विषय «इतर»

आंबटशौकिनांसाठी ?

ही एक सत्यघटना आहे. स्थळ: पुण्यातल्या एका स्त्री-रोगतज्ज्ञाचा दवाखाना. वेळ: संध्याकाळची
… तो (आणि ती) दोघंही कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती… ओळखीतून सहवास.. प्रेम या पायऱ्या त्यांनी ओलांडल्या होत्या…. दरम्यान एक भलताच पेच उभा राहिला. आपल्याला दिवस गेले आहेत अशी या मुलीची समजूत झाली… आपला हा जीव संपवणं हाच एकमेव मार्ग असं मानण्यापर्यंत तिची मजल गेली. … डॉ. नी तिला एकच प्रश्न विचारला, “तुझा आणि त्याचा संबंध कधी आला होता?” तिला तो प्रश्न समजला नाही. अधिक फोड करून सांगताच ती तिरीमिरीनं म्हणाली, “हे काय भलतंच विचारणं डॉक्टर ?

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळा: भाग-२

निधार्मिकता नाही की नास्तिकता

भारताची राज्यघटना १९ नोव्हेंबर १९४९ रोजी प्रथमतः स्वीकृत करण्यात आली. तिच्या उपोद्घातात (झीशरालश्रश) भारताच्या सेक्युलरपणाचा उल्लेख नाही. सेक्युलर हा शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने घातला गेला. ही दुरुस्ती १ सप्टेंबर १९७६ पासून अमलात आली. दुरुस्ती बिलासोबत जेथे उद्दिष्टे आणि कारणे ह्यांचे विधान असते तेथेही हा शब्द समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय ह्याचा काही खुलासा नाही. किंवा ह्याचे औचित्यसूचक काही निवेदन नाही. सेक्युलर हा शब्द ४२ वी घटनादुरुस्ती लागू होण्यापूर्वी घटनेत फक्त एकदा आला आहे, कलम २५ (२) (र) मध्ये, ते राज्याला आर्थिक वित्तविषयक, राजकीय अथवा धर्मव्यवहारांशी निगडित पण तद्भिन्न जे आचार असतात त्यांविषयी कायदे करण्याचा अधिकार प्रदान करते.

पुढे वाचा

मुलगा की मुलगी ?

‘मला मुलगाच हवा’ या हट्टापायी आपल्या देशात हजारो स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. मुलगा हवा यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक वा आर्थिक कारणे काहीही असोत, उत्क्रांती व विज्ञान मात्र यासंदर्भात फार वेगळे चित्र उभे करत आहे. मुलीपेक्षा मुलगा त्याच्या आईला फार तापदायक ठरू शकतो. जन्माच्या वेळचे मुलाचे वजन, पुरुषजातीतील टेस्टोस्टेरॉन ग्रंथिस्रावाचा वाढता प्रभाव, वा मुलांमधील जन्मतःच असलेला व्रात्यपणा इत्यादी गोष्टी मुलाला जन्म देणाऱ्या आईच्या जिवावर उठू पाहत असतात. शेफील्ड विद्यापीठात पुनरुत्पादन वर्तणूक या विषयावर संशोधन करत असलेल्या विपी लुम्मा या प्राध्यापिकेच्या मते जन्माला घातलेला प्रत्येक मुलगा सामान्यपणे आईचे आयुष्य चौतीस आठवड्यांनी कमी करत असतो.

पुढे वाचा

धक्का देणारी विधाने

पूर्वीच्या काळी वंशावरून माणसांना कमी दर्जाचे ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. आजदेखील तसे अजून चालू असेल. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना मानवी व्यवहाराचे मानदंड म्हणून स्वीकारण्यात आले. कोणताही मानव-समूह समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना लायक आहे असे सिद्ध करण्यासाठी मग विविध देशांत राहणारे मानवसमूह हे बौद्धिक, वैचारिक व नैतिक क्षमतेच्या बाबतीत समान आहेत असे गृहीत धरण्यात आले. या गृहीत कृत्यालाच पुढे एक प्रकारचे नैतिक वलय प्राप्त झाले. खरे म्हणजे असे गृहीत धरण्याची काही आवश्यकता नव्हती. प्रत्येक माणूस-मग तो कोणत्याही वंशाचा, देशाचा असो, तो केवळ माणूस आहे म्हणूनच समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना पात्र आहे या विधानाला कोणताही बाह्य आधार देण्याची आवश्यकता नाही.

पुढे वाचा

मानवी लैंगिक जीवन – समज/गैरसमज

(१) पुरुषांच्या लैंगिक समस्या कोणकोणत्या असतात ?
अविवाहित/विवाहित पुरुषांमध्ये जवळ जवळ सर्वच लैंगिक समस्या थोड्या प्रमाणात कधी ना कधी तरी अनुभवास येतात. त्यांमध्ये नपुंसकत्व, शीघ्रवीर्यपतन, विलंबित वीर्यपतन, कामपूर्तीचा अभाव, कामपूर्ती उशीरा होणे, कामवासना अति वाढणे, कामवासना कमी होणे, वेदनायुक्त संभोग ह्या समस्या असतात. त्यांतील काही समस्या परिस्थितीनुरूप असतात, इतर शारीरिक व मानसिक कारणांनी लैंगिक समस्या निर्माण होतात. ह्याची सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने आपण पुढे पाहणार आहोत.
पुरुषांच्या गैरसमजामुळे ते घाबरतात व समस्या स्वतः निर्माण करतात, त्यात, हस्तमैथुन वाईट असते, स्वप्नातील वीर्यपतन (चुकीचा शब्दप्रयोग स्वप्नदोष) वाईट असते, अति हस्तमैथुनाने वीर्य पातळ होते, शिश्न वाकडे होते, नपुंसकत्व येते, पिता बनू शकत नाही, शीघ्रवीर्यपतन होते, वजन कमी होते.

पुढे वाचा

आजची एक भूमिकन्या सीता

एका भारतात दोन-तीन, अनेक भारत आहेत. शहरी, शिकले सवरलेले, सुस्थित भारतीयांची जी समाजस्थिती दिसते, त्यांची जी संस्कृती पाहायला मिळते तिच्यावरून संपूर्ण समाजाची कल्पना करणे योग्य होणार नाही. ग्रामीण भागात जन्या रूढी, रीति-रिवाज टिकून आहेत. बायकांच्या बाबतीत स्त्रियाच स्त्रियांच्या वैरिणी हे सत्य पदोपदी आढळते. तहत हेचा सासुरवास, हंडाबळी, बायको टाकून देणे, एकीच्या उरावर दुसरी आणून बसविणे असे अनेक प्रकार चालू असतात. बालविवाह होत आहेत ते तर टी.व्ही.वर दिसतात, पण टीव्हीवर न दिसणारे अनेक प्रकार आहेत. भूतपिशाच्चाची बाधा, भानामती, करणी, अंगात येणे असे अनेक प्रकार स्त्रीमनोरुग्णांचे आहेत.

पुढे वाचा

नकोशी !

इ.स. २००५ च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील गोष्ट. हॉस्पिटलच्या सभोवतालच्या परिसरात ताजुद्दीन बाबांच्या दर्यासमोर वार्षिक उरूस जोरात होता. आमच्या प्रादेशिक पातळीवरच्या ह्या शासकीय रुग्णालयात रोज सुमारे २०० ते २५० रुग्णांवर उपचार होतात. पण उरुसाच्या वेळी आमच्या परिसरातल्या एका शेडवजा इमारतीत जिला दर्गाह म्हणतात ह्या १५ दिवसांत रोज अक्षरशः हजारो भुते शांत करण्यात येत होती. बाबांच्या कृपेने चमत्कार घडून ती भुते झाडावरून वानर पळावेत तशी रुग्णांच्या अंगातून निघून जातात असा लक्षावधींचा विश्वास होता. ह्या यात्रावजा उरुसात रस्त्याच्या एका कडेला एक सावळीशी तिशी-बत्तीशीची मुलगी आपल्या दोन लहानग्यांना सांभाळत एक चहाचा ठेला चालवीत होती.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

डोकं कसं चालतं? (मेंदू आणि मन याबद्दल)
प्रकाशक आकार फाऊंडेशन, सांगली. प्रथमावृत्ती मे २००७. पृष्ठे १०४. किं.१०० रु.) डॉ. उल्हास लुकतुके
लेखक डॉ. प्रदीप पाटील स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी एम.ए. (क्लिनिकल सायकॉलॉजी) ही पदवी घेतली आहे. मानसिक आरोग्याची सामाजिक जाण वाढावी यासाठी काम करणाऱ्या आकार फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय सेवा, शिक्षकी कार्य, सामाजिक उद्बोधन, लेखन, व्याख्याने यामध्ये ते कार्यमग्न असतात. त्यांचा मुक्काम सांगली येथे असतो.
माणसे जशी वागतात तशी का वागतात हे एक कोडे आहे. शायर अकबर इलाहाबादी म्हणतात ख्याल दौडा निगाह उठी क़लम ने लिखा ज़बान बोली मगर वही दिल की उलझनें किसी ने इसकी गिरह न खोली । विचार धावला, नजर उठली (नजरानजर झाली), लेखणीने लिहिले, जीभ बोलली, पण मनाची (हृदयाची) तीच कोडी, त्यांची गाठ कोणी सोडवली नाही.]

पुढे वाचा

अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!!
आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा आणि लेखनकलेचा काळजी करण्याइतका संकोच होत आहे. आता सुकर्ण (रोलळश्रश) आले आहेत. आधी पत्र लिहा, मग उत्तराची वाट पाहा ह्या अभिक्रमांना उल्हास लागतो, चिकाटी लागते. त्याला फाटा देऊन वाचक सरळ संवाद साधतात.

पुढे वाचा

विवेकवादाला एवढे नक्कीच साधेल

धर्म ही एक सामाजिक आवश्यकता आहे असे म्हणता येईल. प्राचीन काळात धर्माने पार पाडलेली सामाजिक कार्ये म्हणजे, (१) विशिष्ट कर्मकांडांच्या निर्मितीमुळे समाज एकत्रित येणे. (२) भीती, अनिश्चितता या भावनांपासून माणसाची बऱ्या प्रमाणात सुटका होणे. (३) मरणाची व अज्ञाताची भीती बरीचशी कमी होणे. (४) मानवी जीवनात देवाचे साह्य मिळण्याची आशा निर्माण होणे. त्यामुळे माणसाची वैफल्यग्रस्तता कमी झाली व त्याला संकटकाळात आधार प्राप्त झाला. पुढे धर्मात नवनवीन कल्पनांची भर पडत गेली. काही संकल्पना मागे पडल्या. धर्माचे स्वरूपही बदलत गेले. या बदलत्या धर्माचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.

पुढे वाचा