विषय «इतर»

ईश्वराची प्रार्थना तारक की मारक?

असंख्य माणसे रोज अगदी नियमितपणे ईश्वराची प्रार्थना करीत असतात. मात्र अशा माणसांना ईश्वराची प्रार्थना का करावीशी वाटते, याची अनेक कारणे संभवतात. कोणी भाविक माणसे म्हणतील, की आम्ही अमुक एका धर्माचे प्रामाणिक अनुयायी असल्यामुळे, आमच्या ईश्वराची प्रार्थना करणे, हे आमचे पवित्र कर्तव्यच आहे. दुसरी कोणी माणसे म्हणतील, की आमच्या मनातील अनेक कामना ईश्वराची आराधना करून यथावकाश सफळसंपन्न होतील, अशी आमची श्रद्धा असल्यामुळे, आम्ही त्याची प्रार्थना करतो. तर अन्य कोणी माणसे असे म्हणतील, की आम्हाला या आयुष्यात पुण्यसंचय करून, इहलोकीची यात्रा संपल्यावर स्वर्गप्राप्ती करून घ्यावयाची आहे, म्हणून आम्ही निरतिशय प्रेमाने ईश्वराची प्रार्थना करीत करीत, या भूलोकीचा मार्ग आक्रमित असतो.

पुढे वाचा

जुनाच भ्रष्टाचार बरा?

इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून च्या एका वार्ताहराने मला अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात वापरत असलेल्या ‘आधुनिक लॉबीइंगच्या प्रकारां’वर माझे मत विचारले. [लॉबीइंग, lobbying म्हणजे कोणत्याही दबावगटाने राष्ट्रीय धोरण आपल्या गरजांनुसार व्हावे, यासाठी केलेले प्रयत्न आपल्याकडे आज या अर्थी ‘फील्डिंग लावणे’ हा शब्दप्रयोग केला जातो. अमेरिकेत लॉबीइंग ‘ऑफिशियल’ व कायदेशीर आहे. सं.] माध्यमांमध्ये ‘स्टोऱ्या’ पेरणे, वैज्ञानिक व विचारवंतांशी ‘संवाद’ साधणे, आमदार-खासदारांचे थेट लॉबीइंग, अशी जी तंत्रे आज अमेरिकन कंपन्या भारतात वापरत आहेत, त्यांवर तो वार्ताहर अहवाल तयार करत होता.
माझे उत्तर होते की थेट लाच देणे आजही आहेच, पण जरा ‘दडवून’ ; आणि माझे मत विचारलेच तर मला जुना भारतीय नमुन्याचा भ्रष्टाचार नव्यापेक्षा बरा वाटतो.

पुढे वाचा

समूहाची बुद्धिमत्ता

कॉमनसेन्स हा व्यक्तीच्या पातळीवरसुद्धा सहसा आढळत नाही, हा नेहमीचा अनुभव असताना समूहामध्ये त्याचा शोध घेणे हास्यास्पद ठरेल असे वाटण्याची शक्यता आहे. एखादी गर्दी उपयुक्त विचाराला जन्म देऊ शकते हे कधीच अपेक्षित नाही. गर्दीतील बहुमत व अविचारीपणा अनेक वेळा एकट्यादुकट्याला तोंडघशी पाडतात. जातीपंचायतीतील निर्णयाविरुद्ध एक शब्द जरी उच्चारला तरी आयुष्यातून उठावे लागते. श्रेष्ठींचा दबाव व दहशत, ही तर शाळाकॉलेजमधील तरुण-तरुणींना कायमचीच भेडसावणारी समस्या असते.
परंतु समूहाला शहाणपणाचा विचार अजिबात करता येत नाही अशी परिस्थिती नक्कीच नसावी. नोकरशाहीचा पाया सर्व छोट्या-मोठ्या समूहांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीवर व त्यास अनुसरून घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे.

पुढे वाचा

सपाटीकरणाचा सपाटा आणि विश्वाचे ‘वाट्टोळे’ वास्तव

टॉमस एल्. फ्रीडमन, दि वर्ल्ड इज् फ्लॅट : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द्वेन्टीफर्स्ट सेंचुरी, फरार-स्ट्राऊस अँड गिरॉक्स, न्यूयॉर्क २००५, पृष्ठे : ४८८. टॉमस फ्रीडमन हे न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाचे परराष्ट्रव्यवहार प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांना पुलित्झर पुरस्काराने तीनदा गौरविले गेले आहे. बैरुत टु जेरुसलेम (१९८९), दि लेक्सस अँड दि ऑलिव्ह ट्री (१९९९) आणि लाँगिट्यूडस् अँड अॅटिट्यूडस् (२००२) या त्यांच्या ग्रंथांचे जगभरच्या जाणकारांनी प्रचंड कौतुक केले आहे. जागतिकीकरण, माहिती-क्रांती आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे त्यांच्या विशेष व्यासंगाचे विषय आहेत. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत त्यांचा नित्य संचार असून देशोदेशीच्या दिग्गजांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत.

पुढे वाचा

स्वातंत्र्ये आणि सुरक्षा

स्वातंत्र्य हे विकासाचे केवळ अंतिम साध्यच नाही, तर एक कळीचे आणि परिणामकारक साधनही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यांचे परिणाम आणि त्यांचे परस्परसंबंध यांच्या तपासातून असे दिसते की स्वातंत्र्ये एकमेकांना पूरक ठरतात. एखाद्या व्यक्तीपाशी नेमके काय साधायची क्षमता आहे, हे आर्थिक संधी, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक सोईसुविधा, मूलभूत आरोग्य आणि शिक्षण आणि नव्याने प्रश्नांची उकल करण्याचे प्रयत्न, अशा साऱ्यांतून ठरत असते. या सर्व बाबी फार मोठ्या प्रमाणात एकमेकांना पूरक असतात, एकमेकींचा वापर करतात आणि एकमेकींना बळ देतात. स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांचे एकत्रित आकलनच होऊ शकते.

पुढे वाचा

दि. य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका(एक रूपरेषा)

कशी बरे सुरुवात करावी? गेले काही दिवस हाच प्रश्न सतावत आहे. सुनीती देव यांचा ‘दि.य. देशपांडे यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ या विषयावर लेख लिहून पंधरा दिवसांत हवा आहे असा फोन आला आणि मनावर एक प्रकारचे दडपण आले. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या तत्त्वज्ञानावर लिहिणे अतिशय अवघड काम आहे याची मला जाणीव आहे. तरीपण त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे धाडस करीत आहे.
स्वतः दि. य. आपल्या तत्त्वज्ञानात्मक भूमिकेबद्दल काय म्हणतात हे प्रारंभीच लक्षात घेणे इष्ट ठरेल आणि चुका होण्याची शक्यता कमी राहील.

पुढे वाचा

उपयोगितावाद (३): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ३: उपयोगितेच्या तत्त्वाचा अंतिम प्रेरक
कोणत्याही नैतिक मानदंडाविषयी असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो आणि ते योग्यच आहे की त्याचा आधार काय आहे? तो मानला जाण्याचे कारण कोणते? किंवा त्याच्या बंधकत्वाचा उगम कशात आहे? त्याला त्याचा बंधक प्रभाव कोठून प्राप्त होतो? या प्रश्नाला उत्तर पुरविणे हा नैतिक तत्त्वज्ञानाचा अवश्य भाग आहे.

पुढे वाचा

विवेकवादी मनुष्याला रडूही येते!

एकोणीसशे ऐंशी-ब्याऐंशीच्या सुमाराला मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर विभागाने अंधश्रद्धा, देवभोळेपणा वगैरे विषयांशी संबंधित एक परिसंवाद भरवला. त्या काळचे धनवटे रंग मंदिर पूर्ण भरले होते. सहभागी वक्त्यांमध्ये अनेक ख्यातनाम माणसे होती. सर्वात प्रभावी भाषण झाले ते मात्र अतिशय सौम्य शैलीतले आणि अगदी साध्या दिसणाऱ्या माणसाचे. हे होते प्राध्यापक दि.य. देशपांडे विदर्भात ‘दिय’, ‘डीवाय’ किंवा क्वचित् ‘नाना’ म्हणून उल्लेखले जाणारे तत्त्वज्ञ. दिय आणि त्यांच्या पत्नी मनूताई नातू यांच्या कहाण्या विदर्भात, विशेषतः अमरावतीत, प्रेमादराने सांगितल्या जात आजही कधीकधी अशा कहाण्यांच्या ‘फटाक्यांची माळ’ एखाद्या संध्याकाळच्या गप्पासत्राला उजळवून जाते.

पुढे वाचा

मासिकाचे स्वरूप व धोरण

मासिकाचे स्वरूप व धोरण गेली आठ वर्षे राहिले तेच राहावे. उदा. त्यात जाहिराती घेऊ नयेत. देणग्या मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत. विशेषतः ज्यामुळे आपल्याला किंचितही मिंधेपणा येईल अशा देणग्या अनाहूत आल्या तरी स्वीकारू नयेत.
मासिकाचे गेल्या आठ वर्षांत एक विशिष्ट रूप बनले आहे. त्याला एक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून त्याला एक दर्जा आहे. या दोन्ही गोष्टी कायम राहाव्यात. मासिकाला वर्गणीदार फार नाहीत हे खरे आहे. पण केवळ वर्गणीदार वाढावेत म्हणून त्याचा दर्जा खाली आणू नये. तसेच ते रंजक करण्याकरिताही त्यात फारसा बदल करू नये.

पुढे वाचा

विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?

विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलाग. असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे.
या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.

पुढे वाचा