विषय «इतर»

शेतकऱ्यांच्या आत्महत्याः डुर्खाइमच्या तत्त्वांनुसार विश्लेषण

जमिनीवरील वास्तवः
मराठेशाहीच्या व नंतरच्या (१८०३-१८५३) निजामशाही काळात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये श्रमविभाजनाची आणि श्रममूल्याची बलुतेदारी पद्धत होती. ब्रिटिश राजवटीत जमिनींचे मालकी हक्क शेतकऱ्यांना देण्याची रयतवारी पद्धत अंमलात आली. सुरुवातीला करभार कमी होता, पण नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेला. वसुलीसाठी मोठी नोकरशाही उभारली गेली. या पद्धतीत उच्चवर्णीय (ब्राह्मण, राजपूत) जातींनी मालकी हक्क प्रस्थापित केले. यात कुणब्यांचा वाटा सर्वाधिक होता. ‘खालच्या’ जाती कुळे बनून राहिल्या, तर अस्पृश्य (१५ ते २० टक्के लोक) भूमिहीन झाले. काही अस्पृश्यांना वतनी जमिनी होत्या, पण त्या भरड आणि हलक्या होत्या.

पुढे वाचा

अनुल्लेखनीय अडीच अक्षरे वर्ग

[डिसेंबर ‘९२ ते जानेवारी ‘९३ या काळात डेव्हिड बार्सामियनने (David Barsamian) नोम चोम्स्कीच्या तीन मुलाखती घेतल्या. १९९४ साली ओडोनियन (Odonian) प्रेसने या मुलाखती मूठभर श्रीमंत आणि अनेक अस्वस्थ (द प्रॉस्परस फ्यू अँड द रेस्टलेस मेनी), या नावाने प्रकाशित केल्या. मुलाखती चौदा भागांत/प्रकरणांत विभागल्या आहेत. त्यापैकी ‘अनुल्लेखनीय पंचाक्षरी शब्द’, द अन्मेन्शनेबल फाईव्ह-लेटर वर्ड या प्रकरणाचा हा संक्षेप.] बार्सामियनः असे सांगितले जाते की वैचारिका (Ideology) आणि प्रचार (Propaganda) हे इतर संस्कृतींमध्ये दिसतात. अमेरिकेत ‘तसे काही’ नसतेच. वर्ग, Class, ही भानगडही त्याच प्रकारची आहे.

पुढे वाचा

सहकारी ग्रामीण पतव्यवस्था

संयुक्त प्रागतिक आघाडीचे युपीए सरकार केंद्रात स्थापन झाल्यावर समान किमान कार्यक्रम जाहीर झाला. हा कार्यक्रम आघाडीच्या सर्व घटकांनी मंजूर केला व त्याप्रमाणे जमेल तशी अंमलबजावणी चालू आहे.
या कार्यक्रमांत सहकार या विषयावर दोन मुद्दे अंतर्भूत केले आहेत. आज ग्रामीण सहकारी पतव्यवस्था दयनीय अवस्थेत आहे. थकबाकी, भ्रष्ट व्यवहार, अकार्यक्षम नोकरशाही, बेताल नेतृत्व यामुळे काही राज्यांत ही चळवळ कोमामध्ये आहे, काही ठिकाणी लुळी पडली आहे तर काही जागी ती निर्जीव झाली आहे. या व्यवस्थेला संजीवनी देऊन ती ऊर्जितावस्थेत आणण्याचे आश्वासन या कार्यक्रमांत दिले आहे.

पुढे वाचा

केंद्रित संपत्तीचे पुनर्वाटप शक्य होईल?

नुकतेच अमेरिकन कोट्यधीश बिल गेटस् यांनी असे जाहीर केले की ते निवृत्त होत असून त्यांच्या संपत्तीचा ९५ टक्के भाग ते एका न्यासाच्या स्थापनेसाठी वर्ग करणार आहेत. या न्यासाच्या अध्यक्षा त्यांच्या पत्नी असतील. या परोपकारी, भूतदयाधिष्ठित न्यासाचा उपयोग गरीब, विकसनशील देशातील एडस् वगैरे समस्यांच्या परिहारासाठी होणार आहे. पन्नाशीतल्या या उमद्या कोट्यधीशाच्या या घोषणेमुळे प्रभावित होऊन वॉरन बफे नावाच्या तुल्यबळ धनाढ्यांनीही आपल्या संपत्तीचा ३३ टक्के वाटा या न्यासाला देऊ केला आहे. गेटस् यांनी असेही सांगितले की मी माझ्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे.

पुढे वाचा

जुनाच भ्रष्टाचार बरा?

इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून च्या एका वार्ताहराने मला अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात वापरत असलेल्या ‘आधुनिक लॉबीइंगच्या प्रकारां’वर माझे मत विचारले. [लॉबीइंग, lobbying म्हणजे कोणत्याही दबावगटाने राष्ट्रीय धोरण आपल्या गरजांनुसार व्हावे, यासाठी केलेले प्रयत्न आपल्याकडे आज या अर्थी ‘फील्डिंग लावणे’ हा शब्दप्रयोग केला जातो. अमेरिकेत लॉबीइंग ‘ऑफिशियल’ व कायदेशीर आहे. सं.] माध्यमांमध्ये ‘स्टोऱ्या’ पेरणे, वैज्ञानिक व विचारवंतांशी ‘संवाद’ साधणे, आमदार-खासदारांचे थेट लॉबीइंग, अशी जी तंत्रे आज अमेरिकन कंपन्या भारतात वापरत आहेत, त्यांवर तो वार्ताहर अहवाल तयार करत होता.
माझे उत्तर होते की थेट लाच देणे आजही आहेच, पण जरा ‘दडवून’ ; आणि माझे मत विचारलेच तर मला जुना भारतीय नमुन्याचा भ्रष्टाचार नव्यापेक्षा बरा वाटतो.

पुढे वाचा

समूहाची बुद्धिमत्ता

कॉमनसेन्स हा व्यक्तीच्या पातळीवरसुद्धा सहसा आढळत नाही, हा नेहमीचा अनुभव असताना समूहामध्ये त्याचा शोध घेणे हास्यास्पद ठरेल असे वाटण्याची शक्यता आहे. एखादी गर्दी उपयुक्त विचाराला जन्म देऊ शकते हे कधीच अपेक्षित नाही. गर्दीतील बहुमत व अविचारीपणा अनेक वेळा एकट्यादुकट्याला तोंडघशी पाडतात. जातीपंचायतीतील निर्णयाविरुद्ध एक शब्द जरी उच्चारला तरी आयुष्यातून उठावे लागते. श्रेष्ठींचा दबाव व दहशत, ही तर शाळाकॉलेजमधील तरुण-तरुणींना कायमचीच भेडसावणारी समस्या असते.
परंतु समूहाला शहाणपणाचा विचार अजिबात करता येत नाही अशी परिस्थिती नक्कीच नसावी. नोकरशाहीचा पाया सर्व छोट्या-मोठ्या समूहांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीवर व त्यास अनुसरून घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे.

पुढे वाचा

हे भाकरीचे युग

हे माहितीचे युग नाही
हे माहितीचे युग नाहीच
बातम्या विसरा रेडिओ विसरा
आणि तो धूसर चौकोनी पडदाही
हे भाकरीचे आणि तोंडी लावण्यांचे युग आहे.
लोक भुकेले आहेत.
आणि एक सुंदर शब्द आहे, भाकरी हजारोंसाठी
[Natural Capitalism या पुस्तकाच्या दर्शनी पानावरील ही कविता. (पॉल हॉकेन, अमरी लव्हिन्स, एल. हन्टर लव्हिन्स; लिटल, ब्राऊन, २०००)]

उपयोगितावाद (४): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळीी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ४: उपयोगितेच्या सिद्धान्ताची कोणत्या प्रकारची सिद्धी शक्य आहे?
अंतिम साध्यांविषयीच्या प्रश्नांची सामान्यपणे स्वीकृत अर्थाने सिद्धी शक्य नसते असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. युक्तिवादाने सिद्धी अशक्य असणे ही गोष्ट सर्व मूल सिद्धान्तांना समान आहे, ज्ञानाच्या आदिसिद्धान्ताला तसेच आचाराच्या आदिसिद्धान्तालाही. परंतु यांपैकी पहिले वास्तवविषयक असल्यामुळे त्यांच्याविषयी वास्तवविषयक अवधारणांच्या शक्तींना इंद्रिये आणि आंतरसंज्ञा यांना साक्षात् आवाहन करणे शक्य आहे.

पुढे वाचा

शेतीची सद्यःस्थिती व पर्यायी दिशा

शेती व शेतकरी यांची सद्यःस्थिती सामान्य नागरिकांनीदेखील समजून घेणे, या प्रश्नाविषयी संवेदनशील होणे व यावर स्थायी उपाय सुचविण्यासाठी आपलाही वाटा उचलणे गरजेचे आहे.

१.०. शेतीची सद्यःस्थितीः १.१. शेतजमीनधारणाः
आपल्या देशातील लागवडीखाली असलेल्या जमीनधारणेचा विचार करता खाली चित्र दिसते.

जमीनधारणा प्रकार  जमीनधारक कुटुंबांची संख्या %  त्यांच्याकडील जमिनीचे क्षेत्रफळ %
अत्यल्प (१ हेक्टर खालील)  ५९.४ १५.
अल्प (१-२ हेक्टर)  १८.८ १७.४
अर्ध-मध्यम (२-४ हेक्टर)  १३.१ २३.३
मध्यम (४-१० हेक्टर)  ७.१ २७.१
मोठे (१० हेक्टरच्या वर)  १७.३  

यावरून असे लक्षात येते की आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी (७२.२%) ‘अत्यल्प व अल्प’ या गटातील आहेत व त्यांच्या हातात कसण्यासाठी देशातील लागवडीखाली असलेल्या शेतजमिनीपैकी केवळ (३२.४%) जमीन आहे.

पुढे वाचा

शेतकऱ्याच्या दुरवस्थेची वास्तविकता

गेल्या २५-३० वर्षांतील शेतीचा अनुभव आजच्या शेवटच्या टप्प्यात मात्र कटु वाटू लागला. सन १९७२ च्या दुष्काळापासून शेतीउत्पादनातील चढउतार पाहावे लागले. शेती निसर्गावर अवलंबून की नशिबावर हेच आज कळेनासे झाले आहे.
माझे वडील ‘अण्णा’ यांनी कराड तालुक्यातील शेतांत १९५२ नंतर दोन विहिरी पाडल्या. जमिनीस बांध घातले. शेतीतील अनपेक्षिततेचे ओझे सहन केले. बँका- सोसायट्यांच्या कर्ज-थकबाकीबद्दल अनेक वेळा अपमानास्पद घटना विसरून शेती-व्यवसाय चालू ठेवला. वरील दोन्ही विहिरींत मात्र दुर्दैवाने पाणी लाभले नाही. त्याकाळी बागायत जमिनीतून उत्पन्न बरे मिळत होते, परंतु जिवंत बारमाही पाणी नसल्यामुळे त्यांचे शेतीतील आयुष्य अत्यंत कष्टप्रद होते.

पुढे वाचा