इच्छामरणी व्हा

पुस्तकपरामर्श

(१) सन्मानाने मरण्याचा हक्क (२) जगायचे की मरायचे?
[दोन्हीचे लेखक: विनायक राजाराम लिमये, प्रकाशक (१) स.म. ह. चे स्वतः लेखक, (२) चे उन्मेष प्रकाशन, २६ पर्वत, पुणे ४११००९]
आपले आयुर्मान वाढले आहे तसे आरोग्यमानही. परंतु मृत्यू अटळ आहे. कृतांताची ध्वजा दिसू लागल्यापासून त्याचे भेसूर दर्शन होईपर्यंत अशी स्थिती येते की, त्या स्थितीत जिवंत राहण्यापेक्षा मरणे हेच बरे असे वाटू लागते. अशांना ‘तुमचे उत्तरायण सुरू झाले आहे आणि तुम्हीही इच्छामरणी आहात’ असा संदेश देणारी दोन पुस्तके आमच्याकडे अभिप्रायार्थ आली आहेत.

सन्मानाने मरण्याचा हक्क (स.म.

पुढे वाचा

सॉक्रेटीसीय संवाद (उत्तरार्ध)

यूथिफ्रॉन

अनुवादक – प्र. ब. कुळकर्णी

(सॉक्रेटिसाची एक प्रसिद्ध वादपद्धती आहे. ती ‘सॉक्रेटिसीय व्याजोक्ती (‘Socratic Irony’) या नावाने प्रसिद्ध आहे. या व्याजोक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून या संवादाकडे बोट दाखविता येईल. साक्रेटिसाच्या संवादांचे एक उद्दिष्ट कोणत्यातरी संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट करणे हे असले तरी त्यांचे दुसरे ही एक उद्दिष्ट असते, आणि ते म्हणजे जे ज्ञानी असल्याचा टेंभा मिरवितात ते खरोखर अज्ञानी असतात हे दाखविणे. त्याकरिता ‘एखाद्या विषयासंबंधी आपण अगदी अनभिज्ञ आहोत असे सांग आणावयाचे आणि कुशल प्रश्नांच्या साह्याने दुसर्‍याला आपल्या अज्ञानाची पुरेपूर जाणीव करून द्यावयाची अशी सॉक्रेटिसाची व्यूहरचना असते.

पुढे वाचा

जातिविग्रहाच्या मर्यादा व धोके

सध्या भारतात, विशेषतः उत्तर भारतात, मंडल आयोगाच्या काही शिफारसी केंद्र सरकारने अंमलात आणल्या म्हणून व्यापक प्रमाणात दंगली होत आहेत. राखीव जागांचे समर्थक व विरोधक मोठ्या अहमहमिकेने समर्थन व विरोध करीत आहेत. अशा वातावरणात पहिला बळी जातो तो विवेकाचा. या चळवळीत तरुण माणसे अविवेकी बनतात आणि उत्तर भारतात सवर्ण वर्गातील अनेक. रुणांनी आत्मदहन करून घेतले. त्यात दोघांचा बळी गेला. सरकारने विवेक दाखवला नाही तर अनेक लोकांचा बळी जातीजातीतील दंगलीत, गोळीबारात आणि आत्महत्येत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. सरकार जर विद्यार्थ्यांशी चर्चा करणार नसेल, त्यांचे भवितव्य धोक्यात घालणार असेल, तर आत्मदहनाचा मार्ग कितीही आततायी असला तरी तो समजू शकण्यासारखा आहे असा युक्तिवाद राखीव जागांचे विरोधक करीत आहेत, तर कोणत्याही समाजसुधारणेस असा विरोध होतच असतो.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ७)

स्त्रीमुक्ती
लैंगिक नीती सध्या संक्रमणावस्थेत आहे याची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिले, संततिप्रतिबंधाच्या साधनांचा शोध, आणि दुसरे, स्त्रियांची मुक्ती. यांपैकी पहिल्या कारणाचा विचार मी नंतर करणार आहे; दुसरा या प्रकरणाचा विषय आहे.

स्त्रियांची मुक्ती हा लोकशाही चळवळीचा भाग आहे. तिचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात झाला. आपण वर पाहिल्याप्रमाणे या राज्यक्रांतीत वारसाहक्कविषयी कायद्यात कन्यांना अनुकूल असा बदल करण्यात आला. ज्या कल्पनांमुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीमुळे ज्यांचा विकास झाला अशा कल्पनांतून मेरी वॉलस्टोनक्राफ्टचे ‘स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन’ (१७९२) हे पुस्तक निर्माण झाले होते.

पुढे वाचा

विवेकवाद – ७

शब्दप्रमाण
धर्मवाद्यांच्या, श्रद्धावाद्यांच्या शस्त्रागारातील एक महत्त्वाचे आयुध म्हणजे शब्दप्रमाण. जगातील सर्व धर्मानी शब्दाचे (म्हणजे विशिष्ट वाक्यांचे किंवा वचनांचे) प्रामाण्य मानले आहे. ख्रिस्ती नोक बायबलातील वचने, मुसलमान कुराणातील वचने, बौद्ध गौतम बुद्धाची वचने पूर्णपणे सत्य आणि अशंकाई मानतात, तसेच हिंदृही वेद, उपनिषदे, आणि विविध स्मृती यांतील वचने पूर्णपणे विश्वसनीय आणि संशयातीत मानतात. शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला हा अधिकार कोठून प्राप्त होतो? अशी काही वचने आहेत हे खरे आहे काय? अशी वचने आहेत हे मी मानले जाते? इत्यादि प्रश्न येथे उपस्थित होतात.

या प्रकारच्या वचनांच्या अधिकाराविषयी प्रत्येक धर्माची स्वतंत्र उपपत्ती आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

ऑगस्ट ९० च्या अंकातील ‘धर्म की धर्मापलीकडे’ हा लेख वाचला. धर्म हा भीतीवर आधारित आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘सृष्टीच्या खर्‍याखुर्‍या ज्ञानाने भीतीचा समूळ नाश होणार आहे हे सर्वसामान्य लोकांना पटवून द्यावे लागेल’ असे विधान लेखकाने केले आहे. या विधानाला सबळ पुरावा लेखकाने लेखात कोठेही दिलेला नाही. हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे असे वाटत नाही. सृष्टीच्या ज्ञानामुळे भीतीचा समूळ नाश होतो ही कल्पनाच चुकीची असल्यामळे ती सर्वसामान्यांना पटवून देता येणार नाही. हृदयरोगाबद्दल संपूर्ण ज्ञान असलेले डॉक्टर्ससुद्धा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर भीतिग्रस्त होतात.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

एकाने दुसर्‍याकरतां सहज मरणें, बुद्ध्या मारून घेणे, किंवा नाहीं नाहीं ते हाल भोगणें हें सर्वथैव इष्ट असेल तर, स्त्री मेल्यावर पुरुषानेही तिच्याबद्दल प्राण सोडणे, प्राणहत्या करणे, किंवा वैधव्यव्रताचे सेवन करणे प्रशस्त होईल, किंवा झाले असते! बायको मेल्याची वार्ता येतांच बेशुद्ध होऊन परलोकवासी झालेल्या भार्यारतांची उदाहरणे कधी तरी आपल्या ऐकण्यांत येतात काय? किंवा स्त्रीबरोबर सहगमन केलेल्या प्रियैकरतांची उदाहरणे कोणत्याही देशाच्या पुराणांत किंवा इतिहासांत कोणीं वाचली आहेत काय ? किंवा बायकोस देवाज्ञा झाल्यामुळे, नित्य भगवी वस्त्रे परिधान करणारे, क्षौराच्या दिवशीं डोक्याच्या किंवा तोंडाच्या कोणत्याही भागावरील केसांची काडीमात्र दयामाया न ठेवणारे, भाजणीच्या थालिपिठाशिवाय दुसन्या कोणत्याही आहारास स्पर्श ने करणारे, अरिष्ट गुदरल्यापासून चारसहा महिने कोणास तोंड न दाखविणारे, पानतंबाखूची किंवा चिलीमविडीची त्या अत्यंत खेदजनक दिवसापासून आमरण समिध शेकणारे, व मंगलकार्यात किंवा कामासाठी घरांतून बाहेर पडणार्‍या इसमापुढे येण्यास भिणारे नवरे कोणी पाहिले आहेत काय?

पुढे वाचा

शंभर वर्षांपूर्वीचे ‘बालविधवेचे गाणे’

बरोबर १०० वर्षांपूर्वी हरिभाऊ आपटे यांनी आपले करमणूक साप्ताहिक सुरू केले. ‘करमणूक’ काढण्याचा उद्देश स्पष्ट करताना हरिभाऊ यांनी म्हटले होते की, ‘केसरी सुधारकादि पत्रे आपल्या कुशल लेखणीने जे काम निबंधाच्या द्वारे करतात तेच काम हे पत्र मनाची करमणूक करून करणार.’ पुढे ते असे म्हणतात की, ‘ज्यांस पुढल्या माडीपासून चुलीपर्यंत व दिवाणखान्यातील टेबलापासून फणीकरंड्याच्या पेटीपर्यंत कोणाच्या हाती पडले तरी, हवे त्याने हवे त्याच्या देखत निःशंकपणे वाचण्यास हरकत नाही असे पत्र पाहिजे असेल त्यांनी अवश्य ‘करमणूक’चे वर्गणीदार व्हावे.’ यातून एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की ‘चूल’ आणि ‘फणीकरंड्याचा’ उल्लेख करताना त्यांना हे अंक स्त्रियांच्या हाती पडावेत, त्यांनी ते वाचावेत एवढेच नाही तर लिहिण्यास उद्युक्त व्हावे हा त्यांचा स्पष्ट हेतू होता.

पुढे वाचा

सॉक्रेटीसीय संवाद (पूर्वार्ध)

प्रास्ताविक
अनुवादक : प्र. ब. कुळकर्णी

पुढे दिलेला संवाद प्लेटोच्या प्रसिद्ध संवादांपैकी एक आहे. प्लेटोच्या बहुतेक संवादांत प्रमुख पात्र त्याच्या गुरूचे सॉक्रेटिसाचे आहे. सॉक्रेटिसाने स्वतः काही लिहिलेले दिसत नाही. परंतु सबंध आयुष्य त्याने तत्कालीन तत्त्वज्ञ आणि सामान्य माणसे यांच्याशी चर्चा करण्यात व्यतीत केले, आणि या चर्चेतून तत्त्वज्ञानाच्या इतिहासाला एक वेगळे वळण लावले. त्याच्या वादपद्धतीचा एक उत्तम नमुना म्हणून हा संवाद उल्लेखनीय आहे.

सॉक्रेटिसाच्या तत्त्वज्ञानाची आपल्याला जी माहिती आहे तिचे स्रोत दोन, एक प्लेटोने लिहिलेले संवाद, आणि दुसरा झेनोफोन (Xenophon) ने लिहिलेल्या आठवणी.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ६)

कल्पनात्म प्रेम (Romantic Love)
ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या विजयानंतर म्हणजे रोमन नागरणाच्या (civilization) पराजयानंतर स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कित्येक शतकांत गेले नव्हते अशा पशुतेच्या पातळीवर गेले. प्राचीन जग दुराचारी होते, पण ते पाशवी नव्हते. तमोयुगांत धर्म आणि बर्बरता यांनी संगनमत करून जीवनाच्या लैंगिक अंगाचा अधःपात घडवून आणला, विवाहात पत्नीला कसलेच हक्क नव्हते; आणि विवाहाबाहेर सर्वच लैंगिक संबंध पापमय असल्यामुळे अनागरित (uncivilized) पुरुषाच्या स्वाभाविक पशुत्वाला वेसण घालण्याचे कारणच उरले नाही. मध्ययुगात दुराचार सर्व दूर पसरले होते, आणि ते किळसवाणे होते.

पुढे वाचा