वा.म. जोशी यांची वाङ्मयविषयक भूमिका

वामन मल्हार जोशी यांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी प्रस्तुत लेखात केलेली नाही. त्यांच्या वाड्मयविचाराची अशा प्रकारची मांडणी व चिकित्सा वा.ल. कुळकर्णी व अन्य काही ज्येष्ठ समीक्षकांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळेच वामन मल्हारांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी करण्यापेक्षा त्यांचा वाड्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कोणता आहे, म्हणजेच त्यांची वाड़मयविषयक भूमिका कोणती आहे, ती कोणत्या तत्त्वांवर, सूत्रांवर आधारलेली आहे. तिची वैशिष्टये कोणती आहेत, याची चर्चा -चिकित्सा प्रस्तुत लेखात केली आहे.

वामन मल्हारांनी फार मोठ्या प्रमाणात वाङ्मयविषयक लेखन केले आहे असे दिसत नाही. ‘विचारसौंदर्य’ हा वाङ्मयविषयक लेखसंग्रह व अन्य काही ग्रंथनिविष्ट वा असंगृहीत वाङ्मयविषयक लेख वा परीक्षणे हे त्यांचे या प्रकारचे लेखन आहे.

पुढे वाचा

‘आश्रमहरिणी’च्या निमित्ताने

आश्रमहरिणी ही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे.

बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारक समाजापुढे मांडत आले होते. तरीसुद्धा अजून विधवा पुनर्विवाहाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप नव्हती. ही समाजाची परंपराप्रियता वामनरावांनी हेरली. त्याचबरोबर पौराणिक वर्णन – पद्धतीचा चतुराईने वापर करून आश्रमहरिणत पोथीचा आभास त्यांनी निर्माण केला.

पुढे वाचा

सत्यशोधक वामन मल्हार जोशी

वा.म. जोशी ‘सत्यं, शिवं, सुंदरम’ या तत्त्वत्रयीचे निष्ठावंत उपासक आहेत. सत्यनिष्ठेने जीवनाला भरभक्कम आधार मिळतो. नीतिमत्तेने जीवनाला स्वास्थ्य लाभते, आणि सौंदर्याने जीवनात आनंद निर्माण होतो. मानवतेच्या सर्वांगीण हिताकरिता उपकारक अशी ही तत्त्वे आहेत.

वाड्मयकलाविषयक माझी दृष्टी या लेखात वामनराव जीवनवादी दृष्टीने कलेची मीमांसा करतात. ‘कला हे जीवनाचे एक अंग आहे, पण ते जीवनसर्वस्व नाही’ असे म्हणून नंतर ते सांगतात,’जीवनात कला नसेल तर ते बेचव, नीरस, कळाहीन होईल हे खरे, पण सत्य नसेल तर ते लुळे, आंधळे, पांगळे होईल आणि नीती नसेल तर ते रोगट, कुजके, नासके होईल.

पुढे वाचा

वा.म. जोशी यांच्या कादंबरी-वाङ्मयातील सुधारणावाद

वामन मल्हार जोशी यांच्या कादंबरी-वाड्मयाचा चिकित्सक अभ्यास करून त्यात वास्तववादाचा, गांधीवादाचा, समाजवादाचा शोध घेण्याचा प्रयत्न समीक्षकांनी केला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी वा.म.जोशी यांना तात्विक कादंबरीचे जनक ठरविले आणि केवळ ‘तत्त्वप्रधान कादंबरी’ म्हणून रागिणीचा विचार करून चालणार नाही असा अभिप्रार डॉ. भालचंद्र फडके यांनी दिला. परंतु या तत्त्वचर्चेचे मूल्य कोणते या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी बहुतेक समीक्षकांनी टाळली आहे. अपवाद् प्रा. म.ग. नातू यांच्या ‘कै. वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार’ या लेखाचा करावा लागेल. ( विवेकाची गोठी, अमेय प्रकाशन) वा. म.

पुढे वाचा

सुशीलेचा देव: एक टिपण

‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी पुन्हा वाचताना या कादंबरीत सुशीलेच्या आणि इतर पात्रांच्या देवविषयक कल्पनांच्या बाबतीतली क्रांती दाखवणे हा वामन मल्हारांचा या कादंबरीच्या लेखनामागचा हेतू खरोखरीच आहे का असा प्रश्न पडला. सुशीला हे या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. बाळू, सुनंद, रावबा हे तिचे बाळपणापासूनचे. सवंगडी, विनायकराव हे सुशीलेचे वडील आणि गिरिधरराव हे विबाचे वडील. ही कादंबरीतली पात्रे आहेत का? कादंबरी हे एक कल्पित विश्व असते. पात्रे, प्रसंग, घटना यांनी घडलेले, स्वयंपूर्ण असे कल्पित जग. ही कादंबरी वाचताना असे वाटते की हे कल्पित जग नाही.

पुढे वाचा

वा.म. जोशी आजही प्रस्तुत का वाटतात?

मराठी वाङ्येतिहासातील १८८५ ते १९२० या महत्त्वपूर्ण कालखंडात दामन मल्हार जोशी यांचा उदय झाला; इतकेच नव्हे तर कादंबरीकार व कथाकार म्हणून त्यांनी नावलौकिकही मिळवला. हा नावलौकिक दुहेरी स्वरूपाचा होता. एकीकडे वामन मल्हारांनी तत्कालीन बुद्धिजीवी, रसिक वाचकांशी आपल्या कादंबच्यातून — विशेषतः रागिणीतून — संवाद साधला; आणि दुसरीकडे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारख्या साक्षेपी समीक्षकाचे तत्काल लक्ष वेधून घेतले. वाचक व समीक्षक यांना एकाच वेळी आवाहन करणे, त्या कालातील सगळ्याच मोठ्या लेखकांना साध्य झाले, असे म्हणता येणार नाही. हे खास वामन मल्हारांचे वैशिष्ट्य आहे.

त्यांचे दुसरे वैशिष्ट्य हे की, त्यांच्या या आवाहनातील सातत्यही वेगवेगळ्या कारणांमुळे टिकून राहिले.

पुढे वाचा

वा.म.जोशी यांची नीतिमीमांसा

वा.म.जोशी ह्यांचा नीतिशास्त्रप्रवेश हा ग्रन्थ १९१९ साली प्रसिद्ध झाला. ह्यात नीतिशास्त्राच्या त्यावेळी चर्चिल्या जाणार्‍या सर्व प्रश्नांचे सांगोपांग विवेचन आले आहे. हे विवेचन करताना भारतीय आणि पाश्चात्य प्रमुख नीतिमीमांसकांची मते तर त्यांनी विचारात घेतलीच, पण त्यांची तौलनिक चिकित्साही स्वतंत्र बुद्धीने केली. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याला आज सत्तर वर्षे होऊन गेली आहेत. परंतु अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेली एकदोन पुस्तके सोडली तर नीतिशास्त्रप्रवेशाच्या तोडीचे किंवा त्याच्या जवळपासही जाऊ शकेल असे पुस्तक मराठीत झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.

या लेखात या संपूर्ण ग्रंथाचा परामर्श घेण्याचा विचार नाही.

पुढे वाचा

कै.वा.म. जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने

२१ जानेवारी १९८२. बरोबर १०० वर्षापूर्वी याच दिवशी कुलाबा जिल्ह्यातील तळे या गावी वामन मल्हार जोशी ह्यांच्या रूपाने सौजन्य मूर्त झाले. थोर तत्त्वज्ञ, युगप्रवर्तक कादंबरीकार, निस्सीम सत्योपासक, वाचकांना विचार करावयास शिकविणारे समर्थ अध्यापक, इत्यादी अनेक नात्यांनी वा. म. जोशी आपल्याला परिचित आहेत. परंतु महाराष्ट्रास सर्वाधिक प्रभावित केले ते त्यांच्या सौजन्याने. सौजन्य हा त्यांच्या आचाराचा, विचाराचा, लेखनाचा के अध्यापनाचा स्थायीभाव होता. सहिष्णुता, वात्सल्य, प्रेम, त्याग, साधुत्व हे गुण त्यांच्या अंगाखांद्यावर एखाद्या लडिवाळ बालकाप्रमाणे निर्धास्तपणे खेळत, बागडत. आपल्या साठ वर्षांच्या आयुष्यात त्यांना अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध (Taboo)
(उत्तरार्ध)

या प्रकरणात मी लैंगिक आचार कसा असावा याचा विचार करीत नसून, लैंगिक विषयांच्या ज्ञानासंबंधी आपली अभिवृत्ती (attitude) काय असावी याचा विचार करतो आहे. अल्पवयीन मुलांना लिंगविषयक ज्ञान देण्याच्या संबंधात आतापर्यंत मी जे म्हटले त्यास सर्व प्रबुद्ध आधुनिक शिक्षणतज्ज्ञांची सहानुभूती माझ्या बाजूने आहे अशी मला आशा आणि विश्वासही आहे. परंतु आता मी एका अधिक विवाद्य मुद्दयाकडे येतो आहे, आणि त्याविषयी वाचकाची सहानुभूती प्राप्त करण्यात मला अधिक अडचण येईल अशी मला भीती वाटते. हा विषय म्हणजे अश्लील साहित्याचा.

पुढे वाचा

विवेकवाद-९

नीतिविचार धर्मविचाराहून निराळा
नवा सुधारकाच्या ऑक्टोबर अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या आगरकरांच्या उतार्‍याचे शीर्षक आहे,‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’. या विषयावर स्पष्टीकरणात्मक असे काही लिहावयाचा आज विचार आहे.

आजपर्यंत ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे जे आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यांसंबंधाने काही चमत्कारिक विचारणा आमच्याकडे केल्या गेल्या आहेत. एक वाचक म्हणाले की तुमच्या विवेकवादात भावनांना काहीच स्थान नाही काय? तुमच्या लेखांवरून आमचा असा समज झाला आहे की तुम्हाला फक्त तर्ककर्कश गोष्टीच मान्य दिसतात. तुमच्या व्यवस्थेत भावनेला काहीच स्थान दिसत नाही. दुसरे एक वाचक म्हणाले की तुम्ही धर्मावर असे तुटून पडला आहात की तुमच्या विवेकवादात केवळ सुखप्राप्तीलाच तेवढे स्थान आहे.

पुढे वाचा