विज्ञान हा कधीच मूल्य-विरहित उद्योग नव्हता. आणि विज्ञानाच्या दुतोंडीपणाची व दुधारीपणाची वस्तुस्थिती अत्यंत नियमितपणे विसाव्या शतकात प्रकट झालेली आहे. ‘रसायनशास्त्राद्वारे अधिक सुखकर जीवन’ ही घोषणा रंगविली जाण्यापूर्वीच पहिल्या महायुद्धाच्या आघाडीवर क्लोरीन वायूच्या ढगांनी मृत्यूचे थैमान घातले होते. त्यानंतर दुसरे महायुद्ध व शीतयुद्ध यांनी अणुविभाजन व अणुसम्मीलन यात दडलेल्या भयावह शक्तीचे दर्शन घडविले आणि एका नवीन प्रकारच्या प्रलयंकारी भीतीला जन्म दिला. त्यानंतर रेचल कार्सन आल्या. मानवनिर्मित रसायने विस्तृत प्रमाणावर परिसरात विखुरली गेल्याने जागतिक पातळीवरील पर्यावरणाला निर्माण झालेल्या धोक्याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले.
विषय «इतर»
विज्ञानाचे सामाजिक व्यवहारातील स्थान आणि वैज्ञानिकांचे सामाजिक उत्तरदायित्व
विज्ञानाचे समाजव्यवहारातील स्थान काळानुसार बदलत गेलेले आहे, आणि त्याला अनुरूप असा बदल वैज्ञानिकांच्या सामाजिक स्थानात व वर्तणुकीतही झाला आहे.
आधुनिक विज्ञानाने सतराव्या-अठराव्या शतकात युरोपात मूळ धरले आणि युरोपीय व्यापारी, मिशनरी व वसाहतवादी यांच्या बरोबर हे विज्ञानही जगभर फैलावले. आज आपण विसावे शतक हे विज्ञानाचे शतक होते असे छातीठोकपणे सांगू शकतो. परंतु एकोणिसाव्या शतकापर्यंत विज्ञानाचे समाजव्यवहारातील स्थान तसे काठावरचे आणि तात्त्विक व सांस्कृतिक-शैक्षणिक पातळीपुरते मर्यादितच आढळून येते. साहित्यिक, कवी, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार यांच्याच पंक्तीत वैज्ञानिकांचेही स्थान होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
विशेषांक: आधुनिक विज्ञानाचे स्वरूप – मूलभूत सत्य
“विज्ञान ना पौर्वात्य आहे, ना पाश्चात्त्य. त्याची वैश्विकता त्याला आंतरराष्ट्रीय करते. पण असे असूनही विज्ञानाची काही अंगे त्यांच्या जन्मस्थानांमुळे विशेष समृद्ध झाली आहेत.”
“आधुनिक विज्ञानातील अतिविशेषीकरणामुळे (excessive specialization) एका मूलभूत सत्याकडे दुर्लक्ष होण्याचा धोका संभवतो. हे सत्य म्हणजे—-विज्ञाने नाहीत, एकच सर्वसमावेशक विज्ञान आहे. भारतीय मनोवृत्ती या विस्तृत संश्लेषणासाठी फार अनुरूप आहे.”
जगदीशचंद्र बसूंच्या बनारस हिंदु विश्वविद्यालयातील दोन भाषणांमधले हे उतारे – पहिले भाषण 4 फेब्रु. 1916 ला ब. हिं. वि. च्या उद्घाटनाच्या वेळचे आहे, तर दुसरे 1925 च्या दीक्षांत समारोहातील आहे.]
मर्यादा
विज्ञानाशी संबंधित एखादा विशेषांक काढावा असे फार दिवस मनात होते, पण विषय फार मोठा. आज आयुष्याच्या सर्व भागांना तो स्पर्श करतो, व्यक्तिगतही आणि समाजिकही. मग मर्यादा काय घालाव्या?
‘सुरुवात तर करू’ अशा भूमिकेतून ‘विज्ञान : स्वरूप आणि मर्यादा’ हा मथळा निवडला. योग्य अतिथि-संपादकाचाही विचार होत होताच. अशात चिंतामणी देशमुख भेटले. त्यांनी सुचवले, “आधुनिक विज्ञान म्हणा, कारण आजची शिस्त पूर्वी नसायची.” योग्य! “आणि ‘मर्यादा’ म्हटले की लोक गोंधळ घालतात. त्याऐवजी ‘क्षितिजे’ जास्त नेमके ठरेल.’ यावर उत्तर सोपे होते, “तुम्हीच का नाही अतिथि-संपादक होत?”
आधुनिक विज्ञान: स्वरूप आणि स्थिती
विसाव्या शतकात कितीतरी प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आणि जगाचा चेहरामोहरा बदलून गेला. दोन महायुद्धे, रशियन क्रांतीचा उदयास्त, जुना वसाहतवाद संपुष्टात येऊन झालेली नवस्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती, आणि चीनमधील क्रांती वगैरे. परंतु 21 व्या शतकात प्रवेश करताना जाणवते की या घडामोडी कमी लेखणे शक्य नसले तरी आर्थिक, सामाजिक क्षेत्रांत घडून आलेल्या प्रचंड बदलात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे तो आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्या कर्तृत्वाचा. पृथ्वीचे स्वरूप एक ‘जागतिक खेडे’ म्हणून रूपांतरित होत आहे त्यात कोणत्याही तत्त्वज्ञानापेक्षा, विचारप्रणालीपेक्षा विज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञानाचे योगदान अधिक पायाभूत आहे.
साकल्यवाद, संक्षेपणवाद आणि विज्ञान
मी शाळकरी मुलगा असताना बालकवींच्या ‘फुलराणी’च्या प्रेमात पडलो:
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती ! ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या ओढीनेच मी अखेर परिसरशास्त्राकडे वळलो. मग सारे आयुष्य हिरवाई पाहत, फुले निरखत, वृक्षांची मापे घेत, वनस्पती जमवत आणि त्यांचे विच्छेदन करत, त्यांच्यातला हिरवा रंग काढून तो स्पेक्ट्रोफोटोमीटर ने तपासत घालवणे आलेच. या साऱ्या विज्ञानाच्या संक्षेपणवादी (reductionist) पद्धतीतल्या क्रिया. या पद्धतीभोवती अनेक गैरसमजुतींचे लेप चढलेले आहेत. परंतु यामुळे निसर्गातल्या काव्याला आणि सौंदर्याला मी मुकलो का?
विज्ञान ही चीज काय आहे? (पूर्वार्ध)
आधुनिक जगात विज्ञानाविषयी आदराची, दराऱ्याची भावना आहे यात शंका नाही. मानवी ज्ञानाच्या कक्षा अणुरेणूंपासून विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत, विविध क्षेत्रांत, विविध प्रकारे रुंदावण्याचे विज्ञानाचे यश वादातीत आहे. (या लेखाचे ते एक मुख्य गृहीतक ही आहे.) मानवाच्या भौतिक प्रगतीसाठी विज्ञानाची उपयुक्तता, विज्ञानाचे योगदानही सर्वमान्य आहे. विज्ञानाविषयीचा आदर व दरारा मात्र या योगदानातून, उपयुक्ततेतूनच आलेला आहे असे नाही, तर त्याच्यामागे विज्ञानाच्या कार्यपद्धतीत काहीतरी विशेष आहे, खास विश्वसनीय आहे अशी सार्वत्रिक समजूत आहे. प्रसारमाध्यमातील जाहिरातीत-सुद्धा “आमचे उत्पादन वैज्ञानिकरीत्या अधिक ‘शुभ्र’ अधिक ‘चमकदार’, अधिक ‘प्रभावी’, अधिक ‘गुणकारी’ आहे!”
. . . . आणि हेही विज्ञान
1979 साली मिसिआ लँडो (Misia Landau) ही येल विद्यापीठाची इतिहास-संशोधक पुरामानवशास्त्राचा इतिहास तपासत होती. आपली (म्हणजे माणसांची) उत्क्रांती गेल्या शतकाभरातल्या वैज्ञानिकांनी कशी समजावून सांगितली, त्याचा हा अभ्यास. वैज्ञानिक ज्या कोरड्या वस्तुनिष्ठतेचा उदोउदो करतात, तिचा या उत्क्रांतीच्या वर्णनांमध्ये मागमूस नव्हता, हे लँडोला जाणवले. त्याऐवजी एखाद्या मिथ्यकथेसारख्या रूपात आपल्या पूर्वजांपासून आपण कसे घडलो याचे वर्णन केलेले लँडोला आढळले. कोणत्याही लोककथेत भेटणारा घटनाक्रम—-‘होमो’ वंशाचे गरिबीतले बालपण, त्याच्यापुढे एकामागून एक येणाऱ्या अडचणी, त्यांच्यावर मात करताना ‘नायक’ तावूनसुलाखून अखेर ‘होमो सेपियन्स’ या ‘जाणत्या मानवा’च्या पदाला पोचणे.
भौतिकशास्त्रातील अनिश्चितता तत्त्व
विषय परिचय:
पुंज सिद्धान्त (quantum theory) हा आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया आहे. अनिश्चितता तत्त्व हे या सिद्धान्ताचे सारतत्त्व. ह्या तत्त्वामुळे भौतिकशास्त्राच्या विचारसरणीत कायमचे परिवर्तन घडून आले. त्याचा प्रभाव भौतिकशास्त्राच्या पलीकडे तत्त्वज्ञानात, समाजशास्त्रात आणि अन्य क्षेत्रांतही दिसून येतो. या तत्त्वाचा आणि त्याच्या प्रभावाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. भाग 1
‘अनिश्चितता’ आणि ‘भौतिकशास्त्र’ कधी एकमेकांच्या जवळ येतील यावर अगदी सव्वाशे वर्षांपूर्वी कोणीही विश्वास ठेवला नसता. एकूणच निसर्गविषयक शास्त्रांमध्ये नियमबद्धता असते ही त्याकाळची सार्वत्रिक समजूत आजही बऱ्याच अंशी टिकून आहे. सतराव्या शतकामध्ये न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडला गेला.
आत्मा हवा का?
वासांसि जीर्णानि यथा विहाय…..
हे खूप लहानपणी कानावर आले. माणसाला आत्मा असतो. तो अमर असतो. शरीर मेले तरी तो मरत नाही. पहिली वस्त्रे काढून नवी घालावीत तसे आत्मा नवीन शरीर धारण करतो. या जन्मी केलेल्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म कुणाचा येणार ते ठरते. असे ऐकले अगदी पहिल्यापासून.
या सगळ्या कल्पना, खऱ्या असोत वा नसोत, त्यांचे मूळ काय असेल? माणसाला आत्मा असतो असे प्रथम कुणाला तरी का वाटले असेल? मूळ शोधणे तसे जवळपास अशक्यच आहे. पण या ना त्या स्वरूपात माणसाला आत्मा असतो असे जगातले सर्व समाज मानत आले आहेत.