विषय «इतर»

पत्रपरिचय

संपादक, आजचा सुधारक
श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांची पत्रे वाचली. स. ह. देशपांडे यांचा लेखही वाचला होता. मला श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत.
१) राष्ट्रवाद म्हणजे काय व तो नेहमीच आवश्यक असतो असे आपल्याला वाटते
काय?
२) भारतीय नागरिक राष्ट्रवादी नाही व चिनी आहे हे गृहीतक कशाच्या आधारे मांडायचे?
३) विवेकी राष्ट्रवाद वा प्रगमनशील राष्ट्रवाद कोणता हे कोणी व कसे ठरवायचे?
चीनविषयक तपशिलात जाऊन मूळ मुद्दे बाजूला पडू नयेत अशी विनंती आहे.

पुढे वाचा

संपादक

मासिकाचा प्रकाशक म्हणून अगदी पहिल्यापासून मी त्यांच्याशी संबंध ठेवून असल्यामुळे आणि आता संपादकांनी त्यांची सूत्रे खाली ठेवली असल्यामुळे हे सारे लिहिण्यास प्रवृत्त झालो आहे.)
ह्या अशा प्रकारच्या मासिकाचा खप फार होणार नाही ह्याची संपादक-प्रकाशकांना पुरेशी कल्पना होती. त्याशिवाय ह्या मासिकाच्या जाहिराती जिकडेतिकडे फडकवून वाचकांचे लक्ष त्याकडे वेधून घेणे इष्ट होणार नाही ह्याचीही संपादकांना जाणीव होती. आपल्या मासिकाची कीर्ती ज्यामुळे आपोआप पसरेल असे वर्तन ठेवण्याचे बंधन ह्या मासिकाच्या संपादकांनी आपल्यावर घालून घेतले होते, त्यामुळे काही ठिकाणी नमुना अंक पाठविण्यापलीकडे त्यांनी ह्याच्या प्रचाराचा कोठलाही प्रयत्न केला नाही.

पुढे वाचा

स्फुट लेख

एक शहाणा प्रयोग
क) शेतमालाच्या किंमती १९७७ ते १९९८
ज्वारी ‘स्वस्तावली
१९७० १९९८
१०० किलो ज्वारी = १,००० किलो सीमेंट २०० किलो सीमेंट
= २०० किलो लोखंड ४० किलो लोखंड
= ४०० लिटर डीझेल ५० लिटर डीझेल
= ११ ग्रॅम सोने १.५ ग्रॅम सोने
= १,००० किलो ऊस १,००० किलो ऊस
= २० किलो द्राक्षे ५० किलो द्राक्षे
म्हणजे ज्वारी, ऊस यांची किंमत तर घटलीच, पण द्राक्षांची किंमत थेट कोसळली. भाजीपाला दूध यांचेही असेच झाले.
ख) ज्वारी पिकवणारा तगला कसा? घरातल्या बायकापोरांना, गाईबैलांना, जमिनीला, भूगर्भातल्या पाण्याला आणि द्रव्यांना लुटून कारण हे घटक शेतक-यापेक्षाही कमकुवत!

पुढे वाचा

ग्रंथ भ्रामक होऊ शकतात

अनुभव व स्वतंत्र विचार हेच ज्ञानाचे खरे साधन होय. ग्रंथ केवळ मार्गदर्शक आहेत व कित्येक वेळी तर भ्रामकही होतात. म्हणून कोणत्याही संशोधकाने स्वतःच्या अनुभवावरून स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. इतिहासात मात्र घडलेल्या गोष्टी ज्यांनी स्वतः पाहिल्या त्यांची वचने मुख्य प्रमाण मानली पाहिजेत. संशोधन करण्यात कितीही श्रम पडले तरी ते टाळू नका. असे करात्न तरच तुम्हास सिद्धी मिळेल. विचार करताना कोणताही अभिनिवेश धरू नका. आणि तुम्हास जे ज्ञान होईल ते कोणासही न भिता बोलून दाखवा. तुमची चूक झाली आहे असे दिसून आले तरी तीही बोलून दाखविण्यास कचरू नका.

पुढे वाचा

स्त्री-विषयक कायद्यांची परिणामशून्यता

स्त्रीवर्ग हा समाजाचा अर्धा भाग. या वर्गाने स्वतःची प्रगती करून राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वाची भर टाकावी अशी अपेक्षा आहे. म्हणून तळागाळापासून सर्व स्तरावरील स्त्रियांना सक्षम सबल बनविण्यासाठी निरनिराळे उपाय, धोरणे, कार्यक्रम आखले जात आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, राज्य, राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय स्तरावर परिषदा, परिसंवाद, मेळावे आयोजिले जात आहेत. स्वातंत्र्यापासून भारतीय स्त्रियांच्या विशेषतः शहरी भागातील स्त्रियांच्या दर्जात बराच फरक पडला आहे. शिक्षणाचा प्रसार होऊन अनेक क्षेत्रांत त्यांचा शिरकाव झाला आहे. आर्थिक दृष्ट्या परावलंबन कमी झाले आहे. पण विकासाची फळे सर्व स्तरावरील स्त्रियांपर्यंत पोचली आहेत का ?

पुढे वाचा

पुस्तक-परिचय : एकविसाव्या शतकाची तयारी (भाग २)

जागतिक कृषि आणि जैवतंत्रशास्त्र (Bio-technology)
नवीन वैज्ञानिक शोधांनी जागतिक कुपोषणाची समस्या हाताळली जाऊ शकणार नाही काय?
अगदी अलीकडेपर्यंत कृषिउत्पन्न समाधानकारकपणे वाढते आहे असे दिसत होते. १९५० ते १९८४ या काळात शेतीचे उत्पन्न २.६ पटींनी वाढले. ही वाढ जागतिक लोकसंख्यावाढीपेक्षा जास्त होती. लक्षावधि एकर जमीन नव्याने लागवडीखाली आणली गेली, आणि नवीन यंत्रे, अधिक खते, अधिक फलप्रद सिंचन (irrigation) आणि पिकांची फेरपालट यांचा जगभर उपयोग केला गेला.
आशिया खंडात धान्यांच्या नवीन जैवतंत्रशास्त्रीय प्रजननामुळे प्रगतीचे मोठे टप्पे गाठले गेले. संकरज जातींच्या वनस्पती अधिक टिकाऊ असून रोगांचा प्रतिकार अधिक समर्थपणे करू शकतात आणि अधिकृत उत्पन्न देऊ शकतात असे दिसून आले.

पुढे वाचा

शतकाचा ताळेबंद

१३ एप्रिल १९९८ चा टाईम साप्ताहिकाचा अंक हा संग्राह्य असा विशेषांक आहे. २० व्या शतकाच्या ह्या संधिकालात गेल्या १०० वर्षांत होऊन गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आणि त्यांचा सहभाग असलेल्या महत्त्वाच्या घटनांवर एक प्रकाशझोत टाकून १०० वर्षांच्या इतिहासाचा दस्तऐवज वाचकांसमोर मांडण्याचा टाइमच्या संपादकमंडळाचा विचार आहे. असे एकंदर सहा विशेषांक निघणार आहेत. हा पहिला विशेषांक जगातील प्रभावी राजकीय पुढा-यांवर विशेष भर असलेला आहे. पण त्यात स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या मागरिट सँगर आणि निग्रोंच्या नागरी हक्कांसाठी लढा देणारे मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनि.) यांचाही समावेश आहे.

पुढे वाचा

जेथे श्रद्धा हेच ज्ञान असते

व्हॉल्तेर प्रमाणेच दीदरोलाही पाट्यांची चीड येत असे. व्हॉल्तेरने एके ठिकाणी म्हटले आहे. लोकांची श्रद्धा हेच त्यांचे ज्ञान’, दीदरो म्हणतो, त्यांच्या (पाद्रयांच्या) धंद्यामुळे त्यांच्या अंगात ढोंग, असहिष्णुता आणि क्रूरता हे गुण उत्पन्न होतात. पायांची शक्ति राजापेक्षाही अधिक, कारण राजा सामान्य लोकांना पदव्या देऊन बडे लोक बनवतो, पण पाद्री देवांना उत्पन्न करतो. पाढ्यापुढे राजालाही मान वाकवावी लागते. काही देशांत धर्मोपदेशक रस्त्यात नग्न हिंडतात आणि स्त्रियांना त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांच्या X X X चे चुंबन घ्यावे लागते. फ्रान्समध्ये होत नसले तरी पाद्री वाटेल तेव्हा ईश्वराला आकाशातून पाचारण करू शकतो आणि स्वत:पुढे तो इतरांना कस्पटासमान लेखतो.

पुढे वाचा

देवाशी भांडण

कालनिर्णय दिनदर्शिकच्या १९९८ च्या अंकामध्ये प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचा ‘देवाशी भांडण’ हा लेख आला आहे. आम्हा विवेकवाद्यांना त्याची दखल घेणे, त्याचा परामर्श घेणे भाग आहे. तेवढ्यासाठीच मागच्या अंकामध्ये श्रीमती सुनीति देव ह्यांचा लेख प्रकाशित केला आहे. आज आमचे देवाशी भांडण आहे की नाही व असल्यास का हे येथे आणखी एका दृष्टिकोनातून मांडत आहे.
प्रा. रेग्यांचा पूर्ण लेख ‘कालनिर्णय’मध्ये आला नसावा, पानाच्या मांडणीसाठी त्याची काटछाट झाली असावी अशी शंका येते, पण वाचकांच्या समोर फक्त मुद्रित भाग असल्यामुळे त्यावरच आपले मत मांडणे भाग आहे.

पुढे वाचा

विज्ञानाची शिस्त

वैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे ठरणे, या क्रमाने ‘सिद्ध झालेल्या गोष्टीबद्दल वाद असेलच कसा?
गंमत म्हणजे ही विज्ञानाच्या निर्विवाद असण्याची बाब फार सामान्य पातळीवरच्या विज्ञानाबाबतच खरी आहे. पाणी किती तापमानाला उकळते, यावर प्रयोग करून ते तापमान कोणते, हे सिद्ध करणे तसे सोपे असते.

पुढे वाचा