Author archives

विवेकवादी नीती

आतापर्यंत आपण सत्य-असत्याच्या प्रांतात होतो. पण नीतीचा प्रांत म्हणजे सत्य-असत्याचा नव्हे, तर चांगल्यावाइटाचा किंवा साधु-असाधु गोष्टींचा प्रांत. जिला reason म्हणतात, आणि जिचा पर्याय म्हणून आपण ‘विवेक’ हा शब्द वापरतो, त्याच्या प्रांतातून वेगळ्या प्रांतात प्रवेश करतो आहोत. हे कटाक्षाने सांगावे लागते, कारण reason चे, विवेकाचे क्षेत्र म्हणजे सत्य-असत्याचे क्षेत्र हे मत अठराव्या शतकात डेव्हिड ह्यूम (१७११ ते १७७९) या तत्त्वज्ञाने व्यक्त केले असून ते बरोबर असावे असा माझा समज आहे. ह्यूमनंतर आलेल्या कांट (१७२४-१८०४) या जर्मन तत्त्वज्ञाने दोन reasons आहेत असे मत मांडले, Theoretical Reason (औपपत्तिक विवेक) आणि Practical Reason (व्यावहारिक विवेक).

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रचार वाईट, प्रसार चांगला, असे आमचे एक वाङ्मयसेवक विद्वान मित्र म्हणतात. आ. सु. प्रचार-पत्र आहे हा त्याचा अवगुण आहे असे त्यांचे मत आहे. प्रसार हळूहळू होत असतो, आपोआप होतो. प्रचार केला जातो. त्यात भल्याबुऱ्या मार्गांचा विधिनिषेध नसतो. विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते; कसेही करून आपलेच घोडे पुढे दामटले जाते. मेरी मुर्गीकी एकही टांग अशी हटवादी भूमिका घेतली जाते. असा त्यांचा खुलासा. त्यांनी हा आरोप अनेक वेळा केला, आमच्या सहकाऱ्यांजवळही केला. म्हणून आम्ही कोश उघडून पाहिला. ‘प्रचार’ आणि ‘प्रसार’ हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत.

पुढे वाचा

संतांचे बंड आणि भक्तीचा मुलामा

‘. . . तरीसुद्धा या बंडाचा (संतांच्या भागवत-धर्माचा) चातुर्वर्ण्यविध्वं-सनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही. तिची किंमत स्वयंसिद्ध आहे. हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत. त्यामुळे चातुर्वर्ण्याचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्ही चोखामेळ्यासारखे भक्त व्हा, मग आम्ही तुम्हाला मानू, असे म्हणून दलितवर्गाची वंचना करण्याची एक नवी युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली. दलितवर्गातील कुरकुरणारी तोंडे त्या उपायाने बंद होतात, असा ब्राह्मणांचा अनुभव आहे. सांप्रदायी लोक साधुसंतांच्या चमत्काराच्या दंतकथा शक्य तितक्या अतिशयोक्तीने वर्णन करतात, परंतु साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची नि समतावादाची व उदार विचारांची ते हटकून पायमल्ली करतात.

पुढे वाचा

पत्र व्यवहार

नाशिकचे नाव–
आजचा सुधारक जून २००० च्या अंकात ‘मुक्काम नासिक’ मथळ्याखाली नाशिकच्या वाचक मेळाव्याचे वर्णन लिहिताना लेखकांनी नाशिक किंवा नासिक शब्दाची भौगोलिक व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते, या शब्दाचा संदर्भ जास्त करून रामायणकालीन असावा. याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले यावरून या स्थानाचा निर्देश नासिक असा करू लागले असावेत हे अधिक समर्पक वाटते. अंक आवडला.
गं. र. जोशी
७, सहजीवन हौ. सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाइन्स, दर्यापूर, अमरावती — ४४४ ८०३

अलबत्ये गलबत्ये, उपटसुंभ आणि हडेलहप्पी
जून २००० च्या आजचा सुधारक च्या अंकात श्री.

पुढे वाचा

आम्हाला आमच्या ज्येष्ठांची लाज वाटते हो

आम्हा तरुण पिढीच्या वाचकांना असे वाटत होते की, आजचा सुधारक या मासिकामधून जुन्या पिढीचे अनुभवी, ज्ञानी, शांतपणे विचार करणारे लोक आम्हाला जगात कसे वागावे व तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ जीवन कसे जगावे हे शिकवतात. पण अलीकडे आजचा सुधारक हे मासिक घाणेरड्या जातीय राजकारणाचे घासपीठ होऊ लागले आहे. सोनीया गांधीची सभा यशस्वी व्हावी म्हणून आंबेडकराचा पुतळा धुणारे लोक आम्हाला पूर्वी विचारवंत व आमच्या नागपूर विद्यापीठाचे भूषण वाटत होते. पण आता त्याबद्दल संशय वाटू लागला आहे. बाटलेला पुतळा धुऊन पवित्र करणे हा पोरखेळ वडीलधारी माणसे करू शकतात व या कृतीमुळे दलित बांधवामध्ये या वडिलधाऱ्यांविषयी आपुलकी उत्त्पन्न होईल यावर विश्वासच बसत नाही.

पुढे वाचा

पुतळा धुणारे आजचा सुधारकचे सल्लागार !

मी संपादकांना लिहिलेले पत्र व आ. सु. चे एक सल्लागार प्रा. भा. ल. भोळे यांनी त्यास दिलेले उत्तर संपादकांनी जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्याबद्दल संपादकांचे आभार मानतो. मी उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्याला प्रतिमुद्द्याने उत्तर देण्याऐवजी प्रा. भोळ्यांनी आपली राजकारणी संधिसाधू भूमिका विस्ताराने मांडून आम्हाला “अलबत्या गलबत्या’ संबोधून आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व मात्र अधिक उत्तुंग करून घेतले आहे ! मी प्रा. भोळ्यांचा शिवाशिवीवरील विश्वास व त्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झालेला तथाकथित विटाळ (?) धुऊन काढण्याची त्यांची कृती आ. सु. च्या वाचकांच्या निदर्शनास आणल्यामुळे त्यांचा तथाकथित तत्त्वचिंतकाचा व सुधारकाचा मुखवटा ढासळून त्याखालील त्यांचा उचापती संधिसाधू राजकारण्याचा चेहरा उघडा पडल्यामुळे, प्रा.

पुढे वाचा

विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?

(२२ मे २००० च्या ‘टाईम’ साप्ताहिकाचे सूत्र आहे ‘व्हिजन २१ — आपले काम, आपले जग.’ या अनुषंगाने लिहिलेल्या लेखांमध्ये एक लेख अमर्त्य सेन यांचा आहे, ‘विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?’, नावाचा. या वाक्यातील काळाबाबतचे व्याकरण मजेदार वाटले —- “आशा ‘असेल’ का?’, असा प्रश्न आहे, “आहे का?” असा प्रश्न नाही ! सेन यांचा लेखही ठामपणे आशावादाला थारा देणारा नाही.)

प्रगती होते आहे की नाही हे तपासायला तुटवड्यांचा विचार करणे, तुटवड्यातली घट मोजणे, हे गर्भश्रीमंतीत होणाऱ्या वाढीच्या विचारापेक्षा जास्त चांगले.

पुढे वाचा

फिटम् फाट: तस्लीमा नासरीनची कादंबरिका

तस्लीमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम ८७ पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळेच वाढवलेला. पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.

तस्लीमा ‘लज्जा’मुळे प्रकाश झोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी ६ महिने प्रकाशित झालेली. ‘फिट्टे फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’–‘सूड’ ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला. ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या ५ आवृत्त्या निघाल्या होत्या.

पुढे वाचा

विवेक म्हणजे काय?

‘विवेक’ हा शब्द ‘reason’ या इंग्लिश शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरत आहोत हे आमच्या वाचकांना माहीत आहे. Reason’ या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून ‘बुद्धि’ हा संस्कृत शब्द वापरला जातो हे खरे आहे. पण ‘बुद्धि’ या शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे तो शब्द वापरणे आम्हाला गैरसोयीचे वाटते. शिवाय आगरकरांनी ‘Rationalism’ ला समानार्थी म्हणून ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला होता. त्यामुळे ‘विवेकवादी म्हणजे rationalist’ हे आम्हालाही अभिप्रेत आहे याचे वाचकांना स्मरण देऊन या लेखाच्या विषयाकडे वळतो.
या लेखाचा विषय आहे ‘विवेक म्हणजे काय?’ याचे उत्तर विवेक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये “reason” म्हणतात ते’ हे उत्तर वर येऊन गेले आहे असे कोणी म्हणेल.

पुढे वाचा

लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?

‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ हा मुळी कधी प्रश्नच उपस्थित झाला नाही. त्याचा स्त्रीच्या अस्मितेशी काही संबंध आहे अशी जाणीवही होऊ नये इतकी ती अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. मग त्याचे वेगवेगळे कंगोरे बोचू लागणे ही गोष्ट दूरच! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषाच्या अधीन राहावे ही समाजमानसाने, मग त्यात स्त्रियाही आल्याच, पूर्णतः स्वीकारलेली गोष्ट असल्यामुळे पिढ्यानपिढ्या त्यात कुणाला काही वावगे वाटलेले नाही. परंतु गेल्या ५०-६० वर्षांत स्त्रीविषयक कल्पना भराभर बदलत गेल्यामुळे आणि स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागल्यामुळे स्त्रीची अस्मिता आणि स्त्रीचा समान दर्जा या जाणीवा निर्माण झाल्या.

पुढे वाचा