काही महिन्यांपूर्वी नागपूरला ज्येष्ठ नागरिकांचा लिव्ह इन रिलेशनशिप ह्या विषयावर एक कार्यक्रम झाला. नागपूरच्या मानाने हा विषय तसा स्फोटकच होता. तरुणांची लिव्ह इन रिलेशनशिपदेखील ह्या शहराने अजून मान्य केलेली नाही, तर मग ज्येष्ठ नागरिकांची कथा ती काय? ताळतंत्र सोडून वागण्याचे स्वातंत्र्य एकवेळ तरुणांना असते असे मानता येईल, पण ज्येष्ठ नागरिक? तेच जर असे काही वागू लागले तर तरुणांना कोण अडवणार? सगळ्यांनाच जर ह्याची मुभा मिळाली तर विवाहसंस्थेची प्रस्तुतताच राहणार नाही. समाज स्वास्थ्य धोक्यात येईल. एकूण काय, तर हा सारा अमेरिकेच्या अंधानुकरणाचा भाग आहे.
आदिवासी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य
[जनजीवन आणि संस्कृती हे आ.सु. चे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आपल्या अनेक समस्या आणि त्यांची उकल ह्यांची पाळेमुळे त्यातच रुजलेली असतात. आज जगभरातल्या विविध भौगोलिक प्रदेशांतल्या संस्कृतीचे झपाट्याने एकजिनसीकरण व सपाटीकरण होत आहे. निसर्गापासून दूर दूर जाणे हेही त्याचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यामधून आणखी वेगळ्या समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत बिगर-शहरी संस्कृतीची वाटचाल कशी चालली आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल. ह्याच उद्देशाने अनिल पाटील सुर्डीकर ह्यांची ग्रामीण जीवनावरची लेखमाला आ.सु. ने दिली होती. आदिवासींच्या जीवनावरील सुनंदा पाटील ह्यांचा हा लेखही असाच.
हिंदू : भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद रेखाटणारी कादंबरी
हरितक्रांतीनंतर भांडवलाचा शिरकाव शेतीमध्ये झाला आणि शेती हळूहळू बाजारपेठेशी जोडली गेली. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकायला लागली. ती खेड्यांकडून शहराकडे आली आणि शहरांमध्ये आल्यानंतर शहरात ती ‘अनफिट’ ठरली. ही ‘अनफिट’ ठरलेली सगळी मंडळी नेमाडे यांच्या आधीच्या ‘कोसला’ व ‘चांगदेव चतुष्टय’ कादंबऱ्यांचे नायक आहेत.
ही ‘अनफिट’ मंडळी समाजवाद्यांकडे, कम्युनिस्टांकडे गेली मात्र कुठेही ती फिट झाली नाहीत. मग ती अगतिकपणे (त्यांची इच्छा नसताना) खेड्यांमध्ये परत गेली. पण शेतकरी म्हणून नव्हे तर एक अॅलियन क्लास म्हणून – एक नवीन वर्ग म्हणून.
शरद पवारांपासून सदानंद मोऱ्यांपर्यंत आणि अगदी माझ्यापर्यंत म्हणता येईल.
चिं.मो.पंडित
एंजिनीयरिंग कॉलेजात आम्हाला एक अभ्यासक्रम असायचा तंत्रज्ञानाचा इतिहास’ नावाचा. केमिकल एंजिनीयरिंगच्या क्षेत्रात ऋषितुल्य मानले जाणारे प्रा. एन.आर.कामत आम्हाला 1962-63 साली हा विषय शिकवायचे. एंजिनीयरिंग-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पातळ्या पिंजत वेगवेगळ्या पातळ्यांवर अपेक्षित कौशल्ये सांगणे प्रा.कामतांना आवडायचे.
आज पन्नासेक वर्षांनंतर जसा आठवतो तसा कामतसरांचा क्रम नोंदतो —
(1) एखादे काम कसे करायचे ते जाणणारे, ते कारागीर; गवंडी. मशिनिस्ट, सुतार, लोहार, इत्यादी. असे म्हणूया, की आज ज्यांना (ITI) संस्थांमध्ये प्रशिक्षण मिळते, ते लोक म्हणजे कारागीर. (2) एखादी योजना समजणारे, त्या योजनेनुसार घेगवेगळ्या कारागिरांचे एकत्रित काम करवून घेऊ शकणारे, ते तांत्रिक पर्यवेक्षक किंवा फोरमेन.
माणूस, ईश्वर, अक्षर
मानवी मनाला स्मृतिशक्तीची देणगी लाभलेली असल्यामुळे, आपल्या जन्माच्या आधी हे जग चालत आलेले असणार असा विश्वास ठेवणे आपल्याला भाग पडते; आणि जर जगाला सुरुवात असेलच तर ती सुरुवात करणारी शक्ती आहे असे गृहीत धरण्याच्या भूमिकेची सुरुवात होते…ह्यामुळे, जम्म जो वास्तविक केवळ अत्यंत शारीरिक असा अनुभव आहे त्याला पारलौकिक स्वरूप प्राप्त होत जाते. मुलगा आणि वडील, मुलगी आणि आई ह्यांच्यात असलेल्या द्वंद्वात्मक संबंधांमुळे प्रत्येक व्यक्तीला तिचा जन्मदाता अथवा जन्मदात्री ह्यांच्यात विलीन होऊन नाहीसे होण्याची एक अनिवार्य, सुप्त इच्छा असते. ह्या प्रेरणेचे स्वरूप कित्येकदा त्यांची नक्कल करणे असेही दिसू शकते पण ही प्रेरणा बऱ्याच वेळा रचनात्मक स्वरूपातही पुढे येते आणि प्रत्यक्ष जन्मदात्याऐवजी, जो कधीच मृत्यू पावणार नाही अशा एका जन्मदात्याची कल्पना केली जाते.
पत्रसंवाद
गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स्, दर्यापूर, जिल्हा अमरावती -444803.
आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदू विज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचून झाल्यावर अतृप्तीच शिल्लक राहाते; व त्या अतृप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत. पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही..
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे मातीचे मडके तयार होते. त्या मडक्यात पोकळी असते. म्हणजे काहीच नसते. काहीच नसण्याचा अस्तित्वाचा घटक त्या मडक्याच्या उपयोगितेला कारण ठरतो!
माणसाच्या कवटीच्या आत मेंदू असतो.
साहित्यातून विवेकवाद (४) – जॉन बर्जर
निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे सुमारे एक
लक्ष वर्षे पृथ्वीवर जगत आहेत, आणि या आयुष्याचा जवळपास नव्वद टक्के भाग माणसे अन्नसंकलक म्हणून जगत आहेत.
कधीतरी दहाबारा हजार वर्षांपूर्वी माणसे जाणीवपूर्वक अन्न पाळू लागली.
मानवी अस्तित्व (४)
गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का?
या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव अस्तित्वात आला नसता. तद्विरुद्ध सशक्त आण्विक बल काही टक्क्यांनी जरी कमी असते तर आपल्या या जगाला आकार देणारे जड मूलद्रव्य अस्तित्वात आले नसते व त्याप्रमाणे मनुष्य प्राणीसुद्धा……
गुरुत्व बल आहे त्यापेक्षा कमी असते तर सूर्याचा गाभा फोडू शकणारी आण्विक , प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सूर्य किरण पोचले नसते.
चळवळी का यशस्वी होतात? का फसतात?
[2011 सालाच्या सुरुवातीला आनंद करंदीकरांनी ‘निर्माण’ चळवळीच्या मुलामुलींपुढे एक भाषण दिले. त्या भाषणावरून खालील लेख घडवला आहे. भाषणातील तळमळ आणि जोम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. (जरी त्यामुळे कुठेकुठे प्रमाण भाषेबाबतच्या संकेतांचे उल्लंघन होते!) – संपा. ]
भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा गावागावांत दोन-तीन महत्त्वाचे सामाजिक बदल घडले, त्यांचा माझ्या परीने मी एक धावता आढावा घेणार आहे. हा काही त्यांचा पूर्ण इतिहास नाही. पण मला जे पुढे मांडायचे आहे ते मांडण्यासाठी एक सामाजिक भूमिका निर्माण व्हावी म्हणून मी त्यांचा धावता आढावा घेणार आहे.
मर्यादित स्त्रीमुक्ती
कुटुंबनियोजन, बालसंगोपन ह्यांविषयीच्या धारणा, त्याच्याशी निगडित तंत्रविज्ञान व सामाजिक संस्था ह्यांच्यामुळे स्त्रियाही सड्या राहू शकतात. म्हणून आता सत्ता, मत्ता व प्रतिष्ठा ह्यांच्यासाठी पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असण्या-स्वीकारण्याची अपरिहार्यता फारशी उरली नाही. ही तशी चांगलीच घडामोड असली तरी एक प्रकारची दिशाभूल ह्या कारणाने झाली आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती एवढी दृढमूल झालेली आहे की, त्या चौकटीत समानता, स्वतंत्रता व मुक्तता साधण्यामध्ये स्त्रिया समाधान मानीत आहेत, पण ह्याची एक अलिखित शर्त अशी आहे की ज्यांना समान, स्वतंत्र व मुक्त व्हावयाचे असेल त्या स्त्रियांनी जवळपास पुरुषाचाच अवतार धारण केला पाहिजे.