मासिक संग्रह: नोव्हेंबर, १९९०

सर्व जगाचे नेतृत्व फुकाचे नाही

भूतभूतकाळी आमचे धर्मविचार व आमची समाजव्यवस्था ही कितीही स्पृह्य असली व भविष्यकाली आम्ही सार्‍या जगाचे मार्गदर्शक होणार असलो, तथापि वर्तमानकाळ तरी प्रत्येक दृष्टीने आमची स्थिती अगदी खालावलेली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे; आणि भोवताली चाललेल्या जीवनार्थ कलहात आम्हांस सरशी मिळवावयाची असो किंवा मिसेस बेझंट सांगतात त्याप्रमाणे साच्या जगास आध्यात्मिक विचाराचा धडा घालून देणे असो. आम्हांस प्रथम आपल्या सुधारणेस लागले पाहिजे यात मुळीच मतभेद नाही. नुसते आमच बाबा असे होते आणि तसे होते म्हणून फुशारकी मारीत बसण्याने आमची सुधारणा होणे नाही. ती होण्यास आम्ही आपला आयुष्यक्रम बदलण्यास तयार असले पाहिजे…..

पुढे वाचा

मला उमगलेले डॉ. आंबेडकर

आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करीत असताना मी एक टिपण टिपले. ते असे —-
अस्पृश्यतेचे चटके बसलेले आंबेडकर जर साहित्यिक बनले असते, तर विद्रोद्दा व संघर्षाची भाषा स्वीकारून, त्यांनी ‘दलित साहित्य’ निर्माण केले असते. पण असे ‘साहित्यिक’ ते झाले नाहीत. ते ‘समाजसुधारक’ झाले. मृाची भावना जोपासण्याऐवजी त्यांनी क्रांतिकारकता जापासली. ते ‘समतेचे’ पुरस्कर्ते बनले. सामाजिक व आर्थिक ममतेप्टे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अंमळ गौण मानला. देशभक्ती गौण मानली, असे मात्र नाही.
मनुस्मृति जाळणे हिंदत्व – विरोधी दिसले तरी कालबाह्य झालेल्या दोघांना बाजूला सारण्याचा तो एक संकेत होता.

पुढे वाचा

आत्मनाशाची ओढ

ज्या दिवशी जपानमधील हिरोशिमा ह्या नगरावर परमाणुबाँबचा भयानक विस्फोट झाला तो दिवस—-६ ऑगस्ट १६४५-—मानवाच्या संपूर्ण इतिहासात (व प्रागैतिहासातही) अत्यंत महत्त्वाचा मानावा लागल, जीवोत्क्रांतीच्या पदार्थ वाटचालीत पायात प्रथमत:च स्व-जाणीव व बुद्धी निर्माण झाली. त्या काळाच्या विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानवापुढील मृत्यूचे संकट हे व्यक्तिगत स्वरूपाचे होते. पण ज्या वेळी मानवाने भौतिकशास्त्राच्या साहाय्याने परमाणु विदनापर्यंत ‘गनि’ गाठली, न्या अागृत मानवापुढे नुसत्या व्यक्तिगत किंवा लहान समूहाच्या मृत्यूची नव्हे, तर अरिवल मानवजातीच्या संपूर्ण विनाशाची व मानवी संस्कृतीच्या आमूलाग्र विध्वंगावी भयप्रद शक्यता निर्माण झाली आहे. मानवजातीच्या गळ्याभोवती जणू काही एक भयानक काल – विस्फोटक (time bomb) बांधला गेला आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध [taboo]
(पूर्वार्ध)
नवीन लैंगिक नीतीची रचना करताना विचारायचा पहिला प्रश्न: ‘लैंगिक संबंधांचे नियमन कसे करावे?’ ही नाही. तो ‘पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना लैंगिक विषयासंबंधी कृत्रिम अज्ञानात ठेवणे इष्ट आहे काय?’ हा आहे. या प्रश्नाला पहिले स्थान देण्याचे माझे कारण असे आहे की, मी या प्रकरणात दाखविण्याचा यत्न करणार असल्याप्रमाणे, लैंगिक विषयातील अज्ञान हे कोणत्याही व्यक्तीला अतिशय हानिकारक आहे. आणि म्हणून असे अज्ञान टिकवून ठेवणे ज्या व्यवस्थेत अवश्य असेल ती इष्ट असू शकत नाही. मी असे म्हणेन की लैंगिक नीती अशी असावी की ती सु–टाक्षित लोकांना इष्ट वाटावी, आणि तिचे आकर्षण अज्ञानावर अवलंबित नसावे.

पुढे वाचा

विवेकवाद -८

अध्यात्म आणि विज्ञान याच अंकात अन्यत्र वाचकांच्या पत्रल्यवहारात प्रा. श्याम कुलकर्णी यांचे एक पत्र छापले आहे. ते इत्र विवेकवादावर घेतल्या जाणार्‍या आक्षेपांचे प्रातिनिधिक मानायला हरकत नाही. प्रा. कुळकर्णी म्हणतात की जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्माची सुरुवात होते. प्रा. कुळकणी विज्ञानाचे प्राध्यापक आहेत, आणि म्हणून त्यांनी विज्ञानाचे अधिकार आणि त्याच्या मर्यादा यांविषयी व्यक्त केलेल्या मताला वजन आहे असे मानले जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या पत्राला काहीसे सविस्तर उत्तर देण्याचे ठरविले आहे.

जिथे विज्ञानाचे क्षेत्र संपते तिथे अध्यात्माच्या क्षेत्राची सुरवात होते म्हणजे नेमके काय ?

पुढे वाचा

प्रा. वसंत कानेटकर यांच्या पत्राच्या निमित्ताने

प्रा. वसन्त कानेटकर ह्यांच्या ‘नवा सुधारक’ च्या ऑगस्ट-अंकात प्रकाशित झालेल्या पत्रातील पुर्वाधांच्या संदर्भात (स्त्री – पुरुषांनी आपापांतील मत्सरभाव सहजात आहे, की अर्जित) निरनिराळ्या मानवशास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनाचे काही अंश पुढे दिले आहेत. असेच आणखीही काही उतारे पुढे देण्याचा विचार आहे.

भिन्नभिन्न ठिकाणी आढळणाच्या विवाहसंरधनील वैविध्याकडे केवळ वैचित्र्य म्हणून पाहण्यात येऊ नये. आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यासाय ह्या पद्धती मानवाने निर्माण केल्या आहेत. अनेक शतके सातत्याने चालत आलेल्या या समाजमान्य रूढी आहेत. त्या त्या प्रदेशात त्या समाजधारणेला आवश्यक मानल्या जातात. समाजधारणेला त्यांच्यामुळे कधीही बाधा आलेली दिसत नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक
‘नवा सुधारक’ यांस,
आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसास विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित्त मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते. विवेकवादाने जर खून करणार्‍यांपैकी ९०% लोक पुराव्याअभावी निर्दोष सुटतात है। सिद्ध केले तर (व तसे सहज शाक्य आहे) खून करण्याची प्रवृत्ती वाढेल. पाप व पुष्प या कल्पना विवेकवादाच्या कसोटीवर उतरत नाहीत, परंतु ८०-९०% लोकांच्या मनावर या कल्पनांचा पगडा असल्यामुळे ते चांगले वागण्याचा प्रयत्न करतात.

पुढे वाचा