मासिक संग्रह: ऑगस्ट, १९९९

पत्रव्यवहार

श्री. भाटे ह्यांनी रास्त सल्ला डावलला
संपादक, आजचा सुधारक यांस,
आ. सु. च्या जुलै १९९९ च्या अंकात दुस-याच्या मताचे खंडन करायचे असेल तर ते कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ललिता गंडभीर यांची चर्चा या सदरातील टीप (“हिंदू कोण?”) पाहावी. तसेच निकृष्ट तथा सदभिरुचिहीन खंडन कसे करावे याचा नमुना म्हणून त्याच अंकात अनिलकुमार भाटे यांचा लेख (“दि. य. देशपांडे यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ”) पाहावा, गंभीर यांनी अत्यंत मुद्देसूदपणे, कमीत कमी शब्दांत, आपले म्हणणे मांडले असून त्याचा रोख संपादकाचा अगर कुणाचाही उपमर्द करण्याकडे नाही.

पुढे वाचा

स्फुट लेख

हिंदु कोण
१. हिंदुधर्माचे कोणतेही एक पुस्तक, एक देव, समान संस्कार, धार्मिक विधी असे काहीच नसल्यामुळे हिंदु कोण हा प्रश्न निर्माण होतो. आणि हा एक तांत्रिक प्रश्न आहे. हिंदूची सर्वमान्य व्याख्या नसल्यामुळे भारतशासनाने हिंदूंसाठी केलेले कायदे ज्याला लागतात तो हिंदु अशी भारतात सध्या परिस्थिती आहे. ईशान्येकडे अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणीपूरपासून नैर्ऋत्येकडे लक्षद्वीपापर्यंत आणि वायव्येतील राजस्थानपासून आग्नेयेकडील अंदमान, निकोवारपर्यंत भारत पसरला आहे. ह्या इतक्या विस्तृत प्रदेशात राहणा-या ज्यांच्या निष्ठा एका पुस्तकावर (वायबल/कुराण, वेद/गुरुग्रंथ साहेव इ.) वर नाहीत अशा लोकांच्या देवता समान नाहीत, त्यांच्या भापा सारख्या नाहीत इतकेच नव्हे तर पौराणिक कथादेखील समान नाहीत, त्यामुळे त्यांना एकत्र बांधणारे सूत्रच नाही.

पुढे वाचा

श्री. भाट्यांचे म्हणणे पटले नाही

श्री अनिलकुमार भाटे यांचा लेख,(आ. सु. जुलै १९९९) मला आवडला नाही व पटलाही नाही. श्री. दि. य. देशपांडे यांना तत्त्वज्ञानातले आणि अध्यात्मातले काही कळलेले नाही, आणि भाटे यांना खूप काही कळले आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. कर्मसिद्धान्तावद्दल भाटे यांनी असे म्हटले आहे:-कर्मसिद्धान्त हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. ईश्वर माना किंवा न माना, हा सिद्धान्त अवाधित असतो. या सिद्धान्ताचे implementation कोणत्या agency मार्फत होते या प्रश्नाचे उत्तर त्यांनी असे दिले आहे की, आपण स्वतःच हे काम करीत असतो. पूर्वीच्या अनेक जन्मांत केलेल्या कृतींचा व विचारांचा साठा आपल्यावरोवर वागवीत असतो, … वगैरे.

पुढे वाचा

आत्म्याचा अनुभव सार्विक नाही

आजचा सुधारक च्या जुलै १९९९ च्या अंकात “दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ’ या शीर्षकाखाली श्री. अनिलकुमार भाटे यांचे विचार वाचण्यात आले. श्री. देशपांडे यांचा “वैचारिक गोंधळ” आणि त्यांचे “अज्ञान” श्री. भाटे यांनी उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री. देशपांडे यांच्या “अज्ञानातून” वाचकाला ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचा श्री. भाटे यांचा स्तुत्य प्रयत्न आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाने श्री. देशपांडे यांचे “अज्ञान” स्पष्ट झाले की नाही याबरोबरच वाचकांना कितपत “ज्ञानवोध” झाला हेसुद्धा लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. श्री. भाटे यांच्या मतानुसार श्री. देशपांडे यांनी अनेक चुकीची विधाने केलेली आहेत.

पुढे वाचा

प्रचंड गोंधळ भाट्यांचाच

जुलै १९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आ. सु. च्या अंकात अमेरिकानिवासी श्री. अनिलकुमार भाटे नावाच्या एका वाचकाची प्रतिक्रिया वाचनात आली. प्रा. देशपांडे ह्यांनी आपल्या लेखातून आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त अशा भारतीय आस्तिक दर्शनशास्त्रातील संकल्पनांचे खंडन केले आहे. त्या संकल्पनांचे मंडन करण्यासाठी भाटे ह्यांनी जो काय तर्कशास्त्राचा अभ्यास केला असेल किंवा हेगेल, हुसेर्ल, हायडेगर. या हकाराच्या वाराखडीतील युरोपी विद्वानांच्या नावाची जंत्री पाठ केली असेल ते सारे निरर्थक ठरतात. प्रा. देशपांड्यांचा विचार भारतीय दर्शनशास्त्राशी संबंधित आहे. तो नास्तिक दर्शनाशी जिव्हाळ्याचे नाते सांगणारा आहे. त्याच्या खंडनार्थ श्री.

पुढे वाचा

शरीराला जोडलेला आत्मा

मे ९९ च्या अंकातील दि.य. देशपांड्यांच्या सुमारे पाच पानी लेखावर जुलै ९९ च्या अंकात अनिलकुमार भाट्यांचे नऊ पानी उत्तर आहे; संतप्त आणि विस्तृत उत्तर आहे.
१) भाट्यांना दियदेंचे आत्म्याबाबतचे विवेचन पटत नाही. पण भाटे कशाला आत्मा म्हणतात हेही समजत नाही. ते फक्त सांगतात की “माझ्या ‘मी’ पणाच्या सर्व (कल्पनांचा) माझ्या आत्म्याशी काही संबंध नाही”. मग आत्मा आहे कशाशी संबंधित? असे काहीतरी मानवी व्यवहाराचे अंग असणारच, की ज्याच्या वर्णनासाठी ‘आत्मा’ हा शब्द घडवावा लागला आहे. आणि त्याचा माझ्याशी संबंध हवाच-जर आत्मा माझा असेल तर.

पुढे वाचा

चर्चा

भांडवलाचे वास्तव स्वरूप
(आजचा सुधारक – जून १९९९)
– श्री. वि. खांदेवाले
आपण वरील स्फुटात भांडवलाची नवी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधी माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे. ज्या ओघात आपण विचार मांडले त्यांना क्रमांक देऊन टिप्पणी करीत आहे.
१. उत्पादनासाठी भांडवल, श्रम, भूमी आणि कच्चा माल लागतो असे आपण म्हटले. परंतु कच्चा माल हा कृषि-उत्पादनांच्या (अन्नधान्ये, तेलविया, ज्यूट, ऊस, कापूस इत्यादी आणि खनिज पदार्थ, जंगलांपासून मिळणारी उत्पादने इत्यादींच्या) स्वरूपात निसर्गापासून (मूलतः) विनामूल्य मिळतो म्हणून त्याचा समावेश भूमी ह्या घटकात केला जातो. त्यामुळे भूमी व कच्चा माल हे आपण समजता त्याप्रमाणे वेगळे घटक मानले जात नाहीत.

पुढे वाचा

अकादमीय विद्वज्जन आणि युटोपिया

विसाव्या शतकातील सर्वांत दूरगामी परिणाम घडवणारी वौद्धिक क्रांती घडली मात्र संथ, शांत गावांमध्ये. केंब्रिज, कोपनहेगन, म्युनिक, पॅरिस, गॉटिंगेन, अशी ही, गावे. गॉटिंगेन हे गाव हे भौतिकीतज्ज्ञांचे खरे केंद्र. गावाचा आत्मा म्हणजे तिथले प्राचीन जॉर्जिया ऑगस्टा विद्यापीठ. इतर गावांना त्यांच्या नरवीरांचा, त्यांच्या पदकांचा गर्व असायचा. गॉटिंगेनकरांना विद्यापीठातल्या विद्यार्थांच्या आणि अध्यापकांच्या पदव्यांचा आणि जगभरातल्या वैज्ञानिक संघटनांच्या सभासदत्वाचा गर्व वाटायचा. १९२० साली रात्री घरी परतणा-या विद्यार्थ्यांनी ‘करमणूक’ जास्त झाल्याने केलेला दंगा गावक-यांच्या सवयीचा होता – तसेच याच विद्यार्थ्यांनी वौद्धिक उत्तेजनेतून रात्री उशीरापर्यंत रस्त्यामध्ये उभे राहून चर्चा करणेही सवयीचे होते.

पुढे वाचा

भांडण शब्दप्रामाण्याशी

मागच्या महिन्याच्या अंकामध्ये तीन मोठमोठे लेख आम्ही प्रसिद्ध केले. त्यांतील शेवटचा जो लेख होता-अनिलकुमार भाटे ह्यांचा तो आम्ही प्रकाशित करावयाला नको होता असे सांगणारी अनेक पत्रे आली तसेच दूरभाषदेखील आमच्याकडे आले. तो लेख का छापला त्याची कारणे आधी आणि नंतर त्या लेखासंबंधी.
श्री. भाट्यांच्या पत्रांत सतत आरोप होत होता की त्यांची वाजू आम्ही दडवून ठेवतो. प्रतिपक्षाला आम्ही आपले मत मांडू देत नाही; आम्ही एकाच पक्षाचा प्रचार करतो. त्यांची एकामागून एक अशी तीन पत्रे आली. आम्ही त्यांचे तिसरे पत्र प्रसिद्ध केले नाही.

पुढे वाचा

श्रद्धा

संस्कृत तथा प्राकृत भाषेमध्ये श्रद्धा ह्या शब्दाचा सर्वत्र उपयोग केला जातो. परंतु ह्याचा निश्चित अर्थ दिसत नाही. जो काही मिळतो त्याचा हा असा प्रकार आहेः ‘श्रद्धा = गुरुपु शास्त्रेषु निरतिशयः विश्वासः शास्त्राचार्योपदिष्टऽथै अननुभूतेऽपि एवमेव एतदितिविश्वासः, एवं विश्वासः- वंचकत्वाभावसंभावना.’ हे विवरण समाधानकारक नाही. वचन विश्वासानुयायी आहे. …..
“विश्वास हा अनुभव व अनुमान या दोहोंचा परिणाम आहे. अनुभवाला परीक्षण (बुद्धि व शक्ति) अनुमानाला विवेक (बुद्धि) लागते. अनुभवाचे निरीक्षणपूर्वक परीक्षण पाहिजे व अनुमानाला पूर्वानुभव मदतीला घ्यावा लागतो. या दोन गोष्टींशी व्यस्त प्रमाणात विश्वास उत्पन्न होतो.

पुढे वाचा