श्रद्धा–अश्रद्धा घोळ

आपण अश्रद्ध आहोत याचा पराकोटीचा अभिमान-बहुतांशी गर्वच अस-लेल्या बऱ्याच माणसांशी माझी गाठ पडली आहे. प्रत्यही पडते —-श्रद्धेला शास्त्रीय प्रमाण किंवा शास्त्रीय आधार नाही—- शास्त्रीय कसोट्यांवर श्रद्धा घासून पाहताच येत नाही यासारखी घासून गुळगुळीत झालेली विधाने तोंडावर फेकून सगळे अश्रद्ध लोक उरलेल्यांना गप्प करताना दिसतात. हजारो वर्षांपासून ज्यांना कुठल्याही टोप्या फिट्ट बसतात अशी भाबडी सश्रद्ध जनता हे निमूटपणे ऐकून घेते. ह्या विषयावर काही वेगळा विचार माझ्यापरीने मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मुळात, लॉजिकल आणि रॅशनल या दोन शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर, लॉजिकल (1) of, relating to, involving, or being in accordance with logic.

पुढे वाचा

महाराष्ट्र फौंडेशन–पुरस्कारांविषयी काही प्र न

महाराष्ट्र फौंडेशन या अमेरिकेतील संस्थेचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आगमन ही मुळातच एक स्वागतार्ह घटना आहे यात शंका नाही. पुरस्कार, अनुदान, अर्थसाहाय्य इत्यादी स्पांनी ललित साहित्य, वैचारिक वाङ्मय, प्रकाशकीय व्यवहार, समाजकार्य इत्यादींना ती खरोखरच ‘भरघोस’ म्हणावी अशी मदत करते. मात्र तिचे निवडीचे निकष आणि निवडयंत्रणा यांबाबत कोठे चर्चा झाल्याचे आढळत नाही. एक महत्त्वाची सांस्कृतिक संस्था म्हणून तिचे अशा दृष्टीने परीक्षण होणे अवश्य आहे. त्या संदर्भात काही विचार मांडीत आहे.
१. ललित साहित्याच्या निवडीचे निकष (संदर्भ : संवादिनी, १९९९ पृ. ६२)
प्रथमदर्शनी एक गोष्ट जाणवते ती अशी की यात ‘ललित्या’चा उल्लेख कोठेच नाही.

पुढे वाचा

लैंगिक वाङ्मय — एक तुलना (उत्तरार्ध)

कामविषयक वाङ्मयाचे साहजिकच दोन भाग पडतात. एका अर्थी सर्वच ललितवाङ्मयाचा समावेश त्यांत होईल हे वर सांगितलेंच, व दुसरा भाग म्हणजे कामशास्त्रावर शास्त्रीय दृष्ट्या लिहिलेलें वाङ्मय. अशी पुस्तकें संस्कृतांत पुष्कळ आहेत, परंतु ती जुनी असल्यामुळे त्यांतील पुष्कळ विधानें आज पटणे शक्य नाही, व मराठींत आमचे स्वतःचे पुस्तकाशिवाय खरोखर आधुनिक शास्त्रीय दृष्टीनें, म्हणजे त्यांत नीति, धर्म वगैरे फालतू गोष्टी न आणतां, लिहिलेले दुसरें एकही पुस्तक आमचे माहितीत नाही, कारण डॉ. लेले व डॉ. मराठे यांच्या गुप्त रोगांवरील पुस्तकांचा यात समावेश करावा की काय हा प्र नच आहे.

पुढे वाचा

विद्यार्थी सहायक संस्था – एका कृतिशील विचारवंताचे कार्य

पुण्यामध्ये जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असते. अशा विद्यार्थ्यांना मदत करणारी ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ नावाची एक संस्था गेली चव्वेचाळीस वर्षे पुण्यात कार्यरत आहे. ह्या समितीची स्थापना ज्या कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे झाली त्यांतील प्रमुख होते डॉ. अच्युत शंकर आपटे. ७ जानेवारी २००० रोजी डॉ. आपटे यांचे पुण्यात वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले. बी. ए. व एम्. ए. ला गणित हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम आलेल्या अच्युतरावांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, तुरुंगवास भोगला व परिस्थिती निवळल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून न्युक्लीअर फिजिक्समध्ये आचार्य ही पदवी मिळवली.

पुढे वाचा

डॉ. दप्तरींचा अभिनव सुखवाद : अहो, धर्म ऐहिक सुखासाठीच

विद्वद्रत्न डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे गेल्या पिढीतले मोठे विचारवंत होते. मुख्य म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. आमच्या अर्थाने विवेकवादी होते का? याचे उत्तर एका शब्दात देता येणार नाही.

१. डॉ. दप्तरी थोर धर्मज्ञ होते, आणि जनसामान्यांसाठी धर्माची आवश्यकता मानणारे होते. मात्र धर्म काय किंवा धर्मग्रंथ काय अपौरुषेय नाहीत, पूर्णपणे बुद्धिगम्य आहेत, असा त्यांचा सिद्धान्त होता.

आता प्रश्न असा की, ते आधी बुद्धिवादी, आणि मग धार्मिक म्हणजे लोकशिक्षणाकरिता म्हणून धर्माचा आश्रय घेणारे होते की, मुळात धर्मभिमानी पण बुद्धिवादाचा आश्रय घेऊन धर्म विवेकवाद्यांना स्वीकार्य व्हावा अशा रीतीने सांगणारे धर्मसुधारक होते?

पुढे वाचा

प्रिय वाचक,

ऑक्टोबर ‘९९ मध्ये आ. सु. च्या संपादकीय नेतृत्वात खांदेपालट होऊन ती जबाबदारी आमच्याकडे आली. येत्या ऑक्टोबर २००० पासून आम्ही ती सूत्रे खाली ठेवत आहोत. गेल्या एका वर्षात आम्ही काय करू शकलो, जे काही केले त्याच्या मागे कोणते विचारसूत्र होते त्याचा हा धावता आढावा.
आ.सु.तले लिखाण एकसुरी असते. तेच ते लेखक, तेच ते विषय, अनु-क्रमणिका पाहिली तरी पुरते, पुढचे न वाचता आतील मजकूर कळतो; इतकी कडक आलोचना ऐकून मन खिन्न होई. ती टीका मनावर घेऊन थोडी विविधता आणायचे ठरवले. विचारणीयतेबरोबर वाचनीयता काहीशी वाढवण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

तर्क अप्रतिष्ठित कसा?

“तर्क अप्रतिष्ठित आहे म्हणून दुसऱ्या रीतीने म्हणजे वचनप्रामाण्याने अनुमान करावे असे तुमचे (म्हणजे पूर्वपक्षाचे) म्हणणे असेल तर ते चूक आहे. कारण ह्याप्रमाणे देखील तुमची (म्हणजे पूर्वपक्षाची) ह्या अप्रतिष्ठितत्वाच्या आक्षेपा-तून सुटका होत नाही. शब्दप्रामाण्य मानल्यास शब्द अनेकांचे आहेत व त्यांचे अर्थही अनेक करता येतात. म्हणून शब्दप्रामाण्यच अप्रतिष्ठित आहे. म्हणून तर्क अप्रतिष्ठित मानू नये आणि तर्काने सिद्ध होईल तेच ब्रह्माचे ज्ञान ग्रहण करावे”. “दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः” (ब्रह्म सूक्ष्मबुद्धि मनुष्यांच्या श्रेष्ठ बुद्धीने पाहिले जाते) असे उपनिषदाने कंठरवाने सांगितलेही आहेत. “श्रुतेस्तु शब्दमूलत्वात्’ २।१।२७ ह्या सूत्राचा अर्थ श्रीशंकराचार्य करतात तसा नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रत्येक व्यक्तीच्या समाज–गटाच्या किंवा समाजाच्या जीवनामध्ये सतत भिन्न प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होत असतात. त्या स्वतःच्या आर्थिक स्थितीतील बदलांमुळे किंवा इतरत्र (बाह्य) होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात. त्यांचे परिणामही आपल्यावर काही प्रमाणात प्रत्यक्ष आणि काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे घडतात त्या त्या प्रमाणात त्या समस्यांमध्ये आपला सहभाग (involvement) असतो. ज्या समस्यांशी आपला थेट संबंध असतो त्यांच्याबद्दलची आपली जाण चांगली असते. त्यामुळे त्यासंबंधीची इतरांची मते, सरकारी धोरणे कंपन्यांची धोरणे इत्यादी गोष्टी कितपत योग्य आहेत हे आपल्याला चांगले माहीत असते. परंतु थेट संबंध न येणाऱ्या क्षेत्रांतील घडामोडींचा तपशील आपल्याला कमी माहीत असतो.

पुढे वाचा

विद्वेषाने विद्वेष वाढतो

‘आजचा सुधारक’च्या जून २००० च्या अंकात नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात दोन पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. माझी ही प्रतिक्रिया.
विसाव्या शतकात भारतात (की हिंदुस्थानात?) लो. टिळक, गोखले, म. गांधी, पं. नेहरू स्वा. सावरकर, भारतरत्न आंबेडकर आदी थोर व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्याविषयी सर्व भारतीयांना (केवळ हिंदूंनाच नव्हे) पुरेसा आदरभाव असणे अपेक्षित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी भारतीय घटनेच्या पुस्तकातच बंदिस्त आहे का? रा. स्व. संघाच्या प्रमुखांनी घटनेच्या समीक्षेच्या संदर्भात हिंदुत्वाची पुष्टी करणारे विधान करून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्याबरोबर ब्राह्मणी पद्धतीने ‘शांत पापम्’ म्हणून पुतळ्याला स्नान घालण्यात कोणता पुरोगामीपणा आहे ?

पुढे वाचा

डॉ. आंबेडकर पुतळा-प्रक्षालन : एक लाक्षणिक कृती

विवेकवाद वाढवावयाचा असेल तर बौद्धिक लढ्यांबरोबर लाक्षणिक कृत्यांच्या माध्यमातूनही जनजागरणाचे प्रयत्न करावयाचे असतात ह्या श्री. भा. ल. भोळे यांच्या मताशी मी सहमत आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर पुतळा धुण्यामागे हेच कारण होते. आ. सु.च्या सल्लागार–मंडळातून श्री. भोळे यांना काढण्याची चूक आजचा सुधारक करणार नाही याची मला खात्री वाटते.
भारताला पाकिस्तानसारख्या धार्मिक व फासिस्ट राज्यकारभाराकडे घेऊन जाण्याचा संघाचा मानस आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध लिहिणाऱ्या श्री. बा. के. सांवगीकर व श्री. रवीन्द्र विरूपाक्ष पांढरे यांना समजला नसेल असे नाही. विवेकवादाचा मुखवटा घालून संघिस्ट प्रवृत्तीला पोषक अशी कृती करणारे हे अरुण शौरी यांचे चेले भारतात व इथे अमेरिकेतही कमी नाहीत.

पुढे वाचा