेळी घरच्यांकडून दुखावली जाणारी, विचारी व समंजस वागूनही जवळच्यांकडून वागणुकीतले परकेपण मिळणारी.

पुढे वाचा

श्रद्धांजली : अनिल पाटील सुर्डीकर

गावगाडा- शतकानंतर – अनिल पाटील सुर्डीकर

दशावतारांच्या गोष्टींपैकी वामनाची गोष्ट मला नेहेमीच अस्वस्थ करत आली आहे. एरवी देव पाप्यांना शिक्षा देतो, तर बळीचं पापच मला दिसत नाही. एरवी देव दुर्बलांचा घात करतो. हो;
घोडा नको, हत्ती नको, वाघ तर नको रे बाबा
बकरीच्या पोराचा बळी दे,
असा देव दुर्बलांचा घात करतो!
वामन मात्र बळीचा दडपून वर टर्रेबाजी करतो! आणि बळीही हसतखेळत वामनाला झेलून आपले महत्त्व अबाधित ठेवतो. एक वर्षारंभ आपल्या नावाशी जोडून घेतो. इडा-पिडा टळून आपले राज्य येवो, अशी प्रार्थना लोकांना करायला लावतो.

पुढे वाचा