गोमांस, पोर्क, गांधी, सावरकर, जिना
—————————————————————————
गोमांस ह्या सध्याच्या वादग्रस्त प्रश्नाशी संबंधित इतिहासाची काही महत्त्वाची पाने कोणत्याही टिप्पणीविना उलगडून दाखवत आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक तरुण अभ्यासक
——————————————————————–
प्रकरण 1: 10 डिसेंबर 2015 जागतिक मानवाधिकारदिनी तेलंगणातील ओस्मानिया विद्यापीठाचा परिसर युद्धभूमी बनला होता. निमित्त होते गोमांस विरुद्ध वराहमांस विवाद. गोमांसबंदी व त्यासंदर्भात देशभर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक कल्चरल फोरम या डाव्या विचारांच्या विद्यार्थीसंघटनेने उच्च न्यायालयाच्या स्थगितीला न जुमानता विद्यापीठपरिसरात गोमांसउत्सव साजरा करण्याचे ठरविले. यास प्रतिक्रिया म्हणून ओ.यु.जॅाईंट अॅक्शन कमिटी या दुसऱ्या संघटनेने वराहमांस उत्सवाचे आयोजन करण्याचे जाहीर केले.
विषय «जीवनशैली»
दस्तावेज: स्वामी विवेकानंद ह्यांचे मित्रास पत्र
विवेकानंद, हिंदूधर्म, इस्लाम
—————————————————————————
माझ्या प्रिय मित्रा,
मला तुम्ही पाठवलेले पत्र अतिशय भावले आणि आपल्या मातृभूमीसाठी ईश्वर शांतपणे किती अद्भुत गोष्टी रचतो आहे हे कळल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. आपण त्याला वेदान्त म्हणा किंवा अन्य कोणतेही नाव द्या, पण सत्य हे आहे की धर्म आणि चिंतनाच्या क्षेत्रातील अखेरचा शब्द आणि ज्या स्थानावरून आपणास सर्व धर्म व पंथांचे प्रेमाने अवलोकन करता येईल त्याचे नाव आहे अद्वैतवाद. मला विश्वास आहे की भविष्यातील प्रबुद्ध मानवतेचा धर्म हाच असेल. हिब्रू आणि अरबांच्या पूर्वीचा वंश असल्यामुळे हिंदूंना ह्या मुक्कामावर इतरांपूर्वी पोहचण्याचे श्रेय घेता येऊ शकेल; परंतु वास्तवातील अद्वैतवाद, जो सर्व मानवजातीला स्वतःच्या आत्म्याप्रमाणे बघतो व तसा आचारही करतो, सर्व हिंदूंमध्ये कधीही प्रस्थापित झाला नाही.
धर्म समाजस्थैर्यासाठीच आहे
”परधर्माच्या लोकांनी आमच्या धर्माच्या लोकांस आपल्या धर्मात घेतले म्हणजे आमच्या धर्मगुरूंची छाती दु:खाने फाटून जाते! लोकांनी धर्मातर करू नये म्हणून ते गीतेतील तत्त्वज्ञान दाखवतील, वेदांतील सुरस काव्य पुढे करतील, उपनिषदांतील गहन विषय सांगतील, पण धर्माच्या नावाखाली धर्माचाच घात करणाऱ्यांची कानउघाडणी त्यांच्या हातून होणार नाही. असे तर हे धर्ममरतड! असे तर हे धर्मगुरू! आणि असे तर हे शंकराचार्य! बसल्या बसल्या नाटकाप्रमाणे वेदांचे भाषांतर केल्याने धर्माची सुधारणा होणार नाही. गावोगाव पालखीत मिरविल्याने धर्माची ग्लानी जाणार नाही. गीतेवर कितीही लंबी प्रवचने झोडल्याने धर्म जागा होणार नाही.
विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!
अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ म्हणतात.
तसं म्हटलं तर, मानवाच्या बाबतीत लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध असा अर्थ असू नये. कारण तसे संबंध प्राचीन काळापासून विवाहाशिवायच होत होते आणि आजही होऊ शकतात.
प्रतिकार हे कोतेपणाचे लक्षण नसते!
..आज प्रत्यक्ष हिंदू समाजात सर्वच प्रकारच्या भिन्नत्वाच्या कल्पना प्रभावी आहेत. जातीबद्दलची उच्चनीचत्वाची भावना आहे. पोटजातीबद्दलचा अभिमान आहे व त्याबरोबरच प्रादेशिक व भाषिक भिन्नत्वाच्या कल्पनांचा पूर्ण पगडा आहे.. जोवर प्रत्येक पंथ, जात, गट आपापले वैशिष्टय़ निराळे मानतो व त्याप्रमाणे वागतो तोवर भारतीयतेचा कितीही डांगोरा पिटला, तरी आमचा समाज अनेकविध विभागलेला आणि म्हणून दुर्बळ राहणार. तसेच राष्ट्राभिमानाचा अतिरेक व दुष्परिणाम होतात ते राष्ट्रनिष्ठा या एकाच कल्पनेस फाजील महत्त्व दिल्यामुळे.
व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रदेश, राष्ट्र, खंड, जग ही एक श्रेणी मानता येईल. या श्रेणीतील प्रत्येक घटकाबाबत व्यक्तीचे विशिष्ट कर्तव्य असते.
स्वप्रतिमेच्या प्रेमात काही थोर भारतीय
नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्या अलीकडील भेटीत नरेंद्र मोदींनी घातलेल्या पोषाखाची चर्चा बरीच गाजली. त्यांनी जो सूट परिधान केला होता, त्यावर त्यांच्या नावाच्या नक्षीचे पट्टे होते. त्यावरील टीका अप्रस्तुत नव्हती. त्यांच्या पोषाखात दिखाऊपणा, भोंगळपणा तर होताच; तरीही मोदींचे त्यांच्या पेहरावातून दिसणारे स्वयंप्रेम हे आपल्याकडील किती तरी ताकदवान आणि यशस्वी भारतीय पुरुषांच्या सामाजिक वर्तणुकीचे अनुकरण होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
याचे पहिले उदाहरण भारताच्या सुप्रसिद्ध आणि अनेक सन्मानांनी अलंकृत शास्त्रज्ञ सी.एन.आर.राव यांचे देता येईल. ते जगातील एका प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेचे सदस्य (फेलो) आहेत आणि आपल्या देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना अलीकडेच मिळाला आहे.
आजचं भारतीय तारुण्य नेमकं आहे कसं?
‘भारत हा तरुणांचा देश आहे’, हे घिसंपिटं वाक्य ऐकून आपण पुरते कंटाळलो आहोत. इथं घरात चॅनल बदलण्याची सत्ता नाही, त्यासाठी बंड पुकारावं लागतं आणि या देशातली व्यवस्था, समाज, तरुण बदलतील अशी भाषणं केली जातात, असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. मात्र, ‘मार्केट’ या देशातल्या तारुण्याकडे असं पाहत नाही. बाजारपेठेचे अभ्यासक शोधतच असतात, या देशातल्या तारुण्याचं व्यक्तिमत्त्व. त्याचा बदलता स्वभाव आणि आशा-आकांक्षा.
असाच एक अभ्यास जेनेसिस बर्सन-मार्सेलर नावाच्या संस्थेनं अलीकडेच प्रसिद्ध केला. २0१५ मध्ये भारतीय तारुण्यात कुठले महत्त्वाचे ट्रेण्ड्स दिसतात, असं सांगणारा हा अभ्यास.
माझी विचारसरणी
विविध विषयांवर माझे विचार काय आहेत, माझी मते कोणती आहेत ते या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विषय म्हटले तरी ते देव-धर्म-श्रद्धा-विवेकवाद यांच्याशी संबंधित आहेत. तसेच लेखातील विषय काही एका विशिष्ट क्रमाने मांडले आहेत असे नाही. जसे सुचेल तसे लिहिले आहे. मला जे मन:पूर्वक वाटते तेच लिहिले आहे.
- हे विश्व कशातून निर्माण झाले? कसे उत्पन्न झाले? कोणी केले? प्रारंभी काय होते? हे विश्व शून्यातून निर्माण झाले का? याविषयी मला निश्चित असे काही ठाऊक नाही. अजून मतमतांतरे आहेत असे दिसते. महाविस्फोट, बिगबॅंग, हिग्सबोसोन् कण यांसंबंधी प्रसंगपरत्वे वाचतो.
जगावेगळे
(विदर्भातील तत्त्ववेत्ते व विचारवंत दि.य. देशपांडे ह्यांनी आपल्या विदुषी पत्नी मनू गंगाधर नातू ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ह्या जगावेगळ्या दांपत्यावरील, लोकमत २०१४ च्या दिवाळी अंका पूर्वप्रकाशित झालेला हा लेख – का.सं.)
गोष्ट खूप जुनी आहे. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची म्हणजे जवळजवळ गेल्या जन्माची वाटावी अशी. पण मला अद्यापही तो काळ विसरता येत नाही. लहानशा खेड्यातून मी विदर्भ महाविद्यालयात शिकायला आले होते. शहरात छोटीशी खोली घेऊ न राहात होते आणि सायकलने कॉलेजात येत होते.
‘त्यांच्या’ बायका, ‘त्यांची’ इभ्रत!
बायकांसंबंधीचे लेख सहसा 8 मार्चच्या निमित्ताने लिहिण्याची आपली प्रथा आहे. कारण त्या दिवशी (हल्लीच्या) भारतात बायकांचा बैलपोळा साजरा केला जातो. त्या दिवशी स्त्रियांच्या सक्षमीकरणाची, त्यांच्या आत्मनिर्भरतेची, त्यागाची, हक्कांची, मातृहृदयाची, जिद्दीची, समंजसपणाची इतकी चर्चा केली जाते की त्या उमाळ्यांनी आपले सामुदायिक सांस्कृतिक रांजण भरून वाहायला लागते. आपल्या एकंदर सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे उथळ व्यापारीकरण आणि माध्यमीकरण झाल्याने अलीकडे तर स्त्रियांना 8 मार्चचा दिवस म्हणजे ‘नको त्या जाहिराती आणि सवलती’ असे वाटले नाही तरच नवल! परंतु 8 मार्चचे हे उमाळे अजून एप्रिलही सरत नाही तोच पुरते आटून आता स्त्रियांचे सक्षमीकरण तर सोडाच, पण त्यांना सार्वजनिक जीवनातून देखील हद्दपार करण्याची तयारी आपण चालवली आहे आणि त्या हद्दपारीचे नाना परीने गौरवीकरणही घडते आहे.