Author archives

भारतीय संस्कृती व स्टेम सेल्स

भारतीय संस्कृती आणि स्टेम सेल्स या सकृद्दर्शनी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी शीर्षकात एकत्र गुंफल्या आहेत. “ वा, युवा, मघवा” प्रमाणेच हे वाटेल, पण मी काही ‘पाणिनी’ असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे या दोन्हीमधील ‘अ-व्याकरणीय’ संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी मी अर्थातच स्वीकारतो. पण त्यापूर्वी या दोन्ही गोष्टींच्या मला अभिप्रेत असलेल्या व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करणे योग्य ठरेल.

भारतीय संस्कृती :– माणूस या जगात कसा वागतो, कसा बोलतो, कसा विचार करतो याला एकत्रितपणे मानवी वर्तणूक किंवा वागणूक (Human Behaviour) असे म्हणतात. मानवी वर्तणूक ही दोनच गोष्टींवर अवलंबून असते.

पुढे वाचा

हिंदूंचे हित कशात आहे?

आपल्या देशात गेल्या तीन दशकांत अल्पसंख्य समाजाविरुद्ध योजनाबद्ध हत्याकांड सातत्याने होत आहे. ७० च्या दशकात भिवंडीला, ८० च्या दशकात दिल्लीला, ९० च्या दशकात मुंबईला आणि २००० च्या दशकात गुजराथमध्ये. प्रत्येक नियोजित हत्याकांडात पूर्वीच्या दशकातल्या हत्याकांडापेक्षा जास्त अमानुषता आणि संघटित क्रौर्य झाले. गुजरातमधल्या हत्याकांडात हिडीसपणा, बीभत्सपणा यांचा उच्चांक झाला. त्यातल्या अमानुषतेच्या कहाण्या नाझी अत्याचारांनाही लाजवणाऱ्या आहेत. मुख्यतः हे अत्याचार स्त्रियांवर झाले. २७ फेब्रुवारीला गोध्रा येथे रेल्वेच्या एका डब्याला आग लावून ७८ हिंदू प्रवाशांना जिवंत जाळून मारण्यात आले होते. तीही घटना दुर्दैवी आणि अमानुष होती.

पुढे वाचा

संघाचा फतवा: राज्यघटनेलाच आव्हान (एक प्रतिक्रिया)

वरील शीर्षकाचा श्री. सत्यरंजन साठे यांचा लेख साधना साप्ताहिकाच्या २७ एप्रिल २००२ च्या अंकातून घेऊन आजचा सुधारक च्या जून २००२ च्या अंकात छापला आहे. लेखातील विचार पाहता तो तथाकथित बुद्धिवादी आणि सेक्युलरवादी लोकांना संघ आणि संघपरिवारासंबंधी जी कायम कावीळ झाली आहे त्याच दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हजारो वर्षांची जुनी परंपरा आणि प्राचीनता असलेल्या हिंदू जीवनशैलीत सतत सत्य, अहिंसा, सहिष्णुता, विचार, उच्चार आणि आचार-स्वातंत्र्यांचा उद्घोष केलेला आहे. श्री. ज्ञाने वरांच्या पसायदानात ‘जो जे वांछील तो तें लाहो प्राणिजात’ या आधी ‘दुरितांचे तिमिर जावो, वि व स्वधर्मसूर्ये पाहो’ असे म्हटले आहे.

पुढे वाचा

धिस फिशर्ड लँड : लेख ४

संघर्ष

संसाधन-वापराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरणाऱ्या दोन समाजांची गाठ पडली की खूप तणाव उत्पन्न होतो. समाजरचना वेगवेगळ्या असतात. विचारधारा आणि पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. इतिहासात वारंवार अशा तणावांमधून तीव्र संघर्ष उपजताना दिसतात. कधीकधी तर वंशविच्छेदापर्यंत मजल जाते. अमेरिकन (रेड) इंडियन्सची संकलकपद्धती जेव्हा यूरोपीय वसाहतवाद्यांच्या शेतकरी-समाजापुढे आली तेव्हा हे घडले. महाभारतातली खांडववन जाळण्याची घटनाही मुळात संकलकांच्या आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचेच उदाहरण आहे.
युरोपात औद्योगिक जीवनशैली शेतकऱ्यांशी भिडतानाही हेच घडले. तिथे मोठे वाद उद्भवले ते नव्याने सबळ झालेल्या शासनव्यवस्थेने खेड्यांची सामायिक जमीन बळकावण्यामुळे. आधीच्या शेतकरी जीवनशैलीत चराईची कुरणे, गावसीमेतील वने आणि पाणसाठे गावाच्या सामायिक मालकीचे असत.

पुढे वाचा

विवेकवाद (Reason, Rational आणि Reasonable)

गेली कित्येक वर्षे मी स्वतःला rationalist म्हणवत आलो आहे. पण ‘rationalist’ या शब्दाच्या अर्थाची फोड मी अजून पुरेशी करू शकलो नाही असे मला वाटते. ती करण्याचा आणखी एक प्रयत्न मी करणार आहे.

त्या शब्दाची व्युत्पत्ति पाहता तो शब्द लॅटिन भाषेतील ‘ratio’ या शब्दापासून बनलेला आहे असे लक्षात येते. ‘Ratio’ म्हणजे reason; पण ‘reason’ म्हणजे काय हे सांगणे बरेच कठीण आहे. कारण ‘reason’ चे इंग्रजीत अनेक अर्थ आहेत, आणि त्या सर्वांच्या अर्थाचा शब्द मराठीत (किंवा संस्कृतात) नेमका सापडत नाही. ‘Reason’ च्या अर्थाचा चटकन् सुचणारा शब्द म्हणजे बुद्धि.

पुढे वाचा

दुष्टचक्र

दुष्टचक्र बदलाची स्पष्टता नाही म्हणून उभारी नाही, उभारी नाही म्हणून शिस्त नाही, आणि शिस्त नाही म्हणून बदलाची शक्यता आणखी लांब गेली, असं दुष्टचक्र आहे, आणि ते सगळ्याच बाबतीत आहे. शिक्षणाच्या बाबतीत आहे, रोजगाराच्या बाबतीत आहे, वस्तीतल्या सुविधा मिळवण्याच्या बाबतीत आहे. राजकीय शिस्तीशिवाय उभारी फक्त नेत्यांनाच (स्थानिकही); बाकी जनता ‘गरीब बिचारी कुणी हाका’ अशीच.
दुसरं एक वाटतं. इतिहासाचं ओझं अजूनही वागवणाऱ्या या समाजाला ‘अमुक काम करायला घाण वाटते. त्यामुळे यातून बाहेर पडायला पाहिजे’ अशी ऊर्मी वाटत नाही. श्रमाचं महत्त्व मलाही पटतं, पण एकाच प्रकारचे श्रम एकाच समाजाला सतत करावे लागताना पाहिलं की हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

द. रा. ताम्हनकर, ६७५, गव्हे, दापोली, रत्नागिरी – ४१५ ७१२
जुलै-ऑगस्टच्या आ.सु.च्या अंकांत श्री. वि. वा. ताम्हनकर, मिरज, यांनी—-कीव करण्यालायक अशा लेखकांना, संपादकांना, श्री. ढाकुलकरांना आणि मला स्वतःला—-काही शेलक्या शब्दांनी आमचा नालायकपणा थांबवावा अशी ऑर्डर दिली आहे. मी माझ्यापुरते लिहितो.
अहो, वि. वा. ताम्हनकर, मिरज, एवढ्या पत्त्यावर आपणांशी संपर्क साधणे कठीण, म्हणून आपणासाठी आ.सु. मधून हे पत्र. आपण “मला अनभिषिक्त भाष्यकार, मी समजतो” असे म्हटले आहे. मी अज्ञान, ज्ञान, आत्मज्ञानाबद्दल (यांत कदाचित् आपणही असाल) आपापले खंडन-मत मांडून ते खोडून काढून भारतीय जनतेला योग्य ज्ञानाचे दर्शन घडवावे हा त्यात हेतू होता.

पुढे वाचा

संपादकीय

समाजात सतत बदल होत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्यापरीने असे बदल निरखत-नोंदत असतो, त्यांचे बरे वाईट असे मूल्यमापन करत असतो आणि हे सारे इतरांच्या निरीक्षण-मूल्यमापनाशी ताडून पाहत असतो. बहुतेक माणसांना ‘माझेच खरे’ असा गर्व नसतो. आपले विचार मांडणे, इतरांचे विचार समजून घेणे, नव्या भूमिका घडवणे, असे सारे व्यवहार आपण सतत करत असतो. ‘आता मी काय करू?’ ह्या प्रश्नाचे उत्तर आपण अशा विचारांच्या देवाणघेवाणीच्या पायावर उभे राहूनच देऊ शकतो. हे सारे करणाऱ्यांच्या विचारांत आणि कृतीमध्ये फार अंतर पडत नाही. पण ‘माझेच’ खरे ही वृत्ती बळावली तर त्यातून ‘अंतस्थ हेतू’, ‘हिडन अजेंडे’, असे सारे घडून कथणी आणि करणीतले अंतर वाढत जाते.

पुढे वाचा

लेखकांची ओळख

१. रेणू गावस्कर —- सुमारे पंधरा वर्षे डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल या रिमांड होममध्ये कुठल्याही पदावर नसताना मुलांबद्दलच्या आत्मीयतेमुळे शिकवायला जात. वंचित मुलांसाठी सतत काम. इंग्रजी साहित्याचा आणि रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा अनेक वर्षांचा अभ्यास.
२. जॉन होल्ट —- अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ. दुसऱ्या महायुद्धात सैन्यात भरती. नंतर शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या दृष्टीतून पाहून शिक्षणपद्धती असफल का ठरतात याचे विश्लेषण. शेवटी शालेय शिक्षणपद्धतीत काहीच बदल घडत नाहीत म्हणून शाळाच बंद कराव्यात अशी मांडणी करू लागले होते. ‘How Children Learn’, ‘How Children Fail’, ‘Escape from Childhood’, ‘Learning all the Time’, ‘Instead of Education’, ‘Never too Late’, अशा अनेक पुस्तकांचे लेखन.

पुढे वाचा

सर्वांसाठी शिक्षण . . . ?

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात ‘शिक्षण’ ही समाजातल्या वरच्या वर्गाची आणि पुरुषांची मक्तेदारी होती. ते तसे नसावे आणि समाजातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांपर्यंत ते पोचावे, यासाठी गेल्या शतकात अनेक प्रयत्न झाले, चळवळी झाल्या. सर्वांनी शिकण्यामध्ये—-शहाणे होण्यामध्ये एकंदरीतच समाजाचीही उन्नती होणार आहे हा विचार हळूहळू पचनी पडला. त्याचे फलित म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने सर्वांपर्यंत शिक्षण पोचवणे ही
आपली जबाबदारी मानली.
एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिक्षण पोचवणे ही गोष्ट विशेषतः आपल्यासारखा गरीब देशासाठी सोपी नि िचतच नाही. या अंकात निर्देश केलेले सगळे हेतू सर्व मुलांपर्यंत पोचावेत असे तत्त्वतः आपले ध्येय असणे ठीक आहे.

पुढे वाचा