विषय «इतर»

ब्रेन-ड्रेन – दुसरी बाजू

संपादक आजचा सुधारक, नागपूर.
स.न.वि.वि.
ऑक्टोबर महिन्याचा आजचा सुधारक वाचला. या अंकातील पान २१८ वरील ‘कावळे आणि कोकिळा’ हा सुभाष म, आठले, कोल्हापूर, यांचा लेख छापून आपण आपल्या मासिकास खालच्या दर्जावर उतरविले आहे. कोणतीही आकडेवारी किंवा संशोधन याचा आधार न घेता, प्रस्तुत लेखकाने अतिशय बेजबाबदार विधाने केलेली आहेत. उपमेचा आधार घेऊनही लेखकाला नेमक्या सामाजिक वैगुण्यावर बोट ठेवणे जमलेले नाही. एखाद्या ‘मिसफिट’ ठरलेल्या व्यक्तीवरून जर लेखकाचा मानसिक उद्रेक बाहेर पडलेला असेल तर त्या ‘मिसफिट्’ केसबद्दल विस्तृत माहिती उदाहरणादाखल त्याने द्यावयास हवी होती.‘कुतरओढ’

पुढे वाचा

माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्लिश?

काय ग, कुठल्या कॉलेजात मिळाली तुला अॅडमिशन?
(पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयाचे नाव घेऊन) तिथे मिळाली आणि हॉस्टेलमध्ये पण मिळाली.
छान, रूम पार्टनर कोण मिळाली आहे? चांगली आहे ना?
आहे बाई कुणीतरी मराठी मीडियमची, नाव पण अजून विचारलं नाही.
म्हणजे?
अग, होस्टेलप्रवेश मिळालेल्या मुलींमध्ये तीन मुली सोडून सगळ्या माझ्यासारख्या इंग्लिश मीडियमच्याच आहेत. त्या तिघींना कुणी पार्टनर म्हणून घेईना. मग रेक्टरनी त्यांतल्या दोघींना एक खोलीत टाकलं. तिसरीचं काय करायचं?मला दयाआली आणि मी तिला रूम पार्टनर म्हणून घ्यायला कबूल झाले झालं!
हा चुटका पुष्कळ वर्षांपूर्वी भाषा आणि जीवन मध्ये वाचला होता.

पुढे वाचा

प्राथमिक उर्दू शाळामधील मुलींचे शिक्षण

समाजातील स्त्री शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करावा आणि अभ्यास करता करताच काही कृती कार्यक्रम घ्यावे या उद्देशाने आम्ही मुलींच्या शिक्षणासंबंधी काम सुरू केले. भारतीय शिक्षणसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुलींच्या शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही दोन उर्दू प्राथमिक शाळा निवडल्या. त्यात एक सरकारी आणि एक खाजगी शाळा निवडावी असे आम्हीठरवले होते. मात्र खाजगी शाळेने शाळा अभ्यासासाठी घ्यायला परवानगी नाकारली.. मात्र एक गोष्ट याबाबतीत विशेष वाटली ती म्हणजे या खाजगी शाळेच्या संस्था चालकांपैकी सर्वच सदस्याचे मत परवानगी नाकारण्याचे नव्हते. काही सदस्यांना वाटत होते की, या शाळेत बाहेरच्या काही सामाजिक आणि शिक्षणात संशोधन करणार्या.

पुढे वाचा

ग्रंथ-परीक्षण

नववसाहतवाद आणि आधुनिक भारत, लेखक : डॉ. गोपाळ राणे, प्रकाशक : कालिंदी राणे, गोरेगाव, मुंबई-६२, प्रकाशनाचे वर्ष : १९९५, पृष्ठसंख्या : २९७, किंमत रु. २५०
मराठी अर्थशास्त्र-परिषदेचे ‘उत्कृष्ट-पुस्तक’ पारितोषिक प्रा. राणे यांच्या ‘नववसाहतवाद आणि आधुनिक भारत’ या ग्रंथाला १९९५-९६ या वर्षासाठी बहाल करण्यात आले. हे एक सरळ-सोप्या भाषेत लिहिलेले, भरपूर माहिती देणारे, असे वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे. आधीच्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये ह्या दृष्टीने इतिहासाचा अभ्यास केला जातो. भारताच्या आर्थिक इतिहासात मात्र १६०९ पासून इंग्रजांच्या आर्थिक धोरणातले धोके वेळीच लक्षात न घेतल्यामुळे त्याच त्याच चुका झाल्याचे, अजूनही होत असल्याचे प्रा.

पुढे वाचा

भारतीय स्त्रीजीवन

अर्थार्जन करणाच्या सर्वच स्त्रिया स्वतंत्र असत नाहीत. बहुतेक कुटुंबांमधून बायकोचा पगार हा पुरुषाच्या मिळकतीचाच भाग समजला जातो. महिन्याच्या महिन्याला बायकोने आपला पगार नवर्याोच्या हातात ठेवावा, असा दंडकही या घरांत आढळतो. त्या पगारातून हातखर्चाचे पैसे आधी ठेवून घेण्याची सवड कधी बायकोला असते, तर कधी तिचा पगार हातात आल्यावर त्यातून नवरा तिला हातखर्चाचे पैसे देतो; कधी तिच्या खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न तो करतो आणि स्त्री खंबीर नसल्याने तो प्रयत्न यशवीही होतो. पैशाच्या व्यवहारांत बहुतेक पुरुष काटेकोर तर स्त्रिया बेपर्वा असतात. दोघांच्या समाइक मिळकतीने घर किंवा फ्लॅट घेतल्यास तो बहुधा नवर्या च्या नावावर असतो.

पुढे वाचा

पुन्हा एकदा सत् आणि सत्य

कोणत्याही भाषेत अनेक शब्द असे असतात की त्यांना एकाहून अधिक अर्थ असतात; आणि तसेच अनेक शब्द असेही असतात की दोन शब्दांचा एकाच अर्थाने उपयोग होऊ शकतो. सर्व नैसर्गिक भाषांमध्ये ही गोष्ट दिसून येते. सामान्यपणे याने काही बिघडते असे म्हणता येत नाही. एवढेच नव्हे तर साहित्यात ही गोष्ट अनेक दृष्टींनी उपकारक होते. अलंकार आणि वैचित्र्यनिर्मिती यांच्याकरिता ही गोष्ट उपयोगी पडते. परंतु जिथे शब्दांचा आणि अर्थाचा नेमकेपणा अपेक्षित असतो (उदा. विज्ञानात), तिथे मात्र वरील गोष्ट दोषास्पद म्हणावी लागते. शास्त्रीय भाषेचा आदर्श एका शब्दाला एकच अर्थ आणि एका अर्थाचा वाचक एकच शब्द हा आहे.

पुढे वाचा

आम्ही कां लिहितों?

ज्या प्रौढ लोकांच्या मनांत विशिष्ट धर्मकल्पना कायम होऊन गेल्या आहेत व ज्यांचे वर्तन तदनुरोधाने होत आहे त्यांच्या मनावर असल्या चर्चेचा विशेष परिणाम होण्याचा संभव नाहीं हे खरे आहे. पण आमचे असले निबंध तसल्या लोकांकरितां लिहिलेलेच नसतात. ज्या तरुण वाचकांच्या धर्मकल्पना दृढ झाल्या नसतील; ज्यांच्या बुद्धींत साधकबाधक प्रमाणांचा प्रवेश होऊन त्यांचा विचार होणे शक्य असेल; व विचारा अंतीं जें बरें दिसेल त्याप्रमाणे आम्ही थोडा-बहुत तरी विचार करू अशी ज्यांना उमेद असेल, त्यांच्याकरितांच हे लेख आहेत. असले लेख एकदा लिहून टाकले म्हणजे आपले कर्तव्य आटपलें असें कदाचित् मोठमोठ्या तत्त्वशोधकांस म्हणता येईल….पण

पुढे वाचा

श्री. गोखल्यांचे ईश्वरास्तित्वाचे समर्थन

प्रा. विवेक गोखले आपल्या ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ (आ.सु. ८.७, पृ. २१२) या लेखात म्हणतात की नास्तिकांचा एक युक्तिवाद बिनतोड समजला जातो. पण तसा तो नाही. आणि त्यानुसार त्यांनी त्या युक्तिवादाचे एक खंडन सादर केले आहे.
नास्तिकांचा युक्तिवाद असा आहे : ईश्वरवाद्यांच्या ईश्वरस्वरूपाविषयी अनेक कल्पना आहेत. त्यापैकी ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु आहे ही एक आहे. पण असा ईश्वर असू शकत नाही, कारण जगात निर्विवादपणे अस्तित्वात असलेले प्रचंड दुःख आणि वरील वर्णनाचा ईश्वर यांत विरोध आहे. ईश्वर जर ईश्वरवादी म्हणतात तसा असता, तर जगात दुःख असू शकले नसते, कारण ते त्याच्या साधुत्वाला बाधक झाले असते.

पुढे वाचा

माणसाचा मेंदू मोठा का?

मेंदूच्या वजनाचे शरीराच्या वजनाशी प्रमाण तपासले तर माणसाइतका मेंदू इतर फारच थोड्या प्राण्यांमध्ये आढळतो. एकदोन फुटकळ अपवाद सोडता प्रमाणाच्या निकषावर माणसाइतका ‘डोकेबाज’ कोणताच प्राणी नाही. माणसांचे मेंदू दीड-पावणेदोन किलोंचे असतात, आणि शरीरे साठ-सत्तर किलोंची. म्हणजे माणसांच्या शरीरांचा सव्वादोन-अडीच टक्के भाग मेंदूने व्यापलेला असतो.
माणसाचे सगळ्यात जवळचे नातलग म्हणजे चिंपांझी, गोरिला, ओरांग-उटान हे मानवेतर कपी. हे प्राणी आणि माणसे मिळून कपी (apes) हा वर्ग बनतो. या मानवेतर कपींमध्ये मेंदूचे प्रमाणमाणसांच्या थेट अर्धे, म्हणजे शरीराच्या एक-सव्वा टक्का येवढेच असते. चाळीसेक लक्ष वर्षांपूर्वी
जेव्हा माणसांचे पूर्वज या इतर कपीपेक्षा सुटे झाले, तेव्हा माणसांच्या पूर्वजांचे मेंदूही शरीराच्या एक-दीड टक्काच असायचे.

पुढे वाचा

स. ह., चौसाळकर आणि राष्ट्रवाद

स. ह. देशपांडे यांचे ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील दोन लेख आणि त्यावरील प्रा. अशोक चौसाळकर यांची ‘डॉ.स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया वाचली. राष्ट्रवाद म्हटले की काही आक्षेपांचा पाढा वाचायचा असा एक प्रघातच पडला आहे. ही प्रतिक्रिया नेमकी त्याच स्वरूपाची आहे, म्हणून मला या विषयासंदर्भात जाणविणार्याा काही बाबी येथे नोंदवीत आहे.
राष्ट्रवाद ही प्रामुख्याने गेल्या तीन शतकांमध्ये उदयास आलेली अतिशय प्रभावी वगतिमान विचारसरणी आहे. आनुवंशिक तत्त्वाने चालत आलेल्या राजघराण्यांना किंवा दैवी आधार असल्याचा दावा करणा-यांना या तत्त्वज्ञानाने झुगारून दिले.

पुढे वाचा