आपले स्नेही मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचे २३ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. ग्रामस्वराज्याचा विचार हा नेहमीच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला. अनेक दशकांच्या संवाद आणि सहकार्यातून गडचिरोलीतील मेंढा-लेखा गावाने त्यांचे ते स्वप्न साकार केले.
‘आजचा सुधारक’चा आगामी अंक ग्रामस्वराज्यावर घ्यावा असा मानस आहे. सद्य परिस्थितीत हा विषय महत्त्वाचा तर वाटतोच, शिवाय त्यात मोहनभाईंना आदरांजलीही अंतर्भूत आहे.
ह्या अंकाचा विस्तार तीन भागात करता येईल. त्यापैकी आपल्याला निकटचा वाटणारा पर्याय निवडून आपला लेख आपण आमच्याकडे पाठवू शकता.
१. वर्तमानस्थिती : संविधानातील १९९२ मध्ये झालेल्या ७३व्या घटनादुरुस्तीप्रमाणे स्थानिक शासनसंस्थांना घटनात्मक अधिकार मिळाले.