विषय «इतर»

दि.य.दे. आदरांजली

गेली नागपंचमी प्रा. दि.य.देशपांडे (ती. नाना) यांचा आज तसा नव्वदावा जन्मदिन ! काही माणसे जन्माला येतात ती केवळ इतरांना काहीतरी देण्यासाठी ! देता देता ती कुठे नि कधी हरवतात हे कळतही नाही. नानांचे देहदान अन् चक्षुदान हे दैहिक पातळीवर असले तरी ‘देहाचे पारणे फिटणे’ ही विज्ञाननिष्ठ भूमिका त्यामागे आहे. आयुष्यभर देहाची जराही चिंता न बाळगणाऱ्या नानांनी जाताना देहालाही दानाचे भाग्य मिळवून दिले! ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीचे महत्त्व आम्हाला, पटो न पटो, आम्ही मात्र साक्षात् ‘साधुत्व’ अंगी बाणलेल्या प्रा.

पुढे वाचा

राज्यघटनेत सुधारणा

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानसभेत भारताची राज्यघटना मंजूर करून स्वीकारण्यात आली. राज्यघटना अनंत काळपर्यंत तशीच अचल रहावी अशी कल्पना कधीच नव्हती. अनेक वर्षांच्या वापरानंतर या घटनेमधील त्रुटी लक्षात येतील, तसेच काळाबरोबर मानवी जीवनात बदल होत जाऊन, घटनेतही त्यानुसार बदल करावे लागतील, हे अपेक्षितच होते.
आजतागायत घटनेत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. पण त्यांचे स्वरूप बहुतेक वेळा कायदा करण्यातील घटनात्मक अडचणींमधून मार्ग काढण्याचे – पळवाट तयार करण्याचे होते. आज आपण प्रयत्न करणार आहोत तो अनुभवापासून शिकून, घटनेत सुधारणा करण्याचा आहे. कोणत्याही तात्कालिक अडचणीवर मात करण्यासाठी हा प्रयत्न नाही, तर भारतीय जनमानसाला, जनवर्तनाला अधिक चपखल बसणारी अधिक चांगली घटना निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

समूहाचे मानसशास्त्र

‘परिस्थितिजन्य’ मानसिकता
‘दुष्ट लोकच दुष्कृत्य करीत असतात’ या विधानाविषयी जगातील यच्चयावत सर्व सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संघ-संस्थांचे एकमत आहे. जगरहाटीची समज नसलेली लहान वयातील मुले-मुलींचा अपवाद वगळता इतरांना कशाही प्रकारे वागण्याची मुभा असणे, त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करणे आणि वरील प्रकारचे विधान करणे जगातील सर्व समाजामध्ये रूढ आहे.
परंतु या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या व साध्या नाहीत. समाजशास्त्रज्ञ व मानसतज्ज्ञ यांच्याजवळील पुरावे काही वेगळेच सांगत आहेत. या क्षेत्रातील संशोधकांच्या मते बऱ्याच वेळा दुष्कृत्याला भोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरते, व्यक्ती नव्हे. दुष्कृत्य करणाऱ्यांमागे त्यांच्या अवती भोवती असलेल्यांचा फार मोठा प्रभाव असतो, हे चटकन लक्षात येत नाही.

पुढे वाचा

वर्ण आणि जाती

भारतीय उपखंडातील वर्णव्यवस्था हा कायम चर्चेचा विषय आहे. बहुतेक वेळा हे वाद अपुऱ्या माहितीवर आधारित असतात. वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था ह्यांपैकी आधी काय निर्माण झाले ह्या संबंधी ब्रिटिश कालात अनेक वाद झाले. सर्व पाश्चात्त्य विद्वानांचे मत होते की आधी चातुर्वर्ण्य होते व त्याच्या विभाजनातून जाती निर्माण झाल्या. ह्या सिद्धान्ताला फक्त इरावती कर्वे ह्यांनी विरोध केला. त्यांनी दाखवून दिले की वर्णव्यवस्था ही तत्पूर्वी अस्तित्वात असलेल्या विविध ज्ञातींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. ह्या जाती कश्या अस्तित्वात आल्या ह्यासंबंधी विविध अंदाज बांधण्यात आले. पण पन्नास वर्षांपूर्वी आमचे प्राचीन इतिहासाचे ज्ञान अपुरे असल्यामुळे ज्ञातिसंस्थेचा उद्गम व विकास निश्चित सांगणे कठीण होते.

पुढे वाचा

राष्ट्रपतिपदाची तिरकी चालः बाबूजी ते बीबीजी! (भाग १)

आजचा सुधारकात माझे मित्र डॉ. किशोर महाबळ यांनी ‘१३ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर मार्मिक लेख लिहिला. त्यानंतर इंडिया टुडे या (मूळ पाक्षिकातून आता साप्ताहिक झालेल्या) प्रकाशनाने निवृत्तिपूर्वी दोनच दिवस आधी दिलेल्या खास मुलाखतीच्या आधारे ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर एक विशेष लेख लिहिला. त्याही पूर्वी महिलावर्ग आणि महाराष्ट्र प्रदेश यांचा एकसमयावच्छेदेकरून उद्धार करण्याच्या उदात्त उद्देशाने जेव्हा सौभाग्यवती प्रतिभा देवीसिंग पाटील (शेखावत) यांचा नामोल्लेख करण्यात आला तेव्हाच या नियतकालिकाने ‘चिंत्य निवड’ अशा आशयाचा लेख छापला होता. आता आठवड्यापूर्वीच्या (८.८च्या) अंकात या साप्ताहिकातच आलेल्या पूर्वीच्या डझनभर राष्ट्रपतींच्या कार्याच्या मूल्यमापनाच्या अंशतः आधारे हा मजकूर व ह्या आठवणी लिहीत आहे.

पुढे वाचा

प्राणदाता लुई पाश्चर

काही माणसे मानवजातीच्या कल्याणासाठीच जन्मतात आणि आयुष्यभर त्याच एकमेव ध्येयासाठी कष्ट करीत असतात. लुई पाश्चर त्यांच्यापैकीच एक.
ज्यावेळेला रेल्वे गाड्या प्रवाशांना वेगाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत पोहोचवत होत्या, तारायंत्रे जलद गतीने संदेश पोहचवत होती, वैज्ञानिक किरणोत्सर्गाने अणूपेक्षाही लहान कणांचा शोध घेत होते, त्यावेळेला त्यांच्या तुलनेत वैद्यकशास्त्रात अजूनही अंधारयुगच होते. बालमृत्यूचे प्रमाणही फार मोठे होते. सुखवस्तू घरात जन्म मिळूनही बालकांना पूर्ण आयुष्य जगण्याची खात्री नव्हती. व्हिक्टोरियन काळातसुद्धा, जन्मलेल्या बालकांपैकी एकतरी दगावेलच अशी धास्ती सदैव मनात असे. गर्भवती स्त्रियांना अपत्याला जन्म देण्यास गेलो तर आपला मृत्यू निश्चित ओढवेल अशी भीती मनात सदैव घर करून असे.

पुढे वाचा

मुस्लिमांची सुधारणा शक्य आहे काय?

[श्री इब्न व क (Ibn Warraq) हे मी मुस्लिम का नाही (Why I am not a Muslim) ह्या ग्रंथाचे प्रसिद्ध लेखक आहेत. ते अमेरिकेच्या ‘द सेंटर फॉर एन्क्वायरी’मध्ये काम करतात. त्यांनी आजवर केलेल्या लिखाणात, ‘कुराण’, ‘कोणते कुराण ?’, ‘इस्लाम सोडणे’… इ. लेखन प्रसिद्ध आहे. ते मूळचे भारतीय, आधी युरोपात स्थलांतरित आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या रॅडिकल ह्यूमॅनिस्ट ह्न मार्च २००७ मधील लेखाचा मुक्त अनुवाद ] माझ्या युक्तिवादाची मांडणी :
धर्म-सुधार काय आहे?
1.वैश्विक-मानवाधिकाराचा उद्घोष Universal Declaration of Human Rights (UDHR) जो १९४८ मध्ये करण्यात आला त्याहून हा सुधार वेगळा कसा?

पुढे वाचा

पत्रचर्चा

डॉ. भा.वि.देशकर, ४१, समर्थनगर, पश्चिम, वर्धारोड, नागपूर-५.
श्री. टी.बी. खिलारे यांचे आगस्ट ९६ च्या अंकातील पत्र वाचले. ईश्वराच्या जवळिकीचा दावा त्याच्या मुळापेक्षा फळावरून शोधावा हे विल्यम जेम्स ह्या मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे अगदी योग्यच आहे.
मी सीतारामचंद्रनच्या विधानाकडे एका न्युरोसायंटिस्टच्या दृष्टिकोणातून पाहत आलो आहे. ते हिंदू आहेत, परंपरावादी आहेत व त्यात ते ब्राह्मण आहेत हे मला खिलारे यांच्या लेखातूनच कळले.
सायंटिस्ट म्हणून जात, धर्म कुण्याही विज्ञानवाद्याला मान्य नसावे हे मी आजपर्यंत मानत आलो आहे. विज्ञानातही पौर्वात्य व पाश्चात्त्य विज्ञान असा फरक मानत नाहीत.

पुढे वाचा

इमान

पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्या.मू. महंमद मुनीर आणि न्या.मू. कयानी यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे ? सर्वांनी भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वागता कामा नये असे उत्तर दिलेले आहे. मौ. मौदुदी म्हणाले, भारतीय मुसलमानांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या विरुद्ध वर्तन करता कामा नये. त्यांची निष्ठा पाकिस्तानलाच असली पाहिजे.

पुढे वाचा

‘गुजराथ्यांचे (गुरु)महाराज’

कोणाचेहि वास्तविक दोष काढून दाखविणे म्हटले म्हणजे मोठे कठीण काम होय. जरी आपण त्यांचे हित इच्छून प्रीतीने उपेदश केला तरी तो त्यांस कडू लागेलच. तथापि परस्परांस सन्मार्गास लावण्यास प्रयत्न करीतच असावें; हा आपला धर्म आहे, असें जाणून कोणाची भीड न धरितां आपलें काम बजवावें. या मुंबईत गुजराथी लोकांचे गुरु जांस साधारण शब्दकरून महाराज असी संज्ञा आहे, त्यांचे महात्म फार वाढले आहे. युरोप खंडांत रोमन क्याथोलीक पंथाचा मुख्य गुरु जो पोप त्याचप्रमाणे एथें चारपांच पोप आहेत. यांचा लोकांचे मन, बुद्धी, विचार, आत्मा यांवर इतका अधिकार आहे, की ते सर्वस्वी त्यांचे दासानुदास किंकर होऊन बसले आहेत.

पुढे वाचा