विषय «विज्ञान»

कोरोना व्हायरसच्या महासाथीबद्दल काही – नर्मदा खरे

आम्ही ऐकलंय की जीवाणू सगळीकडे असतात: शरीरात, हवेत, पाण्यात. मग कोरोना व्हायरसही सगळीकडेच असणार, नाही का?

  • पहिले तर, कोरोना हा विषाणू (virus) आहे, जीवाणू (bacteria) नाही. 
  • जीवाणू हे एकपेशीय, सूक्ष्मदर्शी जीव आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे असून पृथ्वीतलावर जवळजवळ सगळीकडे (गरम झरे, खारट पाणी, अत्यंत थंड किंवा गरम प्रदेश) सापडतात.
  • काही जीवाणू माणसाच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहतात. त्यांच्यापैकी अगदीच थोडे प्रकार माणसाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ: पटकी (Cholera), क्षय रोग (TB), विषमज्वर (typhoid), मेनिन्जायटिस वगैरे.
  • विषाणू हे जीवाणूंपेक्षाही अनेक पटींनी सूक्ष्म असतात.
पुढे वाचा

कोरोनानंतरचे जग – स्वैर अनुवाद – यशवंत मराठे

Original Article Link
https://amp.ft.com/content/19d90308-6858-11ea-a3c9-1fe6fedcca75
Yuvan Harari is the author of ‘Sapiens’, ‘Homo Deus’ and ‘21 Lessons for the 21st Century’

मानवजात एका जागतिक संकटाला सामोरी जात आहे. कदाचित आपल्या हयातीतील हे सर्वात मोठे संकट असेल. येत्या काही आठवड्यांत लोकांनी आणि सरकारांनी घेतलेले निर्णय, पुढील काळात जगाला कलाटणी देणारे किंवा बदल घडवून आणणारे ठरतील. त्याचा प्रभाव केवळ आरोग्यव्यवस्थेवरच नव्हे तर आपली अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती यांवरदेखील पडेल. त्यामुळे आपल्याला त्वरेने आणि निर्णायकरित्या पावले उचलली पाहिजेत. मात्र त्याचवेळी, आपल्या कृतींचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणामदेखील विचारांत घेणे आवश्यक आहे.

पुढे वाचा

या मार्गानेच जाऊ या – डॉ. शंतनू अभ्यंकर

करोनाने सगळ्यांना दुग्ध्यात पाडले आहे. विशेषतः आरोग्यकर्मींना.

नवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या त्या देशाला त्या त्या देशीच्या देशी औषधांचा अभिमान आहे. तेंव्हा आपलंच खरं असं सांगायची एक चढाओढ लागली आहे.

आमच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथापरंपरा, जडीबुटीची जादुई दवा, आता आपली कमाल दाखवेल, असे दावे जगभरात केले जात आहेत.

चिन्यांनी नेहमीप्रमाणे इथेही आघाडी घेतली आहे. प्राचीन चिनी उपचार कसे ‘बेश्ट’ आहेत हे ते सांगत आहेत. त्यांच्या सरकारचाही त्यांना पाठिंबा आहे.

पुढे वाचा

विषाणूंच्या अगम्य गमती – आशिष महाबळ

२०१९च्या डिसेंबरच्या शेवटी पहिल्यांदा सापडलेल्या इवल्याशा एका विषाणूने मानवजातीच्या नाकी नऊ आणले आहेत. तो चीन देशातील वुहान प्रांतातील wet market मध्ये कसा सापडला येथपासून ते सोशल डिस्टंसिंग का आणि कसे करायचे ते आता सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे कोणाचे कोणते निर्णय चुकले आणि कोणाचे कोणते आडाखे आणि कोणती भाकीते चुकू शकतात याचीपण आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये मी खगोलशास्त्राच्या डेटाव्यतिरीक्त कॅन्सर आणि इतर वैद्यकीय डेटा याचे ज्ञानात रूपांतर करण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. साहजिकच या नव्या संकटाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलायचा माझाही प्रयत्न सुरु झाला.

पुढे वाचा

COVID-19 विषयी

साधारण नोव्हेंबर २०१९ पासून मार्च २०२० पर्यंत म्हणजे फक्त साडेचार-पाच महिन्यांत संपूर्ण जगामधील मानवी आयुष्य एका छोट्याशा विषाणूने विस्कळीत केले आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या साधारण हजारपट लहान, इतक्या छोट्या असलेल्या या विषाणूमुळे आपले रोजचे सामाजिक, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आज मार्च २०२० महिन्याच्या शेवटी संपूर्ण जग फक्त या विषाणूची लागण कशी थांबवता येईल आणि ते करताना आपल्या मूलभूत जीवनावश्यक गरजा कशा भागवता येतील हे सोडून इतर काहीही विचार करू शकत नाही आहे. Corona/SARS-CoV2/COVID-19 अशा विविध नावांनी आज कुप्रसिद्ध झालेला हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, या विषाणूमुळे पुढे नेमके काय काय होईल आणि यावर उपाय कधी येणार असे अनेक प्रश्न पडलेले आहेत.

पुढे वाचा

घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच

इंदौरच्या `नई दुनिया’ दैनिकामध्ये २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित सोपान जोशी ह्यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद

अगदी सामान्य भारतीय नागरिकापासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच पाण्याविषयी एक महत्त्वाचे तथ्य माहिती आहे – पाणी निर्माण करता येत नाही. आधुनिक विज्ञानाने आज कल्पनातीत प्रगती केली आहे. रेणू ज्यापासून बनलेला असतो त्या सूक्ष्म अणूला भेदून त्यातील ऊर्जादेखील आपण काढू शकतो. अनेक नवनवीन रसायनांचा शोध तर लागलेला आहे, निसर्गात न आढळणारी मूलद्रव्येसुद्धा प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहेत. आणि तरीही, पाण्याची निर्मिती काही आपण करू शकत नाही.

पाण्याचे रासायनिक सूत्र अगदी मुलांनासुद्धा ठाऊक आहे.

पुढे वाचा

विनोबा विचार

मिलिंद बोकील ह्यांनी २००३ साली ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना.

डॉ. जयंतराव पाटील यांनी विनोबांच्या या लेखसंग्रहाचे संकलन करून प्रस्तावना लिहिण्याचे काम मला जेव्हा सांगितले तेव्हा आयुष्यात पूर्वी कधीही नाही इतका प्रचंड संकोच वाटला. मन अतिशय दडपल्यासारखे झाले. संकलन करण्याचे काम अवघड नव्हते, पण प्रस्तावना लिहिणे? त्या कामाला आपण पात्र नाही एवढे आत्मज्ञान मला जरूर होते. अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर विनोबांसारख्या महात्म्याच्या लेखांची ओळख माझ्यासारख्याने करून देणे म्हणजे सूर्याला काजव्याने ओवाळण्यासारखे होय. पण डॉ. पाटील यांनी सांगितले की सध्याच्या पिढीतील एका माणसाला विनोबांबद्दल काय वाटते ते कळण्यासाठी हे काम तू करायला हवेस.

पुढे वाचा

जगण्याचे वियाग्रीकरण : जगाची नवी ओळख

“प्रिय आईबाबा आणि माझ्या बंधूंनो,

इथे फार कठीण दिवस आले आहेत, आणि मी जवळपास दर आठवड्याला तुम्हांला पत्र का लिहितोय, हे तुम्हांला समजत असेलच. आज मी तुम्हांला लिहीत आहे ते मुख्यतः आणखी काही पेर्वीटीन गोळ्यांसाठी…..”

तुमचा आवडता
हेन

तो दिवस होता ९ नोव्हेंबर १९३९. नाझीव्याप्त पोलंडमध्ये २२ वर्षांचा एक तरुण जर्मन सैनिक आपल्या आईवडिलांना पत्र लिहीत होता. २० मे १९४०ला त्याने पुन्हा आईवडिलांना लिहीले:

“रसद म्हणून तुम्ही आणखी काही पेर्वीटीन गोळ्या पाठवाल, अशी आशा वाटते.”

त्यानंतर १९ जुलै १९४० रोजी त्याने आणखी एक पत्र लिहिले,

“जर शक्य असेल तर आणखी काही पेर्वीटीनपाठवा, प्लीज.”

पुढे वाचा

नैसर्गिक आणि अनैसर्गिक

नैसर्गिक आणि रसायनमुक्त (chemical-free) म्हणजे चांगले असा एक सर्वसाधारण समज आहे. या शब्दांचा अर्थ काय याचा विचार मात्र क्वचितच केला जातो. साधारणतः कारखान्यात बनलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिकपणे अस्तित्वात असलेले साहित्य वापरून बनवलेले खाद्यपदार्थ/ जिन्नस म्हणजे नैसर्गिक किंवा रसायनमुक्त आणि म्हणून हेच चांगले असे मानले जाते. खरे तर दहावीपर्यंत शाळा शिकलेल्या कोणालाही हे लक्षात यावे की रसायनमुक्त असे काहीच असू शकत नाही, कारण सर्वच सजीव (प्राणी/ वनस्पती/ सूक्ष्मजीव) आणि निर्जीव वस्तू ह्या मुळात वेगवेगळ्या रसायनांपासूनच बनलेल्या असतात. या सर्वांमध्येच वेगवेगळी मूलतत्त्वे (chemical elements) म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, सोडियम इत्यादी असतात.

पुढे वाचा

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस हे वाचल्यावर ‘श्वा, युवा, मघवा’ची आठवण होते ना? यातल्या दुसऱ्या त्रिकूटाला व्याकरणाच्या नियमांनी एकत्र आणले, तर पहिल्या त्रिकूटाला खोट्या माहितीने (disinformation) एकत्र आणले.

मेकॉलेने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय शिक्षणधोरणाविषयी केलेल्या एका भाषणाचा व्हायरस कोणीतरी मराठीलिखित माध्यमामध्ये सोडून दिला. ह्या तथाकथित भाषणाचा सारांश असा : ब्रिटिश राज्य येण्यापूर्वीची भारतीय शिक्षणपद्धती उत्तम आहे. त्यामुळे भारतीय माणूस नीतिमान, स्वाभिमानी, लाच-लुचपतीस बळी न पडणारा झाला आहे. कोणीही भीक मागत नाही. त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीला भारतात स्थिरावण्यासाठी भारतातील मूळ शिक्षणव्यवस्था मोडून काढून, कारकून बनवणारी, गुलाम वृत्ती जोपासणारी नवी शिक्षणव्यवस्था बनवावी लागेल.

पुढे वाचा