विषय «इतर»

राजा दीक्षित यांचा लेख,

“महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार”, प्रतिमा प्रकाशन, पुणे च) ख. ते (सावरकर) असे म्हणतात की, ‘चातुर्वर्ण्याच्या किंवा जातिभेदाच्या सर्व मुख्य प्रकारांच्या मुळाशी आनुवंशिक गुणविकासाचे सर्वसामान्य असे मुख्य तत्त्व आहे हे तत्त्व ‘जनहितकारक’ असून, ‘ज्यांच्या उपकारक प्रवृत्तीच्या पुण्याईच्या वशिल्यावरच आजवर ही संस्था (=जातिभेद) जगत आली’ त्या सर्वात हे तत्व ‘खरोखरच महत्त्वाचे’ आहे असेही ते (सावरकर) सांगतात.” वसंत पळशीकर यांचा लेख, जात्युच्छेदक निबंध व सावरकरांचे अस्पृश्यता निवारक कार्य, सुमंत यशवंत, (संपा.) महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, पुणे खख. “सावरकर हे वंश व वर्णश्रेष्ठत्ववादी कसे होते त्याचा परामर्श घेताना वसंत पळशीकर म्हणतात, “काही गुण श्रेष्ठ, काही कर्मे श्रेष्ठ, अशी त्यांची धारणा कायमच होती.

पुढे वाचा

पाणी व्यवस्थापनः सोपे उपाय

आ.सु.चा एप्रिल २००९ च्या अंकातील लेखात शेतीला लागणारे एकूण पाणी यासंबंधीचे विवेचन वाचले. मला शेतीला लागणाऱ्या पाण्याविषयी काही सांगावेसे वाटले म्हणून हे पत्र !
शेतीसाठी अथवा इतर उपयोगांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत हा पडणारा पाऊस आहे. आता त्याच्यावर आपले म्हणजे एकूणच मनुष्यप्राण्याचे फारसे नियंत्रण नाही. या शास्त्रात काम करणारे आपले जे दिग्गज शास्त्रज्ञ आहेत त्यांचे काम छान झाले याचा अर्थ त्यांनी वर्तवलेला पुढील वर्षीचा पावसाचा अंदाज जवळ जवळ बरोबर वर्तवला असे असते! तेव्हा जेवढा पाऊस पडेल व त्यातून जेवढे पाणी उपलब्ध होईल, ते साठवून (जमिनीवर अथवा जमिनीखाली) व काटकसरीने वापरून आपली गरज भागविण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे निर्विवाद.

पुढे वाचा

स्लमडॉग करोडपती

D: It is written पण नेमकं काय? पाण्याच्या वाफेवर लिहिलेला जमालचा संघर्षमय भूतकाळ की फसवा वर्तमानकाळ की उज्ज्वल भविष्यकाळ ??
जमाल… एक अमिताभवेडा क्रिकेटप्रेमी, तर सलीम, त्याचा मोठा भाऊ, आईसोबत ‘आमची’ मुंबईच्या झोडपट्टीत राहात असतात. हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये जीव वाचवताना राम भेटतो. पण आईला गमावून अनाथ, निष्पाप भावंडे – द टू मस्केटीयर्स – आणि लतिका – द थर्ड – जगण्यासाठी एकांडा संघर्ष सुरू करतात.
पोटासाठी कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या या मुलांना भिकारी बनवण्यासाठी एक दिवस ममनचे लोक घेऊन जातात. मुलांचे डोळे काढून काहींना पांगळे करून भिकेला लावण्याच्या या धंद्याचा ममन बादशाह असतो.

पुढे वाचा

मालिकाबद्ध पुस्तकातले डोह

आजचा सुधारक ची पहिली दोन वर्षे (एप्रिल ‘९० ते मार्च ‘९२) पानांचे क्रमांक दर महिन्यात नव्याने सुरू केले जात. एखाद्या महिन्यात एक ते बत्तीस क्रमांक दिले, की पुढील महिना परत एक पासून सुरू केला जाई. नंतर असा विचार आला, की लेखांवरील चर्चा, पत्रे, प्रतिक्रिया, असे करत एखाद्या विषयावरील सर्वांचे सर्व मुद्दे समजून घेण्यामुळे मासिक खरे तर मालिकाबद्ध पुस्तकासारखे रूप घेते. त्यामुळे एकेक वर्ष तरी पानांचे क्रमांक सलग द्यावेत. एप्रिल ‘९२च्या अंकापासून आजवर ही पद्धत सुरू आहे. त्यावेळी मी आसु चा वाचकही नव्हतो, पण दि.य.देशपांडे,

पुढे वाचा

कामाला लागा, तत्त्वचर्चा पुरे!

[अमर्त्य सेन यांचे द आयडिया ऑफ जस्टिस हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने लेखकाने दिलेली एक मुलाखत इंडियन एक्स्प्रेस ने (८ ऑगस्ट ‘०९) प्रकाशित केली. त्यातील काही अंश असा -] प्रश्नकर्ता : हे पुस्तक आणि धोरणनिश्चिती यांतील संबंधाबद्दल तुम्ही म्हणालात की हा अभियंत्यांचा संदर्भग्रंथ (Engineer’s Handbook) नाही. सेन : तुम्हाला पूल कसा बांधावा हे या पुस्तकात सापडणार नाही – जमीन कशी, सामान कुठून आणायचे – नाही. तुम्हाला पूल किती रुंद असावा यावर कसा विचार करावा, ते इथे सापडेल; वाहतूक कश्या प्रकारची असेल ते हे सांगेल.

पुढे वाचा

डार्विन आणि स्त्रीवादः संवादी शक्यता

निसर्गाविषयी भूमिका घेण्याबद्दल स्त्रीवाद्यांमध्ये बहुतांशी प्रतिकूलता आढळते. निसर्ग म्हणजे निष्क्रिय, अपरिवर्तनीय, ज्याविरुद्ध लढावे लागेल असा अडथळा – असेच चित्रण स्त्रीवादी साहित्यात दिसते. स्त्रीवादी राजकारणाचा रोखही बढेशी असाच राहिला आहे. अर्थात् मानवी किंवा सामाजिक जीवनाच्या जीवशास्त्रीय विश्लेषणाबद्दल स्त्रीवाद्यांना वाटणाऱ्या शंका अप्रस्तुत नाहीत. कारण शास्त्रज्ञांनी जीवशास्त्रीय अध्ययनांमध्ये शरीर, शारीरिक क्रिया-प्रक्रिया यांच्याविषयी मांडलेली गृहीतके, त्यांसाठी वापरलेली तंत्रे व निकष यांमध्ये अनेकदा पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक बाबी आढळतात. विशेषतः उजवी मंडळी आपल्या मतांच्या पुरस्कारासाठी ज्या प्रकारचे विश्लेषण/अध्ययन वापरतात, त्याच्याबद्दल तर स्त्रीवाद्यांचे आक्षेप हमखास लागू पडतात. परंतु, सरतेशेवटी आपण सर्वच निसर्गाचा, जीवशास्त्राचा एक भाग असल्यामुळे निसर्ग किंवा जीवशास्त्रालाच नाकारणे कितपत योग्य ठरेल ?

पुढे वाचा

हिंसेचा इतिहास

मांजर-दहन हा सोळाव्या शतकातील पॅरीसमधील मनोरंजनाचा लोकप्रिय कार्यक्रम होता. ह्या ‘खेळा’त मांजराला एका दोरीला टांगून हळूहळू खाली आगीत सोडण्यात येई. नॉर्मन डेव्हीज या इतिहासतज्ज्ञाच्या मते “मांजर जसजसे होरपळत, भाजत, जळत जाऊन अखेरीस काळे ठिक्कर पडे, तसे प्रेक्षक (ज्यात राजाराण्यांचा समावेश असे) खदाखदा हसत किंचाळ्या मारत.” परपीडनानंदाचे असे बीभत्स प्रदर्शन आजच्या काळात अतयं वाटते. माणसाच्या संवेदनशीलतेतील हा बदल, गेल्या काही शतकात हिंसेत झालेली घट, हा मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा, पण दुर्लक्षित प्रवाह आहे.
हिटलर, स्टॅलिन व माओनंतरच्या शतकात व इराकच्या जखमा ओल्या असताना हिंसा उतरणीला लागल्याचा दावा करणे हा क्रूर विनोद किंवा अश्लील बाब वाटू शकते.

पुढे वाचा

खेळ मांडियेला

खेळकरपणा अपरिपक्वतेचा निदर्शक आहे. इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवजातीच्या उत्क्रांतीत परिपक्वपणा उशीराने येणे ही एक महत्त्वाची बाब आहे. थोडक्यात म्हणजे मानव हा एक अपरिपक्व कपी (immature ape) आहे. प्रौढत्वाला पोचायला माणसाला जितका वेळ लागतो तेवढा इतर कोणत्याच कपीला लागत नाही. या विस्तारित बालपणातच आपण शिकतो आणि खेळतो. इतर कपींच्या एकूण आयुर्मर्यादेइतका वेळ आपण खेळत असतो.
इतर सस्तन प्राणी आणि पक्षीही खेळतात. वासरे, शिंगरे, शेरडे कानात वारा भरून नाचतात. कुत्री, मांजरे व त्यांचे नातलग यांची पिल्ले खोटीखोटी भांडणे करत खेळतात. अनेक प्राण्यांना माणसाळवायला एखादा सवंगडी, सोबती पुरवून खेळू देणे महत्त्वाचे असते.

पुढे वाचा

पुस्तक परिचय- वेताळाच्या आरोग्यकथा

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेले हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक. “बंडखोरी करणाऱ्या व नवनिर्मितीच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्न विचारण्याच्या व उपस्थित करण्याच्या प्रवृत्तीस’ ही अर्पण पत्रिकाही कुतूहल वाढवणारी आहे.
औषधशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवून मुंबईला एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात २० वर्षे प्राध्यापिकी केलेल्या या लेखक महोदयांनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांनाही वाचा फोडली. स्त्री भ्रूणहत्येचे महाराष्ट्रातील वाढते प्रमाण, सोबतच औषधनिर्मिती व विक्रीचा बाजार, त्यात होत जाणारी रुग्णांची फसवणूक, जाणीवपूर्वक किंवा अजाणता डॉक्टर मंडळी यात का सामील होतात ; या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधायचा प्रयत्न करतानाच त्यावर काही उपाय करता येतील का, हा महत्त्वाचा प्रश्न ते आपल्यासमोर मांडतात.

पुढे वाचा

संपादकीय रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

“कोणत्याही संकल्पनेचे महत्त्व जर तिच्याद्वारे प्रेरित वैचारिक परिवर्तनाने मोजण्याचे ठरविले, तर नैसर्गिक निवडीद्वारा उत्क्रांती ही निर्विवादपणे मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना ठरेल.”

चार्ल्स डार्विनच्या जन्माला यंदा दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्याच्या ऑरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाच्या प्रकाशनालाही दीडशे वर्षे लोटली. पण ह्या ग्रंथामुळे उडालेली खळबळ अजूनही विरली नाही. मानवी बुद्धिमत्तेच्या विविध अंगांना कवेत घेणारा, दैवकशास्त्रापासून वैद्यकशास्त्रापर्यंत अनेक क्षेत्रांत मूलभूत वैचारिक परिवर्तन घडविणारा व एकाच वेळी अनेक नव्या विद्याशाखांना जन्म देणारा असा ग्रंथ मानवी इतिहासात अभूतपूर्वच म्हणायला हवा. त्याहून महत्त्वाची बाब ही की ह्या ग्रंथाने मानवी स्वभाव, प्रेरणा, विचारपद्धती व वर्तन यांच्याविषयी फेरमांडणी करतानाच काही असे प्रश्न उपस्थित केले, ज्यांची चर्चा गेली दीडशे वर्षे सुरू आहे व यापुढेही राहील.

पुढे वाचा