विषय «विवेकवाद»

परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद (उत्तरार्ध)

(७) विवेकनिष्ठेचा सांभाळ
पण हा विषय एवढ्यावरच सोडून द्यावा असे मला वाटत नाही. विवेकनिष्ठा मला प्रिय आहे आणि राष्ट्रवादही. म्हणून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एक उपाय सुचतो तो सांगतो.

विवेकनिष्ठा आदर्श समाजाचा आधार म्हणून इष्ट तर आहेच, पण एकूण विचार करता राष्ट्रवादालाही पोषक आहे. कारण राष्ट्रवादाला संघटनेच्या आड येणारे समाजाचे दोषही दूर करायचे असतात. हे दोष परंपरेतून, इतिहासातून निर्माण झालेले असतात. त्यांची नीट चिकित्सा झाली पाहिजे; कारण चिकित्सा झाल्याशिवाय त्यांच्यावर उपाययोजना करता येत नाही. पण आवाहनात्मक, स्फूर्तिकारक मांडणी करताना गटाच्या दौर्बल्यांचे विश्लेषण करणे टाळले जाते आणि त्याची उभारणी निरोगी पायावर होत नाही.

पुढे वाचा

धर्म आणि विवेकवाद -प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर

आजचा सुधारकच्या जुलै आणि चालू अंकात डॉ. स.ह. देशपांडे यांचा ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा उत्तरार्ध (या अंकात प्रसिद्ध झालेला) पूर्णपणे मला उद्देशून लिहिला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ईश्वर ही कल्पना मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणे शक्य दिसत नाही. मी या प्रश्नाशी नीट भिडत नाही. माझी उत्तरे मूळ मुद्दा सोडून असतात. मनुष्य जगात एकटा असून त्याला आधाराला ईश्वर लागतो या मुद्याचा प्रतिवाद मी केला तरी तो उपयुक्त होईल. एरव्ही ईश्वर आणि धर्म यांच्या समाजजीवनावरील प्रभावाचा मी पुरेसा विचार करीत नाही असा आरोप मला पत्करावा लागेल.

पुढे वाचा

विवेकासाठी चळवळ हवी!

व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सुख-शांतीचे व्हावयाचे असेल तर त्यासाठी विवेकाच्या संगोपन-संवर्धनाची नितान्त आवश्यकता आहे. बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि विवेक या संकल्पना परस्परांच्या फार जवळ आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आणि बुद्धिप्रामाण्य यांना सोडून विवेक असू शकणार नाही आणि विवेक नसेल तर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य असू शकणार नाहीत. विवेक ही अधिक व्यापक अशी जीवनसंवर्धक संकल्पना आहे. विवेकाची सविस्तर चर्चा केल्यास बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, reason, श्रद्धा, अंधश्रद्धा इत्यादी सर्व विषयांचा ऊहापोह होऊन जाईल.

सृष्टीतील अचेतन आणि सचेतन अशा सर्व वस्तूंना निश्चित गुणधर्म असतात. अचेतन वस्तूंमध्ये स्वतःच्या अंगचे चैतन्य नसते तर सचेतन वस्तूंमध्ये (वनस्पती आणि प्राणी) अंगभूत चैतन्य असते.

पुढे वाचा

कालचे सुधारक- आधुनिक कामशास्त्राचे प्रणेते : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग २)

खटल्यात सरकारतर्फे साक्षीदार म्हणून आहिताग्नी राजवाडे उभे राहिले. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘धिमाधवविलासचंपू’मध्ये पूर्वी अविवाहित स्त्रियांना मुले होत असे विधान केले खरे, परंतु ते त्यांचे एक तऱ्हेवाईक मत आहे अशी मखलाशी आहिताग्नींनी केली. कर्व्यांच्या बाजूने रियासतकार सरदेसायांची साक्ष झाली. आक्षिप्त लेख शास्त्रीय दृष्टीने लिहिला आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. न्यायालयाने मात्र तो मानला नाही. कर्व्यांना दोषी ठरवून १०० रु. दंड केला. ही घटना एप्रिल १९३२ मधली.. या निकालासंबंधी ‘दोन शब्द’ या लेखात कर्वे म्हणतात, ‘आमचे चुकीमुळे शिक्षा झाली नसून मॅजिस्ट्रेटला आमची मते पसंत नसल्यामुळे झाली.

पुढे वाचा

प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद!

गीतेवरील माझ्या लेखावर प्रा. श्री. गो. काशीकर यांनी घेतलेल्या आरोपांना मी जे उत्तर दिले ते त्यांना पटले नसून त्यांनी आता नवविवेकवादाची गरज आहे’ या शीर्षकाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. हे प्रत्युत्तर या अंकात अन्यत्र छापले असून त्याबद्दलची माझी भूमिका येथे देत आहे.
प्रथम मी प्रा.काशीकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले आणि माझा एक गैरसमज दूर केला. माझी अशी समजूत होती (आणि अजूनही बर्या च प्रमाणात आहे) की विश्वाची उत्पत्ती हा विषय वैज्ञानिक पद्धतीच्या आटोक्यात नाही. काही वैज्ञानिक विश्वरचनेच्या (cosmology) क्षेत्रात काम करीत आहेत हे मला माहीत होते.

पुढे वाचा

आता नवविवेकवादाची गरज आहे

‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.
ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान मोक्षशास्त्रालाही बुद्धीच्या आवाक्यात आणीत आहे याची उदाहरणे मी दिली आहेत. हा प्रयत्न पुरेसा निर्णायक होईपर्यंत मोक्षशास्त्राबद्दल पूर्णविश्वास किंवा पूर्ण अविश्वास व्यक्त न करणे हेच विवेकवादाशी सुसंगत होईल असे मी म्हटले आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – २०

नीतीचा आणखी थोडा विचार
या लेखमालेत नीतीचा विचार अनेक लेखांकांत आला आहे. विवेकवाद – ९, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (जाने. ९१), विवेकवाद -१२ व १३, ‘उपयोगितावाद, १ व २’ (मे, जून १९९१), विवेकवाद – १८, नैतिक मूल्यांविषयी
आणखी थोडेसे (डिसेंबर ९१)- हे ते लेखांक.
या लेखांकांत जे विवेचन आले आहे त्याच्याविषयी अनेक वाचकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे नीतीच्या काही कल्पनांचे थोडे विस्ताराने विवेचन झाल्यास बरे होईल असे वाटते.
विवेकवादाचे विवेचन करताना विवेकाचे कार्य ज्ञान आणि कर्म या दोन क्षेत्रांत काय आहे याचा विचार आपल्याला करावा लागला.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १८)

मानवी मूल्यांत कामप्रेरणेचे स्थान
कामप्रेरणेविषयी लिहिणार्‍या लेखकांवर, या विषयाची वाच्यता करू नये असे मानणार्‍या लोकांकडून, त्याला ह्या विषयाचा ध्यास लागलेला आहे असा आरोप होण्याची भीती नेहमीच असते. या विषयात त्याला वाटणारा रस त्याच्या महत्त्वाच्या तुलनेत प्रमाणाबाहेर असल्यावाचून फाजील सोवळया लोकांकडून होणारी टीका तो आपल्यावर ओढवून घेणार नाही असे मानले जाते. परंतु ही भूमिका रूढ नीतीत बदल केले जावेत असे म्हणणाऱ्या लोकांच्या बाबतीतच घेतली जाते. जे वेश्यांच्या छळाला उत्तेजन देतात, आणि जे नावाला गोऱ्या गुलामांच्या व्यापाराविरुद्ध असलेले, पण वस्तुतः ऐच्छिक आणि स्वच्छ विवाहबाह्य संबंधांविरुद्ध असलेले, कायदे घडवून आणतात; जे आखूड झगे घालणार्‍या आणि लिपस्टिक लावणार्‍या स्त्रियांचा निषेध करतात, आणि जे अपुर्‍या वस्त्रांत पोहणार्‍या स्त्रियांचा शोध घेत समुद्रकिनारे धुंडाळत असतात, त्यांना मात्र लैंगिक ध्यास आहे असे कोणी म्हणत नाही.

पुढे वाचा

विवेकवाद – १९

गीतेतील नीतिशास्त्र – आक्षेपांना उत्तरे

‘गीतेतील नीतिशास्त्र’ या माझ्या लेखावर आमचे अनेक मित्र नाराज झाले आहेत. त्यांपैकी प्रा. सुधाकर देशपांडे आणि प्रा. देवदत्त दाभोलकर यांची पत्रे जानेवारी १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली असून प्रा. श्री. गो. काशीकर यांचा लेख या अंकात अन्यत्र छापला आहे. प्रा. सुधाकर देशपांडे यांनी माझ्यावर सत्यशोधकाचा नि:पक्षपातीपणा सोडून वकिली बाणा स्वीकारल्याचा आरोप केला आहे, प्रा. काशीकर यांनी हे विवेचन विवेकवादी नव्हे असा सरळ निर्णय दिला आहे; आणि प्रा. दाभोलकर यांनी मला विनोबा भाव्यांचे ‘स्थितप्रज्ञदर्शन’ हे पुस्तक वाचण्याची आणि त्याला त्याच तोलाचे उत्तर देण्याची शिक्षा फर्मावली आहे.

पुढे वाचा

हे विवेकवादी विवेचन नव्हे !

प्रा. दि. य. देशपांडे यांचे ‘गीतेतील नीतिशास्त्र ह्या शीर्षकाखाली दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत त्यांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर प्रखर टीका केली आहे. गीतेवर ह्यापेक्षाही प्रखर टीका इतरांनी केलेली आहे. सत्यान्वेषणाच्या दृष्टीने केलेली कोणतीही टीका स्वागताईच ठरावी; कारण त्यातून सत्य अधिकाधिक स्पष्ट होण्याला मदत होते. तेव्हा टीका कोणत्या दृष्टीने केली हे महत्त्वाचे ठरते.

गीतेतील तत्त्वज्ञानाचे आपण ‘विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करीत आहोत असे प्रा. देशपांडे म्हणतात. ह्या क्षेत्रांतील त्यांचा अधिकार मान्य करूनही त्यांचे प्रस्तुत परीक्षण विवेकवादाला धरून नाही असे नम्रपणे सुचवावेसे वाटते….

गीता हे मुख्यतः मोक्षशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र आहे हे प्रा.

पुढे वाचा