विषय «इतर»

उपयोगितावाद (४): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळीी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ४: उपयोगितेच्या सिद्धान्ताची कोणत्या प्रकारची सिद्धी शक्य आहे?
अंतिम साध्यांविषयीच्या प्रश्नांची सामान्यपणे स्वीकृत अर्थाने सिद्धी शक्य नसते असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. युक्तिवादाने सिद्धी अशक्य असणे ही गोष्ट सर्व मूल सिद्धान्तांना समान आहे, ज्ञानाच्या आदिसिद्धान्ताला तसेच आचाराच्या आदिसिद्धान्तालाही. परंतु यांपैकी पहिले वास्तवविषयक असल्यामुळे त्यांच्याविषयी वास्तवविषयक अवधारणांच्या शक्तींना इंद्रिये आणि आंतरसंज्ञा यांना साक्षात् आवाहन करणे शक्य आहे.

पुढे वाचा

शेतीची सद्यःस्थिती व पर्यायी दिशा

शेती व शेतकरी यांची सद्यःस्थिती सामान्य नागरिकांनीदेखील समजून घेणे, या प्रश्नाविषयी संवेदनशील होणे व यावर स्थायी उपाय सुचविण्यासाठी आपलाही वाटा उचलणे गरजेचे आहे.

१.०. शेतीची सद्यःस्थितीः १.१. शेतजमीनधारणाः
आपल्या देशातील लागवडीखाली असलेल्या जमीनधारणेचा विचार करता खाली चित्र दिसते.

जमीनधारणा प्रकार  जमीनधारक कुटुंबांची संख्या %  त्यांच्याकडील जमिनीचे क्षेत्रफळ %
अत्यल्प (१ हेक्टर खालील)  ५९.४ १५.
अल्प (१-२ हेक्टर)  १८.८ १७.४
अर्ध-मध्यम (२-४ हेक्टर)  १३.१ २३.३
मध्यम (४-१० हेक्टर)  ७.१ २७.१
मोठे (१० हेक्टरच्या वर)  १७.३  

यावरून असे लक्षात येते की आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी (७२.२%) ‘अत्यल्प व अल्प’ या गटातील आहेत व त्यांच्या हातात कसण्यासाठी देशातील लागवडीखाली असलेल्या शेतजमिनीपैकी केवळ (३२.४%) जमीन आहे.

पुढे वाचा

स्वातंत्र्ये आणि सुरक्षा

स्वातंत्र्य हे विकासाचे केवळ अंतिम साध्यच नाही, तर एक कळीचे आणि परिणामकारक साधनही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यांचे परिणाम आणि त्यांचे परस्परसंबंध यांच्या तपासातून असे दिसते की स्वातंत्र्ये एकमेकांना पूरक ठरतात. एखाद्या व्यक्तीपाशी नेमके काय साधायची क्षमता आहे, हे आर्थिक संधी, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक सोईसुविधा, मूलभूत आरोग्य आणि शिक्षण आणि नव्याने प्रश्नांची उकल करण्याचे प्रयत्न, अशा साऱ्यांतून ठरत असते. या सर्व बाबी फार मोठ्या प्रमाणात एकमेकांना पूरक असतात, एकमेकींचा वापर करतात आणि एकमेकींना बळ देतात. स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांचे एकत्रित आकलनच होऊ शकते.

पुढे वाचा

दि. य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका(एक रूपरेषा)

कशी बरे सुरुवात करावी? गेले काही दिवस हाच प्रश्न सतावत आहे. सुनीती देव यांचा ‘दि.य. देशपांडे यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ या विषयावर लेख लिहून पंधरा दिवसांत हवा आहे असा फोन आला आणि मनावर एक प्रकारचे दडपण आले. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या तत्त्वज्ञानावर लिहिणे अतिशय अवघड काम आहे याची मला जाणीव आहे. तरीपण त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे धाडस करीत आहे.
स्वतः दि. य. आपल्या तत्त्वज्ञानात्मक भूमिकेबद्दल काय म्हणतात हे प्रारंभीच लक्षात घेणे इष्ट ठरेल आणि चुका होण्याची शक्यता कमी राहील.

पुढे वाचा

उपयोगितावाद (३): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ३: उपयोगितेच्या तत्त्वाचा अंतिम प्रेरक
कोणत्याही नैतिक मानदंडाविषयी असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो आणि ते योग्यच आहे की त्याचा आधार काय आहे? तो मानला जाण्याचे कारण कोणते? किंवा त्याच्या बंधकत्वाचा उगम कशात आहे? त्याला त्याचा बंधक प्रभाव कोठून प्राप्त होतो? या प्रश्नाला उत्तर पुरविणे हा नैतिक तत्त्वज्ञानाचा अवश्य भाग आहे.

पुढे वाचा

सपाटीकरणाचा सपाटा आणि विश्वाचे ‘वाट्टोळे’ वास्तव

टॉमस एल्. फ्रीडमन, दि वर्ल्ड इज् फ्लॅट : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द्वेन्टीफर्स्ट सेंचुरी, फरार-स्ट्राऊस अँड गिरॉक्स, न्यूयॉर्क २००५, पृष्ठे : ४८८. टॉमस फ्रीडमन हे न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाचे परराष्ट्रव्यवहार प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांना पुलित्झर पुरस्काराने तीनदा गौरविले गेले आहे. बैरुत टु जेरुसलेम (१९८९), दि लेक्सस अँड दि ऑलिव्ह ट्री (१९९९) आणि लाँगिट्यूडस् अँड अॅटिट्यूडस् (२००२) या त्यांच्या ग्रंथांचे जगभरच्या जाणकारांनी प्रचंड कौतुक केले आहे. जागतिकीकरण, माहिती-क्रांती आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे त्यांच्या विशेष व्यासंगाचे विषय आहेत. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत त्यांचा नित्य संचार असून देशोदेशीच्या दिग्गजांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत.

पुढे वाचा

मासिकाचे स्वरूप व धोरण

मासिकाचे स्वरूप व धोरण गेली आठ वर्षे राहिले तेच राहावे. उदा. त्यात जाहिराती घेऊ नयेत. देणग्या मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत. विशेषतः ज्यामुळे आपल्याला किंचितही मिंधेपणा येईल अशा देणग्या अनाहूत आल्या तरी स्वीकारू नयेत.
मासिकाचे गेल्या आठ वर्षांत एक विशिष्ट रूप बनले आहे. त्याला एक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून त्याला एक दर्जा आहे. या दोन्ही गोष्टी कायम राहाव्यात. मासिकाला वर्गणीदार फार नाहीत हे खरे आहे. पण केवळ वर्गणीदार वाढावेत म्हणून त्याचा दर्जा खाली आणू नये. तसेच ते रंजक करण्याकरिताही त्यात फारसा बदल करू नये.

पुढे वाचा

विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय?

विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलाग. असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे.
या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.

पुढे वाचा

दि. य. एक माणूस

दि.यं.च्याबद्दल काही लिहिणे म्हणजे तो एक शुद्ध औपचारिकपणाचा पाठ ठरेल की काय अशी भीती वाटते. ते मला जमणार नाही आणि दि.यं. ना (नानांना) रुचणार नाही याची जाणीव असूनही त्यांच्याबद्दल लिहिण्याचे हे धारिष्ट्य करीत आहे. काही वर्षांपूर्वी वहिनींनी (नातूबाई) नानांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध करावे व त्याबरोबरच त्यांच्याबद्दलच्या आठवणींचा एक भाग संकलित करून तो भाग मी संपादित करावा अशी सूचना केली होती. नानांना याचा वास आला आणि त्यांनी तात्काळ आपली नाराजी दर्शविली. प्रसिद्धिविन्मुख अशा नानांना मी केलेले मूल्यमापनाचे कृत्य कितपत रुचेल याची दाट शंका आहे.

पुढे वाचा

सुधारक दि. य. देशपांडे

मोठा माणूस गेला की त्याच्या निधनाने आपल्याला दुःख होते. त्याच्या जाण्याने एखाद्या क्षेत्राची अतोनात हानी झाली असे आपण म्हणत असतो. तो बरेचदा एक उपचार असतो. कारण वृद्धापकाळामुळे त्याचे जगणे नुसते क्रियाशून्य अस्तित्व बनले असते. तरी त्याने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तसे म्हणतो. सभ्य समाजाची ही रीत आहे.
प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाने झालेली हानी खरीखुरी आहे. ते एकोणनव्वदाव्या वर्षी वारले, (३१ डिसेंबर २००५) त्याआधी सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचे तर्कशास्त्रावरचे एक पुस्तक प्रकाशित झाले. तर्कशास्त्रावरील एका अभिजात ग्रंथाचे ते भाषांतर आहे.

पुढे वाचा