मासिक संग्रह: सप्टेंबर, २०००

पत्र-संवाद

श्याम कुळकर्णी
‘यमाई’, तंत्रनगर, औरंगाबाद — ४३१ ००५
खाजगी शिकवणी वर्ग
संदर्भ : आजचा सुधारक च्या जुलै २००० चे संपादकीय
शिकवणीवर्गाचे समर्थन विवेकवादात बसत नाही. आ. सु.च्या डिसेंबर १९९१ च्या ‘विवेकवाद’च्या १७ व्या भागात युक्त व अयुक्त कर्म तसेच कर्माची नैतिकता या चर्चेतील दोन उदाहरणे देतो. कारखानदार, व्यापारी इ. मंडळींच्या उद्योगामुळे देशाची समृद्धी वाढते, बेकारांना काम मिळते आणि सर्वांचेच राहणीमान उंचावते हे खरे आहे, पण म्हणून तेवढ्याकरिता त्यांचे उद्योग नैतिकदृष्ट्या प्रशंसनीय आहेत असे म्हणता येत नाही, ही सर्व मंडळी केवळ स्वार्थाने प्रेरित झालेली असल्यामुळे त्यांची कर्मे नैतिक या पदवीस पात्र होत नाहीत असे तेथे म्हटले आहे.

पुढे वाचा

निष्ठा : दोन पैलू

अॅरिस्टॉटल हा प्रकांड ग्रीक पंडित होता हे त्याच्या ग्रंथ-निर्मितीवरून चटकन कोणाच्याही लक्षात येईल. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, नाट्य-शोकांतिका व इतर विषयांवर त्याने लिहिलेली विद्वत्ताप्रचुर पुस्तके हे त्याच्या पांडित्याचे पुरावे म्हणून देता येतील. प्लेटोचा तो अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने “अकॅडमी’ची स्थापना करून जनतेच्या ज्ञानलालसेला जशी चालना दिली तसाच प्रयत्न अॅरिस्टॉटलने “लायसेयम’ही ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण करून आपली गुरुपरंपरा पुढे चालविली होती.
अॅरिस्टॉटल एकदा आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गात तत्त्वज्ञानाची चर्चा करीत असताना एका विद्यार्थ्याने प्लेटोचे विधान त्याच्या तोंडावर फेकून अॅरिस्टॉटलला पेचात आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

पुढे वाचा

जागतिकीकरण व मानवसमूह

माणूस हा एक सस्तन प्राणी आहे. म्हणून जीवशास्त्राचे मूलभूत नियम माणसाला लागू पडतातच. जीवशास्त्राच्या अभ्यासात पुढील नियम आपल्याला आढळतात :–

१) पर्यावरणाची विविधता प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जाती-प्रजातींच्या उत्क्रांतीस व टिकून राहण्यास आवश्यक असते. ही विविधता नष्ट केल्यास, सरसकट सारखे पर्यावरण निर्माण केल्यास, अनेक जाती प्रजाती जैविक चढाओढीत मागे पडून नष्ट होतात. पर्यावरणाच्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे केवळ काही विशिष्ट जाती प्रजाती शिरजोर ठरत असतात. उदाहरणार्थ डोंगराच्या शिखरावर, मध्य-उतारावर, घळीमध्ये, खालच्या उतारावर, सपाटीवर वेगवेगळ्या झाडांच्या जाती आढळतात. पूर्व दिशेच्या उतारावर व प िचम बाजूच्या उतारावर देखील वेगवेगळ्या जातींचे प्राबल्य आढळते.

पुढे वाचा

सक्षम मेंदूला डोळस अनुभवाची गरज

आपल्या सर्वांचाच मेंदू सक्षम असतो, फक्त त्याला डोळस अनुभव द्या. (We all have same hardware but only different software.) स्थळ आहे ऐने. वांगणीस्टेशन पासून १५-२० कि. मी. अंतरावर असलेले एक आदिवासी छोटेसे गाव. ग्राममंगल संस्थेच्या चवथीपाचवीतल्या १४-१५ मुला-मुलींचा गट. नीलेश गुरुजींनी ३-४ दिवस आधी या मुलांना पोष्ट ऑफीस पाहून यायला सांगितले होते. आणि मुलेमुली काय काय पाहिले ते सांगत होती : कोणाला शिक्के मारण्याचे काम आवडल, काही जणांनी पत्त्यांप्रमाणे पत्रांचे गढे कसे तयार करतात ते पाहिले. असे चालले होते. इतक्यात एका मुलाला प्र न पडला —
गुरुजी नदी आडवी आली तर टेलीफोनची तार कशी नेतात?

पुढे वाचा

श्रद्धा–अश्रद्धा घोळ

आपण अश्रद्ध आहोत याचा पराकोटीचा अभिमान-बहुतांशी गर्वच अस-लेल्या बऱ्याच माणसांशी माझी गाठ पडली आहे. प्रत्यही पडते —-श्रद्धेला शास्त्रीय प्रमाण किंवा शास्त्रीय आधार नाही—- शास्त्रीय कसोट्यांवर श्रद्धा घासून पाहताच येत नाही यासारखी घासून गुळगुळीत झालेली विधाने तोंडावर फेकून सगळे अश्रद्ध लोक उरलेल्यांना गप्प करताना दिसतात. हजारो वर्षांपासून ज्यांना कुठल्याही टोप्या फिट्ट बसतात अशी भाबडी सश्रद्ध जनता हे निमूटपणे ऐकून घेते. ह्या विषयावर काही वेगळा विचार माझ्यापरीने मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मुळात, लॉजिकल आणि रॅशनल या दोन शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर, लॉजिकल (1) of, relating to, involving, or being in accordance with logic.

पुढे वाचा

महाराष्ट्र फौंडेशन–पुरस्कारांविषयी काही प्र न

महाराष्ट्र फौंडेशन या अमेरिकेतील संस्थेचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आगमन ही मुळातच एक स्वागतार्ह घटना आहे यात शंका नाही. पुरस्कार, अनुदान, अर्थसाहाय्य इत्यादी स्पांनी ललित साहित्य, वैचारिक वाङ्मय, प्रकाशकीय व्यवहार, समाजकार्य इत्यादींना ती खरोखरच ‘भरघोस’ म्हणावी अशी मदत करते. मात्र तिचे निवडीचे निकष आणि निवडयंत्रणा यांबाबत कोठे चर्चा झाल्याचे आढळत नाही. एक महत्त्वाची सांस्कृतिक संस्था म्हणून तिचे अशा दृष्टीने परीक्षण होणे अवश्य आहे. त्या संदर्भात काही विचार मांडीत आहे.
१. ललित साहित्याच्या निवडीचे निकष (संदर्भ : संवादिनी, १९९९ पृ. ६२)
प्रथमदर्शनी एक गोष्ट जाणवते ती अशी की यात ‘ललित्या’चा उल्लेख कोठेच नाही.

पुढे वाचा

लैंगिक वाङ्मय — एक तुलना (उत्तरार्ध)

कामविषयक वाङ्मयाचे साहजिकच दोन भाग पडतात. एका अर्थी सर्वच ललितवाङ्मयाचा समावेश त्यांत होईल हे वर सांगितलेंच, व दुसरा भाग म्हणजे कामशास्त्रावर शास्त्रीय दृष्ट्या लिहिलेलें वाङ्मय. अशी पुस्तकें संस्कृतांत पुष्कळ आहेत, परंतु ती जुनी असल्यामुळे त्यांतील पुष्कळ विधानें आज पटणे शक्य नाही, व मराठींत आमचे स्वतःचे पुस्तकाशिवाय खरोखर आधुनिक शास्त्रीय दृष्टीनें, म्हणजे त्यांत नीति, धर्म वगैरे फालतू गोष्टी न आणतां, लिहिलेले दुसरें एकही पुस्तक आमचे माहितीत नाही, कारण डॉ. लेले व डॉ. मराठे यांच्या गुप्त रोगांवरील पुस्तकांचा यात समावेश करावा की काय हा प्र नच आहे.

पुढे वाचा

विद्यार्थी सहायक संस्था – एका कृतिशील विचारवंताचे कार्य

पुण्यामध्ये जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असते. अशा विद्यार्थ्यांना मदत करणारी ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ नावाची एक संस्था गेली चव्वेचाळीस वर्षे पुण्यात कार्यरत आहे. ह्या समितीची स्थापना ज्या कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे झाली त्यांतील प्रमुख होते डॉ. अच्युत शंकर आपटे. ७ जानेवारी २००० रोजी डॉ. आपटे यांचे पुण्यात वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले. बी. ए. व एम्. ए. ला गणित हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम आलेल्या अच्युतरावांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, तुरुंगवास भोगला व परिस्थिती निवळल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून न्युक्लीअर फिजिक्समध्ये आचार्य ही पदवी मिळवली.

पुढे वाचा

डॉ. दप्तरींचा अभिनव सुखवाद : अहो, धर्म ऐहिक सुखासाठीच

विद्वद्रत्न डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे गेल्या पिढीतले मोठे विचारवंत होते. मुख्य म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. आमच्या अर्थाने विवेकवादी होते का? याचे उत्तर एका शब्दात देता येणार नाही.

१. डॉ. दप्तरी थोर धर्मज्ञ होते, आणि जनसामान्यांसाठी धर्माची आवश्यकता मानणारे होते. मात्र धर्म काय किंवा धर्मग्रंथ काय अपौरुषेय नाहीत, पूर्णपणे बुद्धिगम्य आहेत, असा त्यांचा सिद्धान्त होता.

आता प्रश्न असा की, ते आधी बुद्धिवादी, आणि मग धार्मिक म्हणजे लोकशिक्षणाकरिता म्हणून धर्माचा आश्रय घेणारे होते की, मुळात धर्मभिमानी पण बुद्धिवादाचा आश्रय घेऊन धर्म विवेकवाद्यांना स्वीकार्य व्हावा अशा रीतीने सांगणारे धर्मसुधारक होते?

पुढे वाचा

प्रिय वाचक,

ऑक्टोबर ‘९९ मध्ये आ. सु. च्या संपादकीय नेतृत्वात खांदेपालट होऊन ती जबाबदारी आमच्याकडे आली. येत्या ऑक्टोबर २००० पासून आम्ही ती सूत्रे खाली ठेवत आहोत. गेल्या एका वर्षात आम्ही काय करू शकलो, जे काही केले त्याच्या मागे कोणते विचारसूत्र होते त्याचा हा धावता आढावा.
आ.सु.तले लिखाण एकसुरी असते. तेच ते लेखक, तेच ते विषय, अनु-क्रमणिका पाहिली तरी पुरते, पुढचे न वाचता आतील मजकूर कळतो; इतकी कडक आलोचना ऐकून मन खिन्न होई. ती टीका मनावर घेऊन थोडी विविधता आणायचे ठरवले. विचारणीयतेबरोबर वाचनीयता काहीशी वाढवण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा