मन केले ग्वाही (भाग २)

प्रजा अडाणीच ठेवावी!

भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचे बहुतेक नेते उच्चशिक्षित होते. बरेचसे बॅरिस्टर होते. इतर बरेच मानव्यविद्यांचे विद्यार्थी होते. यामुळे सुरुवातीची मंत्रीमंडळेही बहुतांशी उच्चशिक्षित असत. कायदा-मानव्यविद्यांसोबत त्यांत काही डॉक्टर -इंजिनीयरही असत. हे स्वाभाविक होते कारण चळवळींचे नेते लढाऊ असावे लागतात, तर मंत्री व्यवहारी आणि नियोजनाचा विचार करणारे असावे लागतात.

पहिली चाळीस-पन्नास वर्षे मंत्रिमंडळे अशी वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांमधून निवडली जात. अगदी सुरुवातीला तर हे फारच आवश्यक होते, कारण तुटपुंज्या संसाधनांमधून नवे, महाकाय राष्ट्र उभारायचे होते, आणि यासाठी योद्ध्यांऐवजी तंत्रज्ञ जास्त आवश्यक होते. त्याहीपेक्षा आवश्यक होते शिक्षक, जे चांगले, तंत्र जाणणारे नागरिक घडवू शकतील.

पुढे वाचा

‘पब्लिक’ विचारवंतांचे महत्त्व : रोमिला थापरांच्या तोंडून

आणीबाणीच्या काळात भाजपचे लाल कृष्ण अडवानी माध्यमांबाबत म्हणाले, ‘‘त्यांना वाकायला सांगितले तर ते रांगू लागले”. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या माध्यमांनी आपले स्वातंत्र्य आणि सचोटी कसे घालवले, यावरचे अडवानींचे भाष्य भाजपेतरांना आणि विचारवंतांनाही कौतुकास्पद वाटले होते.
आज माध्यमेच नव्हे तर शिक्षण, सांस्कृतिक व्यवहार, आरोग्यसेवा, विधिव्यवस्था वगैरे क्षेत्रांतील मान्यवरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे रांगू लागले आहेत; आणि त्यांना कोणी वाकायलाही सांगितलेले नाही.
१२ ऑक्टोबरला रा.स्व.संघाच्या दिल्ली प्रांत प्रमुखांनी साठ मान्यवरांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत दुपारच्या जेवणासाठी बोलावले. जागा होती, दिल्ली-पंजाब-हरियाना चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.

पुढे वाचा

स्वच्छता अभियान: गांधी, मोदी आणि लेनिन

जातिव्यवस्थेने व्यवसाय स्वातंत्र्य नाकारून प्रत्येक व्यवसायासाठी एक स्वतंत्र जात निर्माण केली. जिने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जातीला ठरवून दिलेलेच काम केले पाहिजे असा दंडक घातला गेला. या व्यवस्थेनुसार सर्वात घाणेरडे काम, म्हणजे साफसफाईचे काम आणि तिन्ही वरच्या वर्णाच्या लोकांची सेवा करण्याचे काम शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींवर सोपवण्यात आले. अशा प्रकारे स्वच्छतेची जबाबदारी अतिशूद्रांवर ज्यांना आपण अस्पृश्य जाती म्हणतो त्यांच्यावर सोपवून सगळ्या वरच्या जातींचा समाज निर्धास्त झाला. त्यामुळे `स्वच्छता’ हे आपले काम नाही. थे अमुक, अमुक जातींचे आहे ही मानसिकता आजतागायत रूजली गेली आहे.

पुढे वाचा

जागतिकीकरणाने सबका विकास?

गेली 20-22 वर्षे भारतामध्ये जागतिकीकरणामुळे सर्वांपर्यंत विकास पोचणार असा भ्रामक प्रचार, राज्यकर्ते, माध्यमे, तथाकथित विचारवंत, शास्त्रज्ञ आदी सर्व करत आहेत. त्यामुळे जागतिकीकरण स्वागतार्ह आहे अशी अंधश्रद्धा जनमाणसात खोलवर रूजवली गेली आहे. 1991 साली काँग्रेस सरकारने नाणेनिधीचे मोठे कर्ज घेऊन त्यांच्या अटीबरहुकूम खाजाउ (खाजगीकरण- जागतिकीकरण-उदारीकरण) धोरण स्वीकारले. बहुराष्ट्रीय व बडया कंपन्याधार्जिण्या, या धोरणामुळे विस्थापन, बेकारी, महागाई वाढत जाऊन जनतेची ससेहोलपट वाढू लागली. तेव्हा स्वदेशीचा नारा देत भाजप आघाडीने 1999 साली केंद्रीय सत्ता काबीज केली. परंतु सत्तेवर आल्यावर मात्र काँग्रेसपेक्षाही अधिक वेगाने खाउजा धोरण रेटणे चालू ठेवले.

पुढे वाचा

आत्मा आणि मानवी मेंदू

इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:।
(गीता अ. ३ श्लोक. ४२)
गीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे. मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही. संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही. संस्कृत-मराठी “गीर्वाणलघुकोशा”त मेंदू हा शब्द नाही. पुढे शोध घेता लक्षात आले की आपण आज ज्या अर्थाने मेंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाचा एकही शब्द वेद, उपनिषदे, गीता यांत नाही. एवढेच नव्हे तर तो बायबलात नाही, कुराणात नाही, कुठल्याही धर्मग्रंथात नाही.

पुढे वाचा

मजेत

पद्मजा फाटक वारल्या. अनेक व्याधी, ‘रोपण’ केलेले मूत्रपिंड, त्या मूत्रपिंडाला शरीराने स्वीकारावे यासाठीची औषधयोजना, त्या औषधांचे दुष्परिणाम टाळायला (किंवा सौम्य करायला) आणखी औषधयोजना; अशा साऱ्यांशी बावीस-तेवीस वर्षे झगडून सत्तरच्या वयात ६ डिसेंबर २०१४ ला पद्मजांनी ‘देह ठेवला’
‘आजचा सुधारक’चा आणि त्यांचा जुना स्नेह. दि. य. देशपांडे, प्र. ब. कुलकर्णी, मी, साऱ्यांशी तसाच जुना स्नेह.
शिक्षणाने समाजशास्त्रज्ञ असलेल्या पद्मजांना खरे तर कोणताच विषय वज्र्य नव्हता. ‘शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक’ आणि (माधव नेरूरकरांसोबतचे) ‘बाराला दहा कमी’ ही त्यांच्या ग्रंथसंपदेतली रत्ने.
ताराबाई मोडक पद्मजांच्या आजी.

पुढे वाचा

कुटुंबसंस्था: काही प्रश्न

आजचा तरूण अस्वस्थ आहे, असंतुष्ट आहे. बेभान आहे, बेदरकार आहे, बेजबाबदार आहे हिसंक आहे, विध्वंसक आहे. त्याला कोणतीही बंधने नकोत. त्याला मुक्ती हवी आहे पण ही अराजकवादी मुक्ती आहे. हा बेबंदपणा आहे. हे आजच्या समाजशास्त्रज्ञांचे तरूणाचे विश्लेषण आणि हा राज्यकर्त्याच्या, त्याच बरोबर आईवडिलांच्या डोक्याच्या काळजीचा विषय. उपाय अनेक सुचविले जातात, तरूणांना विधायक कार्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. खेड्यात पाठविले पाहिजे. त्यांची उसळती युवाशक्ती सृजनासाठी वापरली पाहीजे. तरूणांने राजकारणात पडू नये सरकारी पातळीवर विद्यापीठातून ह्या युवाशक्तीला बांध घालण्याचे प्रयत्न होतात. आईवडिलाकंडून पैशाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न होतो.

पुढे वाचा

रॅट रेसचा विळखा!

तुम्हाला आपण फार असहाय आहोत, अगतिक आहोत असे वाटते का? कुणीही आपली दखल घेत नाही अशी भावना अधूनमधून येत असते का? या जगात आपला निभाव लागणार नाही हा विचार येत असतो का? अस्तित्वासाठीची स्पर्धा, स्पर्धेतून स्वार्थ, भीती, व इतरांचा दुस्वास इत्यादीमुळे आपण मानसिक स्वास्थ्य हरवून बसलो आहोत असे वाटत असते का?
असे काही वाटून घेणारे तुम्ही एकटेच नाही. हे जे वाटणे आहे ते मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे असेही वाटून घेण्याचे कारण नाही. आताची बदलत असलेली परिस्थितीच या मानसिकतेचे, असमाधानीवृत्तीचे प्रमुख कारण असावे असे काही तज्ञांचे मत आहे.

पुढे वाचा

बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजाची नीतिमत्ता

आमच्या बुद्धिजीवि मध्यमवर्गीयांच्या संस्कृतीची स्थिति आज शीड नसलेल्या तारवाप्रमाणें झाली आहे. स्वार्थाच्या आणि अहंकाराच्या भोवऱ्यांत ती सांपडल्यानें बाहेर पडण्याचा मार्ग तिला आज दिसत नाही. पारतंत्र्य जाऊन स्वातंत्र्य आलें, द्विभाषिक जाऊन संयुक्त महाराष्ट्र आलें, बाहेरचें जग अशा तऱ्हेनें कितीतरी बदललें, तरी या बदलत्या जगाचे पावलावर पाऊल टाकून स्वत: बदलणें बुद्धीच्या घमेंडीमुळें या संस्कृतीला अपमानाचें वाटतें. मेथ्यु अर्नॉल्ड या आंग्ल टीकाकारानें अशा जातीच्या लोकांना ‘Philistines’ असें संबोधून खऱ्या सांस्कृतिक गुणांचा अभाव असलेल्या अशा लोकांमुळें समाजांत अराजक माजतें, असें म्हटलें आहे. अशा तऱ्हेचें अराजक सध्यां महाराष्ट्रांत माजलें आहे.

पुढे वाचा

मन केले ग्वाही (भाग एक)

खिळखिळी लोकशाही

आजचा सुधारक या मासिकाचे प्रकाशन सुरू झाल्याला लवकरच पंचवीस वर्षे होतील. एप्रिल एकोणीसशे नव्वद ते मार्च दोन हजार पंधरा या काळात जगात मोठाले बदल झाले. काही बदल संख्यात्मक, quantitative होते, तर काही गुणात्मक, qualitative होते. काही मात्र या दोन्ही वर्गांपैक्षा मूलभूत होते, आलोक-बदल किंवा paradigm shift दर्जाचे.
या बदलांबद्दलचे माझे आकलन तपासायचा हा एक प्रयत्न आहे, विस्कळीत, अपूर्ण, असमाधानकारकही. पण असे प्रयत्न करणे आवश्यकही वाटते.

शीतयुद्ध आणि त्यानंतर

एकोणीसशे नव्वदच्या आधीची पंचेचाळीस वर्षे सर्व जग शीतयुद्धाच्या छायेत होते. ताबडतोब आधीची पंधरा वर्षे ब्रिटनमध्ये (यूनायटेड किंग्डम) स्थितिवादी हुजूरपक्ष सत्तेत होता.

पुढे वाचा