Category «इतर»

दुभंगलेला समाज

मुंबईतील भा.ज.पा.च्या एका कार्यकर्त्याने अभिनेता इमरान हाशमीच्या विरोधात ३ ऑगस्ट २००९ रोजी तो जातीय द्वेष पसरवतो आहे अशा प्रकारची तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये महेश भट्ट ज्यांनी इमरान हाशमीच्या बाजूने विधान केले आहे, त्यांनाही गोवण्यात आलेले आहे. इमरान हाशमीने अलीकडे राज्य अल्पसंख्यांक आयोगाला भेट देऊन अशी तक्रार केली की ‘निभाना’ ही हौसिंग सोसायटी, जी मुंबईतील पालीहील भागात आहे त्यांच्याकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. त्याची मुख्य तक्रार अशी होती की, त्याने फ्लॅट विकणाऱ्याला अगोदरच अॅडव्हान्समध्ये लाखभर रुपये दिले होते, पण हौसिंग सोसायटी त्याला ‘ना हरकत पत्र’ देण्यास तयार नव्हती कारण इमरान हाशमी मुसलमान आहे.

पुढे वाचा

पुराव्यांनी धारणा बदलतात

पण माणसांचे विश्वास, त्यांच्या धारणा सहज बदलू शकतात, विशेषतः धोका पुढ्यात उभा असला की. म्हणूनच माणसे पुरावे पाहून धारणा बदलतात. याचे अभिजात उदाहरण मला भेटले. १९९०-२००० च्या मध्याजवळ मला वार्ताहर विचारत, की माझा तापमानवाढीवर विश्वास आहे का, आणि मी माझ्या विश्वासाचा उघडपणे बचाव देईन का.
आज मात्र तेच मला विचारतात, की परिस्थिती किती बिघडेल ! [मार्क मॅस्लिनच्या अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु ग्लोबल वॉर्मिंग (ऑक्स्फर्ड युनि. प्रेस, २००४) या पुस्तकातून]

ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी

आपण गेल्या २-३ वर्षांत विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या व त्यावरचे विचारवंतांचे, राजकीय पक्षांच्या धुरीणांचे लेख वाचले. समित्या नेमलेल्या ऐकल्या. त्यांचे अहवाल वाचले. पण अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. याचे एक कारण असे की राज्यकर्ते नेहमीप्रमाणे या अरिष्टावर काही तरी मलमपट्टी उपाय करू पाहत आहेत व या सर्व गोष्टींच्या मागे जो मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे त्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलेले आहे. या आत्महत्यांचा सरकारवर झालेला दृश्य परिणाम म्हणजे केंद्र व राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी! कर्जमाफीसाठी असलेले अनेक निकष फारसे योग्य नाहीत.

पुढे वाचा

इतिहासातील नवेजुने

अॅक्टन व त्याच्या सहकाऱ्यांना (१८९६ साली) वाटत असे की भविष्यात कधीतरी ‘अंतिम इतिहास’ लिहिता येईल. साठ वर्षांनी सर जॉर्ज क्लार्कने यावर टिप्पणी केली –
“भावी पिढ्यांतील इतिहासकारांना (अंतिम इतिहास लिहिता येईल) असे वाटत नाही. त्यांना त्यांचे कार्य वारंवार उल्लंघून नवनवे इतिहास लिहिले जात राहतील असे वाटते. त्यांच्या मते भूतकाळाबाबतची माहिती एका वा अनेक माणसांच्या मनांच्या प्रक्रियेतूनच आपल्यापर्यंत येते. त्यामुळे ती मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय तथ्य-कणांच्या रूपात असू शकत नाही. इतिहास संशोधन ही अंतहीन प्रक्रिया आहे. काही घाई झालेले विद्वान यामुळे संशयवादी होतात.

पुढे वाचा

सकारात्मक दृष्टीतून इतिहासलेखन

इतिहास लिहिण्याच्या पद्धतींमागच्या भूमिकांचा आढावा घेणारा रा.ह.तुपकरींचा लेख या अंकात आहे. त्यांच्या आगामी ग्रंथातील इतिहास या प्रकरणाचा तो संक्षेप आहे. इतिहासकार व त्याचा वर्तमानकाळ यांचा त्याने लिहिलेल्या इतिहासावर परिणाम होणारच. पण व्यक्तिसापेक्षता मान्य करूनही ते कल्पकतेतून लावलेला अर्थ आणि बुद्धिपुरस्सर केलेली मोडतोड…… (यांतील) सीमारेषा फार पुसट असतात, असा महत्त्वाचा इशारा देतात.
कथाकथनात्मक, मार्क्सवादी, आधुनिकतावादी व आधुनिकोत्तरवादी अशा चार भूमिका तुपकरी नोंदतात. कथाकथनात्मक, मार्क्सवादी व आधुनिकतावादी भूमिकांमध्ये त्रुटी तर आहेतच. परंतु त्या कोणत्याही भूमिकेत व्यक्तिसापेक्षता हा गुण मानून त्याला मान्यता दिली जात नाही.

पुढे वाचा

इतिहास

इतिहास म्हणजे भूतकाळात जे घडले त्या विषयीची माहिती, ज्ञान, आकडे (data), इ. इ. सर्व. भूतकाळाशी संबंधित वस्तू (भांडी, शस्त्रे, नाणी, कपडे, दागिने, इ.), वास्तू (भवने, राजवाडे, किल्ले, रस्ते , इमारती, शिलालेख, इ.) आणि माहिती, आकडे, ज्ञान (दस्तावेज, पत्रव्यवहार, लेख, विचार, इ.) या सर्वांची जुळवाजुळव करून भूतकाळात काय घडले असावे हे वर्तमानात सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इतिहासकार किंवा इतिहासतज्ज्ञ म्हणतात.
जगाचा आद्य इतिहासकार म्हणून महर्षी व्यासांकडेच पाहता येईल. ज्याकाळी लिहून ठेवण्याच्या सोयीच नव्हत्या त्या इ.पू. जवळपास १०,००० वर्षांपासून विभिन्न ऋषिमुनींनी जे श्लोक रचले त्यांत त्या काळातील अनेक घटनांचे वर्णन व ज्ञान, कला, इ.

पुढे वाचा

राष्ट्रीय विद्यापीठे

भारतात केंद्रीय तसेच राष्ट्रीय विद्यापीठे सुरू होणार असल्याचे वृत्त १९ ऑगस्टच्या लोकसत्ते त (पृ.२) वाचले, आणि आठवण झाली डॉ. वीणा पुनाचा यांची. देशात चौदा नवीन राष्ट्रीय विद्यापीठे स्थापन करण्याला त्यांचा तसेच डॉ. वीणा मजुमदार, डॉ. सुकांता चौधरी इत्यादी अन्य मान्यवरांचा तत्त्वतः विरोध नसला, तरी समाजात होऊ घातलेल्या बदलांची दखल घेऊन त्यावर विचारमंथन होणे अवश्य आहे, हा विचार त्या कळकळीने मांडतात. शिक्षणक्षेत्रातील ह्या स्थित्यंतराविषयी काहीसा नाराजीचा सूर तीन्ही विदुषींनी लावलेला दिसतो. भारतातील ३७८ विद्यापीठे आज १४,३२३.६ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. जात-पात, धर्म, लिंग, मासिक/वार्षिक उत्पन्न ह्यांपैकी कुठलीही बाब शिक्षणाच्या आड न येता.

पुढे वाचा

पेटंटशाही व आपण (पुस्तक परीक्षण)

पेटंटशाही व आपण हे डॉ. सुनीती धारवाडकरांचे पुस्तक समीक्षणासाठी म्हणून जेव्हा मिळाले तेव्हा त्याचे आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ व समर्पण-पत्रिका ह्यांनी प्रथमदर्शनीच लक्ष वेधून घेतले. नावावरून असे वाटले की ह्यात पेटंटबद्दल सविस्तर माहिती मिळेल परंतु ‘शाही’ ह्या शब्दाचे महत्त्व पुस्तक वाचायला लागल्यावर लक्षात आले. ह्या पुस्तकाचे कंसातील (शेती व जीवनाची कोंडी) हे सहशीर्षकही सयुक्तिक आहे.
हे पूर्ण पुस्तकच माहितीपूर्ण आहे, ज्ञानवर्धक व चिंतनीय (म्हणजे काळजी करायला लावणारे) आहे. परंतु सर्व पुस्तक ललित-लेखनासारखे एका बैठकीत वाचून होत नाही. ते अर्थातच पुस्तकातील मजकूर ओघवता नाही म्हणून नव्हे तर ते वाचकाला बऱ्याच गोष्टींची माहिती देणारे आहे म्हणून.

पुढे वाचा

अमेरिकन बँकांचे राष्ट्रीयीकरण

भांडवलवादाचा सर्वांत जास्त स्वीकार केलेला देश म्हणजे अमेरिका (यूएसए), आणि भांडवल हाताळणाऱ्या कळीच्या संस्था म्हणजे बँका. अर्थातच पूर्णपणे अनियंत्रित बँकिंग व्यवस्था, हा अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असेल, नाही का? नाही! इ.स. १७९१ मध्ये (अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर १५ वर्षांनी) अलेक्झंडर हॅमिल्टन या राष्ट्राध्यक्षाने बह्वशी सरकारी मालकीची बँक ऑफ द यूनायटेड स्टेट्स सुरू केली. ती १८११ मध्ये बंद केली गेली. इ.स. १८६४ मध्ये वित्तव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी कॉम्प्ट्रोलर ऑफ द करन्सी हे पद घडवले गेले. इ.स. १९१३ मध्ये, महामंदीच्या (द ग्रेट डिप्रेशन) काळात अमेरिकन काँग्रेसने (लोकसभेने) बुडणाऱ्या बँकांच्या ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी फेडरल रिझर्व्ह इन्शुअरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ही संस्था घडवली.

पुढे वाचा

राजा दीक्षित यांचा लेख,

“महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार”, प्रतिमा प्रकाशन, पुणे च) ख. ते (सावरकर) असे म्हणतात की, ‘चातुर्वर्ण्याच्या किंवा जातिभेदाच्या सर्व मुख्य प्रकारांच्या मुळाशी आनुवंशिक गुणविकासाचे सर्वसामान्य असे मुख्य तत्त्व आहे हे तत्त्व ‘जनहितकारक’ असून, ‘ज्यांच्या उपकारक प्रवृत्तीच्या पुण्याईच्या वशिल्यावरच आजवर ही संस्था (=जातिभेद) जगत आली’ त्या सर्वात हे तत्व ‘खरोखरच महत्त्वाचे’ आहे असेही ते (सावरकर) सांगतात.” वसंत पळशीकर यांचा लेख, जात्युच्छेदक निबंध व सावरकरांचे अस्पृश्यता निवारक कार्य, सुमंत यशवंत, (संपा.) महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, पुणे खख. “सावरकर हे वंश व वर्णश्रेष्ठत्ववादी कसे होते त्याचा परामर्श घेताना वसंत पळशीकर म्हणतात, “काही गुण श्रेष्ठ, काही कर्मे श्रेष्ठ, अशी त्यांची धारणा कायमच होती.

पुढे वाचा