विषय «पुस्तक परीक्षण»

पुस्तकपरिचय

सुदृढ समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषसमानता या तत्त्वाचा उद्घोष स्त्रीमुक्ती आंदोलन सुरुवातीपासून करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्री उवाच वार्षिक प्रकाशित होत असते. या वार्षिकाचा सहावा अंक मार्च ९२ मध्ये प्रकाशित झाला. स्त्रीचा व त्या अनुषंगाने समाजाचा ‘मायक्रोस्कॉपिक व्ह्यू’ घ्यावा तसे या अंकाचे स्वरूप आहे. स्त्रीजीवनावर परिणाम करणार्‍या सर्व महत्त्वाच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक-अंगांचा ऊहापोह तर यामध्ये केला आहेच, परंतु समाजापासून सहसा दडवून ठेवलेले असे जे स्त्रीचे कौटुंबिक जीवन, त्यावर या अंकात विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम या अंकातील स्त्री कुटुंबातील आई म्हणून कशी आहे ते बघू .

पुढे वाचा

पुस्तक परिचय

पुस्तक परिचय: भारतीय स्त्रीजीवन- ले. गीता साने (मौज प्रकाशन मुंबई)
गीता सान्यांचे ‘भारतीय स्त्रीजीवन’ हे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले असले आणि गेल्यावर्षी त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असला तरी त्याच्याकडे अजून मराठीतील क्रियाशील आणि चोखंदळ वाचकांचे वाचकाचे म्हणावे तसे लक्ष गेले आहे असे वाटत नाही. कारण त्यात कथन केलेले अनुभव इतके दाहक आणि विचार इतके विद्रोही आहेत की त्याने हा वाचकवर्ग कळवळून उठला तरी असता किंवा खवळून विरोधी गञ्जना तरी करू लागला असता. परंतु गेल्या पाच वर्षात या पुस्तकाच्या अनुषंगाने असली आवाहने किंवा साद-पडसाद कानावर आले नाहीत एवढे मात्र खरे.

पुढे वाचा

सुशीलेचा देव: एक टिपण

‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी पुन्हा वाचताना या कादंबरीत सुशीलेच्या आणि इतर पात्रांच्या देवविषयक कल्पनांच्या बाबतीतली क्रांती दाखवणे हा वामन मल्हारांचा या कादंबरीच्या लेखनामागचा हेतू खरोखरीच आहे का असा प्रश्न पडला. सुशीला हे या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. बाळू, सुनंद, रावबा हे तिचे बाळपणापासूनचे. सवंगडी, विनायकराव हे सुशीलेचे वडील आणि गिरिधरराव हे विबाचे वडील. ही कादंबरीतली पात्रे आहेत का? कादंबरी हे एक कल्पित विश्व असते. पात्रे, प्रसंग, घटना यांनी घडलेले, स्वयंपूर्ण असे कल्पित जग. ही कादंबरी वाचताना असे वाटते की हे कल्पित जग नाही.

पुढे वाचा

‘आश्रमहरिणी’च्या निमित्ताने

आश्रमहरिणी ही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे.

बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारक समाजापुढे मांडत आले होते. तरीसुद्धा अजून विधवा पुनर्विवाहाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप नव्हती. ही समाजाची परंपराप्रियता वामनरावांनी हेरली. त्याचबरोबर पौराणिक वर्णन – पद्धतीचा चतुराईने वापर करून आश्रमहरिणत पोथीचा आभास त्यांनी निर्माण केला.

पुढे वाचा

इच्छामरणी व्हा

पुस्तकपरामर्श

(१) सन्मानाने मरण्याचा हक्क (२) जगायचे की मरायचे?
[दोन्हीचे लेखक: विनायक राजाराम लिमये, प्रकाशक (१) स.म. ह. चे स्वतः लेखक, (२) चे उन्मेष प्रकाशन, २६ पर्वत, पुणे ४११००९]
आपले आयुर्मान वाढले आहे तसे आरोग्यमानही. परंतु मृत्यू अटळ आहे. कृतांताची ध्वजा दिसू लागल्यापासून त्याचे भेसूर दर्शन होईपर्यंत अशी स्थिती येते की, त्या स्थितीत जिवंत राहण्यापेक्षा मरणे हेच बरे असे वाटू लागते. अशांना ‘तुमचे उत्तरायण सुरू झाले आहे आणि तुम्हीही इच्छामरणी आहात’ असा संदेश देणारी दोन पुस्तके आमच्याकडे अभिप्रायार्थ आली आहेत.

सन्मानाने मरण्याचा हक्क (स.म.

पुढे वाचा